विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 13 August 2020

रघुनाथ बल्लाळ

 


१४ ऑगस्ट १६५७....

शिवाजी महाराज दंडा राजपुरी जिंकतात जावळी घेतल्यानंतर शिवरायांनी थेट कोकणाला हात घालता येत होता जंजीऱ्याचा सिद्दी आता त्याचा शेजारी झाला होता शिवरायांनी

रघुनाथ बल्लाळला दंडा राजपुरीवर धाडले. ह्या घटनेचा उल्लेख शिवापूर शकावली देते रघुनाथने ह्या मोहिमेसाठी पाच सहा हजार घोडदळ घेतले होते असे त्यातून कळते...

रघुनाथने आधी तळे-घोसाळे हे दोन किल्ले व त्यांचा परिसर जिंकला एक दोन ठिकाणी त्याने सिद्दीच्या सैन्याला पळवून लावले त्यानंतर त्यांच्यात तह झाला शिवभारतातही ह्या घटनेची पुष्टी मिळते. अफजलखानने सन १६५९ मधे वाईला पोहोचल्यावर लिहीलेल्या पत्रातही ह्याचा उल्लेख आहे शिवरायांनी सिद्दीच्या प्रदेशात केलेले आक्रमण थांबवून ते भाग सिद्दीला परत देण्याची आज्ञा त्यात केली होती...

सिद्दीला जंजीऱ्यावरून हुसकावून लावायला त्यावेळी मराठ्यांकडे नावीक बळ नव्हते त्यामुळे रघुनाथ बल्लाळने फक्त दंडा राजापुरीचा भाग जिंकून घेतला.. जंजिरा जिंकण्याचा पहिला प्रयत्न फसला.....

https://www.instagram.com/_shivkalyanraja_/

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...