विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 8 November 2020

गोदाजी जगताप

 


गोदाजी जगताप
आत्ता कुठे स्वराज्य बहरू लागलं, आकार घेउ लागले होते. कुठल्याच पातशाहीचे त्यावर जास्त नजर नव्हती महाराज हळू हळू मुलुख वाढवत. संबध मावळातील लोक आपलेसे करत निघाले होते. अचानक महाराजांची अस्ते कदमांनी चालणारी कामे घोडदौडीत बदलली. स्वराज्याच्या कार्यास,श्रींच्या मनसुब्यास आई जगदंबेने भरघोस यश दिले आणि शहा पुत्र शिवाने सह्याद्रीवरी बंडाचा झेंडा उंचावला बघता बघता तोरणा , सुभानमंगळ, कोरीगड असे किल्ले सर करून पराक्रम गाजवले जाऊ लागले .
आणि शहाजीचा पोर मावळात आपली माणसे फोडतोय स्वतःचा मुलुख बनवतोय अशा खबरी आदिलशाही दरबारात येऊन थडकायला लागल्या. आणि त्या पहाडी चुह्याचा बंदोबस्त म्हणून फत्तेखानास शिवाजीवर धाडले फत्तेखान जेजुरी मार्गे चालून येत होता . नेसरी बेलसर जवळ त्याची छावणी पडली, तंबू ठोकले गेले . आणि नुकत्याच शिवाजीने जिंकलेल्या सुभानमंगळ या भुईकोटा वर आपले सैन्य धाडले वा तो किल्ला सर केला गेला.
तो किल्ला परत स्वराज्यात दाखल करून घेण्यासाठी महाराजांनी कावजी मल्हार यांना त्या भुईकोटावर धाडले. आणि त्यांनी गड काबीज केला ही पुरंदर मुक्कामी असताना महाराजांना समजली.
" किल्ला सर झाला आता या फत्तेखानास अजून एक तडाखा द्यायलाच हवा म्हणून महाराजांनी एक तुकडी तडक नेसरी गावावर धाडली. ह्या तुकडीचे प्रमुख होते बाजी पासलकर आणी त्यांसोबत कान्होजी जेधे, बाजी जेधे व गोदाजी जगताप


तशी खानची तुकडी बेसावधच होती. आत्ताच बाळसं धरलेल्या स्वराज्यावर चालून आलेली शिवाय ही पहिलीच मोहीम असल्याने मराठ्यांच्या काव्या विषयी काही माहीतच नसलेली रात्रीच्या अंधारात कुसं बदलत निपचित पडलेली खानाची छावणी. मराठ्यांनी डाव साधला


एकच कापाकापी सुरु झाली. कित्येक हश्मांनातर हत्त्यारे धरण्याची,उचलण्याची उसंत देखील मिळाली नव्हती पण तुकडी छोटीशी असल्याने मराठे जास्त काळ तग धरू शकणार नव्हते म्हणून तेथून काढता पाय घेतला व पुरंदर घाटला. ह्या वेळेस आदिलशाही सैन्य चाल करून येत होते गड चढत असतानाच गोदाजी , बाजी अशा सर्वानीच पराक्रमाची पराकाष्ठा केली चाल करून आलेल्या यवनांची कत्तल चालू होती.


ह्यातच गोदाजी व मुसेखानाचा एक खास सरदार मुसेखान हे एकमेकांच्या सामोरे झाले या दोघात तुंबळ युद्ध पेटले होते. वार प्रतिकार आघाडी पिछेहाट असे युद्ध चालू असताना गोदाजीच्या तलवारीने बरोबर मुसेखानाच्या छातडाचा वेध घेतला आणि मुसेखान कोसळला.

No comments:

Post a Comment

फलटण संस्थान

  फलटण संस्थान फलटण  हे सातारा  जिल्ह्यातील    एक  तालुका व  शहर  आहे.  फलटण  शब्दाची उत्पत्ती  फल   उत्तन  ( अर्थात  फळबागांचा  प्रदेश ) अश...