मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Showing posts with label सरदार भापकर. Show all posts
Showing posts with label सरदार भापकर. Show all posts
Thursday, 27 July 2023
सरदार भापकरांचा इतिहास-
सरदार भापकरांचा इतिहास-
बेळगावा जवळ असलेल्या चांद-शिंद नावाच्या छोट्याश्या कड्या कपारीतल्या गावामध्ये
राहणारी कडक व चपळ असलेले ९६ कुळी मराठा अशी लोक म्हणजे चव्हाण सरदार घराणे.
हि मंडळी म्हणजे अति विश्वासू व प्रामाणिक म्हणून राजाचे खास संरक्षक.
थोडक्यात म्हणजे राजाच्या असलेल्या चार संरक्षक कड्यापैकी सर्वात आतली प्रथम
संरक्षक व अभेद्य भिंत म्हणजे चव्हाण लोकांना काम असायचे.
वेळ आल्यावर स्वताच्या जीवावर उदार होऊन राजाचे रक्षण करणारी हि विश्वासू मंडळी.
सर्वात प्रथम शिवाजी महाराजांनी या लोकांना स्वताच्या संरक्षणासाठी नेमले.
त्या वेळेस रात्र-दिवस भाले हातात पकडून महाराजांचे रक्षण करायचे.
म्हणून त्यांचे नाव भालापकड असे पडले.
मग हळू हळू हे नाव भापकर असे पुढे रूढ झाले.
त्या वेळेस महाराजांनी त्यांना चौदा गावचे सुभे दिले व
कायमचे पुणे व आसपासच्या भागात स्थलांतरित केले.
पुढे राजाच्या विश्वासू रक्षकाची हि परंपरा अखंडित चालू राहिली.
पेशव्यांच्या काळात यांना पेशव्यांनी लोणी भापकर व आसपासची दहा गावे बक्षीस
म्हणून दिले.
पानिपतच्या युद्धात भापकरांचा बराचसा नाश झाला. कारण सगळ्याच पेशव्यांचे
रक्षण व लढण्यात वाकबगार असणारी मंडळी पानिपत मध्ये अविश्वसनी मारली गेली.
दोघे चौघे कसे तरी जीव वाचवून माघारी आले पण तोपर्यंत काही पुण्यातील लोकांनी यांची
गावे बळकावली होती व घरादाराची लुटालूट झाली होती.
त्यामुळे एका गावात राहणाऱ्या भापकर घराण्याला गाव सोडायची वेळ आली.
पुढे जाऊन जिकडे जिकडे थोडी फार शेती भाती राहिली होती तिकडे तिकडे हे
सारे लोक स्थलांतरित झाले. सोनाजी भापकर लोणी मध्येच राहिले. तिथल्या
काही मंडळीनी त्यांचे खूप हाल केले. पण ते शेवटपर्यंत गावातच राहिले.
काही भापकर आपल्या आजोळी म्हणजे जाधवांकडे साताऱ्यात गेले.
काही भापकर मामाकडे म्हणजे शिंदे कडे पुण्यात आले.
काही भापकर जाधवांचे आजोळ नगर मध्ये गेले.
काही आत्या कडे म्हणजे जुन्नर,नाशिक भागात गेले.
पण खरा वारसा आपला भापकरांचा म्हणजे विश्वासू, लढवय्ये, प्रामाणिक व दयाळू हा आहे.
परोपकार करणे म्हणजे भापकरांचा हात कुणीही धरत नाही.
भापकरांच्या घरातली मुलगी जरी असली तरी ती ज्या घरात जाते त्या घरात वातावरण
आनंदी व सुखमय करून टाकते.
गणेश भापकर.
९८९०००८८५९.
Subscribe to:
Posts (Atom)
अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय
अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...
-
*बहिर्जी नाईक* शिवाजीराजेंचे गुप्तहेर _(आपल्या मुलांना माहिती असणे गरजेचे आहे. आजही CBI, CID अशी सरकारी खाती यावरच काम करतात.)_ बघायल...
-
25 सप्टेंबर 1750 रोजी नानासाहेब पेशवे व राजाराम महाराज द्वितीय यांच्यात सांगोला करार झाला सांगोला करार :- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थाप...
-
°°°छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यंकोजी राजांना पत्र °°° छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाच्या वेळेस व्यंकोजीराजांना लिहिलेली चार पत...
