विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 9 August 2020

८ एप्रिल १657 ला छत्रपती शिवाजी महाराज व काशिबाई राणीसाहेब यांचा विवाह

 

.

८ एप्रिल १657 ला छत्रपती शिवाजी महाराज व काशिबाई राणीसाहेब यांचा विवाह 📷
POSTSAAMBHAR:डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे
छत्रपती शिवाजीराजे यांचा सहावा विवाह काशीबाई जाधवराव यांच्याशी वैशाख शुद्ध पंचमीला( ८ एप्रिल -१६५७ )रोजी राजगडावर जिजाऊसाहेबांच्या उपस्थितीत पार पडला .काशीबाई साहेबांचा जन्म सन १६४८मध्ये जाधवराव घराण्यात झाला. काशीबाईसाहेब या संताजी जाधवराव यांच्या कन्या होत.संताजी जाधवराव म्हणजे जिजाऊसाहेबांचे भाऊ अचलोजी यांचे द्वितीय सुपुत्र.संताजी उर्फ सुजनसिंह यांच्या कन्या म्हणजे काशीबाईसाहेब .
जिजाऊसाहेबांचे वडील लखुजी जाधवराव व बंधू अचलोजी जाधवराव या दोघांनी जाधवराव घराण्याला सतराव्या शतकाच्या आरंभी मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली होती. दौलताबाद व सिंदखेड राजा मुलुख इत्यादी भागात त्यांचा मोठा दरारा होता.परंतु दौलताबादेस निजामशहाकडून विश्वासघाताने लखुजी जाधवराव व त्यांचे दोघे पुत्र अचलोजी, रघुजी आणि नातू यशवंतराव हे सर्व पुरुष एकाच वेळी मारले गेले. या प्रकारानंतर अचलोजींचा अल्पवयीन मुलगा संताजी जाधवराव यांना रायगडावर आणून त्यांचे पालन-पोषण जिजाऊसाहेबांनीच राजगडावर केले होते.संताजी लहानपणापासून राजगडावरच राहिले होते. सुजनसिंह,उर्फ संताजी यांना दोन मुले होती. पुत्र शंभुसिंह आणि कन्या काशीबाईसाहेब. यांचा विवाह मोठ्या थाटामाटात राजगडावर करून जिजाऊंनी जाधव-राजेभोसले संबंध परत एकदा जवळ केले. काशीबाईसाहेबाचे वडिल आणि शहाजीराजे यांचे जेष्ठ पुत्र संभाजीराजे,हे समवयस्क होते. सुजनसिंह हे कनकगिरीच्या युध्दात शहिद झाले ,आणि काशीबाईसाहेब यांचे बंधु शंभुसिंह हे पावनखिंडीत शहीद झाले . काशीबाई साहेबांना अपत्य नव्हते. त्यांचा मृत्यु १६मार्च १६७४ मध्ये झाला. काशिबाई राणीसाहेब यांची समाधी पाचाड येथे कुशावर्त तलावाच्या जवळ आहे.

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...