विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label सरसेनापती प्रतापराव गुजर. Show all posts
Showing posts with label सरसेनापती प्रतापराव गुजर. Show all posts

Monday, 6 September 2021

सरसेनापती प्रतापराव गुजर….. यांच्या आखणीतील एक सर्जिकल स्ट्राइक भाग ४

 


सरसेनापती प्रतापराव गुजर…..
यांच्या आखणीतील एक सर्जिकल स्ट्राइक
भाग ४
प्रतापराव व बहलोलखान यांच्यात झालेल्या युद्धाचे वर्णन नारायण शेणवी (इंग्रजांचा दुभाशी) हा डेप्युटी गव्हर्नर, मुंबई यांना ४ एप्रिल १६७४ रोजी लिहीलेल्या पत्रात लिहीतात.
The Rajah Sevajee intended to proceed to currall to give a new orders to his army and to creat a New generall of his horse in the rooms of pertab roy (Pratap ray) Who fell in the encounter of Sevajees army with Bullool Ckaun in a narrow passage betwixt two hills who with six horse man more were slaine, being not succored by the rest of the army, so that Bullool ckaun remains victorius. (factory records of surat)
राजे शिवाजी यांनी आपल्या फौजेला आज्ञा देण्यासाठी व नविन सरनोबत नियुक्त करण्यासाठी कुडाळ येथे जाण्याचा निर्णय घेतला त्याचे कारण असे की, सरनोबत प्रतापराव हे बहलोलखानाशी झालेल्या चकमकीत मारले गेले. ही चकमक दोन टेकड्यांच्या मधे असलेल्या अरुंद ठिकाणी (खिंडीत – नेसरीची खिंड) झाली. प्रतापरावांसोबत आणखी सहा घोडेस्वार मारले गेले. प्रतापरावांना वेळेवर सैन्याची मदत न पोहोचू शकल्याने ह्या सर्वांची कत्तल झाली. लढाईमद्धे बहेलोल खान विजयी ठरला.
याच पत्राचे भाषांतर शिवकालीन पत्र सार संग्रह खंड २ मद्ये पत्र क्र. १६२५ मद्ये देखिल पहायला मिळते.
प्रतापराव बहलोलखानाशी फक्त ६ घोडेस्वारांनिशी लढताना बाकीच्या सैन्याचे अभावी मारला गेला. त्याचे जागी नविन सेनापती नेमून, सैन्याला नवे हुकूम देण्यासाठी शिवाजी कुडाळला जाणार होता. परंतु प्रतापरावाचा दुय्यम आनंदराव याने धीराचे पत्र लिहिल्यामुळे शिवाजीने त्याला सेनापती पद देऊन ” शत्रूचा मोड केल्याशिवाय तोंड दाखवू नये.” असा हुकूम केला.
वरील इंग्रजी पत्र व त्याचे मराठी भाषांतर पाहून लक्षात येते की, प्रतापरावां सामवेत आणखी सहा योद्धे नेसरीच्या खिंडीत मारले गेले. मात्र त्या सहा जणांची नावे कोणत्याही समकालीन कागदात माझ्यातरी माहितीनूसार उल्लेखीत नाहीत. तसेच केवळ सहा योद्धे मारले गेले हे इंग्रजी पत्राखेरीज कोणालाच माहित नाही. या वेळी प्रतापरावांसोबत नक्की किती सैन्य असावे याचा उलगडा होत नाही. उमराणीच्या लढाईत लढताना प्रतापरावांसोबत असलेले सरदार सर्व तेच नेसरीच्या लढाईत उपस्थित न्हवते. कारण विठोजी शिंदे जे उमराणीच्या लढाईत लढले होते ते नेसरीच्या खिंडीतील युद्धाच्या सहा महिने आधीच श्रावण महिन्यात मारले गेले आहेत. (जेधे शकावली) त्यामुळे विठोजी शिंदे नेसरीच्या लढाईत उपस्थित नसावेत. तसेच जेधे शकावलीतील उल्लेखानुसार फाल्गुन वद्य ११, १५९५, संपगावीची पेठ लुटली आनंदराव येता खिदरखानासी लढाई जाली दोन हत्ती पाडाव झाले. म्हणजेच उमराणीच्या लढाईत लढलेले प्रतापरावांचे दुय्यम आनंदराव हे नेसरीची लढाई झाल्यानंतर ही जिवंत आहेत. याचाच अर्थ एकतर ते नेसरीच्या लढाईत नसावेत कींवा ते नेसरीच्या खिंडीत मारले गेले नसावेत.
प्रतापराव गुजर हे मारले गेल्यावर सरनोबात पद भुषविण्यासाठी महाराजांनी आनंदराव यांस तात्काळ सरनोबत पदाची सुत्रे सोपविली. म्हणजे प्रतापरावांनंतर काही मोजका काळ का होईना आनंदराव हे सरनोबत पदावर होते. त्या नंतर सरनोबत पदाची सुत्रे हंसाजी उर्फ हंबिरराव मोहिते यांच्या हाती सोपविण्यात आली. (F.R.Surat) स्वराज्याच्या सरसेनातींमद्धे प्रतापराव गुजरांनंतर आनंदराव हे नाव देखील सामाविष्ट होते.
इंग्रजी पत्रातील शब्द पहाता, Pertab roy (Pratap ray) Who fell in the encounter of Sevajees army with Bullool Ckaun. येथे Battle किंवा War हे शब्द न वापरता Encounter शब्द वापरला आहे. या वाक्यातील ENCOUNTER या शब्दाचा शब्दशः अर्थ पहाता. घडलेली घटला ही समोरासमोर घडलेली चकमक असावी. (कदाचित बहेलोलखानाच्या फौजेशी प्रतापरावांच्या सैन्याची अकस्मात भेट झाली असावी. त्यात प्रतापरावांचा लढण्याचा निर्णय हा मरणानंतर देखील मराठ्यांनाच विजयश्री देऊन गेला.) प्रतापरावांच्या कार्यकाळातील रणनीति व पराक्रम पाहूनच छत्रपतींनी त्यांना सरनौबती दिली असावी. असे शुर प्रतापराव केवळ सहा साथीदार घेऊन बहलोल खानाच्या छावणीवर छापा घालण्याचा जिवघेणा खेळ खेळणार नाहीत. अखेर ते स्वराज्याचे सरनोबत होते. इंग्रजी पत्रातील उल्लेख सांगतो की, वेळेवर सैन्याची कूमक पोहोचू न शकल्याने प्रतापराव व साथीदारांना मरणाला सामोरे जावे लागले. याचाच अर्थ हा छापा मराठा फौजेत माहित असावा पण फौज तेथे पोहोचण्यात दिरंगाई झाली व ७ मराठे मारले गेले. (कदाचित मराठ्यांची फौज वेळेवर पोहोचली असती तर रणांगणावर काही वेगळे चित्र दिसले असते.)
अवकाश होऊन प्रतापराव सरनोबत तलवारीचे वाराने ठार जाले. रण बहुत पडिले. रक्ताच्या नद्या चालिल्या. त्याजवरी बेलोलखान विजापूरास गेला. (सभासद बखर) अवकाश होऊन प्रतापराव पडले म्हणजे प्रतापरावांनी व सहा जणांनी बहूत काळ रणांगण गाजविले नक्कीच तसेच त्यांचे शौर्य व बलिदान अनन्यसाधारण होते यात शंका नाही. रक्ताच्या नद्या वाहिल्या. पण मारले गेलेल्या मावळ्यांची संख्या केवळ सात सांगितली आहे. म्हणजेच मराठ्यांनी शत्रूची कत्तल चालविली असणार यात शंका नाही. या लढाई नंतर बलोलखान विजापूरास गेला. सरनोबत मारले गेले. पण बहलोलखानाने माघार पत्करली.
महाशिवरात्रीच्या रात्री प्रतापराव व इतर सहा शिवगणांनी बहलोलखानाच्या फौजेस शिवतांडव काय असते दाखवून दिले. अखेर मावळ्यांच्या पवित्र शरीरातुन भु-लिंगावर रूधिराभिषेक झाला. मावळ्यांच्या श्वासाचे बिल्वपत्र समर्पित झाले. शिवतांडव थांबले. काळाने देखील विजयाची माळ त्या सात शिवगणांच्या गळ्यात घातली. व इतिहासाच्या सुवर्ण पानात अजरामर केले..
धन्यवाद…
आपलाच,
अनिकेत अशोक पाटील
मुरूड जंजिरा, रायगड
९२२६३६०७३३

सरसेनापती प्रतापराव गुजर….. यांच्या आखणीतील एक सर्जिकल स्ट्राइक भाग ३

 


सरसेनापती प्रतापराव गुजर…..
यांच्या आखणीतील एक सर्जिकल स्ट्राइक
भाग ३
वेडात मराठे विर दौडले सात…
उमराणीच्या लढाईत बेलोलखानाने प्रतापराव व मराठा सैन्यासमोर शरणागती पत्करली. प्रतापरावांनी त्यास माफी दिली. प्रतापराव माघारी फीरले. येताना वाटेत मोघलाईत असलेले भागानगर, देवगड, रामगीरी ह्या प्रदेशांची लूट करुन प्रतापराव स्वराज्यात परतले.
शके १५९५, प्रमादी संवत्सरे, श्रावण वद्य नवमी सातारा घेतला. कार्तिक मासी सर्जा खानासी व विठोजी सीदे (शिंदे) यांसी झगडा जाला विठोजी पडला. (जेधे शकावली) विठोजी शिंदे हे उमराणीच्या लढाईत प्रतापराव गुजरांसामावेत होते. सर्जा खानाशी लढताना त्यांचा मृत्यू झाला.
प्रतापराव गुजरांनी बहलोल खानास माफ केले हे शिवाजी महाराजांस रुचले नाही. उमराणीच्या लढाईत प्रतापरावांनी केलेल्या उपकारांची जाण न ठेवता, बहलोलखान पन्हाळा किल्ल्यावर चाल करुन आला. महाराज प्रतापरावांवर नाराज झाले. याच गोष्टीचा योग्य तो समाचार घेण्यासाठी महाराजांनी प्रतापरावांस सांगितले , “बहलोल खान येतो यासी गाठ घालून बुडवून फते करणे नाहीतर तोंड न दाखविणे.” अशा कठोर शब्दात महाराजांनी प्रतापरावांस सुनावले. (सभासद बखर) (अशा अशयाचे पत्र देखिल महाराजांनी प्रतापरावांस पाठविले होते, ते पत्र किंवा पत्राचे स्वरूप मला अभ्यासण्यास सापडले नाही.) बहलोल खानाने केलेल्या विश्वास घाताने प्रतापरावांच्या मनातील क्रोधाग्निने वणव्याचे रुप धारण केले. याच वणव्यात बहलोल खानास दहन करण्याचा निश्चय झाला.
राजियास कळले की, बेलोलखान मागती आला आहे. मग राजे म्हणू लागले कीं,” हा घडोघडी येत.” या करिता मागती प्रतापराव यास पाठविले की, ” तुम्ही लश्कर घेऊन जाऊन बेलोलखान येतो. यांसी गाठी घालून, बुडवून फते करणे. नाहीतर तोंड न दाखविणे.” ऐसे प्रतापराव यास निक्षुन सांगून पाठविले. त्यावरि प्रतापराव जाऊन बेलोलखानासी गाठीले. जेसरीवरी (नेसरीवरी) नवाब आला. त्यांनी गाठिले. मोंठे युद्ध जाले. अवकाश होऊन प्रतापराव सरनोबत तलवारीचे वाराने ठार जाले. रण बहुत पडिले. रक्ताच्या नद्या चालिल्या. त्याजवरी बेलोलखान विजापूरास गेला. (सभासद बखर)
शके १५९५ , माघ वद्य १४, सिवरात्रीस बहलोलखानात व प्रतापराव सरनोबत यांचा झगडा निवटियास जाला. प्रतापराव पडिले. (जेधे शकावली)
प्रतापराव रणांगणात पडले त्या दिवशी महाशिवरात्री होती.

सरसेनापती प्रतापराव गुजर….. यांच्या आखणीतील एक सर्जिकल स्ट्राइक भाग २

 


सरसेनापती प्रतापराव गुजर…..
यांच्या आखणीतील एक सर्जिकल स्ट्राइक
भाग २
रात्रीच्या वेळी हत्तींना पाणी पिण्यासाठी माहूत व इतर सैन्य जलाशया जवळ जावयास निघाले तेव्हा त्यांना कळून चुकले की आपण पुर्णपणे अडकले गेलो आहोत. याच वेळी घुळीचा लोट आसमंतात उधळीत प्रतापराव आपल्या हजार घोडेस्वारांनीशी शत्रूवर तुटून पडले. ह्या अकस्मात झालेल्या हल्याने बहलोल खानाचा सैन्य धांदळून गेले. मात्र काहीच वेळात बेहलोल खान व त्याचे सैन्य देखील युद्धास सज्ज झाले. तुंबळ युद्ध सुरु झाले. चार घटका युद्धाचा खणखणाट चालू राहिला.
मराठ्यांचा आवेश पाहून शत्रू सैन्य आता माघार घेऊ लागले. पराक्रमाची नशा चढलेल्या आनंदरावांनी काही विरांच्या मदतिने शत्रू वर परत हाल्ला चढविला. मात्र यात आनंदराव जखमी झाले परंतु मागे हाटले नाहीत. तब्बल तिन घटीकापर्यंत(अंदाजे एक ते दिड तास) आनंदरावांनी शत्रू सैन्याची धुळधाण उडाविली.
ह्याच वेळी एक भला मोठा, उन्मत्त हत्ती पिसळला. त्या हत्तीने घट्ट बांधलेली साखळी स्वतः तोडून ती सोंडेत पकडली व रणांगणावर बेफान पणे सैरावैरा धावत सुटला. आपल्याच सैन्यात हत्तीने दाणादाण उडवून दिली. कित्येक जण जखमी तर काही मारले देखिल गेले. काही काळानंतर माहूतांनी बहूत प्रयत्नांनी हात्तीला वश केले. मात्र याच संधीचा फायदा घेत सिद्धी हिलाल याने आपले पाच पुत्र व सैन्याच्या मदतीने शत्रू वर पुन्हा हाल्ला चढविला. रुपाजी भोसले, सोमाजी मोहिते व सिदोजी निंबाळकर हे देखील शत्रू वर तुटून पडले. विठोजी शिंदे व विठ्ठल पिलदेव हे एका बाजूने मोठ्या सैन्यासोबत शत्रू सैन्यावर धावून गेले.
महादजी ठाकूर हा देखील सोमाजी मोहित्यांच्या सोबतीला लढत होता. विजापुरी सैन्याच्या वतीने भाईरखान नावाचा सेनापती आपल्या लढवय्या पठाण फौजेला घेऊन पुढे सरसावला. पठाणांचे व मराठ्यांचे तुंबळ युद्ध माजले. तिरंदाजांच्या कमानी स्थिरावल्या, समशेरी भिरभीरु लागल्या कित्येकांचे हात तुटले, कित्येकांचे पाय गेले, रक्ताचे पाठ वाहू लागले. कित्येंकांची शिरकमल भु-क्षेत्रावर रक्ताभिशेख घालत कोसळली. कित्येकांची रक्ताने आंघोळ झाली होती. युद्ध मग्न झालेल्या त्या दोन्हीही सैन्यांचे सुर्यास्ता पर्यंत युद्ध सुरू होते.
दिपाजी राऊत व कृष्णाजी भास्कर हे दोन्हीही रणधुरंदर हातात नंग्या समशेरी घेऊन घोड्यावर स्वार होत शत्रू सैन्याचा पाठलाग करु लागले. सापडेल त्याला आपल्या समशेरीचे पाणी पाजत यमसदनी पाठवत होते. मात्र क्षत्रिय धर्म सांडला न्हवता. कोणाच्याही पाठीवर वार झाला नाही. त्यांच्या या अतुलनिय पराक्रमाने रणांगण पटून उठले होते. मात्र याच बहलोलखानाचा सरदार सिद्धी महमद बर्क याने तिर-कमान रचली. सुटलेला तिर राऊतांच्या घोड्याचा वेध घेणारा निघाला. राऊतांचा घोडा रणांगणावर कामी आला. राऊतांनी रणभूमीचे भान राखत दुसऱ्या घोड्यावर ते अरुढ झाले. शत्रू सैन्याने या घोड्याच्या देखील कुशीत, पाठीवर व तोंडावर तलवारीने तीन वार केले. मात्र आता राऊतांचा क्रोध अनावर झाला. राऊतांची समशेर बर्कीचे रक्त प्राशन करण्यास तहानली होती. राऊतांनी घोडा बर्कीच्या जवळ घेतला व तलवारीने केलेल्या एका प्रहारातच बर्की संपविला.
कित्येक रणांगणावर समशेर गाजविणारा बाहलोल खानाचा आधारस्थंभ बर्की, रणांगणावर कोसळल्याची वार्ता रणभूमीवर वाऱ्यासारखी पसरली. शत्रू सैन्य धिर सोडून पळू लागले. बर्कीच्या मृत्युची वार्ता ऐकून बहलोल खान जाणून चुकला की, त्याचा काळ जवळ आला आहे. मृत्यूच्या भितीने बहलोल खान प्रतापरावांना शरण आला. प्रतापरावांनी त्याला माफी दिली. कृष्णाजी भास्कर यांनी शत्रूच्या सैन्याची लूट केली. कित्येक हत्ती, घोडे पाडाव झाले.
शरण आलेला बहलोलखान प्रतापरावांनी दाखविलेल्या मार्गाने मराठ्यांसमोर पराजीत होऊन मागे निघून गेला. (पर्णालपर्वतग्रहणाख्यान, अध्याय -५, ३८-१०५ सारांश)
प्रतापरावांच्या सैन्याने विजापुरी सैन्याची कोंडी केली. विजापुरी सैन्याची रसद तोडण्यात आली. तसेच अवश्यक असणाऱ्या पाण्यापासून त्यांना वंचित ठेवण्यात आले. अशा हलाखीच्या परिस्थितीत मराठ्यांनी शत्रू वर हल्ला चढवीला. बेलोलखान जेरीस आला. बेलोलखानाने प्रतापराव व मराठा सैन्यासमोर शरणागती पत्करली. प्रतापरावांनी त्यास माफी दिली. प्रतापराव माघारी फिरले. येताना वाटेत मोघलाईत असलेले भागानगर, देवगड, रामगीरी ह्या प्रदेशांची लूट करुन प्रतापराव स्वराज्यात परतले.
….. (क्रमशः)
आपलाच,
अनिकेत अशोक पाटील,
मुरुड-जंजिरा, रायगड
९२२६३६०७३३

सरसेनापती प्रतापराव गुजर….. यांच्या आखणीतील एक सर्जिकल स्ट्राइक भाग १

 


सरसेनापती प्रतापराव गुजर…..
यांच्या आखणीतील एक सर्जिकल स्ट्राइक
भाग १
हिंदवी स्वराज्याच्या काळजावर खोलवर झालेली जखम म्हणजे औरंगजेबाचा सरदार मिरजाराजे जयसिंग व छत्रपती शिवराय यांच्यातील तह. या तहानुसार स्वराज्यातील २३ किल्ले व त्या बरोबर ४ लक्ष होन वार्षिक उत्पन्नाचा मलुक मोघलांना देण्यात आले. (शि.प.सा.सं – १०६४) सभासद बखरीतील उल्लेख – सत्ताविस किल्ले तांब्रास दिले. पण काहीच काळात मोघल व मराठे यांच्यातील तहाला वणवा लागला. महाराजांनी लागलीच मोघलांना तहात दिलेले आपले किल्ले परत घेण्याचा तगादा सुरू केला.
कोकणात उतरण्याचे दक्षिणेकडील द्वार म्हणजे पन्हाळा किल्ला घेण्याच्या प्रयत्नात असताना सरसेनापती नेतोजी पालकर यांच्याकडून कसूर झाला. महाराजांनी त्यांना सरनोबत पदावरुन दूर करुन राजगडाचे सरनौबत कुडतोजी गुजर यांना प्रतापराव हे नाव देऊन सरनौबती देऊन गौरविले.
उंबराणीची लढाई..
शके १५९५ प्रमादी संवत्सरे चैत्र शुद्ध प्रतिपदेला राजश्री राहीईरीहून पनाल्यास गेले तेच मासी बहलोल खान यांसी व प्रतापराव व आनंद राव यासी लढाई जाहाली विज्या पुरा जवळ फत्ते जाली येक हती पाडाव जाला. (जेधे शकावली)
प्रतापराव यास हुकूम करुन आणविले आणि हुकुम केला की, ” विजापुरचा बेलोलखान येवढा वळवळ बहूत करीत आहे. त्यास मारुन फते करणे.” म्हणोन आज्ञा करून लष्कर नवाबावरी रवाना केले. त्यांनी जाऊन उंबराणीस नवाबास गांठिले. चौतर्फा राजियाचे फौजेने कोंडून उभा केला. युद्धही थोर जाहले. (सभासद बखर)
विजापुरी सरदार अब्दुल करीम बहलोलखान हा बारा हजार स्वार घेऊन स्वराज्यावर चाल करुन आला. ही वार्ता महाराज्यांस समजताच महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांस बेलोलखानावर रवाना केले. बेलोलखानाचे सैन्य व प्रतापराव यांच्या सैन्याची भेट उंबराणीस झाली. मराठ्यांनी बेलोलखानाच्या सैन्याची केलेली वाताहात कथन करताना, कवी परमानंद आपल्या पर्णालपर्वतग्रहणाख्यान ह्या काव्यात सांगतात,
उम्राणी गावाजवळ येताच त्याला (बेलोलखानास ) पत्र आले की, सर्जाखानासोबत मुजाफर मलीक हा सैन्यासह रांंगणे किल्ल्याच्या आसपास आहे. त्याला आपल्या बाजूला वश करुन घ्यावे. तसेच सिद्धी मसूद, कर्नेलचा अब्दुलअजीज, नळदुर्गाच्या अलिकडील खिदिरखान (याला पणि म्हणतात) हे तिन सेनापती आहेत. इतर सैन्य मदतीला मिळविण्यासाठी ह्या तीन सेनापतींनी दिलेरखानास भेटून सैन्य मागावे. अशाप्रकारे सर्वांनी एकत्र येऊन शिवाजी याला युक्तीने जिंकावे.
वरील सर्व योजना छत्रपती शिवाजी महाराज्यांस समजताच, शिवरायांनी आपल्या प्रतापराव, आनंदराव या सेनापतिंना बोलावून त्यांना सर्व डाव समजाविला. जो पर्यंत बहलोलखान स्वतःच्या थोड्याफार सैन्यासह जवळच आहे तोपर्यंत त्याला एकट्याला गाठावे व जोरदार हल्ला करावा. महाराजांची आज्ञा घेऊन सेनापती निघाले. (ह्या वेळी प्रतापरावांसोबत आनंदराव, सिद्धी हिलालखान,विठोजी शिंदे, कृष्णाजी भास्कर, विठ्ठल पिलद्या उर्फ पिलदेव, विसो बल्लाळ हे साथीदार होते.)
(सिद्धी हिलाल हा मुस्लिम अधिकारी असून तो कधी महाराजांकडे तर कधी अदिलशाहीत येऊन जाऊन होता. मालोजी राजे यांचा भाऊ विठोजी राजे भोसले, यांचा द्वितीय पुत्र खेळोजी राजे भोसले यांचा सिद्धी हिलाल हा क्रितपुत्र होता. क्रितपुत्र म्हणजे विकत घेतलेला गुलाम पण स्वतःच्या मुलासारखा वाढविलेला. )
रातोरात सर्वजण शत्रूच्या जलाशया (तलाव) जवळ आले. नंतर योग्य संधी पाहून शत्रूच्या चहू बाजूंस पसरले. दुरून चहू दिशांस खूप सैन्य दिसू लागले. मग सर्वांनी जलाशयास वेढा घातला. सिद्धी हिलाल हे तेथे अघाडीवर होते. तेथून जवळपास एक कोसावर विठोजी शिंदे होते. कृष्णाजी भास्कर आणि विठ्ठल पिलदेव हे शत्रूच्या दोन्हीही बाजूला नजर रोखून होते. विसो बल्लाळ मात्र घिरट्या घालत होते. आत्ता पर्यंत आपण मराठ्यांच्या चक्रव्यूहात आडकल्याची शंका देखिल बेलोलखानाच्या फौजेस आलेली न्हवती.

शिवकालीन इ.स. 1673 (शके 1595) उंबराणीच्या लढाईबद्दल माहिती भाग ४

 

शिवकालीन इ.स. 1673 (शके 1595)
उंबराणीच्या लढाईबद्दल माहिती
पोस्तसांभार ::एकनाथ वाघ



भाग ४
प्रतापरावांच्या सैन्याने विजापुरी सैन्याची कोंडी केली. विजापुरी सैन्याची रसद तोडण्यात आली. तसेच अवश्यक असणाऱ्या पाण्यापासून त्यांना वंचित ठेवण्यात आले. अशा हलाखीच्या परिस्थितीत मराठ्यांनी शत्रू वर हल्ला चढवीला. बेलोलखान जेरीस आला. बेलोलखानाने प्रतापराव व मराठा सैन्यासमोर शरणागती पत्करली. प्रतापरावांनी त्यास माफी दिली. प्रतापराव माघारी फिरले. येताना वाटेत मोघलाईत असलेले भागानगर, देवगड, रामगीरी ह्या प्रदेशांची लूट करुन प्रतापराव स्वराज्यात परतले.
स्रोत :

शिवकालीन इ.स. 1673 (शके 1595) उंबराणीच्या लढाईबद्दल माहिती भाग ३

 

शिवकालीन इ.स. 1673 (शके 1595)
उंबराणीच्या लढाईबद्दल माहिती
पोस्तसांभार ::एकनाथ वाघ

भाग ३
उंबराणीच्या लढाई :
महादजी ठाकूर हा देखील सोमाजी मोहित्यांच्या सोबतीला लढत होता. विजापुरी सैन्याच्या वतीने भाईरखान नावाचा सेनापती आपल्या लढवय्या पठाण फौजेला घेऊन पुढे सरसावला. पठाणांचे व मराठ्यांचे तुंबळ युद्ध माजले. तिरंदाजांच्या कमानी स्थिरावल्या, समशेरी भिरभीरु लागल्या कित्येकांचे हात तुटले, कित्येकांचे पाय गेले, रक्ताचे पाठ वाहू लागले. कित्येंकांची शिरकमल भु-क्षेत्रावर रक्ताभिशेख घालत कोसळली. कित्येकांची रक्ताने आंघोळ झाली होती. युद्ध मग्न झालेल्या त्या दोन्हीही सैन्यांचे सुर्यास्ता पर्यंत युद्ध सुरू होते.
दिपाजी राऊत व कृष्णाजी भास्कर हे दोन्हीही रणधुरंदर हातात नंग्या समशेरी घेऊन घोड्यावर स्वार होत शत्रू सैन्याचा पाठलाग करु लागले. सापडेल त्याला आपल्या समशेरीचे पाणी पाजत यमसदनी पाठवत होते. मात्र क्षत्रिय धर्म सांडला न्हवता. कोणाच्याही पाठीवर वार झाला नाही. त्यांच्या या अतुलनिय पराक्रमाने रणांगण पटून उठले होते. मात्र याच बहलोलखानाचा सरदार सिद्धी महमद बर्क याने तिर-कमान रचली. सुटलेला तिर राऊतांच्या घोड्याचा वेध घेणारा निघाला. राऊतांचा घोडा रणांगणावर कामी आला. राऊतांनी रणभूमीचे भान राखत दुसऱ्या घोड्यावर ते अरुढ झाले. शत्रू सैन्याने या घोड्याच्या देखील कुशीत, पाठीवर व तोंडावर तलवारीने तीन वार केले. मात्र आता राऊतांचा क्रोध अनावर झाला. राऊतांची समशेर बर्कीचे रक्त प्राशन करण्यास तहानली होती. राऊतांनी घोडा बर्कीच्या जवळ घेतला व तलवारीने केलेल्या एका प्रहारातच बर्की संपविला.
कित्येक रणांगणावर समशेर गाजविणारा बाहलोल खानाचा आधारस्थंभ बर्की, रणांगणावर कोसळल्याची वार्ता रणभूमीवर वाऱ्यासारखी पसरली. शत्रू सैन्य धिर सोडून पळू लागले. बर्कीच्या मृत्युची वार्ता ऐकून बहलोल खान जाणून चुकला की, त्याचा काळ जवळ आला आहे. मृत्यूच्या भितीने बहलोल खान प्रतापरावांना शरण आला. प्रतापरावांनी त्याला माफी दिली. कृष्णाजी भास्कर यांनी शत्रूच्या सैन्याची लूट केली. कित्येक हत्ती, घोडे पाडाव झाले.
शरण आलेला बहलोलखान प्रतापरावांनी दाखविलेल्या मार्गाने मराठ्यांसमोर पराजीत होऊन मागे निघून गेला. (पर्णालपर्वतग्रहणाख्यान, अध्याय -५, ३८-१०५ सारांश)

शिवकालीन इ.स. 1673 (शके 1595) उंबराणीच्या लढाईबद्दल माहिती भाग २

 

शिवकालीन इ.स. 1673 (शके 1595)
उंबराणीच्या लढाईबद्दल माहिती
पोस्तसांभार ::एकनाथ वाघ

भाग २
उंबराणीच्या लढाई :
रातोरात सर्वजण शत्रूच्या जलाशया (तलाव) जवळ आले. नंतर योग्य संधी पाहून शत्रूच्या चहू बाजूंस पसरले. दुरून चहू दिशांस खूप सैन्य दिसू लागले. मग सर्वांनी जलाशयास वेढा घातला. सिद्धी हिलाल हे तेथे अघाडीवर होते. तेथून जवळपास एक कोसावर विठोजी शिंदे होते. कृष्णाजी भास्कर आणि विठ्ठल पिलदेव हे शत्रूच्या दोन्हीही बाजूला नजर रोखून होते. विसो बल्लाळ मात्र घिरट्या घालत होते. आत्ता पर्यंत आपण मराठ्यांच्या चक्रव्यूहात आडकल्याची शंका देखिल बेलोलखानाच्या फौजेस आलेली न्हवती.
रात्रीच्या वेळी हत्तींना पाणी पिण्यासाठी माहूत व इतर सैन्य जलाशया जवळ जावयास निघाले तेव्हा त्यांना कळून चुकले की आपण पुर्णपणे अडकले गेलो आहोत. याच वेळी धुळीचा लोट आसमंतात उधळीत प्रतापराव आपल्या हजार घोडेस्वारांनीशी शत्रूवर तुटून पडले. ह्या अकस्मात झालेल्या हल्याने बहलोल खानाचा सैन्य धांदळून गेले. मात्र काहीच वेळात बेहलोल खान व त्याचे सैन्य देखील युद्धास सज्ज झाले. तुंबळ युद्ध सुरु झाले. चार घटका युद्धाचा खणखणाट चालू राहिला.
मराठ्यांचा आवेश पाहून शत्रू सैन्य आता माघार घेऊ लागले. पराक्रमाची नशा चढलेल्या आनंदरावांनी काही विरांच्या मदतीने शत्रू वर परत हाल्ला चढविला. मात्र यात आनंदराव जखमी झाले परंतु मागे हाटले नाहीत. तब्बल तिन घटीकापर्यंत(अंदाजे एक ते दिड तास) आनंदरावांनी शत्रू सैन्याची धुळधाण उडाविली.
याच वेळी एक भला मोठा, उन्मत्त हत्ती पिसळला. त्या हत्तीने घट्ट बांधलेली साखळी स्वतः तोडून ती सोंडेत पकडली व रणांगणावर बेफान पणे सैरावैरा धावत सुटला. आपल्याच सैन्यात हत्तीने दाणादाण उडवून दिली. कित्येक जण जखमी तर काही मारले देखिल गेले. काही काळानंतर माहूतांनी बहूत प्रयत्नांनी हत्तीला वश केले. मात्र याच संधीचा फायदा घेत सिद्धी हिलाल याने आपले पाच पुत्र व सैन्याच्या मदतीने शत्रू वर पुन्हा हाल्ला चढविला. रुपाजी भोसले, सोमाजी मोहिते व सिदोजी निंबाळकर हे देखील शत्रू वर तुटून पडले. विठोजी शिंदे व विठ्ठल पिलदेव हे एका बाजूने मोठ्या सैन्यासोबत शत्रू सैन्यावर धावून गेले.

शिवकालीन इ.स. 1673 (शके 1595) उंबराणीच्या लढाईबद्दल माहिती भाग १

 

शिवकालीन इ.स. 1673 (शके 1595)
उंबराणीच्या लढाईबद्दल माहिती
पोस्तसांभार ::एकनाथ वाघ

भाग १
उंबराणीच्या लढाई :-
प्रथम उंबराणीच्या लढाई बद्दल सविस्तर माहिती घेण्याअगोदर या लढाईची कालावधी आणि ऐतिहासिक माहितीची जेधे शकावली आणि सभासद बखरी नुसार झालेली नोंद बघूया ;
शके १५९५ प्रमादी संवत्सरे चैत्र शुद्ध प्रतिपदेला राजश्री राहीईरीहून पनाल्यास गेले तेच मासी बहलोल खान यांसी व प्रतापराव व आनंद राव यासी लढाई जाहाली विज्या पुरा जवळ फत्ते जाली येक हती पाडाव जाला. (जेधे शकावली)
प्रतापराव यास हुकूम करुन आणविले आणि हुकुम केला की, ” विजापुरचा बेलोलखान येवढा वळवळ बहूत करीत आहे. त्यास मारुन फते करणे.” म्हणोन आज्ञा करून लष्कर नवाबावरी रवाना केले. त्यांनी जाऊन उंबराणीस नवाबास गांठिले. चौतर्फा राजियाचे फौजेने कोंडून उभा केला. युद्धही थोर जाहले. (सभासद बखर)
उमराणी (सध्या ता. जत जि. सांगली) लढाई बद्दल सविस्तर माहिती अशी आहे की, विजापुरी सरदार अब्दुल करीम बहलोलखान हा बारा हजार स्वार घेऊन स्वराज्यावर चाल करुन आला. ही वार्ता महाराज्यांस समजताच महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांस बेलोलखानावर रवाना केले. बेलोलखानाचे सैन्य व प्रतापराव यांच्या सैन्याची भेट उंबराणीस झाली. मराठ्यांनी बेलोलखानाच्या सैन्याची केलेली वाताहात कथन करताना, कवी परमानंद आपल्या पर्णालपर्वतग्रहणाख्यान ह्या काव्यात सांगतात,
उम्राणी गावाजवळ येताच त्याला (बेलोलखानास ) पत्र आले की, सर्जाखानासोबत मुजाफर मलीक हा सैन्यासह रांंगणे किल्ल्याच्या आसपास आहे. त्याला आपल्या बाजूला वश करुन घ्यावे. तसेच सिद्धी मसूद, कर्नेलचा अब्दुलअजीज, नळदुर्गाच्या अलिकडील खिदिरखान (याला पणि म्हणतात) हे तिन सेनापती आहेत. इतर सैन्य मदतीला मिळविण्यासाठी ह्या तीन सेनापतींनी दिलेरखानास भेटून सैन्य मागावे. अशाप्रकारे सर्वांनी एकत्र येऊन शिवाजी याला युक्तीने जिंकावे.
वरील सर्व योजना छत्रपती शिवाजी महाराज्यांस समजताच, शिवरायांनी आपल्या प्रतापराव, आनंदराव या सेनापतिंना बोलावून त्यांना सर्व डाव समजाविला. जो पर्यंत बहलोलखान स्वतःच्या थोड्याफार सैन्यासह जवळच आहे तोपर्यंत त्याला एकट्याला गाठावे व जोरदार हल्ला करावा. महाराजांची आज्ञा घेऊन सेनापती निघाले. या वेळी प्रतापरावांसोबत आनंदराव, सिद्धी हिलालखान,विठोजी शिंदे, कृष्णाजी भास्कर, विठ्ठल पिलाजी उर्फ पिलदेव, विसो बल्लाळ हे साथीदार होते.
(सिद्धी हिलाल हा मुस्लिम अधिकारी असून तो कधी महाराजांकडे तर कधी अदिलशाहीत येऊन जाऊन होता. मालोजी राजे यांचा भाऊ विठोजी राजे भोसले, यांचा द्वितीय पुत्र खेळोजी राजे भोसले यांचा सिद्धी हिलाल हा क्रितपुत्र होता. क्रितपुत्र म्हणजे विकत घेतलेला गुलाम पण स्वतःच्या मुलासारखा वाढविलेला. )
इतिहासाकारांनी या लढाईचा अगदी डोळ्यासमोर उभा राहील, असा प्रसंग रेखाटला आहे.

अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय

  अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...