फार
पूर्वीपासून सामान्य लोक आपले नांव लिहिताना स्वतःचे नांव, वडिलांचे नांव व
आडनाव या क्रमात लिहितात. पूर्वी बादशहांच्या पदरी असणारे मराठा सरदार
फारतर नावापुढे आपला किताब अथवा बिरुद जोडायचे. शिवाजी महाराजांचे घराणेही
यास अपवाद नव्हते. महाराजांचे वडील शहाजीराजे आपल्या नावाबरोबर फर्जंद व
सरलष्कर ही बिरुदे लिहायचे(?) मात्र नांव लिहिताना स्वतःचे नाव व आडनाव
असाच क्रम असायचा. शिवपूर्वकालापासून सर्वच मराठा सरदार याच पद्धतीने आपली
नावे पत्रव्यवहारांमध्ये लिहीत असत. उदा.,
पिराजीराव घाटगे सर्जेराव, दौलतराव जाधव सरनौबत इत्यादी. अशापद्धतीने
सामान्य रयतेप्रमाणे व सरदार-जहागिरदारांप्रमाणे नावामध्ये आडनावाचा उल्लेख
शिवराय देखील करायचे. राज्याभिषेकापूर्वी शिवरायांनी जे पत्रव्यवहार
केलेले आहेत त्या पत्रांमध्ये "राजेश्री सिवाजीराजे भोसले" असा अथवा अशा
सर्वसामान्य पद्धतीनेच शिवरायांचा नामोल्लेख आढळतो. मात्र १६७४ साली
महाराजांनी स्वतःस राज्याभिषेक करवून घेतल्यानंतर महाराज व महाराजांचे
घराणे सामान्य राहिले नव्हते, शिवाजीराजे भोसले हे आता कुणी सरदारपुत्र
नव्हते तर ते एक सार्वभौम अभिषिक्त राजे होते. शिवराय "छत्रपती" झाले होते.
यामुळे साहजिकच आपल्या सर्वसामान्य नामाभिधानाचा त्याग करणे व नवीन नांव
धारण करणे शिवरायांना क्रमप्राप्त होते, आणि म्हणूनच "राजेश्री शिवाजीराजे
भोसले" या आपल्या नावाचा त्याग करुन सार्वभौम अभिषिक्त नृपतीस शोभेल असे,
"क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिवछत्रपति" असे नवीन नांव महाराजांनी धारण
केले. राज्याभिषेकानंतरच्या एकाही पत्रव्यवहारामध्ये महाराजांनी आपल्या
नावापुढे "भोसले" हे आडनांव एकदाही जोडलेले नाही. महाराजांनी इतरांना
लिहिलेल्या व इतरांनी महाराजांना लिहिलेल्या अशा सर्व पत्रांमध्ये
"क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिवछत्रपति" असाच उल्लेख आढळतो. छत्रपती श्री
शिवाजी महाराजांनंतर छत्रपतींच्या गादीवर विराजमान झालेल्या कोणत्याही
छत्रपतींनी व छत्रपती घराण्यातील कोणत्याही सदस्याने आपल्या नावापुढे
"भोसले" असे आडनाव लिहिलेले नाही व तसे ऐतिहासिक उल्लेखही आढळून आलेले
नाहीत. छत्रपती, महाराणी व युवराजांसाठी वेगवेगळ्या बिरुदावल्या होत्या.
उदाहरणासाठी अनुक्रमे :
क्षत्रियकुलावतंस श्री राजा शाहू छत्रपति,
अखंडलक्ष्मी अलंकृत महाराणी लक्ष्मीबाई छत्रपति,
युवराज राजेश्री राजाराम छत्रपति किंवा चिरंजीव विजयीभव राजे राजाराम
छत्रपति. यामध्ये कुठेही भोसले आडनावाचा उल्लेख आढळत नाही.
मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Monday, 22 June 2020
कोल्हापूरचे छत्रपती भोसले आडनाव का लावत नाहीत ?
कोल्हापूरचे छत्रपती भोसले आडनाव का लावत नाहीत ?
Subscribe to:
Post Comments (Atom)
राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी
राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी १७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...
-
25 सप्टेंबर 1750 रोजी नानासाहेब पेशवे व राजाराम महाराज द्वितीय यांच्यात सांगोला करार झाला सांगोला करार :- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थाप...
-
साळुंकीचे पाखरू अथवा साळुंकीचे पंख कुलचिन्ह अर्थात देवक : राजे साळुंखे चाळुक्य राजवंशाचे --------------------------- ---------------------...
-
मराठा सरदार राजे वाघ घराणे #काठापुर_वाडा__________ लेखन माहिती : Nitin Kemse मराठा साम्राज्य वाढवण्यासाठी होळकर शाहीने कंबर कसली होती.त्य...

No comments:
Post a Comment