विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label सरदार त्रिंबकजी डेंगळें. Show all posts
Showing posts with label सरदार त्रिंबकजी डेंगळें. Show all posts

Tuesday, 4 April 2023

सरदार त्रिंबकजी डेंगळे

 


सरदार त्रिंबकजी डेंगळे
सर्वसामान्य इतिहास वाचकांना त्रिंबकजी ज्ञात आहे तो 1815 सालच्या गंगाधरशास्त्री खून प्रकरणामुळे. फारतर पेशवाईच्या उत्तरार्धातील दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा एक नवखा पण विश्वासू सरदार म्हणून.
इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम मराठी मुलखात उठाव घडवून आणणारा त्रिंबकजी, स्वतःच्या राजकीय आयुष्याची पर्वा न करता पेशवाई वाचवण्यासाठी प्रयत्न करणारा त्रिंबकजी, शिंदे-होळकर-भोसले-गायकवाड या मराठेशाहीच्या स्तंभांना एकत्रित आणण्यासाठी धडपडणारा त्रिंबकजी, इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन ठाण्याच्या तुरुंगातून पळणारा त्रिंबकजी, ब्रिटिशांविरुद्ध गुप्तपणे पेशव्यांसाठी फौजेची जमवाजमव करणारा त्रिंबकजी, कोरेगावच्या लढाईत पराक्रम गाजवणारा त्रिंबकजी व धुळकोटला अखेरपर्यंत पेशव्यांची साथ न सोडणारा त्रिंबकजी महाराष्ट्राला फारसा ज्ञात नाही.
त्रिंबकजीला इतिहासात न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न ना.सं.इनामदार यांनी केला. त्रिंबकजी मराठी वाचकांपर्यंत पोहोचला तो त्यांच्या 'झेप' कादंबरीमुळेच.
त्रिंबकजी संगमनेरजवळील निमगावजाळी गावचे. शेतकऱ्याचं पोर ते पेशव्यांचा कारभारी हा त्रिंबकजीचा जीवनप्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. त्रिंबकजी सुरुवातीस दुसऱ्या बाजीरावाच्या पदरी हेर अथवा जासूद होते. 1802 साली यशवंतराव होळकरांनी पुण्यावर स्वारी केल्यावर पेशवे महाडला पळून गेले तेव्हा त्रिंबकजी त्यांच्यासोबत होता.बाजीरावाचे एक गुप्त पत्र पुण्याला पोहोचवून त्याचे उत्तर त्रिंबकजीने मोठ्या शिताफीने आणले व पेशव्यांची मर्जी संपादन केली.पुढे त्रिंबकजी बाजीरावाचा विश्वासु बनला. त्रिंबकजीवर सोपवलेली पहिली मोठी जबाबदारी म्हणजे सातारा छत्रपतींवर देखरेख ठेवणे होय. त्यानंतर कर्नाटक प्रांताचा सुभेदार म्हणून त्रिंबकजीची नेमणूक करण्यात आली(1804).
1802 च्या वसई तहामुळे पेशव्यांच्या कारभारावर इंग्रजांचा प्रभाव वाढू लागला. मराठी राज्यात झालेला इंग्रजांचा हस्तक्षेप त्रिंबकजीला पहावत नसे. त्याने सर्व मराठी सरदारांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न चालवले. शिंदे,होळकर,भोसले,पेंढारी यांच्याकडे आपले वकील रवाना केले. फौजेची जमवाजमव सुरू केली. 1814 ला त्रिंबकजी अहमदाबादचा सुभेदार झाला. पुढे सदाशिवभाऊ माणकेश्वर यांच्या जागी त्रिंबकजी पेशव्यांचे कारभारी(Cheif Minister) झाले.
1814 साली बडोद्याहून गायकवाडांचे दिवान गंगाधरशास्त्री पटवर्धन पुण्यात आले. गायकवाडांची पेशवे सरकारकडे पुष्कळ थकबाकी होती तसेच गुजरातेतील काही सुब्यांचा प्रश्न होता. वर्षभरापासून त्या वाटाघाटी चाललेल्या होत्या. गंगाधरशास्त्री यांच्या संरक्षणाची जबाबदारी इंग्रजांनी घेतलेली होती.
1815 च्या जुलै महिन्यात पंढरपुरात गंगाधरशास्त्र्यांचा खून होतो. त्याचे आरोप इंग्रज त्रिंबकजीवर करतात. वास्तविक त्रिंबकजीला गंगाधरशास्त्र्यांचा खून करून काहीही फायदा होणार नव्हता. सुरुवातीपासूनच इंग्रजांविरुद्ध गायकवाडांना आपल्या बाजूने आणण्याचा त्रिंबकजी गंगाधरशास्त्र्यांमार्फत प्रयत्न करत होता. हे खून प्रकरण आजतागायत गूढ व अनाकलनीयच राहिले आहे. अलीकडील ऐतिहासिक शोधांवरून हा खून त्रिंबकजीने केला नाही,असेच स्पष्ट होत आहे. परंतु आपल्या मार्गातील काटा काढण्याची इंग्रजांना ही आयतीच संधी मिळाली. इंग्रजांनी बाजीरावाकडे त्रिंबकजीची मागणी केली. प्रारंभी पेशव्यांनी त्यास कराड जवळील वसंतगडावर ठेवले परंतु त्यावरही इंग्रजांचे समाधान न होता त्यांनी त्रिंबकजीला आपल्याच हवाली करावे यासाठी बाजीरावावर दबाव आणण्यास सुरुवात केली. सप्टेंबर 1815 ला त्रिंबकजीला इंग्रजांनी ठाण्याच्या किल्ल्यात अटकेत ठेवले. पुढे वर्षभराने 12 सप्टेंबर 1816 ला त्रिंबकजीने ठाणे तुरुंगातून पलायन केले. पुढे ते त्र्यंबकेश्वर व नाशिक भागात आले.
त्रिंबकजी इंग्रजांविरुद्ध फौज गोळा करण्याचा प्रयत्न करु लागले. प्रारंभी त्यांनी खानदेशात जाऊन तेथील भिल्ल समाजाला संघटित केले. त्रिंबकजी स्वतः भिल्ल जमातीत जाऊन त्यांना जुलमी ब्रिटिश सरकारविरुद्ध उठवण्याचे प्रयत्न करू लागला. सुमारे 8,000 भिल्लांनी खानदेश व बागलाण भागात इंग्रजांविरुद्ध उठाव केला (हा महाराष्ट्रातील पहिला उठाव). पुढे त्रिंबकजी साताऱ्याकडील शंभू महादेवाच्या डोंगररांगांत येऊन तेथे फौजेची जमवाजमव करू लागले.
इकडे इंग्रज रेसिडेंट एल्फिन्स्टन बाजीरावाकडे त्रिंबकजीला पकडण्यासाठी दबाव आणू लागला. बाजीरावाने त्रिंबकजीसाठी सिंहगड,रायगड व पुरंदर किल्ले इंग्रजांकडे ठेवले तसेच त्रिंबकजीला शोधून देणाऱ्यास इनाम जाहीर केले परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. कोणीही पुढे येऊन त्रिंबकजी विषयी माहिती दिली नाही. पेशवे अप्रत्यक्ष त्रिंबकजीला या कार्यासाठी मदतच करत होते. पुण्याजवळील फुलगाव येथे त्रिंबकजीने दुसऱ्या बाजीरावाची गुप्त रूपाने भेट घेतल्याचेही म्हटले जाते.
1817 च्या उत्तरार्धात दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध युद्ध आरंभिले. खडकीच्या लढाईनंतर पेशवे ब्राह्मणवाड्यास असता त्रिंबकजी उघडउघड पेशव्यांना फौजेनिशी मिळाला. कोरेगाव भीमा च्या युद्धात त्रिंबकजी प्रत्यक्ष सहभागी झाले. बापू गोखले व त्रिंबकजी डेंगळे यांनी लढाईत पराक्रम गाजवला. पुढे पंढरपूर जवळील आष्टीच्या युद्धात (20 फेब्रुवारी 1818) सेनापती बापू गोखले मारले गेले. पेशव्यांची हार झाली. पुढे पेशवे वऱ्हाडात नागपूरकर भोसल्यांच्या प्रांतात गेले. पेशव्यांबरोबरच्या अनेक सरदारांनी पेशव्यांची साथ सोडून दिली. शेवटपर्यंत त्रिंबकजी पेशव्यांबरोबर होते. अखेर 3 जून 1818 ला अशीरगडाजवळील 'धुळकोट' येथे श्रीमंत दुसरे बाजीराव जनरल माल्कमच्या स्वाधीन झाले व मराठेशाहीचा अस्त झाला. त्यानंतर त्रिंबकजी पसार झाले. इंग्रज सरकारने त्यांना शोधण्यासाठी त्यांच्यावर इनाम लावले.
त्रिंबकजी हा त्याची सासुरवाडी अहिरगाव (ता. निफाड जि. नाशिक) येथे राहत असल्याची खबर जयाजी पाटील याने 28 जून 1818 ला मालेगावला दिली त्यावेळी कॅप्टन ब्रिग्ज खानदेशात होता. त्याने कॅप्टन स्वान्स्टनला त्रिंबकजीला पकडण्यासाठी धाडले. स्वान्स्टनच्या नेतृत्वाखालील फौजेने त्रिंबकजीला कैद केले. काही काळानंतर त्याची रवानगी वाराणसी जवळच्या चुनारच्या किल्ल्यात करण्यात आली. 1818 ते 1829 अशी अकरा वर्षे चुनारला कैदेत असणाऱ्या त्रिंबकजीचा अखेर 16 ऑक्टोबर 1829 ला चुनारला दुर्दैवी मृत्यू झाला.
कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्रिंबकजीने स्वकर्तृत्वावर पेशवाईत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. ज्या काळात फितुरीची बीजे मुलुखभर रोवली गेली होती,अनेक मराठे सरदार इंग्रजांशी सुरुवातीपासूनच संधान ठेवून होते त्याकाळात त्रिंबकजी मराठेशाहीच्या स्वातंत्र्याचे स्वप्न बघत होते. इंग्रजांच्या कच्छपी लागून स्वतःची जहागीर वाचवणं त्रिंबकजीला अशक्यप्राय बिलकुल नव्हतं. या सामान्य माणसाने भारतभर फोफावत जाणाऱ्या इंग्रज सत्तेला काही काळ स्वतःच्या बळावर आव्हान दिलं परंतु त्याला सर्वस्वी अपयश आलं. आयुष्याच्या उत्तरार्धात चुनारच्या किल्ल्यावर त्रिंबकजी अत्यंत हलाखीचे जीवन कंठत होता.
त्रिंबकजीचे त्याच्या गावावर अत्यंत प्रेम होते.याबद्दल एल्फिन्स्टन त्याच्या रोजनिशीत म्हणतो की, 'त्याच्या भरभराटीच्या काळातही तो त्याच्या गावाला विसरला नाही'. अनेक इतिहासतज्ञ त्रिंबकजीला 'मराठेशाहीचा शेवटचा आधारस्तंभ' म्हणतात. नाना फडणीसानंतर इंग्रजांना त्रिंबकजीचा धाक असल्यामुळे अनेक इतिहासतज्ज्ञ त्यास 'सवाई नाना' संबोधतात. न.चिं.केळकर आपल्या 'मराठे व इंग्रज' या पुस्तकात त्रिंबकजीविषयी लिहितात,
'बाजीरावास पुष्कळ कुटिल मंत्री होते पण त्या सर्वांत त्रिंबकजी डेंगळे हा श्रेष्ठ होता. वास्तविक त्रिंबकजी हा अत्यंत शूर, धाडसी, हजरजबाबी, कल्पक व कर्ता असा पुरुष होता. पेशवाईच्या गादीची इतकी हलाखी झाली हे त्याला पाहावत नसे; या सर्वाला कारण इंग्रज हे त्यांच्या मनाने घेतले होते. इंग्रजांच्या वैराचा स्पर्श त्याला लागला नसता किंवा नाना फडणीसासारख्या मुत्सद्याच्या पदरी तो असता तर इतिहासात त्याचे मोठे नाव झाले असते.'
लेखन- ©सुमित अनिल डेंगळे.
संदर्भ-
1. 'History of mahrattas'- James grant Duff
2. 'Bajirao II and the East India Company'- Pratul Chandra Gupta
3. 'John briggs in Maharashtra'- Arvind Deshpande
4. 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने'-राजवाडे (खंड 4)
5. 'मराठे व इंग्रज'- न.चिं.केळकर
6. 'महाराष्ट्रातील स्वातंत्र्यलढे'- वि.गो.खोबरेकर
छायाचित्रे-
१. सरदार त्रिंबकजी डेंगळे
२. सरदार त्रिंबकजी डेंगळे वाडा (निमगावजाळी, ता.संगमनेर, जि. अहमदनगर)
३. चुनारगड (जि. मिर्झापुर, उत्तरप्रदेश)

त्रिंबकजी डेंगळे पाटील

 

A bright man from dark era..
त्रिंबकजी डेंगळे पाटील 
लेखन :कौस्तुब कस्तुरे


दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे दिवाण. आधीचे दिवाण सदाशिव माणकेश्वर हे तसे मवाळ होते. आधीचा ब्रिटिश रेसिडेंट बॅरी क्लोज देखील मवाळ होता. पण त्याच्या जागी एल्फिन्स्टन आला आणि तो राज्य गिळणार हे दिसू लागताच बाजीरावांनी सदाशिव माणकेश्वरांना खाजगी कारभारी करून दौलतीत दिवाण म्हणून त्रिंबकजी डेंगळे यांना नेमलं. त्रिम्बकजी म्हणजे प्रती नाना फडणवीस. त्यांनी बापू गोखले, पानसे वगैरे सरदारांना आणि अगदी बडोदेकर गायकवाड, शिंदे, होळकर, नागपूरकर भोसले यांना एक करून इंग्रजांना हाकलून द्यायचं राजकारण सुरू केलं. एल्फिन्स्टनला नेमकी बाजीरावांची ही चाल खुपली. काहीतरी निमित्त काढून त्रिंबकजींना दूर करावं म्हणून बडोदेकर वकील गंगाधर शास्त्री पटवर्धन यांची पंढरपुरात हत्या करवून त्याचा आळ डेंगळे पाटलांवर आणला. बाजीराव त्रिंबकजींना इंग्रजांकडे सोपवायला तयार नसल्याने ब्रिटिशांनी युद्धाची तयारी केली. त्रिंबकजी स्वतःहून इंग्रजांच्या ताब्यात गेले. पुढे एक वर्ष ठाण्याच्या कैदेत होते, आणि अखेरीस कैदेतून पळाले. या सगळ्याला बाजीरावांची अंतर्गत मदत होती. सुटल्यावर पेंढारी जमवून त्रिंबकजी लपून छपून ब्रिटिशांची लांडगेतोड करत होते. अखेरीस तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धात ते उघडपणे बाजीरावांकडे आले. १८१८ मध्ये बाजीरावांच्या शरणागती नंतर त्रिम्बकजी पकडले जाऊन त्यांना चुनारच्या किल्ल्यात कैद केलं, पुढे दहा वर्षांनी त्यांचा कैदेतच मृत्यू झाला.

सरदार त्रिंबकजी डेंगळेंचे उत्तरआयुष्य

 

सरदार त्रिंबकजी डेंगळेंचे उत्तरआयुष्य 

 

ब्रिटिश सत्तेविरुद्ध दीर्घकाळ संघर्ष करणाऱ्या पेशव्यांचे कारभारी त्रिंबकजी डेंगळेंचं नंतर काय झालं ?, त्यांना इंग्रजांनी कुठे ठेवलं?, त्यांचे कैदेतील दिवस कसे होते ?, त्यांचा मृत्यू कधी व कसा झाला? या सर्व प्रश्नांचा ससंदर्भ घेतलेला वेध …

3 जून 1818 ला श्रीमंत दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी अशीरगडाजवळील ‘धुळकोट’ येथे जनरल माल्कमसमोर शरणागती पत्करली व पेशवाईचा परिणामी मराठेशाहीचा अस्त झाला. शेवटपर्यंत त्रिंबकजींनी पेशव्यांची साथ सोडली नव्हती. त्यावेळी अशीरगडावर असणाऱ्या त्रिंबकजींना पकडण्यासाठी कर्नल डोव्हटनने फौज पाठवली. किल्लेदार यशवंतराव लाडांच्या मदतीने त्रिंबकजी अशीरगडावरून पळाले व दक्षिणेत आले. इंग्रजांनी त्रिंबकजींचा शोध सुरू केला व त्याला शोधून देणाऱ्यास इनाम जाहीर केले.

त्रिंबकजी त्याची सासुरवाडी अहिरगाव (ता.निफाड, जि.नाशिक) येथे गुप्तपणे राहत असल्याची खबर अहिरगावचा पाटील जयाजी याने 28 जून 1818 ला मालेगावला इंग्रजांना दिली. त्यावेळी कॅप्टन ब्रिग्ज खानदेशात होता, त्याने कॅप्टन स्वान्स्टनला त्रिंबकजींना पकडण्यासाठी धाडले. स्वान्स्टनच्या नेतृत्वाखालील 800 घोडेस्वारांच्या फौजेने दुसऱ्या दिवशी (29 जून 1818) भल्या सकाळी चांदवड मार्गे अहिरगाव गाठले व त्रिंबकजींना कैद केले. त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली. त्यांना प्रारंभी चांदवड व नंतर ठाणे येथील तुरुंगवजा किल्ल्यात कैदेत ठेवण्यात आले (जिथून ते सप्टेंबर 1816 ला मोठ्या शिताफीने निसटले होते). काही महिने त्रिंबकजी ठाण्याच्या तुरुंगातच होते परंतु तेथूनही त्यांची गुप्तपणे सुटका करण्याची काही कारस्थानं इंग्रज सरकारच्या कानावर आली, त्यामुळे त्यांना मराठी मुलखात ठेवणे धोक्याचे वाटून त्यांना कलकत्त्याला पाठवण्याचे सक्त आदेश कलकत्त्याच्या गव्हर्नर जनरलने एलफिस्टनला दिले. 5 एप्रिल 1819 ला त्रिंबकजींनी ठाणे सोडले व मुंबईहून त्यांना समुद्रमार्गे बोटीने कलकत्त्याला नेण्यात आले व त्यानंतर त्यांची रवानगी ‘चुनार’च्या किल्ल्यात करण्यात आली.

सरदार त्रिंबकजी डेंगळे

 

सरदार त्रिंबकजी डेंगळे 

 

सरदार त्रिंबकजी डेंगळे


आज दिनांक 16 ऑक्टोबर 2019, सरदार त्रिंबकजी डेंगळे यांची 190 वी पुण्यतिथी.

सर्वसामान्य इतिहास वाचकांना त्रिंबकजी ज्ञात आहे तो 1815 सालच्या गंगाधरशास्त्री खून प्रकरणामुळे. फारतर पेशवाईच्या उत्तरार्धातील दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा एक नवखा पण विश्वासू सरदार म्हणून.
इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम मराठी मुलखात उठाव घडवून आणणारा त्रिंबकजी, स्वतःच्या राजकीय आयुष्याची पर्वा न करता पेशवाई वाचवण्यासाठी प्रयत्न करणारा त्रिंबकजी, शिंदे-होळकर-भोसले-गायकवाड या मराठेशाहीच्या स्तंभांना एकत्रित आणण्यासाठी धडपडणारा त्रिंबकजी, इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन ठाण्याच्या तुरुंगातून पळणारा त्रिंबकजी, ब्रिटिशांविरुद्ध गुप्तपणे पेशव्यांसाठी फौजेची जमवाजमव करणारा त्रिंबकजी, कोरेगावच्या लढाईत पराक्रम गाजवणारा त्रिंबकजी व धुळकोटला अखेरपर्यंत पेशव्यांची साथ न सोडणारा त्रिंबकजी महाराष्ट्राला फारसा ज्ञात नाही.
त्रिंबकजीला इतिहासात न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न ना.सं.इनामदार यांनी केला. त्रिंबकजी मराठी वाचकांपर्यंत पोहोचला तो त्यांच्या ‘झेप‘ कादंबरीमुळेच.

त्रिंबकजी संगमनेरजवळील निमगावजाळी गावचे. शेतकऱ्याचं पोर ते पेशव्यांचा कारभारी हा त्रिंबकजीचा जीवनप्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. त्रिंबकजी सुरुवातीस दुसऱ्या बाजीरावाच्या पदरी हेर अथवा जासूद होते. 1802 साली यशवंतराव होळकरांनी पुण्यावर स्वारी केल्यावर पेशवे महाडला पळून गेले तेव्हा त्रिंबकजी त्यांच्यासोबत होता.बाजीरावाचे एक गुप्त पत्र पुण्याला पोहोचवून त्याचे उत्तर त्रिंबकजीने मोठ्या शिताफीने आणले व पेशव्यांची मर्जी संपादन केली.पुढे त्रिंबकजी बाजीरावाचा विश्वासु बनला. त्रिंबकजीवर सोपवलेली पहिली मोठी जबाबदारी म्हणजे सातारा छत्रपतींवर देखरेख ठेवणे होय. त्यानंतर कर्नाटक प्रांताचा सुभेदार म्हणून त्रिंबकजीची नेमणूक करण्यात आली(1804).
 
1802 च्या वसई तहामुळे पेशव्यांच्या कारभारावर इंग्रजांचा प्रभाव वाढू लागला. मराठी राज्यात झालेला इंग्रजांचा हस्तक्षेप त्रिंबकजीला पहावत नसे. त्याने सर्व मराठी सरदारांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न चालवले. शिंदे,होळकर,भोसले,पेंढारी यांच्याकडे आपले वकील रवाना केले. फौजेची जमवाजमव सुरू केली. 1814 ला त्रिंबकजी अहमदाबादचा सुभेदार झाला. पुढे सदाशिवभाऊ माणकेश्वर यांच्या जागी त्रिंबकजी पेशव्यांचे कारभारी(Cheif Minister) झाले.

1814 साली बडोद्याहून गायकवाडांचे दिवान गंगाधरशास्त्री पटवर्धन पुण्यात आले. गायकवाडांची पेशवे सरकारकडे पुष्कळ थकबाकी होती तसेच गुजरातेतील काही सुब्यांचा प्रश्न होता. वर्षभरापासून त्या वाटाघाटी चाललेल्या होत्या. गंगाधरशास्त्री यांच्या संरक्षणाची जबाबदारी इंग्रजांनी घेतलेली होती.
1815 च्या जुलै महिन्यात पंढरपुरात गंगाधरशास्त्र्यांचा खून होतो. त्याचे आरोप इंग्रज त्रिंबकजीवर करतात. वास्तविक त्रिंबकजीला गंगाधरशास्त्र्यांचा खून करून काहीही फायदा होणार नव्हता.सुरुवातीपासूनच इंग्रजांविरुद्ध गायकवाडांना आपल्या बाजूने आणण्याचा त्रिंबकजी गंगाधरशास्त्र्यांमार्फत प्रयत्न करत होता. हे खून प्रकरण आजतागायत गूढ व अनाकलनीयच राहिले आहे. अलीकडील ऐतिहासिक शोधांवरून हा खून त्रिंबकजीने केला नाही,असेच स्पष्ट होत आहे. परंतु आपल्या मार्गातील काटा काढण्याची इंग्रजांना ही आयतीच संधी मिळाली. इंग्रजांनी बाजीरावाकडे त्रिंबकजीची मागणी केली. प्रारंभी पेशव्यांनी त्यास कराड जवळील वसंतगडावर ठेवले परंतु त्यावरही इंग्रजांचे समाधान न होता त्यांनी त्रिंबकजीला आपल्याच हवाली करावे यासाठी बाजीरावावर दबाव आणण्यास सुरुवात केली. सप्टेंबर 1815 ला त्रिंबकजीला इंग्रजांनी ठाण्याच्या किल्ल्यात अटकेत ठेवले. पुढे वर्षभराने 12 सप्टेंबर 1816 ला त्रिंबकजीने ठाणे तुरुंगातून पलायन केले. पुढे ते त्र्यंबकेश्वर व नाशिक भागात आले.

त्रिंबकजी इंग्रजांविरुद्ध फौज गोळा करण्याचा प्रयत्न करु लागले. प्रारंभी त्यांनी खानदेशात जाऊन तेथील भिल्ल समाजाला संघटित केले. त्रिंबकजी स्वतः भिल्ल जमातीत जाऊन त्यांना जुलमी ब्रिटिश सरकारविरुद्ध उठवण्याचे प्रयत्न करू लागला. सुमारे 8,000 भिल्लांनी खानदेश व बागलाण भागात इंग्रजांविरुद्ध उठाव केला (हा महाराष्ट्रातील पहिला उठाव). पुढे त्रिंबकजी साताऱ्याकडील शंभू महादेवाच्या डोंगररांगांत येऊन तेथे फौजेची जमवाजमव करू लागले.
इकडे इंग्रज रेसिडेंट एल्फिन्स्टन बाजीरावाकडे त्रिंबकजीला पकडण्यासाठी दबाव आणू लागला. बाजीरावाने त्रिंबकजीसाठी सिंहगड,रायगड व पुरंदर किल्ले इंग्रजांकडे ठेवले तसेच त्रिंबकजीला शोधून देणाऱ्यास इनाम जाहीर केले परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. कोणीही पुढे येऊन त्रिंबकजी विषयी माहिती दिली नाही. पेशवे अप्रत्यक्ष त्रिंबकजीला या कार्यासाठी मदतच करत होते. पुण्याजवळील फुलगाव येथे त्रिंबकजीने दुसऱ्या बाजीरावाची गुप्त रूपाने भेट घेतल्याचेही म्हटले जाते.

1817 च्या उत्तरार्धात दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध युद्ध आरंभिले. खडकीच्या लढाईनंतर पेशवे ब्राह्मणवाड्यास असता त्रिंबकजी उघडउघड पेशव्यांना फौजेनिशी मिळाला. कोरेगाव भीमा च्या युद्धात त्रिंबकजी प्रत्यक्ष सहभागी झाले. बापू गोखले व त्रिंबकजी डेंगळे यांनी लढाईत पराक्रम गाजवला. पुढे पंढरपूर जवळील आष्टीच्या युद्धात (20 फेब्रुवारी 1818) सेनापती बापू गोखले मारले गेले. पेशव्यांची हार झाली. पुढे पेशवे वऱ्हाडात नागपूरकर भोसल्यांच्या प्रांतात गेले. पेशव्यांबरोबरच्या अनेक सरदारांनी पेशव्यांची साथ सोडून दिली. शेवटपर्यंत त्रिंबकजी पेशव्यांबरोबर होते. अखेर 3 जून 1818 ला अशीरगडाजवळील ‘धुळकोट’ येथे श्रीमंत दुसरे बाजीराव जनरल माल्कमच्या स्वाधीन झाले व मराठेशाहीचा अस्त झाला. त्यानंतर त्रिंबकजी पसार झाले. इंग्रज सरकारने त्यांना शोधण्यासाठी त्यांच्यावर इनाम लावले.

त्रिंबकजी हा त्याची सासुरवाडी अहिरगाव (ता. निफाड जि. नाशिक) येथे राहत असल्याची खबर जयाजी पाटील याने 28 जून 1818 ला मालेगावला दिली त्यावेळी कॅप्टन ब्रिग्ज खानदेशात होता. त्याने कॅप्टन स्वान्स्टनला त्रिंबकजीला पकडण्यासाठी धाडले. स्वान्स्टनच्या नेतृत्वाखालील फौजेने त्रिंबकजीला कैद केले. काही काळानंतर त्याची रवानगी वाराणसी जवळच्या चुनारच्या किल्ल्यात करण्यात आली. 1818 ते 1829 अशी दहा-अकरा वर्षे चुनारला कैदेत असणाऱ्या त्रिंबकजीचा अखेर 16 ऑक्टोबर 1829 ला चुनारला दुर्दैवी मृत्यू झाला.
सरदार त्रिंबकजी डेंगळे वाडा (निमगावजाळी, ता.संगमनेर, जि.अहमदनगर)
चुनारगड (जि.मिर्झापुर, उत्तरप्रदेश)

कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्रिंबकजीने स्वकर्तृत्वावर पेशवाईत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. ज्या काळात फितुरीची बीजे मुलुखभर रोवली गेली होती,अनेक मराठे सरदार इंग्रजांशी सुरुवातीपासूनच संधान ठेवून होते त्याकाळात त्रिंबकजी मराठेशाहीच्या स्वातंत्र्याचे स्वप्न बघत होते. इंग्रजांच्या कच्छपी लागून स्वतःची जहागीर वाचवणं त्रिंबकजीला अशक्यप्राय बिलकुल नव्हतं. या सामान्य माणसाने भारतभर फोफावत जाणाऱ्या इंग्रज सत्तेला काही काळ स्वतःच्या बळावर आव्हान दिलं परंतु त्याला सर्वस्वी अपयश आलं. आयुष्याच्या उत्तरार्धात चुनारच्या किल्ल्यावर त्रिंबकजी अत्यंत हलाखीचे जीवन कंठत होता.
त्रिंबकजीचे त्याच्या गावावर अत्यंत प्रेम होते.याबद्दल एल्फिन्स्टन त्याच्या रोजनिशीत म्हणतो की, ‘त्याच्या भरभराटीच्या काळातही तो त्याच्या गावाला विसरला नाही’. अनेक इतिहासकार त्रिंबकजीला ‘मराठेशाहीचा शेवटचा आधारस्तंभ‘ म्हणतात. नाना फडणीसानंतर इंग्रजांना त्रिंबकजीचा धाक असल्यामुळे अनेक इतिहासकार त्यास ‘सवाई नाना’ संबोधतात. न.चिं.केळकर आपल्या ‘मराठे व इंग्रज’ या पुस्तकात त्रिंबकजीविषयी लिहितात,

‘बाजीरावास पुष्कळ कुटिल मंत्री होते पण त्या सर्वांत त्रिंबकजी डेंगळे हा श्रेष्ठ होता. वास्तविक त्रिंबकजी हा अत्यंत शूर, धाडसी, हजरजबाबी, कल्पक व कर्ता असा पुरुष होता. पेशवाईच्या गादीची इतकी हलाखी झाली हे त्याला पाहावत नसे; या सर्वाला कारण इंग्रज हे त्यांच्या मनाने घेतले होते. इंग्रजांच्या वैराचा स्पर्श त्याला लागला नसता किंवा नाना फडणीसासारख्या मुत्सद्याच्या पदरी तो असता तर इतिहासात त्याचे मोठे नाव झाले असते.’

लेखन- ©सुमित अनिल डेंगळे.
संदर्भ-
  1. ‘History of mahrattas’- James grant Duff
  2. ‘Bajirao II and the East India Company’- Pratul Chandra Gupta
  3. ‘John briggs in Maharashtra’- Arvind Deshpande
  4. ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’-राजवाडे (खंड 4)
  5. ‘मराठे व इंग्रज’- न.चिं.केळकर
  6. ‘महाराष्ट्रातील स्वातंत्र्यलढे’- वि.गो.खोबरेकर



त्रिंबकजी डेंगळे यांच्या पराक्रमी सुटकेचा साक्षीदार असणारा ‘ठाण्याचा किल्ला’

 

त्रिंबकजी डेंगळे यांच्या पराक्रमी सुटकेचा साक्षीदार असणारा ‘ठाण्याचा किल्ला’ 

 लेखन ::सुमित अनिल डेंगळे

आज जिथं ठाण्याचं मध्यवर्ती कारागृह आहे तोच ठाण्याचा किल्ला. हेच ते ठिकाण जिथून 1816 सालच्या 12 सप्टेंबरला इंग्रजांच्या तावडीतून शेवटच्या पेशव्यांचे कारभारी त्रिंबकजी डेंगळेंनी इतिहासप्रसिद्ध पलायन केलं. खाडीच्या काठी उभा असलेला, भक्कम तटबंदी लाभलेला, पोर्तुगिजांनी बांधलेला हा कासवाच्या आकाराचा किल्ला खरोखरचं अप्रतिम आहे.

ग्रँट डफ (मराठ्यांचा आद्य इतिहासकार) आपल्या History of Mahrattas (Vol.3, Page no. 377) या ग्रंथात म्हणतो त्याप्रमाणे ‘त्यावेळी या घटनेला लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचं रूप दिलं आणि त्रिंबकजींची प्रसिद्धी मराठी मुलुखात फार मोठ्या प्रमाणावर वाढली, इतकी की पेशव्यांच्या कारभारीपदी असतानाही पूर्वी त्यांना मिळाली नसेल.’ यावरून या घटनेचं महत्त्व लक्षात येण्यासारखं आहे. तसचं ग्रँट डफ हा त्रिंबकजींचा समकालीन होता हेसुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे.

 815 साली त्रिंबकजी डेंगळे यांच्यावर बडोद्याचे वकील गंगाधरशास्त्री पटवर्धन यांच्या पंढरपूरला झालेल्या खुनाचे आरोप इंग्रजांकडून ठेवण्यात आले. इंग्रजांनी त्रिंबकजींची मागणी पेशव्यांकडे केली. आधी वसंतगड (कराडजवळ) इथं पेशव्यांनी त्यांना ठेवलं, पण त्यावर इंग्रजांचं समाधान झालं नाही. त्रिंबकजी आमच्याच कैदेत असावे असं म्हणून एल्फिन्स्टननं (पुण्याचा इंग्रज रेसिडेंट) पेशव्यांवर दबाव आणायला सुरुवात केली. इंग्रजांच्या वाढत्या वर्चस्वाला आव्हान निर्माण करणाऱ्या आणि पेशव्यांचा सरदार, सल्लागार, कारभारी असणाऱ्या त्रिंबकजींना दूर करण्याची आयती संधी इंग्रजांना मिळाली. मग वेल्लोर, श्रीरंगपट्टणम, चुनार व कलकत्ता ही ठिकाणं त्यांना ठेवण्यासाठी इंग्रजांकडून ठरवली गेली. पेशव्यांची त्याला मान्यता नव्हती. शेवटी कंपनी सरकारच्या मुलुखात असणारा ठाण्याचा किल्ला हे ठिकाण निश्चित केलं गेलं. त्यांना वसंतगडाहून ठाण्याला आणण्यात आलं. वर्षभर ते इथं कैदेत होते. 12 सप्टेंबर 1816 च्या भल्या पावसाच्या रात्री त्यांनी किल्ल्यातून मोठ्या शिताफीनं पलायन केलं. हे खुनाचे आरोप व अटक सगळं संशयाच्या आधारावर होतं. चौकशी म्हणता म्हणता इंग्रज तेव्हाही आणि नंतर त्यांचं राज्य आल्यावरही ठोस पुराव्याच्या आधारे हा खून त्रिंबकजींनी केला हे सिद्ध करू शकले नाहीत. आजवर हा खून गूढ आणि अनाकलनीयच राहिला आहे. असो.

 

त्रिंबकजींनी ठाण्यातून नेमकं कसं पलायन केलं याचं एक कथानक आपण ऐकलेलं असतं. ते असं,

त्रिंबकजींवर ठाण्याच्या तुरुंगात कडक पहारा असतो. पहाऱ्यावर ठेवलेले सर्वजण युरोपियन असतात. एक मराठी माणूस काही दिवसांनी किल्ल्याचा तुरुंग अधिकारी एल्ड्रिज यांच्या घोड्याच्या मोतद्दाराची (मोतद्दार म्हणजे घोड्याची निगा राखणारा) नोकरी धरतो. तो त्रिंबकजींना ऐकू जाईल अशा आवाजात रोज गाणी (पोवाडा) गात असायचा. तिथल्या युरोपियन मंडळींना त्यातलं काहीएक कळत नसायचं. त्रिंबकजीना मात्र त्यातून संदेश जायचा. अशा रीतीने पलयानाची योजना ठरली. त्रिंबकजींना रोज सकाळ व संध्याकाळी ठरलेल्या वेळेत शौचास नेलं जायचं. एके दिवशी संध्याकाळी त्यांना नेहमीप्रमाणे शौचालयात नेण्यात आलं. बाहेर तुफान पाऊस आणि अंधार होता. पहारेकरी बाहेर थांबले. त्रिंबकजी शौचालयात गेले. तिथून ते जवळच्या तबेल्यात उतरले, तिथल्या खिडकीचे गज आधीच काढून ठेवले होते. नंतर किल्ल्याच्या तटबंदीवर चढले. तिथून खाली उतरले. ठाण्याची खाडी पोहून पलीकडे गेले. तिथं त्यांची माणसं तयारीत होतीच. त्यांच्यासोबत ते रात्रीतून घाटावर म्हणजे इगतपुरी, सिन्नर भागात रवाना झाले.

उपरोक्त कथानक हे खरं आहेच. त्यावेळी इंग्रजांनी केलेल्या चौकशीतूनच ते समोर आलं. तो मोतद्दारसुद्धा त्या दिवसापासूनच गायब झाला. तो गात असलेल्या पोवाड्याच्या काही ओळीसुध्दा इंग्रजीत उपलब्ध आहे (बिशप हेबरने त्याची नोंद आपल्या प्रवासवर्णनात केली आहे). प्रसिद्ध कादंबरीकार ना. सं. इनामदार यांच्या ‘मंत्रावेगळा’ कादंबरीतही आपण हे कथानक वाचलं असेल. परंतु हे तितकच नाही, हा केवळ त्याचा एक वरवरचा आणि तात्कालिक भाग झाला. पुढे काही वर्षे गेल्यानंतर, म्हणजे मराठी राज्य जाऊन इंग्रजांचं राज्य आलेलं असतं तेव्हा इंग्रजांना या प्रकरणासंबंधी एक ‘क्लू’ मिळतो. केस रिओपन होते. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाते. मग बरच कायकाय बाहेर येतं.

हा पलायनाचा कट फार मोठा असून त्यात अनेक छोट्यामोठ्या व्यक्ती आणि घटना समाविष्ट आहेत. एक मराठा महिलेची (लक्ष्मीबाई ?) या सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते. मुंबईच्या ब्रिटिश सॉलिसिटरला दिलेली पन्नास हजार रुपयांची लाच, भिल्लांच्या टोळ्या किल्ल्यात घुसवण्याची योजना, ‘त्या’ महिलेने विकलेले आपले ऐंशी हजार रुपयांचे दागिने, त्रिंबकजींना रोज देण्यात येणाऱ्या दुधाच्या पेल्यातील तांब्याच्या डबीत असणारा संदेश, साधूच्या वेशात ठाणे परिसरात वावरणारे लोक असं बरंच काय काय थक्क करणारं त्यात आहे. एकंदरीत हे प्रकरण फार मोठं आणि रोमांचक आहे. त्रिंबकजींच्या ठाण्यातून सुटकेवर एखादा भन्नाट चित्रपट निघू शकेल हे तर नक्की. असो.

ठाणे किल्ला 1782 (सौजन्य- bl.uk)

ठाण्याच्या तुरुंगातून पळाल्यानंतर त्रिंबकजींनी खानदेश व शंभू महादेवाच्या डोंगररांगांत भिल्ल, मातंग, रामोशी समाज संघटित केला. इकडे पेशवे आणि इंग्रज यांच्यातील वाद विकोपाला जाऊन त्यांच्यात तह होतो. त्यात त्रिंबकजींच्या कुटुंबीयांना जामीन म्हणून ठेवण्याची अट असते. इंग्रज त्रिंबकजींच्या कुटुंबीयांना ठेवतात ते ही ठाण्याच्याच किल्ल्यात.

त्रिंबकजी डेंगळे यांना पुन्हा एकदा इथं ठेवण्यात येतं. तिसऱ्या आंग्ल मराठा युद्धानंतर 1818 त जेव्हा सासुरवाडी अहिरगाव इथं त्यांना पकडलं जातं, त्यानंतर चांदवड, नगर आणि नंतर ठाण्याच्या तुरुंगातच पुन्हा आणलं जातं. पुन्हा सात आठ महिने ठाणे. तिथेही त्रिंबकजी शांत बसले नव्हते. पुन्हा पलायनाचे अनेक कट बाहेर आकार घ्यायला लागले होते. मग त्यांना तेथून हलवून मुंबई, समुद्रमार्गे कलकत्ता व नंतर काशीजवळील चुनार इथं नेण्यात आलं. जिथं दहा वर्षे कारावासात राहिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

ठाण्यावर 1530 ते 1737 या काळात म्हणजे तब्बल दोन शतकं पोर्तुगिजांचा अंमल होता. त्यांनीच मोक्याचं ठिकाण पाहून हा किल्ला बांधला. त्यासाठी तज्ज्ञ इंजिनीअर्स पोर्तुगाल मधून बोलवून घेतले. नंतर पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात मराठ्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. 1782 च्या मराठे व इंग्रज यांच्यात झालेल्या सालभाईच्या तहाने किल्ला इंग्रजांकडे आला. मुंबई व आसपासचा प्रदेश हा कंपनी सरकारच्या बराच पूर्वी ताब्यात आलेला होताच, त्याला हा प्रदेश जोडला गेला. मग किल्ल्याचा तुरुंग म्हणून वापर इंग्रजांनी सुरू केला. त्रिंबकजी तसे इथले पहिले राजकीय कैदी. 1848 साली क्रांतिवीर राघोजी भांगरे यांना फाशी देण्यात आली ती इथंच. तसचं नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याच्या खूनप्रकरणी अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या तिघांना 1910 मध्ये इथं फाशी देण्यात आली. सावरकरांना अंदमानला पाठवण्याआधी इथं ठेवण्यात आलं होतं. 1942 च्या छोडो भारत आंदोलनादरम्यान तर स्वातंत्र्यसैनिकांनी तुरुंग खचाखच भरलं होतं.

ठाणे कारागृहातील त्रिंबकजी डेंगळे यांचा फोटो

कारागृह असल्याने किल्ला पाहण्यासाठी खुला नसतो. किल्ल्याचा काही भाग स्मारकाच्या रूपानं सर्वसामान्यांसाठी आगामी काळात खुला करून देण्याचाही प्रशासनाचा विचार आहे. काही काळापूर्वी तुरुंगात कैदेत असणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचे फोटोज तिथे लावण्यात आले. त्रिंबकजी डेंगळे यांचाही फोटो त्यात होता. त्रिंबकजी डेंगळे यांचा तेथील फोटो कारागृह प्रशासनाने नंतर उपलब्ध करून दिला, तो पोस्टमध्ये जोडला आहे.

सुमित अनिल डेंगळे

संदर्भ-

  1. History of Mahrattas(Vol.3)- James Grant Duff
  2. Poona Residency Correspondence (Vol. 13)
  3. मराठी रियासत (खंड 8)- गो. स. सरदेसाई
  4. मराठी विश्वकोश- ठाणे किल्ला




Monday, 3 April 2023

पुण्यातला डेंगळे पूल

 



पुण्यातला डेंगळे पूल
लेखन ::सुमित अनिल डेंगळे
‘डेंगळे पूल’ पुणे शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात आहे. शिवाजीनगरहून रेल्वे स्टेशन, कँप, हडपसरकडे जायचं म्हंटलं की या पूलाचा वापर केला जातो. परंतु अनेकांना ज्यांच्या नावानं हा पूल आहे ते ‘डेंगळे’ नेमकी कोण हे माहीत नसतं.
ते डेंगळे म्हणजे शेवटच्या पेशव्यांचे सरदार ‘त्रिंबकजी डेंगळे’. त्यांनीच एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला (म्हणजे 1800-1818 मध्ये कधीतरी) हा पूल बांधला. पूर्वी या पूलाजवळ सतराव्या शतकातला एक जुना पूल होता. त्रिंबकजींनी तिथं दगडाचा नवा पूल बांधून घेतला. त्यावेळी पुण्याचा विस्तार आजच्यासारखा नदीच्या उत्तरेला नव्हता. पुणं हे मुठा नदीच्या दक्षिणेला होतं. पलीकडं भांबुर्डा (भांबवडा) नावाचं गाव होतं, ज्याला आज आपण शिवाजीनगर म्हणतो. तिथं पेशव्यांचा तोफखाना होता. ते या पूलानं जोडलं गेलं.
अर्थात डेंगळे पूल हे नाव काही त्या पूलाला त्यावेळी देण्यात आलं नव्हतं. तो बांधल्यानंतर काही वर्षांतच मराठ्यांचं राज्य गेलं. परंतु लोक डेंगळेंनी बांधला म्हणून त्याला डेंगळे पूल म्हणू लागले. आणि ते नाव रूढ झालं. 1970 ला पुणे महापालिकेने या पूलावर नवा पूल बांधला, जो आपल्याला आज दिसतोय. 2016 मध्ये हा पूल धोकादायक घोषित करण्यात आला. अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला. त्याच्याजवळ समांतर नव्या पूलाची उभारणी करण्यात आली. त्या पूलाला ‘शाहू सेतू’ असं नाव देण्यात आलं. त्यानं वाहतुक बरीचशी विभागली गेली.
आता डेंगळे पूलाच्या डागडुजीचं काम सुरू होणार आहे. पूलाच्या रचनेबरोबर त्याच्या नावाचीही डागडुजी व्हायला हवी. त्याचं नाव ‘सरदार त्रिंबकजी डेंगळे पूल’ व्हायला हवं. इंग्रजांविरुद्ध संघर्ष करणाऱ्या, अखेरच्या काळात मराठेशाही सावरून धरण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या, राज्यात भिल्ल, मातंग, रामोशी समाज ब्रिटिशांविरुद्ध संघटित करणाऱ्या त्रिंबकजी डेंगळे यांच्या स्मृती त्यानिमित्तानं जतन व्हायला हव्यात.

अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय

  अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...