विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 4 April 2022

सरलष्कर चतुरसिंग राजेभोसले सेनापती वावीकर

 


सरलष्कर चतुरसिंग राजेभोसले सेनापती वावीकर
(? - १५ ऑगस्ट १८१८). 
उत्तर पेशवाईतील एक तडफदार सेनानी. त्याचे घराणे मूळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशातील. मालोजी राजे भोसले यांचा धाकटा भाऊ विठोजी राजे यांच्या वावी कर राजेभोसले यांच्या शाखेतील. यांचा मोठा भाऊ विठोजी राजे सातारच्या रामराजास १७७७ मध्ये दत्तक गेले. तेच पुढे छत्रपती शाहू दुसरे (कार. १७७७-९८) म्हणून प्रसिद्धीस आले. त्यामुळे चतुरसिंग राजे बालपणापासून राजकीय वातावरणात वाढले. दुसऱ्या बाजीरावच्या वेळी (कार. १७९५-१८१८) सातारच्या गादीची होत असलेली अवहेलना त्यांना सहन झाली नाही. त्यांच्या मते पेशव्यांकडून सत्ता काढून घेऊन छत्रपतींचे हात बळकट करावेत, असे होते.
पुढे चतुरसिंग राजे यांनी मराठी राज्याचा खरा स्वामी सातारचा राजा आहे, त्याने आपल्या हाती सर्व सत्ता घ्यावी, असा दावा मांडून तसेच सर्व मराठ्यांनी एकत्र येऊन इंग्रजांशी मुकाबला करावा, म्हणून त्यांनी मराठी राज्याच्या एक टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत हिंडून हा विचार प्रसृत केला; तथापि नागपूरकर भोसल्यांशिवाय त्यांना कोणीच फारसा प्रतिसाद दिला नाही. अखेर त्यांच्या मदतीने चतुर सिंग राजेंनी इंग्रजांशी असई व अशीरगड या ठिकाणी मातब्बर मुकाबला दिला; परंतु इंग्रजांनी त्याचा पाडाव करून त्यांना कैद केले (१८०९). या त्यांच्या उद्योगास काही इतिहासाकारांनी बंडखोरी असे म्हटले आहे.
ते अत्यंत धाडसी, स्वाभिमानी व पराक्रमी होते. १८०१ मध्ये सर्जेराव घाटग्याने त्यांना सरदारकी द्यावी, अशी शिफारस दुसऱ्या बाजीरावाकडे केली होती पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्यांना दुसऱ्या बाजीराव पेशव्याचे एकूण धोरण नापसंत होते, म्हणून त्यांनी पुणे सोडले. पुढे यशवंतराव होळकराने जेव्हा पुणे लुटले, तेव्हा दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांची मदत घेतली (१८००). ही गोष्ट त्यांस मानहानीकारक वाटली.
मराठी राज्याची विस्कटलेली घडी नीट बसावी व मराठा राजमंडळाचा उत्कर्ष व्हावा, म्हणून त्यांनी शिंदे, होळकर, नागपूरकर भोसले आदी मातब्बर सरदारांच्या भेटी घेतल्या. त्यांची मदत मिळावी, म्हणून ते चंबळ, अजमीर, दिल्ली वगैरे भागांत फौजफाटा घेऊन गेले; तथापि याच वेळी यशवंतरावास वेडाचे झटके आल्यामुळे त्यांचे प्रयत्न निष्फळ झाले. छत्रपती शाहू दुसरे यांच्या मृत्यूमुळे तर ते हताश झाले. पुढे काही वर्षे ते धार येथे राहिले आणि अखेर दुसरा बाजीराव तर्फे त्रंबकजी डेंगळे यानी फसवून त्यांना मालेगाव नजिक कैद केले आणि रायगडाच्या जवळ कांगोरी किल्ल्यावर ठेवले. सुमारे तेरा वर्षांचा तुरुंगवास सोसून ते तुरुंगातच (कांगोरी किल्ल्यावर) मरण पावले.

No comments:

Post a Comment

राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे

  राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे : सरदार मलोजी रणनवरे हे जिंती तालुका फलटण येथील पुरातन वतनदार....