विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 4 February 2026

संताजी घोरपडे : अंतिम भाग - ४१

 


संताजी घोरपडे : अंतिम भाग - ४१

कारखेलच्या जंगलात भूमिगत असलेल्या संताजीच्या पाळतीवर नागोजी माने होता. ज्याने आपल्या कुळाचे क्षास्त्रतेज दाखवून शत्रूच्या रुधीराचा अभिषेक आपल्या मातृभूमीला केला, त्या संताजींना आज भूमिगत होऊन वावरावे लागत आहे. तरी आपल्या ब्रिदाला कलंक लागू दिला नाही. आज त्यांच्या मागावर परकीय व स्वकीयही होते.

नागोजी माने जळभावी घाट ओलांडून पूर्वेला उतरला आणि कारखेल गावातून संताजींबद्दल विचारपूस करू लागला. पण गावकऱ्यांनी त्याला दाद दिली नाही. मग पर्यंती गावाजवळील डोंगरावर चढला. त्याच्याबरोबर सात-आठ माणसे होती. संपूर्ण डोंगर चिक्कार वृक्षांनी व्यापला होता. मोक्याची जागा पाहून प्राण डोळ्यात आणून सावज टिपण्यासाठी बसला.

कारखेलच्या परिसरात पर्यंती गावाजवळ एक जलौघ खळखळ वाहत होता. नागोजीने विचार केला, संताजी जंगलात कुठेही असला तरी, पाण्यासाठी ओढ्यावर त्याला यावंच लागेल. नागोजीने पूर्ण रात्र जीव मुठीत घेऊन काढली. दुसरा दिवस उजाडला. बाजूच्या झाडीतून सळसळ ऐकू आली, तसा नागोजी माने सावध होऊन कान टवकारले. एक मानवाकृती दबकत दबकत कानोसा घेत पुढे पुढे जात होती. तसा नागोजीही आकृतीच्या मागे अंतर ठेवून सावधतेने जाऊ लागला.

ती मानवाकृती ओढ्याच्या काठावर आली. इकडे तिकडे पाहत कपडे काढले. नागोजीने ओळखले, ती व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपली शिकार संताजी घोरपडेच आहे.

संताजींनी मेरु स्वामींचा अनुग्रह घेतल्यापासून सूर्योदयाची अंघोळ कधी चुकवली नव्हती. एवढे संकटे, एवढा वनवास पदरी आलात तरी मेरु स्वामींच्या महामंत्रानेच आपल्याला आधार दिला ही त्यांची पक्की धारणा होती. संताजी पाण्यात उतरले. त्याचवेळी नागोजी माने ओढ्या काठी येऊन लपून बसला. आंघोळ झाल्यावर संताजी नेहमीप्रमाणे ओंजळीत पाणी घेऊन सूर्याला अर्ध्य देण्यासाठी पूर्वाभिमुख उभे राहिले. ओठातून आपोआप मंत्राचे शब्द उमटले.... ॐ नमो... संताजी देहभान विसरले. मंत्राचे शब्द आपोआप ओठातून बाहेर पडत होते. संताजी बाह्य जगाचे भान विसरले. आणि हीच संधी साधून नागोजी माने पुढे झाला आणि संताजीच्या मानेवर तलवारीचा प्रहार केला. पाण्यात उष्ण रक्ताची धार मिसळली. आत्मा परमात्मात विलिन झाला.

लाख वेळा तलवारीच्या वारांना सामोरी गेलेली पहाडी छाती शेवटपर्यंत अभंगच राहिली. "लढून मरावं, मरून जगावं" ही वडिल म्हाळोजींची शिकवण! संताजी आयुष्यभर लढले आणि परमेश्वराची आराधना करत या शूरवीराचा आत्मा परमात्म्यात विलीन झाला... कायमचा...

संताजीच्या हत्येचा वृत्तांत जिंजी दरबारात कळला मात्र! महाराणी ताराबाईंचा कंठ्ठ दाटून आला. महाराजांनी संताजींना एकाकी पाडले नसते तर हा मराठ्यांचा मोहरा असा स्वकीयांनीच लयाला धाडला नसता.

सदरेवर छत्रपती महाराज सुन्न मनाने एकटक महाद्वाराकडे पाहत होते. महाराजांचं मन व्याकूळ झाले. त्यांना खरं काय ते कळून चुकलं. संताजी मोगलांना फितूर झाला नव्हता. तसे असते तर बादशहाने नागोजीला हाताशी धरून खुन करायला लावलेच नसते. बादशहाला नागोजी सारख्यांची गरज नव्हती. त्याला शूर सरदार हवे होते. संताजी त्याला मिळाले असते तर, औरंगजेबाने दख्खनची सुभेदारी नक्की बहाल केली असती आणि त्याने तसे प्रयत्नही केले होते. पण संताजी लोभाला बळी पडले नव्हते.

संताजींनी एवढी लूट केली की ते आपली कोठारे भरू शकला असते. पण जे काही मिळाले ते त्यांनी रायगड, पन्हाळा, जिंजीच्या सरकारी खजिन्यात जमा करून, स्वराज्य उभारणीस हातभार लावला. संताजीने तन मन धन खर्च करुन अपूर्व मराठेशाही रुजवली, जगवली. एवढेच नाही तर, आणीबाणीच्या वेळेस छत्रपतींना परांगदा होण्याची वेळ आली तेव्हा, त्यांनी आपली समशेर पाजळून स्वराज्याचे रक्षण केले. राजाराम महाराजांचा कंठ दाटून आला. डोळे अश्रूंनी भरले. त्यांना आपली चूक उमगली.. पण वेळ निघून गेली होती.

कारखेलच्या घाटात संताजीचा वध केल्यावर काही अंतरापर्यंत नागोजीने त्यांच धड आणून तेथेच टाकले आणि त्या शूरवीराचे शिर बादशहाला नजर करण्यासाठी मोठ्या दिमाखात मिरवत घेऊन गेला.

देशाभिमानी मराठ मावळ्यांना संताजींच्या हत्येची खबर मिळताच त्यांनी कारखेलचे जंगल धुंडाळून संताजी घोरपडेंचं धड शोधून कुरुंदवाडला आणले आणि कृष्णा-पंचगंगेच्या पवित्र संगमावर संताजींच्या पार्थिवावर विधिपूर्वक अंत्यसंस्कार केले.

तिकडे बादशहाच्या छावणीत भाल्याच्या टोकावर संताजीचे शिर घेऊन धिंड निघत होती.

ज्यांच्या हयातीत नुसत्या धसक्याने त्यांच्या आजूबाजूलाही फिकायला कोणी धजावत नव्हते, तेच त्यांचे निस्तेज शिराची टिंगल टवाळी करू लागले. मानोजी माने, गाजीउद्दीन फिरोजजंग संताजीच्या हत्येचे श्रेय आपल्या पदरात घ्यायला बादशहाच्या दरबारात धडपडत होते. पण नियतीने ते कोणालाही लाभू दिले नव्हते.....

खरं म्हणजे नागोजीच्या तलवारीचा घाव पडायच्या आधीच मेरु स्वामींनी दिलेला महामंत्र आळवीत परमात्म्याशी एकरूप झाले होते.

अशा या महान कर्तुत्वान पराक्रमी व शेवटी एकाकी पडल्यालेल्या वीराला कोटी कोटी प्रणाम!!

संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख

नमोस्तुते!


स मा प्त

उंबरखिंडीची लढाई :-

 




उंबरखिंडीची लढाई :-

फक्त मूठभर मावळ्यांनी ३०००० मुघल सैन्याची अक्षरशः धूळधाण केली.
शिवाजी राजे व मुघल सरदार कारतलब खान ह्यांच्यात २ फेब्रुवारी १६६१ रोजी ही लढाई झाली. उत्तर कोकण काबिज करण्यासाठी निघालेल्या मुघल सैन्याला शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने उंबरखिंडच्या दरीत गनिमी कावा पद्धतीने हल्ला करुन मुघल सैन्याचा पूर्ण पराभव केला.
२ फेब्रुवारी इ.स.१६६१ ला कारतलब खानाच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्य पुण्याहून निघून लोहगडाच्या बाजूने बोर घाटाकडे न जाता घाटमाथ्यावरुन उंबरखिंडीच्या दिशेस उतरु लागले. नळीसारख्या बारिक वाटेने मुघल सैन्य सह्याद्री डोंगर उतरत होते. घाट उतरुन मुघल सैन्य पुढे उंबरखिंडीत आले. उंबरखिंडच्या घनदाट अरण्यात लपून बसलेल्या शिवाजी राजांच्या सैन्याने मुघलांवर बाणांच्या वर्षावाने व तोफांच्या गोळ्यांनी हल्ला सुरू केला.
मुघल सरदार मित्रसेन व अमरसिंह यांनीही मराठा सैन्याचा बाणांचा हल्ला करुन प्रतिकार करण्यास सुरुवात केला. जंगलात व डोंगरावरुन गनिमी कावा पद्धतीने युद्ध करणार्या मराठा सैन्याला घाबरुन मुघल सैनिक मार्ग मिळेल तेथे पळत होते. पण सर्व मार्ग शिवाजी राजांच्या सैन्याने अडवून धरले होते. मुघल सैन्याचे मराठा सैन्याकडून प्रचंड हाल होत असताना रायबाघण यांच्या सल्लावरुन कारतलब खानाने तह करण्यासाठी शिवाजी राजांकडे दूत पाठवला.
पाठीवर बाणांचे भाते , एका हातात धनुष्य व दुसर्या हातात भाला , कमरेला तलवार , मस्तकावर शिरस्त्राण, शरीरावर चिलखत व ढाल ह्या युद्धसज्ज वेशात शिवाजी राजे घोड्यावर बसलेले होते.
कारतलब खानाचा दूत शिवाजीराजांकडे आला व "कारतलब खान पूर्ण शरणागती पत्करतो आहे व ह्या प्रदेशातून बाहेर पडण्यासाठी परवानगी मागत आहे." हा संदेश दुताने शिवाजी राजांना दिला. शिवाजी राजांनी विनंती मान्य करुन , कारतलब खानाला मुघल सैन्यासह निघून जाण्यास सांगितले. हा संदेश दूताने कारतलब खानाकडे पोहोचवला. तेव्हा कारतलब खान, मित्रसेन व इतर मुघल सरदारांनी शिवाजी राजांना खंडणी पाठवली. मुघलांकडून महाराजांना मोठ्या प्रमाणात घोडे, हत्यारे, दारुगोळा खंडणी स्वरूपात मिळाला. उंबरखिंडीच्या वेगवेगळ्या भागात लढत असलेल्या मराठा सैन्याला युद्धबंदीचा संदेश देण्यात आला व मुघल सैन्याला आल्या वाटेने परत पाठवण्यात आले.
युद्धात हरलेल्या मुघलांनी परत हल्ला केला तर त्यांचा बंदोबस्त करता यावा म्हणून शिवाजी राजांनी सेनापती नेताजी पालकर यांना उंबरखिंडच्या परिसरात म्हणजेच उत्तर कोकणात ठेवले व शिवाजी राजे स्वतः दाभोळ, शृंगारपुर च्या दिशेस दक्षिण कोकणच्या मोहिमेवर गेले.
खोपोली पाली रोडवर उंबर गावापासून पुढे उंबरखिंडीचा फाटा लागतो, या फाट्यापासून गाडीने ४ किमी आत गेल्यावर समरभूमी उंबरखिंड स्मारक आहे. याच ठिकाणी लोणावळा येथील काही संघटनांनी एकत्र येऊन उंबरखिंड युद्ध विजयस्मारक उभारले. या विजयस्तंभेची उंची १२.५० मीटर उंचीचे असून, स्तंभाच्या समोरील बाजूस शिवाजी महाराजांचे शस्त्रसज्ज वेशातील शिल्प आहे. मागील बाजूस उद्घाटनाची कोनशिला असून , डावीकडे आज्ञापत्रातील वृक्षा विषयीची माहिती व उजवीकडील बाजूस उंबरखिंडच्या लढाईचा थोडक्यात इतिहास कोरलेला आहे. दगडी स्तंभाच्या वर ढाल, तलवार, भाला, धनुष्य, ध्वजस्तंभ ह्याच्या मोठ्या प्रतिकृती करुन ठेवल्या आहेत.
(१६ मे २०२० रोजी सकाळ वृत्तपत्राच्या साप्ताहिक पुरवणीत प्रकाशित झालेला गुगल वारी :- उंबरखिंड लेख)
कसे जायचे :- पुणे - रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर खालापूर तालुक्यात खोपोली-पाली रस्त्यावर निसर्गाच्या कुशीत, डोंगरराशीत व नदीकाठी चावणी व उंबर गावाजवळ 'उंबरखिंड' आहे.
कुरवंडे घाटातून अंदाजे दोन मैलांवर चावनी नावाचे गाव आहे. इथून पुढचा मार्ग अत्यंत उताराचा आणि अगदी चिंचोळा. चावनीपुढे आल्यावर नदीच्या वळणापाशी चढाव चढून अर्धा-पाऊण मैलावर उंबरे गाव आहे. चावनी ते उंबरे गावामध्ये असलेली मैलभर लांबीची दरी खिंडीसारखी आहे तीच उंबरखिंड. ( हा मार्ग ट्रेकिंगसाठीचा आहे, वाहने जात नाहीत)
धन्यवाद !
🚩🚩🙏🙏🚩🚩

स्वराज्यासाठी लढली गेलेली पहिली लढाई म्हणजे खळद-बेलसरची लढाई

 


स्वराज्यासाठी लढली गेलेली पहिली लढाई म्हणजे खळद-बेलसरची लढाई

, भारतीय इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई हि स्वराज्यासाठी लढली गेलेली पहिली लढाई असेल. स्वराज्यासाठी लढली गेलेली पहिली लढाई म्हणजे खळद-बेलसरची लढाई असेलच.
छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरूवात केली होती. शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती. व
जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरूवात केली.
तोरणा, सुभानमंगळ, रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले.
विजापुरच्या अदिलशाही दरबारात शिवबांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या. शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी अदिलशाहने सन १६४८ साली फत्तेखानास धाडले.
आदिलशहाने शहाजी राजांना कपटाने कैद करून शिवाजी राजांवर फतेहखानास पाठविले होते, बंगरुळास थोरले बंधू संभाजीराजांवर पण विजापुरी फौजा चालून गेल्या होत्या, राजकारणाचे धडे ज्यांच्या हाताखाली गिरवले होते ते दादोजी कोंडदेव मृत्यू पावले होते.
अशा या संकटकाळी मनाचे स्थैर्य ढळू न देता शिवाजी राजांनी खळद- बेलसर येथील फतेहखानाच्या छावणीवरच हल्ला करण्याचा बेत आखला.
या तुकडीचे नेतृत्व होते एका साठ वर्षाच्या तडफदार तरुणाकडे ते म्हणजे "बाजी पासलकर".
"फत्तेखानाने जेजूरीजवळील बेलसर येथे आपला तळ ठोकला होता. खानाच्या सैन्याने शिरवळजवळील सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला करून किल्ला काबीज केला. मराठ्यांचा हा पहिलाच पराभव होता."
छत्रपतींनी कावजी मल्हार यास सुभानमंगळ भूईकोटावर चालून जाण्यास सांगितले. त्यांनी एकारात्रीत गड सर केला तर फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर, कान्होजी जेधे, बाजी जेधे, गोदाजी जगताप बेलसरच्या छावणीवर गेले, अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला.
फत्तेखानचा सरदार मुसेखानाने पुरंदरावर हल्ला केला, पुरंदराला खानाच्या सैन्याचा वेढा पडला. गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युध्द झाले.
बाजी पासलकर, कान्होजी जेधे, गोदाजी जगताप यांनी गनिमांची कत्तल केली. फत्तेखानचा सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकाला भिडले.
दोघात तुंबळ युध्द झाले. अखेरीस गोदाजीच्या वाराने मुसेखानाच्या छाताडाचा वेध घेतला व खान कोसळला.
मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला पण बाजी पासलकर सारखा वीर रणी पडला.
या लढाईत विजापुरी फौजेशी मावळ्यांनी कडवी झुंज दिली पण विजापुरी फौजेच्या रेट्यापुढे मावळ्यांना माघार घ्यावी लागली. या लढाईत बाजी पासलकरांनी पराक्रमाची शर्थ करून रणदेवतेला आपल्या प्राणाची आहुती दिली.
बाजी पासलकरांचा देह पडताच मराठा स्वारांचा जमाव फुटला. मराठ्यांच्या निशाणाचे पथक मुख्य फौजेपासून अलग पडले. निशाणाच्या तुकडीस यवनांच्या सैन्याचा गराडा पडला, एक एक स्वार कापू जाऊ लागला. निशाणाची होऊ घातलेली दुर्दशा पाहून एक मराठा स्वार विजेच्या चपळाईने त्या गर्दीत आपली तलवार चालवत घुसला.
एकाच झटक्यात पाच सहा शत्रू कापत त्याने निशाणाचा स्वार मोकळा केला आणि आपल्या बरोबर चालविला, एवढ्यात निशाणाच्या स्वारावर शत्रूचा घाव बसून तो घोड्याखाली आला.
हे पाहताच त्या निशाणाच्या स्वारास आपल्या घोड्यावर बसवून निशाणाचा भाला आपल्या खांद्यावर टाकून तो शूर पुरंदरास सुखरूप परत आला. या लढवय्याचे नाव होते बाजी जेधे. हे बाजी जेधे म्हणजे कान्होजी नाईक जेधे यांचे पुत्र आणि बाजी पासलकर यांचा नातू (मुलीचा मुलगा). याच लढाईत आणखीन एका बाजीने पराक्रम गाजविला होता ते म्हणजे बाजी नाईक बांदल, बांदलांच्या जमावाने मोठा पराक्रम गाजवत विजापुरी सैन्याचा मुकाबला केला होता, या लढाईत बांदलांचे सुमारे अडीचशे लोक कामाला आले.
या तिनही वीरांचा यथोचित सत्कार शिवाजी राजांनी पुरंदरची लढाई संपल्यावर केला.
बाजी पासलकरांच्या धाकट्या बंधूंना मोसे खोऱ्याची देशमुखी देऊन “सवाई बाजी” हा किताब दिला.
बाजी जेधे यांना “सर्जेराव” हा किताब देऊन वस्त्रे आणि दोन तेज तुर्की घोडे बक्षीस दिले.
बाजी नाईक बांदल यांना शिवाजी राजांनी मौजे भाणसदरे व पऱ्हर खुर्द या गावचे महसूल इनाम म्हणून दिले.
स्वराज्यासाठी लढल्या गेलेल्या लढायांमध्ये खळद-बेलसरची लढाई हि एकमेव लढाई असेल ज्या लढाई मध्ये एक नाही, दोन नाही तर तीन तीन बाजींनी आपल्या प्राणांची “बाजी” लावून स्वराज्याठाई आपली निष्ठा दाखवून दिली होती.
बाजी पासलकरांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला.
अशाप्रकारची माहितीप्रमाणे याबद्दल सांगता येईन.
🚩 हर हर महादेव 🚩
🚩🚩🚩जय भवानी, जय जिजाऊमाता , जय शिवाजी!!!🚩🚩🚩🚩🚩
वाचल्याबद्दल धन्यवाद 🙏.

संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर मध्ये हल्ला

 




संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर मध्ये हल्ला

संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर मध्ये हल्ला करून अशी दहशत निर्माण केली की बुऱ्हाणपूरच्या मौलवी नि औरंग्याला कळवले की संभाजी महाराजांचे काही केले नाही तर आम्ही शुक्रवारचा नमाज बंद करू.
शिवाजी महाराजांनी दक्षिणे कडे जिंजी पर्यंत स्वराज्य भक्कम केले , राज्याभिषेक होऊन संभाजी महाराजांनी १५ दिवसात स्वराज्य ची उत्तरेची बाजू म्हणजे नाशिक बागलाण साल्हेर रामशेज अहिवंतगड त्र्यंबक हि बाजी भक्कम करायची ठरवली. आणि त्यांनी थेट बुऱ्हाणपूर या दख्खन चे द्वार असलेल्या श्रीमंत शहरावर हल्ला करून लुटायचे ठरवले . कदाचित औरंग्या आज किंवा उद्या स्वराज्यावर चालून येणार त्याची त्यांना कुणकुण लागली असावी. आग्रा आणि दिल्ली नंतर बुऱ्हाणपूर सगळ्यात मोठी होती. बाजारपेठ पण मोठी आणि लष्कराचे मोठे ठिकाण होते . त्यामुळे मुघलांच्या इथला सुभेदार हे बादशहाच्या जवळच्या नातलग असणे गरजेचे होते . खांजहाँ बहादूरखान कोकलताश हा औरंगझेबाचा दुध भाऊ होता आणि त्याची कडे जबाबदारी होती
या बहादूरखान कोकलताश च्या पुतण्याचे लग्न होते म्हणून तो औरंगाबाद ला निघून गेला होता .बुऱ्हाणपूर हुन निघताना आपल्या ८००० फौजे पैकी ३००० फौज घेऊन लग्नात मिरवायला निघून गेला . त्याच्या माघारी नायब काकारखान आता बुऱ्हाणपूरच मालक होता . काकारखान हा त्यावेळी हिंदूंची वाकडे घेयातल्यामुळे खूप कुप्रसिद्ध होता त्यामुळे त्यांनी २०० सशस्त्र रक्षकांचा स्वतःचा पहारा होता . बुऱ्हाणपूर मध्ये १७ पुरे होते (आहे) नावाबपुरा , करणपूर , शहाजहान पुरा आणि खुर्रमपूर असे बादशहाच्या नावावर अनेक पुरे आहे . सुरत अहमदाबाद सारखे अनेक श्रीमंत व्यापारी होते . मराठ्यांनी हल्ला करताना आपण आता सुरत वर चालून जाणार अशी आवई उठवली . मराठ्यांची हि तिसरी सुरतची लूट अशी अफवा मुघलांच्या पसरली .
त्यामुळे या काकारखान कडे मुघलांचे सुरतेहून दूत धावून आले आणि हि बातमी दिली . त्यामुळे काकारखं वैतागला .काकारखानाने १००० फौज ठेऊन राहिलेली ४००० फौज सुरत कडे पाठवून दिली .
४००० पथके निघून गेल्यावर ३१ जानेवारी ला १६८१ ला संध्याकाळी काही दुतानी खबर दिली कि मराठे बुऱ्हाणपूर जवळ दिसले आहे . नुकतीच दहा दिवसापूर्वी मी,अराठयांचा राजा संभाजी महाराजांनी राज्यभिषेक करून घेतला हि बातमी माहित होती तेंव्हा मराठ्यांचं कोणता सरदार येणार नाही असाच त्याला वाटले . मात्र व्यापारी गडबडून गेले . तो पर्यंत रात्री बातमी आली कि स्वतः सेनापती हंबिराव हंबीरराव आलेत . आधीच थंडीचे दिवस . आणखी जुने सैनिक आणि पहारेकरी व १०००० हजारांची फौज घेऊन काकरक्षण निघाला . पण समोर चित्र भयानक होते . स्वतः हंबिराव होते पण हंबीर राव आधी पुढे शम्भू महाराज आले आणि ५ दिवसात संभाजी महाराजांनी दौड करून हंबीर राव यांना मिळाले होते . आता काकारखं ला समोर छत्रपती संभाजी महाराज आणि हंबीरराव यांच्याबरोबर मराठा सैनिक घेऊन होते . स्वतः संभाजी महाराज बरोअबर असताना या मराठा सैन्याला खूप जोर होता . ते पाहून ककारखान आता सरकून दरवाजा बंद केला . पण तिथे महाद्वाराला युद्धाचे नाटक दुसऱ्या दरवाजाने आत शिरून बुऱ्हाणपूर लुटायला चालू केले .
दोन दिवस बुऱ्हाणपूर लुटल्यावर बहादुरशहा ला हि बातमी काळजी आणि तो औरंगाबाद वरून निघाला .शंभू महाराज आणि हंबीरराव परत रायगडाला निघाले . वाटेत बहादुरशहा आडवा येईल अशी शक्यता होती .. आणि बरोबर प्रचंड दौलत . हि लूट साल्हेर च्या किल्ल्यावर ठेवायचे ठरले . वाटेत जाताना चोपडा आणि धरणगाव ची वाट होती आणि तिथे बहादूरखान असणार हे राजांनी गृहीत धरले .
चोपडाच्या जंगलामध्ये बहादुरशहा दडून बसला होते . तिथे काही मराठ्यांची फळी चालली होती पण त्यांनी सांगितले कि आम्ही वकील आहोत .बहादुरशाहने संभाजी महाराजांच्या विषयी विचारले तेंव्हा अशी उत्तरे मिळाली कि तुम्ही याच भागात आहेत तर शंभू महाराज असे कसे येतील ?
बहादुर्शहाला पण हे पटले . बहादुरशहा ५००० ची फौज घेऊन तिथून निघून गेला आणि त्या जंगल लपून असलेली मराठ्यांची फौज खजिन्यासहित आरमत निघून गेली .
साल्हेरला येताना संभाजी महाराजांनी वाणी चे देवीचे दर्शन घेतले . अशी युक्तीने आणि कमी किंमतीने मराठ्यांनी मुघलांची प्रचंड दौलत लुटली .

संताजी घोरपडे : अंतिम भाग - ४१

  संताजी घोरपडे : अंतिम भाग - ४१ कारखेलच्या जंगलात भूमिगत असलेल्या संताजीच्या पाळतीवर नागोजी माने होता. ज्याने आपल्या कुळाचे क्षास्त्रतेज दा...