आदिलशाही, निजामशाही, बरिदशाही, इमामशाही व कुतुबशाही
भाग १
पोस्तसांभार :आशिष माळी
बहामनी साम्राज्याने केलेल्या अन्यायामुळे मराठा स्वराज्य निर्माण ल सुरुवात झाली अस म्हटले तर गैर ठरणार नाही. या पाच शाही मधील तीन शाही तर औरंग्याने स्वतःच्या हाताने संपवाल्या. (आदिलशाही, कुतुबशाही आणि बरीदशही) . या पाच शाह्यानी मिळून विजयनगर चे हिंदूंचे साम्राज्य संपवले .
पूर्वेतिहास
१३३७ मध्ये दिल्लीतील मुहंमद तुघलक काळात अनेक मुस्लिम सरदार बंड करू लागले.त्यात इस्माईल मख नावाच्या सरदाराला सुलतान पदास आवाहन दिले .ते बंड मोडायला मुहंमद तुघलक मोठ्या फौजेनिशी दख्खन मध्ये उतरला.त्याने इस्माईल मखचा दौलताबादला हरवले .पण त्याचं वेळी उत्तरेत देखील बंड चालू झाले आणि त्याला तिकडे जावे लागले.त्याची काही फौज दख्खन येथे राहीली.तेंव्हा सरदार हसन गंगू याने त्या फौजेचा पराभव केला.तेंव्हा इस्माईल मख ने सुलतान पद सोडले व सर्व सरदारांनी मिळून हसन गंगू ला सुलतान म्हणून घोषित केले.
मुळ बहामनी सत्तेचा उदय
हसन गंगू ने अबुल मुझफ्फर अल्लाउद्दीन बहमनशाह हे नाव धारण केले.आणि ३ आॅगस्ट १३४७ ला बहमनी साम्राज्याची स्थापना करत त्याने स्वतःला दक्षिणेचा सुलतान म्हणून घोषित केले.त्याची पहिली राजधानी ही कर्नाटकात गुलबर्गा येथे होती. काहींच्या मते म्हणजे तबकात-इ-अकबरी या ग्रंथानुसार इस्फंदयारचा मुलगा बहमन व त्याचा मुलगा हसन गंगू. काहींच्या मते इराणचा प्राचीन राजा बहमन याचा हसन गंगू हा त्याचा वंशज होता.तर काहींच्या मते हसन गंगूचा मालक एक ब्राह्मण होता म्हणून त्याने बहमन हे नाव धारण केले असावे.त्याने कल्याणी ,बिदर, गुलबर्गा या क्षेत्रात राज्यविस्तार केला.
त्याची सत्ता उत्तरेस मंडूपर्यंत म्हणाजे नर्मदा नदीपासून , दक्षिणेत रायचूर पर्यंत पुर्वेला भोंगी पर्यंत व पश्चिमेस दाभोळपर्यंत प्रस्थापित केली होती.
त्याने राज्यकारभार सुरळीत चालवण्यासाठी आपल्या साम्राज्याची गुलबर्गा, दौलताबाद ,बरार व बिदर या चार सुभ्यात विभागनी केली आणि तिथेच या बहामनी साम्राज्याची दुहीचे बीजे रोवली गेली.
No comments:
Post a Comment