आदिलशाही, निजामशाही, बरिदशाही, इमामशाही व कुतुबशाही
भाग २
पोस्तसांभार : आशिष माळी
बहामनी साम्राज्याची शकले
बहमनी साम्राज्याचे मुख्य शत्रू हे विजयनगर साम्राज्य होते.त्याच काळात हरिहर आणि बुक्का यांनी स्थापन केलेले साम्राज्य विकसित होत होते. हसन गंगू ११फेब्रुवारी१३५८ रोजी मरण पावला. त्यानंतर त्याचा मुलगा मुहंमदशहा गादीवर आला.१४२५ मध्ये बहमनींनी आपली राजधानी गुलबर्गा वरून बिदर येथे हलवली.याच नंतर तिसर्या मुहंमद शहाच्या वेळी त्याचा मुख्यमंत्री महमूद गवां याने अमुलाग्र बदल घडवून आणले.महम्मद गवान ह आतिशय हुषार. त्याने राज्याचे विभाजन आठ सरलष्करात( सुभ्यांत) केले.राज्यव्यवस्थेमध्ये महमूद गवां च्या तरफदारांचाचं दबदबा होता बहुतांश मंत्री हे त्यांचे बाजूने होते,विरोधकांनी महमूद गवां बद्दल मुहंमद शहाचे कान भरले व त्यामुळे त्यास फासावर चढवण्यात आले.
या घटणे मुळे राज्यात अस्थिरता निर्माण झाली व अंतर्गत बंडाळीस सुरुवात झाली. मध्यवर्ती सत्ता कमजोर बनताचं सुभेदार चे वर्चस्व वाढले आणि अखेरीस हे स्वतंत्र होऊन बहमनी साम्राज्याचे पाच स्वतंत्र शाह्यांत रुपांतर झाले.
)सर्वप्रथम १४८४ ल बेरार वेगळं झालं.
२) त्यानंतर १४९० ला विजापूर युसूफ आदिलशहाद्वारे वेगळं करण्यात आलं व त्या शासनास आदिलशाही असे संबोधले जाते.
३) १४९० ला मलिक अहमद ने अहमदनगरचा स्वतंत्र तख्त स्थापन केला व त्या शाहीस निजामशाही म्हणून संबोधले गेले.अहमद निजाम शहा (१४९०-१५१०) याने राज्याचा विस्तार कोकणात चौल-रेवदंड्यापर्यंत, उत्तरेत खानदेशापर्यंत तर दक्षिणेत सोलापूरपर्यंत केला
४)१४९२ मध्ये काशिम बरीद ने बिदर वेगळे केले व त्याने बरीदशाही म्हणून आपला कारभार चालवला.
५)सर्वात शेवटी १५२२ मध्ये कुलीशहाने गोवळकोंडा वेगळा केला, व त्या शाहीस कुतुबशाही म्हणून संबोधले गेले.हैद्राबादचं चारमिनार कुली कुतुबशहानेचं त्याच्या कारकिर्दीत बनवून घेतलं.
बहामनी राज्य व नंतरच्या पाच शाह्या यांचे महाराष्ट्राच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे.
बहामनी वंशाची सत्ता पंधराव्या शतकात सबंध महाराष्ट्रावर प्रस्थापित झालेली होती. बहामनी राज्यकारभारात परदेशी मुसलमानांचे वर्चस्व होते. सोळावे शतक त्या सर्व मुस्लिम राज्यांच्या आपापसांतील लढायांनी भरलेले आहे. विजयनगरच्या वाढत्या सामर्थ्यामुळे त्या राज्यांना शह बसला, पण सर्वांनी एक होऊन विजयनगरचा मोठा पराभव केला. त्यामुळे एक विशाल साम्राज्य नष्ट झाले आणि इतिहासाला कलाटणी मिळाली.
No comments:
Post a Comment