विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label सरदार आवजीराव कवडे. Show all posts
Showing posts with label सरदार आवजीराव कवडे. Show all posts

Tuesday, 28 November 2023

सरदार आवजीराव कवडे गढी

 

सरदार आवजीराव कवडे गढी
 
 
लेख व माहिती संकलित
संतोष झिपरे
( राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक) ९०४९७६०८८८
संदर्भ :-+ सोलापूर जिल्ह्यातील इतिहास, मराठा रियासत
पेशवे दप्तर, वैद्य दप्तर







 
 
 
 🌞🌞 सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात असलेले गुरसाळे हे गाव मराठ्यांच्या इतिहासात सरदार आवजीराव कवडे व सरदार महिपतराव कवडे यांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे या गावात त्यांची राहती गढी साडेतीन ते चार एकर मध्ये असावी आज घडीला गढीचे अवशेष आपल्याला त्या भागात दिसून येतात पण ते राहण्या योग्य नाहीत याशिवाय सदर गढीचे जे तळघर आहे ते जवळजवळ एक एकर मध्ये असून सदर तळघर हे स्वच्छता व साफसफाई केल्यास वापरण्यायोग्य आहे पण स्थानिक पातळीवरील शिवप्रेमी वंशज व ग्रामपंचायत याचे याकडे दुर्लक्ष झाला आहे कवडे गढीच्या तळघर हे एक भुलभुलय्याचा प्रकार असावा कारण तत्कालीन काळात निजाम आणि मराठ्यांच्या संघर्षात निजामाकडून या भागात वारंवार हल्ले करण्यात येत होते म्हणून सदर गढीचे बांधकाम हे तळघरात मजबूत स्वरूपात बांधलेला आहे कारण या तळघरात धान्य शस्त्रसाठा वगैरे ठेवण्याची सोय असावी तसेच या काळात घरातून एक रस्ता फुटून पाठीमागील बाजूस असलेल्या चंद्रभागा नदीच्या पात्राकडे जातो जो नित्य नेमाने नदी तून पाणीपुरवठा करण्यासाठी वापरला जात असावा तसेच सदर गडढीही गावाच्या शेवटच्या टोकाला एका उंच टेकडीवर बांधण्यात आली आहे आणि पाठीमागील बाजूला असलेल्या चंद्रभागा नदी शेजारून वाहत असल्याने नैसर्गिक संरक्षण या घडीला लाभला आहे जवळजवळ कधी गडीच्या वरच्या टोकापासून ते चंद्रभागा नदीचे पात्र हे शंभर उंची वाटते मीटर तरी बसत असावं असं दिसते प्रवेशद्वारे हे दगडी बांधकामातील चिरोबिंद असून ते 30 फूट उंच आहे आज शिरल्यानंतर दोन्ही बाजूला चौकांची सोय असून जस जस आपण ग ढी च्या आत मध्ये फिरायला सुरुवात करून तेव्हा अनेक ठिकाणी मातीच्या राशी आपल्याला पडलेले दिसतात पण याचा अर्थ काय एवढी माती कशी प्रश्न मनात येत तरी होत नाही की इतक्या मोठ्या प्रमाणात माती इथे कसे तर सदर गढी ही तीन ते चार एकर परिसरात आहे या गढीवर पूर्वी 12 ते 18 बुरुजा असल्याचं सांगितले जातात तसेच जुन्या मंडळी जुने जाणकार मंडळी हे आपल्या लहानपणात सदर गढीच्या तटबंदीवरून पूर्ण गढीला फेरी मारत होते सदर गढीची तटबंदी ही चार फूट रुंद ते कुठे कुठे आठ फूट होऊन जाईल यावरून गढीच्या बांधकामाची मजबुती व लढाईच्या काळात गढी अनेक दिवस झुंजत ठेवण्याची तयारी या स्थापत्यशास्त्रातून पडली आहे असे दिसून येते आज घडीला गढीवर चिल्लारीची झाड काटाळ हीच उगवली असून सदर झाडांचे मुळे जमिनीत जाऊन तेथील तळघरास नुकसान करत आहेत याकडे गावातील स्थानिक मंडळींनी लक्ष दिलं पाहिजे होगा ग्रामपंचायतीने ऐतिहासिक ठेवा जोपासण्यासाठी पुढाकार घ्यावा साठी पुढाकार घेतला पाहिजे परिसरातील तुळशीवर्धन असून काही इमारतीचे अवशेष आजही दिसतात विशेष म्हणजे माझ्या बघण्यात आजवर अनेक गाड्या आल्या पण या गढीचे तळघर हे मला नेहमीच भुरळ पाडीत राहील इतकी सुंदर रचना व स्थापत्यशास्त्र या ठिकाणी दिसून येतं या तळघरात जाण्यासाठी व निघण्यासाठी विविध पायऱ्या आणि चोरवाटा आहेत ज्या आता उघडे पडू लागले आहेत..
झाडांच्या चिल्लरच्या झाडांचे मुलांमुळे तळघराच्या बांधकामाला भेगा पडून पावसाळ्यात पाणी गळत असावं असं दिसतं विशेष म्हणजे मे महिन्याच्या 14 15 तारखेला या ठिकाणी दिल्यामुळे भर उन्हाळ्यात दुपारच्या बारा ते तीन यावेळी सदर गडी पडल्यामुळे अनेक नवनवीन गोष्टी अभ्यासणे या ठिकाणी मिळाले

सरदार आवजीराव कवडे

 

भोपाळच्या लढाईनंतर आवजी कवडें यास पालखीचा मान पेशव्यांच्या कडून दिला होता.तसेच तसेच





सरदार आवजीराव कवडे यांचे दोन शिक्काचा उल्लेख वाचनात येतो त्यात दोन्ही शक्य हे वर्तुळाकार असून एकावर 🔥🔥
श्री
मल्हार चरणी तत्पर आवजी कवडे निरंतर🔥🔥
असा उल्लेख असून तर दुसरा शिक्का हा 🔥🔥
श्री
मार्तंड चरणी तत्पर आवजी कवडे निरंतर🔥🔥
असं आढळून येतो दोन्ही शिक्यातील उल्लेखावरून कवडे घराणं हे जेजुरीच्या खंडोबा भक्त होते असे दिसून येते येतील एका शिक्क्यावर सूर्य चंद्र कोरला आहे. . सरदार आवजीराव कवडे यांची पुतणे सरदार तुळाजीराव ऊर्फ तुबाजीराव यांचा उल्लेख ही इतिहासात सापडतोय तसेच काका पुतण्यातील वाद असलेले पत्र ही आढळून आले आहे याबद्दल त्यांनी पुण्याला पेशव्यांच्या दिवाणी तक्रार केल्याची उल्लेख सापडतो
छ. थोरले शाहू महाराजांच्या भाऊबंद पैकी मदनसिंह राजे भोसले यांचे पुत्र शंभू सिंह यांच्या इनाम जहागिरी मध्ये सरदारजी कवडे यांनी धुमाकूळ घातला सदर गोष्ट समजतात छत्रपती थोरले शाहू महाराजांनी का निवड केली व पेशव्यास समज दिला
छत्रपती प्रतापसिंह महाराज सातारा तर यांच्या हजरीतील सरदारांमध्ये नरसिंगराव जानराव कवडे या सरदारांचा उल्लेख सापडतो आणि सरदार आवजीराव कावळे यांच्या पराक्रमाबद्दल रियासतकार गो. स. सरदेसाई म्हणतात, 🌞🌞 ‘जोराने मुसंडी मारून वाटेल तिकडे गहजब उडवीत जाणारा निर्धास्त बंडखोर 🌞🌞असे वर्णन करतात.
आवजी कवडे पहिल्या बाजीराव पेशव्यांची घोडदळावर भिस्त असणारी सरदार होते
कुरकुंभची फिरंगाई देवी ही पेशवे घराण्याचे भक्ती स्थान होय . आवजी कवडेंचे सुपुत्र सरदार महिपतराव कवडे यांनी या मंदिराची चुर्णोद्धार केली. याच महिपतरावांनी पंढरपूर विठ्ठल मंदिरात देवाच्या दक्षिण बाजूस लक्ष्मीचे मंदिर बांधले आहे.
🌙🌙सरदार आवजीराव कवडे यांच्या जीवनातील लढाया व महत्त्वाचे प्रसंग🌙🌙
१) अजनूज येथील सरदारजी कवडे यांच्या वाड्यावर वाड्यावर पहिले बाजीराव पेशवा यांचे आगमन -सतराशे एकवीस
२) 1727- निजामाच्या पुण्यावर चालून आल्या तर पुण्यातून निजामाला घालवण्यासाठी सरदार आवजीराव कवडे यांनी निजामाच्या मराठवाड्यातील राजधानी असलेल्या औरंगाबाद भागात धुमाकूळ घातला यामुळे निजाम निघून औरंगाबाद कडे वळला
३) मराठ्यांच्या अंतर्गत संघर्षा पेशव्यांच्या बाजूने सेनापती दाभाडे विरुद्ध लढाई 1730- 31
४) उत्तर कोकणात पोर्तुगाला विरुद्ध लढाईत सहभाग 1737
५) 20मे 1737 मराठ्यांनी तांदूळवाडी किल्ला जिंकला या लढाईत सहभाग
६) मनेरच्या खाडीत पोर्तुगीलांना पळवून लावले की चिमाजी अप्पांसह या लढाईत सहभाग 20 मे 1737
अजनुज येथील
७) वराडु खानदेश या भागा त पहिल्या बाजीराव पेशव्यांसोबत विविध लढत सहभाग 1736 ते 1739
८) भोपाळ येथील भोपाळ येथील लढाईत निजामा फौजेवर सरदार यशवंतराव पवार व सरदार आवजीराव कवडे या दोघांनी हल्ला केला व प्रचंड कापाकापी केली
९) 6 जानेवारी 1738 निजाम मराठ्यांना शरण आला यावेळी सरदार आवजीराव कवडे त्या ठिकाणी उपस्थित होते
१०) 1741- 42 नानासाहेब पेशव्यांचा उत्तरेतील साऱ्यांमध्ये सहभाग
लेख व माहिती संकलित
संतोष झिपरे
( राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक) ९०४९७६०८८८
संदर्भ :-+ सोलापूर जिल्ह्यातील इतिहास, मराठा रियासत
पेशवे दप्तर, वैद्य दप्तर

अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय

  अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...