विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 12 September 2026

रास्ते घराण्यातील शिक्का 🚩🚩🚩

 



रास्ते घराण्यातील शिक्का 🚩🚩🚩
सदर शिक्का मोर्तब याचे महत्व त्या व्यक्तीच्या इतिहासातील कामगिरीवर लष्करी व मूलखी कारभारातील योगदानावर आधारलेला असतो यासाठी अगोदर ज्या सरदारांच्या शिक्का आहे त्यांच्याबद्दल इतिहासातील काही महत्त्वाच्या ऐतिहासिक पत्रातील नोंदी वाचूया
. ५५२ (८७०) फिरंगी गोवेकर याचा व सरकारचा तह सन समानीनांत जाहला,
खमस समानीन
मया व अलफ लगते सरकारांतून द्यावे, याप्रमाणे करार जाहला, परंतु गांव दुमाला
ते समई फिरंगी यास बारा हजार रुपयांचे कमाल बेरजेचे गांव दवण. सफर २४ जाहले नाहीं, सबब सदरहू बारा हजाराचे कमाल बेरजेचे गांव नेमून देऊन गांव याल त्याची याद तपसीलबार हुजूर पाठवणे अणोन, आनंदराव भिकाजी, व त्रिंबक भिकाजी मामलेदार तालुके वसई यांस, सन सलास समानीनांत सनद सादर जाहली, त्याजवरून त्यांनी सन अर्बा समानीनांत परगणे नगर हवेली, प्रांत रामनगर, तर्फ मजकूर,. या महालपैकी सहा गांव, व जकात दरोबस्त सरकारांत ठेऊन बाकी गांव बसाहती व बोस सुद्धां बारा हजार रुपयांचे ऐवजी नेमून दिले, त्याची याद हुजूर पाठविली, त्याप्र माणे परगणे मजक्र‌पैकी सहा गांव, व जकात सरकारांत ठेविली त्याची जमा वजा करून बाकी गांव, व सेत, व उज्याढ सुद्धां बारा हजार रुपयांची बेरीज भरून, अजमासास जमा धरून, नेमून दिल्ही असे, त्यास बारा हजारांत सुटीचा व उज्याड गांबचा वगैरे आकार जमा धरिला आहे, परंतु त्याप्रमाणें आकार होणार नाहीं, तोटा बहुत आहे, याज-करतां कमाल बसुली बारा हजार रुपयांचा आकार लाऊन द्यावा ह्मणोन, नारायण विठ्ठल
बकील दिंमत फिरंगी गोंवेकर यांणी विनंति केली, त्याजवरून सालमजकूर सन खमस समानीनांत करार जाला की, बारा हजार रुपयांचे गांव द्यावयाचे, त्यास परगणे मजकूर हा महाल सरकार अंमल दरोबस्त, देखील जकात्, लाऊन द्यावा, त्यापैकी पेशजी गौंव लावून दिल्हे आहेत, ते वजा करून बाकी राहिले गांव व जकात याप्रमाणें देविले असे, तरी बारा हजारांत परगणे मजकूर दरोबस्त महाल ज़कातसुद्धां सालमजकुरापासून फिरंगी याचे दुमाला करून पावलियाचे कबज घेणे. परगणे मजकूरचे सत्तेचाळीस गांव सन अबीत 'फिरंगी याचे हवाली जाहले, त्या खेरीज परगण मजकूरचे गांव व जकातीचा सालगुदस्त सरकारांत बसूल आला असेल, तो माघारा देविला असे, तरी हिशेबी जमा आला असेल तो पाहून त्याप्रमाणे माघारा देऊन कबज घेणें; व परगणे मजकुरी फिरंगी यांणी नवी इमा-रत कांहीं करूं नये. याप्रमाणें करार जाहला आहे, त्यास नवी इमारत करूं लागल्यास करू देऊ नये ह्मणोन, जिवाजी गोपाळ तर्फ वसई यांचे नांवें.
-------------------------------
५७४-८००) नवाब फत्ते अल्लीखान बहादर यांचे नांव जाब की तुझांकडे सन
मया व अलफ रजय ३
ठराव केला त्याचा भरणा.
११९५ हिजरी शके १७०३ प्लवनामसंवत्सरेचे पेषकसीचे ऐवजाचा रुपये
१०,००,००० गुजारत नूरमहमदखान हस्ते अच्यापा नाईक, गुमस्ते दिंमत राघवेंद्र नाइक जखाते.
अलाहिदा दिल्या आहेत. २,००,००० आनंदराव भिकाजी रास्ते याचे पथकास खर्चास देविले, त्याच्या बराता रुपये.
५०,००० कित्ता बरात सन इहिदेंत पेस्तर सालचे खंडणीचे ऐवजी
रुपये.
दिल्ही आहे ते.
रुपये.
१,५०,००० कित्ता बरात सन इसनेंत दिल्ही ते.
१२,००,०००
एकूण बारा लक्ष रुपये सदरहूप्रमाणे सरकारांत पोहोंचले असेत ह्मणोन. जाब १.
------------------------------
अर्थ समानीन
५७५ (३५) बाळाजी महादेव लवाटे हे कोळीयांचे मलईत मिळोन, जवारकर
मया व अलफ रबिलाखर
राणीचे निसबतीस राहून, कल्याण प्रांतांत वगैरे जागा दंगा करीत होते, सबब मशारनिल्हेचे मुलांमाणसांस जामीन घेऊन कतबा तुझीं
सुभा घेतला आहे, त्यास हल्ली जवारकर राणी आनंदराव भिकाजी यांचे नांवे
-----------------------------
एकूण व्या [य]शीं हजार अड्डठ्ठावन रुपये तीन आणे, पैकीं बजा दुमाले गांव देहे १८ निसबत अनंदराव निकाजी रास्ते यांजकडे तनखा रुपये २४७६३, बाफी तनखा रुपये.
५७२९४॥ ऐन.
१०७५ मुभा निसवत कलमे.
५८३६९।।
पैकी बजा आकार होत नाहीं, सबब तकूब रुपये १६३६८।। व्यास रुपये ४२००१ यासी इस्तावा सालें बीतपशील.
बरहुकूम गुदस्त.
४४००१ सन अर्बा सबैन सालमजकूर.
४२००१ बरहुकूम पेशजी.
२००० जाजती.
४४००१
४४००१ सन समस सबैन ४४००१ सन सीत सबैन बरहुकूम गुदस्त.
४४००१ सन सबा सबैन बरहुकूम गुदस्त.
१७६००४
एकूण एक लक्ष शहात्तर हजार चार रुपये पैकीं सन अर्वा चवेताळीस हजार एक रुपया, व सन खमस चवेताळीस हजार एक रुपया, सन सीत चवेताळीस हजार एक रुपया, व सन सथा चयेताळीस हजार एक रुपया, एकूण चौसाला मक्ता करार करून दिल्हा असे, तर सालबेसाल हप्तेबंदीप्रमाणें ऐवज सरकारांस पावता करून पावलियाचे जान घेणे. तेणेंप्रमाणें मजुरा पढेळ. सदरहू मामलतसंमंचे कलमें बीतपशील.
---------------------------
शिक्का हे सरदार आनंदराव भिकाजी रास्ते यांचे आहे सरदार
आनंदराव भिकाजी रास्ते हे पुण्याच्या इतिहासातील प्रसिद्ध रास्ता पेठेचे संस्थापक होते. ते साताऱ्याचे प्रसिद्ध सावकार भिकाजी नाईक रास्ते यांचे पुत्र आणि पेशवे बाळाजी बाजीराव (नानासाहेब) यांच्या पत्नी गोपिकाबाई यांचे सख्खे भाऊ होते.त्यांच्याबद्दलची महत्त्वाची ऐतिहासिक माहिती वरील प्रमाणे आहे:ऐतिहासिक योगदान आणि कारकीर्दलष्करी मोहिमा: त्यांनी माधवराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकातील अनेक महत्त्वाच्या लष्करी मोहिमांचे यशस्वी नेतृत्व केले.रास्ता पेठेची स्थापना: त्यांनी १७८५ मध्ये पुण्याच्या पूर्व भागात 'शिवपुरी' नावाच्या परिसरात एक नवी पेठ वसवली. ही पेठ पुढे त्यांच्या नावावरून 'रास्ता पेठ' म्हणून ओळखली जाऊ लागली.रास्ते वाडा: त्यांनी रास्ता पेठेत ११ ते १२ हजार चौरस मीटर परिसरात एक भव्य आणि मजबूत सरदार रास्ते वाडा बांधला. हा वाडा पेशवाईतील उत्कृष्ट लाकडी कोरीव काम आणि स्थापत्यकलेचा नमुना मानला जातो.धार्मिक वास्तूंची निर्मिती: आनंदराव रास्ते यांनी पुण्यात आणि वाई प्रांतात अनेक मंदिरे व घाट बांधले. त्यांनी रास्ता पेठेत ऐतिहासिक श्री लक्ष्मीश्वर महादेव मंदिर (१७८६) आणि गणपतीचे देऊळ बांधले. तसेच वाई येथे महालक्ष्मी मंदिर आणि कृष्णा नदीवर प्रसिद्ध घाट बांधले
वरील शिक्का एका मोडी कागदपत्रे माझ्या संग्रही आहे त्यात आढळून आले ..
यानंतर सादर शिक्का मोर्तब कोणत्या इतिहास प्रसिद्ध व्यक्तींचे आहे शोधात असताना..
या रास्ते घराण्यातील कागदपत्रे तील काही पत्र वाचण्यात आले म्हणून सरदार आनंदराव भिकाजी रास्ते यांचे शिक्का आहे हे दिसून आले
आपले
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य
संतोष झिपरे
९०४९७६०८८८

खोपडे देशमुख घराण्यातील महजर

 



खोपडे देशमुख घराण्यातील महजर

🚩🚩
कारकिर्दी छ १९ रजब सन इसकी रदिहे समासीन
भूद्ध ननमी रतीवासर विरोधकृत संवत्सर यया ब्द चांदजी बन गंगाजी तह नर सोजी बीन गोमाजी खोपडे देशमुख बीरादर ताा उत्तोमी रोहिडवोरे यास वेतनपत्त येसेने तुम्ही हुजुर + + + पूर्ण ओळ खराब + + + +
ओळ खराब
इना वाटणीचे गाउ दो देशमुखीचे पा ले व मौजे वरुडी खुर्द हे दोन्ही गान.. व पुस्त दर पुस्त न्यामत आले आहेत धेसीयास आपन त्तीम भा उ केदारजी बीन वाधोनी खोपडा थाचे नकाल जाले म्हणुन सेखोजी बीन. संबाजी खोपडा याने. थला मावीलाआहे की केदारजी भिन वा.. घोजी खोपडा मयत जाला तेव्हा त्याचे बायकोचे ओटीस आपणास आपले रूप बीमनी नाइक यांनी घातले आ हे तरी दोन्ही गाव देशमुखी तकसिम केदारजी मेन मौजे आयाने आपणासीक-
(* इसवी सन १७३१चा कागद)
इनाम जमीन मौजे पाले येथे तिस बि ये घे आहे तेथे ते आपणास देणे. जी वीन वाधोजी याचा वाचा दतपुहा आहे सर म्हणून कजीया सांगतो यैसियास बापली तकसिम मुलपुरुषापासुन आजी साहा सात डोया पावेतो वेगळी उ टली आहे त्याचे वाटणीचे कागदपत आ-पणा जवल आहेत आमच्या घरात ला भावाचे नकल जाले तरी त्याची त क्षीमेचे वतन आम्ही खाते येसिया अ सता सिनियाच्या घरातील से खोजी खोण्डा भांडलो तरी येविशी बरहक साहेब गोलमुखे धर्मताच्चाये (र्य ?) इनसाफ करून आपले वत न आपले दुमाला केले पाहीजे म्हणू न विनंती केली त्यावरून सखोजी भनू बींकजी खोपडे यास हुजुर मौजे नर ताा मजकुर आणुन त्या व तुम्हास कसबे सिखल येथे मुकामास
नेर लाग मजकुर
झाणुन त्यास तुम्हास कसबे सिवाल येथे गोलू नेउन नेमुन देउन तुम्हा हरदुजनारद सगोतात पाटविले त्यावरून गोलाने.
++ +++++ चूरगळ‌ला आहे + + + + + बहते होती ते गोताने पाट तकरीरा घेतल्या व यमास राजी असाल तरी निवाठीयाप्रमाणे वर्तावयाचे राजी-तर नाने वजामीन हठणे म्हणून गोता ने पुरसीस केली त्यावरून तुम्ही हरदु जणानी गोलमुखे निवाडा, होइन होइल त्या प्रमाणे वर्तावे पैसे रा-जीनामे व जामीन तुम्हास जमान राणो-जी ना। बांदल देशमु खता। हिरडस मावल क तब सिकियानीसी
सखोजी खोपडे खास नाईक बबंदल देश यास जमान मानाजी मुख बीरादर तो हिरड-समावल
येणे प्रमाणे जमान होउन जेष्ठ व-दय च्यातिदिखसीस गोत ही चे देवालई मंड‌पान बैसोन ले (वेलेस) स पुरसीस केली सखोजी खोपडे यानी गोताचा कागद पुत्त्रपणा यास केदारजी खोपडे दय
थाना न्चे देवालई मंड‌पात बैसोन ते (वेले) स पुरसीस केली सखोजी खोपडे जी गोलाचा कागद पुत्रपणा न्या व मौजे पाले येथे केदारजी खोपडे यास इनाम जीमीन बीही तीरस था-चे राजपत्ते दाखतीली त्यानी त्यावरी त्या-स पुरसीस केली कि हा वेव्हार तुमन्चे वडिली भावीला कि तुम्ही भाविता त्यावरून तुम्ही बोलीलेत कि आपले बाप गंगाजी खोपडे वन्धुमते सुलतानजी खोपडे हे चंजीस राजची स्वामी भनीध होते घरी नरसोजी मेन गोमा जी खोपडा होता त्याने आपल्या ब-पास व चुलत्यास वर्तमान सांगोब-न पाटविले बिंबाजी खोपडे यांनी आपला पुत्त सखोजी केदार-जी
* गंगाजी खोपडे व सुलतानजी खोपडे राजाराम महाराजांबरोबर जिंजीस (चंजीस / -चंदीस) होते.
* जी खोपडा मेलीयावरी बाईकोचे वोहीयात घातला म्हणून वर्तमान सांगीन पाटवीले त्यावरून सुनतानजी खोपडे याणी किल्ले प्रतापगड न्चे मु कामी रजश्री स्वामी व मातुची आईसाहेब यान्चे रजपत्त राज ची शंकराजी पंतसचीव यांस आणीले व राजनी शामजी हरी, सुभे दार प्रोत् मावल यांजपासी वेव्हार म्हणून बेसीले
भाविला जाला नाही
म्हणून नेलीलेत त्यावरून गोत बोली ले कि बोलता तैसी पत्ते दाखवीने त्यावरून तुम्ही प्ते दाखवीली राजपत्र येक वनिल्हेन्ची व सुभे ची पत्ते ४ चार चेकुन पाच दाखवीली ती पत्र पाहीन गोलाने सखोजी खोपडे यास पुसीले की गोलपत्र तुम्हाजवळ आहे त्यावरी तुम चे कप ना 'नाइक याचा सिला आहे व खंडोजी खोपडे याचे नावे लिहीले आह
ििमहीले आहे. आाणि नावा खाली सिका लागे सबब केला नाही
दस्तुरी सालीत दोन दस्तुर आलेत व इनामपत्त संभाजीच्या नावाचे मौजे पालचे आहे त्त्याल नाव चित आहे जैसी दिक-कायू लिा. फिरोन सेखोजी, खोपडे कत काय धारा पुसीले कि गोत पत्ता प्रो राजमुद्रे‌चे पत्र पुत्रापणाचे दाखवणे राजमुद्रे व गेलगोलपत्र देत नाही त्यावरी सखोजी खोपडे बोलीला की शोध करून पत्ता असीले तरी हा-खवीतो त्यावरी गोत देवाम्यईहून -वे गातात गेले दूसरे दिवसी मजालिस केली तेव्हा सखोजी खोपडे यास पुसीले की राजमुद्रेचे पत्र शोध करून दाखवितो म्हणून बोलीलेत ते दाखवणे त्यावरी सखोजी बोलोला जे पत्त येथे आपणापासी नाही गावी अत्योन तरी शोध करून येउन अपणास निशख देणे
निशख देणे त्यावरी गोत बोलीले कि सिखान आंबाडे दुर नाही तीन दिवसा न परत आणुन देणे त्यावरी नरसिंगराव व बाजी व सखोजी, ओलीले कि कागदाच्या शोधान पंधरा खोपडे दिवम् सवलत देणे त्यावरी सखोजी खोपडे यानी गो लाक पसी बाईदे रोखा ब पंधरा दिवसी चे मुदतीचा लेहून चिल्हा त्या हर-हुजनास गोलाने निराख दिल्हा जा शास देउन गोलाजवलू हाजीर होणे तो पौर्णिमेस विं-भजी नाा खोपडे यांनी गोतास. पाटविले कि सेखोजी खोपडे उभयेतानी
कागद
दिल्हा आधिक
येसे याचा विचार मनास आणि त्या पाहिजे म्हणून अभि पत आले.
मुदतीस तुम्ही हजार जालेत गोला ने तुम्हास तीन दिवस सिखली पाहून घेऊन कागद बिलजी खोपडे यास
पाटविले कि चांद‌जी खोपडे घास हजर होउन तीन दिवस जाले तरी से खोजी खोपडे यास पाटउन देणे न येत तरी जाला करीना राजची पंता कडे लेटून पाटवुन त्याचे उत्तर आले कि सखोजी खोपडे सातशियाईस गेले आहेत तेथुन भात्मीयावरी पाटवून देऊन पैसे पत्त आलीयावरी तुम्ही गो तास बेलीला कि आपला वाढ्या सातारी याय गेला आहे आपण येथे राहुन काय करावे जाल्या करीनीयाचा कागद विचारास आले तरी लेटून देणे आम्ही सातारीयास जाउन येसे तुम्ही बेलील्यावरी गोताने (+ + दिसत नाही ++) न्ची बखर तुम्हाजवल लेटून दिल्ही दुसरा कयास गोताने निहोला कि ज्या-णी पुत्त्र दिल्हा त्यांनीच लिहुन हिल्से पट‌विले कि. त्यांनी लिहीले तरी पैसे त्यास कलत असता असताते वडिल सिमियाचे खावंद पुटा बरादर भावास. येथे त्या + + + हाडी पडुन फाटाने आहे + + + + - तुम्ही हुजुर सातारियाच्या - मुकामास आलत भाणि सदरहू बखर व पुर्विल पत्ते आणून दाखविली व पु रातन तुमच्या वडिलाचे वेळाचा वा टणींचा मटजर आणून दाखवीला त्या मधे वडिल मुलपुरुष‌खामोजी व अंतोजी नाा दोघे त्यास वडिल खेलोजी याचे संतान नाही दुसरा अंतोजी यास बयेका च्यार यांस संतान कतपसील वडिल बालाईचालक बाकी गोजाई चे लेक हिरोजी विंवाजी नाा याचा वडिल दुसरी बायको गो जाई इला मिनु छ पैकी वडिल धर्माजी १ वडिल यमजी याचा वंश नरसाजी बी गोमाजी हजार १ दुर्गेजी याचेनक कल जाये दुसरा
थागे हिरोजी
पिलाजी याच नकाम
नकल जाले तिसरा
कियाच्या घरात राहिला तररी
चौथा खेलोजी या
वंश मालोजी बीन खंडोजी
च वंश केदारखी भी
वाघोजी याच नकल जाय
बाझारेकर
यास वाटणी सिका
पाचवा मलजी याचा वंश चांद
वडिलपण दरोबस्त
जी भन गंगाजी
हजारे
दशमुखी भावाचे ती
न गाव खेरीज करून कुलम
चवथी
6 जिससे बाईको जा नाई इज‌ला भिक
याँस वाटणी दिल्टी
6 इसाफ त पैकी रकम टके १२
जीयास कुलम
१ मौजे आंबवडे व वरोडी
१ मैजे नाझरे इसा फल पैकी सत
खुर्द येथील
ए टके इकलम,
मौजे गोकवडि येथील हक उप्त
मौने
१ मौजे खानापुर पैकी
न्न का अंबाडे व बजे करोज प्रा२
खाचर
आहे कालम
घ्यावे कलम
सदर प्रमाणे वाटणीचा महत्तर
स.महजर माणुन दाखवीला त्यावरी त्यखोजी खोपडे यास पुरसीम केली कि तुम्ही सिखालच्या गोतात
वायदे रोखा पंधरा दिवसाचा रोजाचा लेहून दिल्हा कि पुत्तपणा-चे राजमुद्रेचे पत भा-गुन दाखवीतो नसलो तर मु छतीस हाजीर होउन पैसा गोतात कागद लेहून दिल्हा आणि मुदतीस एकागदनसी गोतात हजार जाम्ये नाहीत तरी तुम्हाजवल राजमुद्रेचे पत्त पु अपणाचे असेल ते दाखवणे व खंडोजी जी नाा खोपडे याच्या नावाखाले सि-का गोतपत्तावरी काय सबब नाही व गोतपत्तात सिखलेच्या गोलाने हिकत काढीली कि येक दस्तुरी पत्त याचा मजकुर काय तो सांगणे व पा त्याच्या इनामाच्या पत्रात नाव चि त्त केले आहे त्याचा मजकुर काय येसी सेखोजी खोपडे यास पुरसीस केली त्यावरी सखोजी खोपडे याणी तकरीर केली जे राजमुद्रेचे पत्त आपणाजवल जवल नाही
जवल नाही. गोलात हजारे जालो नाही सबब सबब कि या पत्तावरून गोताने आपणास खोटे पैसे म्हटले खे डीजी ना याच्या सिकियाचा मज-कुर तरी खंडोजी नाा आपले घरी होन. आपला कारभारी सोनजी नार कर पाटउन गोही घालवीली यामुळे सिका बाही, जाला नाही गोतपत्त येक दस्तुरी व इनामाचे राजपत्त व सरेणीचे पत यादाही पक्षात नाव न्चीत केले
याचा मजकुर तरी आपण धाकटा अ डियावर डिवावरसाचा होतो आपले वडिल्ली +++घडी पडली घेतले हे आपणास
ए अडिचा वरला चा
नाही वैसी तकरीर सखोजी खोपडे यानी केली त्यावरी तुम्हास व से-खोजी खोपडे यास हुजुर राजक्षी स्वामी सनीध नेउन उभे केले राजनी स्वामीनी हरदुजनाचा करीना मनास आवुन मजालसी-मते नीवाडा केला की बुडाल्या भावाचे वतन ज्याच्या घरातील भाऊ त्यांनी खावे आगर त्याचा पुत्त घ्यावा बीगदर भावाचा पुत्त ध्या वयास समंध नाही दूसरी गोली गोलप्त केले ते बीबाजी नाईक सिकीयाचे खावंद यानी यांनी भीडे ने करवुन भावाच्या व पाटीलाच्या गोव्या घातल्या त्याससखोजी ना। खोपडे यांचे लिक बालाजीना व अंबरींग यानी हुजुर येउन सां-गोहरी घालवीली नाही तिसरी ते इनामपत्त व सेरणीचे पत्र आमचे नावचीप्त केले आहे त्यावरून आवधे कागदपत सखोजी खोपडे याचे
गीतले की आपले बाप खंडोजी नाग नाग यांनी. यांनी सांगीन
पैसे जाणुन सखोजी खो आणि केदार-
पडे खोटे पैसे जी बीज वाघोजी याची छोटीगावी
ची देशमुखीन्ची तीस तधीक तुमचे दुमाला करवीली मौजे पाले येथील तीस बीधे इनाम सेत आहे ती सखोजी च्या दुमाला करवीला सबब की केदारजीची बायको गुनाई इचे पाल ग्रहणवीस पत्र वीस वर्षे सेखोजीने केमि म्हणून सेल देविले होते. फिरोन तुम्हास पुरसीस केली कि तुमच्या वाटणीश्व च्या महजरात मौजे आंबाडदेव मौजे व-रोड्री खुर्द आहे दोन्ही गाव लिहीले आहेत आणि तुम्ही मौजे पाले काये स बब घेलामा यैसी पुरसीस केली त्यावरी तुम्ही करीना विदीत केला की मौजे आंबाडे हा गाव आम्हाजवल
वाटणीचा महजर आहे त्यात आमचे वाटणीस लिहीला आहे. त्यास तो गाव बींबजी खोपडे याच्या वडि मानी आपल्याकडे ठेवीला त्याचा मुबदमा मौजे पालि हा गाव त्याचेह वाटणीचा होता तो आमच्या वडिलांकडे ला कडे दिल्हा त्या तागायत आ नभवीत आलो आहो दोन गावीची रकम हरखी आहे याप्रमाणे आप णास दखाम आहे. म्हणुन जाहिर केले हे मनास आणुन राजही स्वा मी तुम्हावरी कृपाळू हीउन मौजे पाले व मौजे वरोडी खुर्द दोन्ही गावीचा देशमुखीचा
उत्पन्न वं पंटी पासोडी व रा बंणूक व इसाफन मौजे नाझरे मौजे खानापूरचे खाचर पैसे सुदामत दामत प्रमाणे तुमचे दुमोला असे तरी तुम्ही आपले पैकी सेत रकम टके १२ पुत्रपौत्रादी वंशपरंपरेने सदरहू दोन गावीचे देशमुखी
बनुक व श्साफल मौजे नाझरे पैकी सेल रकम टके १२ मौजे खानापुरचे खम्चर पैसे सु दामत प्रमाण तुमचे दुमाला
4. असे तरी तुम्ही आपले सुदामत प्रश्रो पुत्रपौत्रादी वंशपरंपरेने सदरहू दोन गावीचे देशमुखी, ये वर्तन व व मौजे नाझरे पैकी सेन रकम टके भरा व खाचर मौजे खानापुर पैकी वतन अनभडन सुखरूप राहानेस दरह दाहीगाव देशमुखीचे व सैत बारा टके नाझरे पैकी व खा चर यास सखोजी खोपडे यास कथला करावयास समंध नाही येवीशी सखोजी खोपडे याजवल कागदपत्र असतील ते एक रद असे त केदारजीची बायको गुणाई
५. सखोजी को होती ते तुमचे तीजला अन वरच देउन सदरह वतनाची सेवा करून सुखरूप राहाणे तुम्हास वत तुम्हास वतबाबा -नाची सेवा पडले आणि बतनाचे उ-त्पन होते त्याने अवकात नाही चालत नाही याकरीता स्वामींनी कृपाळू होउन नु लन इनाम जमीन देउन वंशपरंपरेने चलवीले पाहिजे म्हणुन तुम्ही विनं ती केली त्यावरून मनास आणून स्वामी तु-म्हावरी तुम्हावरी कृपाळू होउन नुतन इनाम पड जमीन दुलफा कुलबाब कुल-कानू खेरीज हकदार करून तुम्हास व
तुमचे वंशपरंपरेने इनाम जमीन ने पाले +++माज मौजे +++ मौजे वरूडी येळून वीस बीघे दिल्हे ये विसी पहले
वतनपत्त १ (चार) रुपये 300 तीनसे१ देशमुख व देशपांडे
و गोवींद सामराज नामजाद देव कारकुन वर्तमान व भावी
२पंतसचिव
नुतन पत्ते इनाम
देशमुख व देशपांडे
१ देशमुख देश पांडे
१ सुभेदार
येकुन नउ पत्ते
देणे و गावास पत्रो
मोडी लिप्यंतर
..... मा श्री अतुल नरणवरे
आपले
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ विकास परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक संतोष झिपरे
९०४९७६०८८८
🚩🚩 इसवी सन १७३१ चा खोपडे देशमुख घराण्याचा मूळ महजर / निवाडा 🚩🚩
या महजराचा थोडक्यात सार
हा वाद आहे - रोहिडा खोऱ्याचे देशमुख खोपडे घराण्यातील दोन शाखांमधला.
पक्षकार:
१. चांदजी बिन गंगाजी व नरसोजी बिन गोमाजी खोपडे देशमुख - बीरादर तर्फ उत्तमी रोहिडवोरे
२. सखोजी बिन संभाजी खोपडे
वादाचा विषय : देशमुखी वतनाची दोन गावे
• मौजे पाले • मौजे वरुडी खुर्द
आणि मौजे पाले येथील ३० बिघे इनाम जमीन.
सखोजी खोपड्याचा दावा काय होता?
केदारजी बिन वाघोजी खोपड्याची नकल (वंश खुंटला) झाली, तेव्हा त्याची बायको ओटीपोटात होती, तिला आपल्या बापाने म्हणजे बिंबाजी नाईक यांनी आपल्या पोटात घेतले, म्हणजे दत्तक घेतले. त्यामुळे केदारजीच्या वाट्याची दोन्ही गावे आणि इनाम जमीन आपल्याला मिळावी.
चांदजी / नरसोजी पक्षाचा जवाब:
आमची वाटणी मूळ पुरुषापासून ६-७ पिढ्या आधीच वेगळी झाली आहे. त्याचे वाटणीचे कागदपत्र आमच्याजवळ आहेत. आमच्या घरातल्या भावाची नकल झाली तरी त्याचे वतन आम्हीच खातो. दुसऱ्या घरातला सखोजी भांडतोय हे चुकीचे आहे.
१. दोन्ही पक्षांना कसबा शिरवळ(सिखल) येथे गोतासमोर बोलावले.
२. गोताने - जेष्ठ-वृद्ध लोकांनी देवाच्या मंडपात बसून दोन्ही पक्षाच्या तक्रारी घेतल्या.
३. गोताने सखोजीला विचारले - तुझ्याकडे राजमुद्रेचे पुत्रपणाचे (दत्तक) पत्र आहे का? दाखव.
४. सखोजीने ५ पत्रे दाखवली - १ राजपत्र वनिल्हेंचे आणि ४ सुभ्याची पत्रे. पण त्यावर खंडोजी खोपड्याच्या नावाखाली शिक्का नाही, आणि दस्तुरीचा मजकूरही स्पष्ट नाही म्हणून गोताला शंका आली.
५. सखोजी म्हणाला - पत्रे गावी आहेत, शोधून आणतो. त्याला १५ दिवसांची मुदत देऊन वायदे-रोखा लिहून घेतला.
६. मुदतीत सखोजी हजर झालाच नाही. तो साताऱ्याला गेला होता.
७. शेवटी दोन्ही पक्षांना हुजूर छत्रपती शाहू महाराजांच्या समोर साताऱ्यात उभे केले.
छत्रपतींचा अंतिम निवाडा
राजांनी मजलस करून हा धर्मन्याय दिला:
१. बुडालेल्या भावाचे वतन ज्याच्या घरातील भाऊ असेल त्यानेच खावे, किंवा त्याचा मुलगा घ्यावा. बिगर घरातील भावाने पुत्र घ्यायला संबंध नाही. - हा मुख्य न्याय.
यामुळे सखोजीचा दावा खोटा ठरला.
२. गोतपत्र बिंबाजी नाईकांच्या शिक्क्याने भीडेने (बळजबरीने) करवून घेतलेले आहे.
३. सखोजीने केदारजीची बायको गुणाई हिचे पाळी ग्रहणाचे पत्र २० वर्षे दाबून ठेवले होते.
निवाडा चांदजी खोपडे यांच्या बाजूने लागला :
तुमचे मौजे पाले आणि मौजे वरुडी खुर्द दोन्ही गावांची देशमुखी, त्याचे उत्पन्न, पट्टी-पासोडी, राब, बनुक, इसाफत, मौजे नाझरे पैकी सेत रक्कम टके १२ आणि मौजे खानापूरचे खाचर - हे सर्व पुत्रपौत्रादी वंशपरंपरेने तुमचे दुमाला केले आहे. याला सखोजी खोपड्याने कसलाही कथला (हरकत) करू नये.
शिवाय राजांनी कृपा करून नूतन इनाम म्हणून मौजे पाले आणि मौजे वरुडी येथून २० बिघे जमीन कुलबाब कुलकानू खेरीज करून इनाम म्हणून दिली.
या निवाड्यासाठी एकूण ९ पत्रे दिली -
१ वतनपत्र, ४ देशमुख-देशपांड्यांना, १ सुभेदाराला, ३ गावांना पत्रे.
या कागदातून मिळणारी ऐतिहासिक माहिती:
• गंगाजी खोपडे व सुलतानजी खोपडे हे राजाराम महाराजांबरोबर जिंजीस (चंजीस) होते - ही फार मोठी नोंद आहे. महाराणी ताराबाईंच्या काळातील इतिहासाशी थेट संबंध. • किल्ले प्रतापगडचा मुक्काम, मातुश्री आईसाहेब ( महाराणी ताराबाई साहेब), शंकराजी पंत सचिव, शामजी हरी सुभेदार हिरडस मावळ - यांचा उल्लेख येतो. •
वाटणीची पद्धत - टके १२, आंबवडे, वरोडी खुर्द, नाझरे, खानापूर, गोकवडी.

छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या कडून सरदार गोविंदराव ढमाले यासी सरंजाम

 


छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या कडून सरदार गोविंदराव ढमाले यासी सरंजाम

**छत्रपती शाहू महाराजांकडून हुजूर पथकातील बारगीर सरदार म्हणून नेमणुकीस असलेल्या गोविंदराऊ ढमाले देशमुख यांना सरंजाम देण्यात आला.*
गोविंदराव ढमाले हे युवराज फत्तेसिंह राजेभोसले यांच्या दिंमतातील सरदार होते...
*त्या सरंजामाची व्यवस्था कशा प्रकारे केली होती, हे या पत्रातून स्पष्ट होते.*
*त्यांच्या सरंजामात पौड खोऱ्यातील पलसे आणि सीरगाव ही दोन गावे मुकासा म्हणून देण्यात आली होती.*
*याशिवाय सरंजामाच्या दुसऱ्या भागात नख्त स्वरूपात एकूण १०० रुपयांची तरतूद होती. त्यापैकी ५० रुपये तर्फ पौड खोऱ्याच्या हवालदारांकडून, तर उर्वरित ५० रुपयांची तरतूद देशमुखांच्या चौथाईतून व देसपांड्यांकडून करण्यात आली होती.**
## **गोविंदराऊ ढमाले देशमुख — पराक्रमाची पावती आणि सरंजामाची ऐतिहासिक व्यवस्था**
छत्रपती शाहू महाराजांच्या **हुजूर पथकात बारगीर सरदार म्हणून नेमणुकीस असलेले गोविंदराऊ ढमाले देशमुख** हे स्वराज्याच्या सेवेत कार्यरत असलेले मानकरी होते. त्यांच्या सेवेला मान्यता देत छत्रपती शाहू महाराजांकडून त्यांना **सरंजाम बहाल करण्यात आला**. या सरंजामाची रचना केवळ इनाम किंवा गावांच्या देणगीपुरती मर्यादित नव्हती; त्यामागे तत्कालीन राज्यव्यवस्थेतील **महसुली हक्क आणि आर्थिक तरतुदींची शिस्तबद्ध व्यवस्था** दिसून येते.
या सरंजामाचा एक महत्त्वाचा भाग **मुकासा** स्वरूपाचा होता. त्यामध्ये **पौड खोऱ्यातील पलसे आणि सीरगाव** ही दोन गावे गोविंदराऊ ढमाले यांना देण्यात आली होती. या गावांच्या महसुलातून त्यांच्या सरंजामाची एक बाजू पूर्ण होत होती.
याशिवाय सरंजामाचा दुसरा भाग **नख्त**, म्हणजे रोख रकमेच्या स्वरूपात निश्चित करण्यात आला होता. या नख्त तरतुदीची **एकूण रक्कम १०० रुपये** होती. त्यापैकी **५० रुपये तर्फ पौड खोऱ्याच्या हवालदारांकडून**, तर उर्वरित **५० रुपयांची तरतूद देशमुखांच्या चौथाईतून व देसपांड्यांकडून** करण्यात आली होती.
अशा प्रकारे **पलसे व सीरगाव या गावांचा मुकासा आणि १०० रुपयांची नख्त तरतूद** यांद्वारे गोविंदराऊ ढमाले देशमुख यांच्या सरंजामाची आर्थिक पायाभरणी करण्यात आली होती. या पत्रातून एका सरदाराला दिलेल्या सरंजामामागील **महसुली व्यवस्था, स्थानिक अधिकाऱ्यांची भूमिका आणि सरंजामदाराला उपलब्ध करून दिलेले आर्थिक साधन** यांचे महत्त्वपूर्ण दर्शन घडते.
**गोविंदराऊ ढमाले यांच्या सेवेला मिळालेली ही सरंजामाची मान्यता म्हणजे त्यांच्या राज्यसेवेचा ऐतिहासिक दस्तऐवजी पुरावाच आहे.** एका बाजूला हुजूर पथकातील बारगीर सरदार म्हणून त्यांचे स्थान, तर दुसऱ्या बाजूला गावांचा मुकासा आणि नख्त महसुलाची तरतूद—या दोन्हींच्या माध्यमातून त्यांच्या मानमरातबाला आणि सेवेला छत्रपती शाहू महाराजांच्या राज्यव्यवस्थेने दिलेले महत्त्व अधोरेखित होते.
मोडी लिप्यंतर:- अतुल रणनवरे
आपले
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक संतोष झिपरे

छत्रपती थोरले शाहू महाराजांकडून भापकर घराण्यास इनाम


 छत्रपती थोरले शाहू महाराजांकडून भापकर घराण्यास इनाम

🚩
!! श्री !!
राजमंडळ // कर्यात सासवड
इनामदार :- सरदार सुभानजी बिन गोंदजी भापकर
राहणार :- मौजे दिवे, कर्यात सासवड, प्रांत पुणे
इनामाचा तपशील :-
मौजे दिवे पैकी चावर १ जमीन इनाम म्हणून छत्रपती थोरले शाहू महाराजांनी आपल्या दरबारात सादर मोडी पत्राद्वारे प्रदान केली आहे.
स्थळ :- दिवे, प्रांत सासवड, कसबा पुणे
मोडी लिप्यंतर :- श्री. प्रदीपराव भापकर( मौजे कारंजे -चौधरी वाडीकर)
ऐतिहासिक पार्श्वभूमी :-
लोणी भापकर येथील सरदार भापकर घराणे हे छत्रपती शहाजीराजे महाराजांच्या काळापासून स्वराज्याच्या सेवेत आहे. त्याच निष्ठेची परंपरा पुढेही कायम राखली गेली.
छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या आगमनानंतर या भापकर घराण्यातील मंडळींनी महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मराठा साम्राज्याची निष्ठेने सेवा केली. त्यांच्या याच स्वामीकार्याचा गौरव म्हणून शाहू महाराजांनी त्यांना इनाम देऊन सन्मानित केले.
आजही दिवे गावात सरदार सुभानजी बिन गोंदजी भापकर यांचे वंशज वास्तव्यास आहेत. सदर भापकर घराणे हे मूळचे लोणी येथील असून, याच पराक्रमी भापकर आडनावावरून लोणी गावास 'लोणी भापकर' अशी ओळख प्राप्त झाली.
टिप - सदर मूळ मोडी कागदपत्र हे इतिहासाचा अमूल्य ठेवा आहे.
आपला,
संतोष झिपरे
संस्थापक - राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद, महाराष्ट्र राज्य

हिंदवी स्वराज्य ते मराठा साम्राज्य - चरणी तत्पर जवळकर घराणे निरंतर

 


हिंदवी स्वराज्य ते मराठा साम्राज्य - चरणी तत्पर जवळकर घराणे निरंतर

🚩
सिंहगड म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेतील सर्वात जुना साक्षीदार. या किल्ले सिंहगडाच्या घेऱ्यामध्ये असंख्य घराण्यांनी आपल्या पराक्रमाने हिंदवी स्वराज्य ते मराठा साम्राज्य अशी अविरत सेवा केली.
छत्रपती शहाजीराजांच्या काळापासून या परिसरातील अनेक घराण्यांचे उल्लेख विविध गावांच्या महजरांमधून आढळतात. यातीलच एक पुरातन आणि मानाचे घराणे म्हणजे मौजे खानापूर येथील जवळकर घराणे.
१. खानापूरचे जवळकर - एक पुरातन वतनदारी
खानापूर येथील जवळकर घराण्याची वतनदारी ही पुरातन काळापासून आहे. येथील पाटीलकी परंपरेने जवळकर घराण्याकडे आहे.
ऐतिहासिक महजरांमधून संताजी पाटील जवळकर यांचा उल्लेख शिवकालीन कागदपत्रांमध्ये स्पष्टपणे आढळतो. तसेच खानापूरमधील जाधव घराण्यासोबतही या घराण्याचा निकटचा संबंध महजरांमधून दिसून येतो. सिंहगड परगण्याच्या महसूल आणि संरक्षण व्यवस्थेत या घराण्याचे योगदान अनन्यसाधारण आहे.
२. थोरल्या शाहू महाराजांकडून इनाम आणि सरंजाम
छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या काळात एकनिष्ठपणे सेवा केल्याबद्दल सरदार अंतोजीराव जवळकर यांना खास इनाम देण्यात आले. याबाबतचे मूळ मोडी दस्तऐवज आज आमच्या संग्रहात उपलब्ध झाले आहेत.
शिवाय अंतोजीराव जवळकर यांना लष्करी सरंजाम देखील बहाल करण्यात आला होता, याचेही पुरावे त्या कागदपत्रांमधून मिळतात.
३. ऐतिहासिक मोडी पत्र - थेट पुरावा
आम्हाला प्राप्त झालेल्या मोडी पत्रातील मजकूर पुढीलप्रमाणे -
"अंतोजी जवलकर यांची येकनिष्ठ पण सेवा करीत आहे त्यास मौजे आलंदी का. कडूस प्रांत पुणे येथे जमिन पड चावर येक ईनाम दिले पाहिजे."
मोडी लिप्यंतर : मा. श्री. शुभमराव भोसले (लऊळकर)
या एका ओळीवरून दोन महत्त्वाचे निष्कर्ष निघतात :
अ) जवळकर घराण्याचे मूळ गाव खानापूर असून त्यांना चोराची आळंदी (ता. खेड, प्रांत कडूस) येथे इनाम मिळाले.
ब) खानापूर आणि आळंदी येथील जवळकर हे एकाच भाऊबंदकीतील आहेत हे यावरून सिद्ध होते.
४. पुढील संशोधन
किल्ले सिंहगडाच्या घेऱ्यातील असंख्य घराण्यांचा अज्ञात इतिहास अजूनही बाहेर येणे गरजेचे आहे. या घराण्याकडे असलेली सरंजामी आणि इनामाची कागदपत्रे आम्हाला सापडली असून सदर सरंजामीमध्ये कित्येक गावांचा समावेश आहे. त्याची सविस्तर माहिती आम्ही लवकरच पुराव्यासह प्रसिद्ध करू.
तळटीप;-:-
या निमित्ताने सिंहगडाच्या पायथ्याशी स्वराज्यासाठी झटणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात वीरांना मानाचा मुजरा.
याबद्दल ऐतिहासिक मोडी कागदपत्रे आपल्या कडे उपलब्ध आहेत
विशेष आभार :- अक्षयराव जाधव खानापूरकर
आपला,
संतोष झिपरे
संस्थापक - राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद, महाराष्ट्र राज्य
९०४९७६०८८८

मातोश्री राणाईबाई आनंदराव जाधव यांस छत्रपती कडून मौजे करंडी इनाम

 





मातोश्री राणाईबाई आनंदराव जाधव यांस छत्रपती कडून मौजे करंडी इनाम

🔥🔥
🚩🚩सरदार भवानजी जाधव 🚩🚩 सदर खालील दोन पत्रे हे यातील एक पत्र हे 17 59 मधले असून यात सज्जनगड येथील किल्लेदार असलेले भवनजी जाधव यांना पेशवा नानासाहेब यांनी लिहिले आहे व यात महाबळेश्वर येथील दिवाकर बट यांना सज्जनगडावरील असलेल्या अश्वथ पूजेच्या मानाप्रसंगी व उत्पन्न झालेल्या वाद संबंधात त्यांनी पुण्यात येऊन तक्रार केली असता यासंबंधी परंपरागत मान हा दिवाकर भटांचा असून यात वाद करणारे जोशी यास संबंध नाही असे पत्रात उल्लेख केला आहे तसेच यात किल्लेदार भवानजी जाधव यांना परंपरागत रित्या दिवाकर भटास असलेला मान सुरू ठेव ण्यास आज्ञा दिली आहे तर दुसऱ्या पत्रात लेखांक 272 मध्ये राणोजी शिंदे यांनी हे पत्र राक्षस भवन च्या लढाई वरून दिलेलं आहे यात मराठ्यांच्या विजयाची सूचना असून विठ्ठल सुंदर ठार झाल्याचा उल्लेख आहे तसेच बाबाजी जाधव म्हणजेच मानसिंगराव जाधव हे निजामाच्या वतीने लढताना ठार झाल्याचाही उल्लेख यात आहे तसेच यावेळी निजाम हा गंगातीरी म्हणजेच गोदावरी नदीच्या पलीकडे निघून गेल्याचाही उल्लेख यात येतो सदर दोन्ही पत्रातील सरदार भवनजी किल्लेदार हे कारडी या गावातले असून सोबत दिलेल्या वंशावळीत ते दिसून येतात सदर वंशावळ हे कारडी झरेवाडी कर जाधव घराण्यातील आहे यातील राणोजी शिंदे कोण हे शोधलं असता स्पष्ट होत नाही याबद्दल आणखीन संशोधन होणे गरजेचे आहे पण त्यांचा संबंध सज्जनगड किल्ल्याची आणि भवानजी जाधवांशी निश्चित आहे व ते स्वतः जातीने राक्षसभवनच्या लढाईत उपस्थित होते हे विशेष
________________
🚩🚩सज्जनगडावरील मानकरांची यादीत कारडी झरेवाडी कर जाधव 🚩🚩
पाठीमागे माझा अभ्यास दौरात कारडी व झरेवाडी या दोन्ही गावांना भेट देण्याचा योग आला यावेळी झरेवाडीतील जाधव घराण्यातील मंडळींच्या असणाऱ्या घरांच्या परिसरात एका घरासमोर एक तांब्याचा हंडा त्यात पाणी भरून ठेवलेला आमच्या बघण्यात आला होता आणि त्यावर जाधवराव हा उल्लेख असल्याचेही दिसून आलं यावेळी सदर जाधवराव उल्लेख या घराण्यात पुरातन काळापासून असल्याचा हा एक व शाश्वत पुरावा होता कारण सदर हंडा हा शंभर दीडशे वर्ष जुना असून तो एक वस्तुरूपी पुरावा या झरेवाडी कर घराण्यात आहे याबद्दलची पोस्ट सोशल मीडियाला चार-पाच वर्षांपूर्वी मी स्वतः टाकले आहेत याबद्दल खात्री करून घ्यावी सर्वांनी तसेच झरेवाडीतील याच घराण्याकडे वंशपरंपरागत सज्जनगडावर धनुष्यबाणाचा मान रामदास नवमीच्या पूजेस असतो व सज्जनगडावरील देवस्थानकडून सदर मान देण्यासाठी दरवर्षी मानकरी येऊन धनुष्यबाणाची पूजा करून मान देऊन जातात व येथील जाधव मंडळी सदर मान विधिवत घेऊन जातात सदर सज्जनगडावरील मानकरांची यादी या ठिकाणी देत आहोत हे विशेष.
सदर यादीत विविध घराण्यातील मानकरांची व त्यांच्या गावांची नावे उपलब्ध असून असून आजही ही सर्व गावातील मंडळी रामदास नवमी त्या ठिकाणी आपापला मान व विविध क्षेत्रात धारण करून पूजेसाठी जातात हे विशेष
--------------------------
🚩🚩सेनापती धनाजी जाधव उंब्रजकर🚩🚩
छत्रपती थोरले शाहू महाराज सातारा येथे आपला राज्याभिषेक करून घेतला खालील एक पत्र आमच्या वाचनात आले यात 1709 मधील छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या काळात सज्जनगड येथील विविध मानकरी घराण्याची यादी यात दिली आहे त्यात रामदास नवमी उत्साहाने साजरा करण्यारे घराण्यातील नावातच तत्कालीन विविध घराण्याच्या सोबत सेनापती धनाजी जाधव उंब्रजकर असा उल्लेख त्यात आला आहे तसेच आज घडीस व छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या काळातील उंब्रज येथे जाधवराव घराण्यातील एक शाखा वास्तव्यास असून तिथे इतिहास प्रसिद्ध आहे आणि आजही तिथे जाधव मंडळी इनामदार म्हणून ओळखली जातात आणि सदर पत्रात सेनापती धनाजी जाधव यांचा उल्लेख उंब्रजकर म्हणून आढळतो आणि सज्जनगडावर उत्सव साजरा करणारे यादीत धनाजी जाधव उब्रंजकर असे उल्लेख येत तर कारडी व झरेवाडी कर येथील जाधव हे सगळं इनामदार ही पदवी लावतात त्यांनी छत्रपती कडून तीन वेळा इनाम जमीन मिळाले इतिहासात नोंद आढळते. त्याअर्थे कारडी व झरेवाडी कर हे मंडळी धनाजी जाधव यांच्याशी संबंधित आहेत काय ? याचाही शोध घेतला पाहिजे 1709 मध्ये धनाजी जाधव उंब्रजकर यांना सज्जनगड येथील रामदास नवमी तील मानकरी म्हणून उपस्थित असतील आणि आजघडीस तो मान झरेवाडी कर येथील जाधव मंडळी असेल तर कारडी व झरेवाडी कर जाधव ही धनाजी जाधव यांच्या सेनापती घराण्यातील आहेत काय याबाबत सकल संशोधन व्हावं तसेच उंब्रज येथील जाधव मंडळीही धनाजी जाधवराव यांच्याच वंशातील आहेत काय या दृष्टीने ही सदर पत्र एक संशोधनाच्या दृष्टीने पाऊल म्हणून अथवा पुरावा म्हणून किंवा एक मार्ग म्हणून वापरल्यास इतिहासातील आणखी बऱ्याचशा गोष्टी या जाधव वश मंडळी बद्दल इतिहास बाहेर येईल.
पण एवढे निश्चित आहे की कारडी व झरवाडीतील जाधव मंडळींचा संबंध जाधव घराण्याची आहे कारण राणोजी शिंदेंनी पाठवलेला पत्रात बाबाजीराव जाधव उर्फ मानसिंगराव पैठणकर यांचे राक्षस भवन लढाईतील ठार झाल्याचा उल्लेख तसेच आनंदराव जाधव किल्लेदार अजिंक्यतारा यांचे महाराणी ताराराणी ने केलेली हत्या यावेळीही बाबाजी जाधवराव हे तेथे ताराबाईंच्या तंत्राने राहणारे म्हणून उल्लेख आहेत आणि ते सर्वश्रुत आहे तसेच 1709 च्या छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील यादीत धनाजी जाधव सेनापती उंब्रजकर असा उल्लेख हा संशोधनास वाव देणारा आहे या ठिकाणी तटस्थपणे संशोधन झालं पाहिजे सदर वंशावळीत आनंदराव जाधव व भवनजी जाधव यांचा उल्लेख आला आहे
!!सज्जनगड किल्लेदार येसाजी जाधव!!
येसाजी जाधव यांचाही उल्लेख या वंशावळीत आहे या येसाजी जाधवास रामराजे यांनी काही जमीन इनाम दिली आहे सदर येसाजी जाधव हे सज्जनगड येथे किल्लेदार असल्याची नोंद ही शाहू दप्तरी सापडते
_____
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक संतोष झिपरे 9049760888
____----______---__
🚩🚩 छत्रपती रामराजे च्या सुटकेसाठी बलिदान देणारे अंजिक्यतारा हवालदार सरदार आनंदराव जाधव. 🚩🚩
छत्रपती रामराजेंच्या राज्याभिषेकानंतर रामराजे हे छत्रपती महाराणी ताराराणी साहेब यांच्या कडून अनुकूल नव्हता पेशव्यांकडून अनुकूल होऊन कारभार पाहू लागले यामुळे महाराणी साहेब यांचा छत्रपती रामराजेंवर राग खूप झाला यावेळी चंपाषष्ठीच्या जीवना निमित्त रामराजेंना गडावर बोलवून त्यास कैद करण्यात आले छत्रपती रामराजे यांच्या ३रे पत्नी च्या वडील बुरांणजी मोहिते यांच्या कन्या होत्या सरदार बुरांणजी मोहिते त्यांच्यामार्फत पेशव्यांनी मध्यस्थी करण्यास सुरुवात केली व छत्रपतींची सुटका करून कारभार सुरळीत करण्यास प्रयत्न सुरू करण्यात आले यावेळी मातोश्री छत्रपती ताराराणी साहेब यांना संशय आल्याने त्यांनी हवालदार आनंदराव जाधवांसह अनेक लोकांना ठार मारली हे सरदार आनंदराव जाधव हे अजिंक्य तारा किल्लाच्या पाठीमागे असलेल्या कारडी गावातील वतनदार व छत्रपती शाहू महाराजांच्या विश्वासातले म्हणून ओळखले जाणारे तसेच मानसिंगराव उर्फ बाबाजी जाधवराव पैठणकर यांचे ते भाऊबंद असल्यामुळे बाबाजी जाधवराव आहे महाराणी ताराबाई साहेब यांच्या विश्वासातले होते यावेळी स्वतः अजिंक्यतारावर व ताराराणी सरकार यांच्या बाजूनी खिंड लाढवते होते छत्रपती रामराजांच्या सुटकेस प्रयत्न केल्याचा संशय मुळे छत्रपतीं ताराराणींच्या हातून आलेलं
बलिदान हे आजही कारडी कर जाधव घराण्यातील मंडळी अभिमानाने सांगतात या सरदार आनंदराव जाधव यांची समाधी मस्तकासह कारडी गावातील भैरवनाथ मंदिराच्या डाव्या हाताला असलेल्या वृक्षाखाली होती पण काही वर्षांपूर्वी भैरवनाथ मंदिराच्या सुशभीकरणात सदर समाधी काढून टाकण्यात आली स्थानिक समाधीचे महत्व आणि इतिहास माहीत नसल्याने हे आयोगाने घडलेलं कृत्य आहे दुर्दैवाने महाराष्ट्रात असे अनेक मंदिराच्या परिसरातील समाध्या काढून टाकून सदर मंदिर परिसर सुशोभित करताना केला जात आहे आजघडीला ही शोकांतिका आहे पण सदर समाधी पुन्हा बांधण्याची किंवा मूळ ठिकाणी उभे करण्याची मानसिकता तेथील जाधव मंडळींनी दाखवावे असे आम्हास वाटते आनंदराव जाधव यांच्या बलिदानाची हकीकत अशी
आईसाहेबांकडे मध्यस्थी करून कलह मिटविण्याची कामगिरी पेशव्यानें बराणजी मोहित्यास सांगितली, त्यावरून त्याने कळविलें, "आम्ही आपल्या आज्ञेप्रमाणें मातुश्री व महाराज यांचे भेटीस जावें तर त्या उभयतांची चित्त- शुद्धि दिसोन येत नाहीं. आम्हांस भेटीस यावें म्हणोन त्यांचे हुजरे आले आहेत. आपण सांगाल तेणेंप्रमाणें वर्तणूक करूं." म्हणजे सर्व जाणत्या माणसांना महाराणी ताराबाईची शाश्वती वाटत नव्हती. समेटाच्या वाटाघाटी चालू असतां संशया- वरून धरपकडीचीं कृत्यें ती करीत होती, हवालदार बगैरे मंडळीशों पुरंदरे यांनीं बोलणीं चालविल्याचें ताराबाईस समजतांच "किल्ल्याचा हवालदार आनंदराव जाधव यास खलबतास म्हणून बोलावून त्याचा तिर्ने ता० १६ जुलई, स. १७५१ रोजीं शिरच्छेद करविला. त्यावरोवरच लोक व सरदार बगैरे फार मारिले. त्यावरून लोक अत्यंत भयभीत झाले. *
________________
🚩🚩 मातोश्री राणाईबाई आनंदराव जाधव🚩🚩
अजिंक्यतारा किल्ल्यावर हवालदार असणारे सरदार आनंदराव जाधव यांची हत्या महाराणी ताराबाई साहेब यांनी केली पुढे छत्रपती रामराजांच्या सुटकेनंतर छत्रपती रामराजे यांनी आनंदराव जाधव यांच्या पत्नी शी जमीन इनाम करून दिली व त्यांच्या बलिदानाचे सार्थक केलं पण पण तेथील वरातदार त्या इनामस वरात लावत असल्याने तक्रार त्यांच्या पत्नीने केली यावर छत्रपती रामराजेंचे एक पत्र शाहू दप्तरी आहे त्यात आनंदराव जाधवांच्या पत्नीच्या जमिनी वरात लावू नये असे स्पष्ट उल्लेख त्यात आहे त्यांच्या पत्नीचे नाव मातोश्री राधाबाई आनंदराव जाधव छत्रपती घराण्याच्या लोककीला साजन असेच असंच धोरण छत्रपती रामराजेंनी स्वीकारल्याचं या ठिकाणी दिसते खरं आपल्यासाठी बळी देण्यासाठी कुटुंबाचा पुढे चालवले पाहिजे म्हणून छत्रपती रामराजेंनी त्यास इनाम दिले मुळात रामराजे बद्दल लिहिताना इतिहासकारांनी अनेक टीका केल्या आहेत पण छत्रपती च्या रक्तातला" रयतेस पोटात लावणी आहे" हे धोरण रामराजेंनीही सुरू ठेवले याठिकाणी वरील मोडी पत्र उपलब्ध आहे तो असे
श्री
संताजीराव व राजजी व नारायण व लक्ष्मणराव बिन जानराव जाधव यांनी हुजूरास पुणे मुक्कामी येऊन विदित केले की,
मौजे करंडी ता. सातारा हा गाव आनंदराव जाधव यांजकडे इनाम होता. त्यास आनंदराव मृत्यू पावले, यापरी त्याची बायको राणाई जाधव इजवर कैलासवासी मातुश्री आईसाहेब कृपाळू होऊन श्रीमंती पूर्ववत प्रमाणे गाव इनाम करार करून देऊन पत्र करून दिले. त्याप्रमाणे राणाईकडे गाव इनाम चालत आहे. त्यास आनंदराव जाधव याचे पाठी पुत्र संतान नाही, सबब राणाईने भगवानराव जाधव दीर यांचे चिरंजीव नारायणराव जाधव आपले बाप यास आनंदराव मृत्यू पावले यापरी दत्तक घेतले.
ते सन खमसैन [साल] श्रीमंत राजश्री दादासाहेब यांचे ठायी एकनिष्ठ सेवा चाकरी गुजराथ प्रांती सरकार कामावरी हजर झाले व राणाई साल मजकुरी मृत्यू पावली.
असता साहेबी कृपाळू होऊन राणाईकडे गावचा इनाम चालत आला त्याप्रमाणे आपल्याकडे इनाम करार करून दिला पाहिजे. त्याजवरून मनास [आले की] ता मौजे मजकूर हा गाव आनंदराव जाधव मृत्यू पावले यापरी याची...
येथे पुढील पाने फाटलेली दिसतात.
या कागदाचा सारांश काय आहे?
हे एक वारसाहक्काचा अर्ज आहे.
पात्रे:
• मूळ इनामदार: आनंदराव जाधव - मौजे करंडी, ता. सातारा • त्यांची पत्नी: राणाई जाधव • दत्तक पुत्र: नारायणराव जाधव ( भगवानराव जाधव यांचा मुलगा) • अर्जदार: संताजीराव, राजजी, नारायण, लक्ष्मणराव - हे चौघेही नारायणराव जाधव यांचे पुत्र व जानराव जाधव यांचे नातू आहेत.
घडलेला क्रम:
१. करंडी गाव आनंदराव जाधव यांना इनाम होता.
२. आनंदराव वारले. त्यांना मुलगा नव्हता. म्हणून कैलासवासी मातुश्री आईसाहेबांनी (महाराणी ताराबाई साहेब सरकार) कृपा करून तोच गाव राणाईबाईंकडे पूर्ववत चालू ठेवला.
३. राणाईबाईंनी आपले दीर भगवानराव जाधव यांचा मुलगा नारायणराव याला दत्तक घेतले.
४. हा नारायणराव सन खमसैन मध्ये श्रीमंत दादासाहेब (पेशवे) यांच्या सेवेत गुजरात प्रांतात सरकारी कामावर हजर झाला.
५. याच साली राणाईबाई पण वारल्या.
६. आता नारायणराव यांचे चार पुत्र (अर्जदार) पुण्यात हुजूरासमोर येऊन विनंती करत आहेत की, "राणाईकडे जसा इनाम चालत होता, तसाच तो आमच्याकडे करार करून द्यावा."
कैलासवासी मातुश्री आईसाहेब असा उल्लेख आहे. सातारा गादीच्या संदर्भात हा उल्लेख सहसा महाराणी ताराबाई, राणीसाहेब यांच्यासाठी येतो. नंतर पेशव्यांनी त्याला मान्यता दिली. श्रीमंत दादासाहेब म्हणजे बहुतेक थोरले बाजीराव पेशवे किंवा रघुनाथराव दादासाहेब पेशवे.
करंडीकर व जिरेवाडीकर
जाधव हे मराठेशाहीचे जुने सरदार. अशा प्रकारचे गाव इनाम हे सहसा
• लष्करी चाकरी / सरदारकी बद्दल, • वतनदारी म्हणून, • किंवा एखाद्या मोहिमेत केलेल्या पराक्रमाबद्दल दिले जात असे.
करंडी हे सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचे गाव आहे. जानराव जाधव घराणे हे सातारा-कोरेगाव भागातील मोठे वतनदार होते.
सन खमसैन म्हणजे काय?
हा अरबी-फारसी सन आहे. खमसैन म्हणजे ५०. म्हणजे सन ११५० किंवा ११७० च्या आसपासचा काळ. म्हणजे इ.स. १७३८ ते १७६० च्या दरम्यानचा हा कागद असावा.
---------------------------
फोटो मोडी कागदपत्रे संग्रहात आहे आमच्याकडून आणखीन माहिती लवकरच.....
मूर्त रूप देऊन ......
माहिती व लेख सग्रंह
संतोष झिपरे 9049760888

रास्ते घराण्यातील शिक्का 🚩🚩🚩

  रास्ते घराण्यातील शिक्का सदर शिक्का मोर्तब याचे महत्व त्या व्यक्तीच्या इतिहासातील कामगिरीवर लष्करी व मूलखी कारभारातील योगदानावर आधारलेला अ...