सरसेनापती धनाजी जाधव यांना दोन बायका, पहिली बायको ही सती गेली..पहिल्या बायकोला मुलगा त्याचा नाव संताजी. आणि पतंगराव (चंदन वंदन च्या युद्धात मारला गेला) अशी आख्यायिका (?)आहे की संताजी घोरपडे चा विशेष प्रभाव किंवा मैत्रिपोटी त्याने पहिल्या मुलाचे नाव संताजी जाधव ठेवला.संताजी घोरपडे चा पण त्यावर विशेष जीव होता पण एक युद्धात संताजी जाधव हा सातारा जवळ मांडावे इथे मारला गेला.दुसरा बायकोपासून धनजीला ला दोन मुले त्यात मोठा मुलगा चंद्रसेन जाधव आणि धाकटा शंभूसिंग.
धनाजी आजारी असतांना बाळाजी विश्वनाथ हा त्याचा कुल कारभार पाहूं लागला, पण शाहू महाराजांच्या वाढत ओढ पाहून चांद्रसेनच्या मनात मत्सर उत्पन्न झाला. वास्तविक चंद्रसेनाचा ओढा ताराबाईकडे होता व तो आंतून तिला (शाहूच्या विरुद्ध) फितूरहि झाला होता.
धनाजीच्या मरणानंतर चंद्रसेनाकडे सेनापतित्व आलें. इ. स. १७१३ मध्यें मोगलाईंतून चौथ, सरदेशमुखी वसूल करण्याकरितां चंद्रसेनाची योजना झाली होती. या प्रसंगीं वरील हक्कांपैकीं सरदेशमुखी गोळा करण्याकरितां चंद्रसेनाबरोबर बाळाजी विश्वनाथाची नेमणूक झाली असल्यामुळें बाळाजीविषयीं चंद्रसेनाचा द्वेषाग्नि अधिकच भडकला. त्यानें क्षुल्लक कारणावरून (हरणाचा तंटा) कुरापत काढून बाळाजीचा पाठलाग केला व (शाहूच्या आज्ञेवरून) त्यास पांडवगडामघ्घें आश्रय मिळाला असतां चंद्रसेनानें त्या किल्ल्यास वेढा दिला, व बाळाजीस आपल्या हवालीं करण्याविषयीं शाहूजवळ उर्मटपणानें मागणी केली. शाहूनें हैबतराव निंबाळकरास जाधवाचें वचपा करण्यास पाठविलें. निंबाळकरानें जेऊरजवळ चंद्रसेनाचा पराभव केला; तेव्हां तो उघडपणें कोल्हापूरकर संभाजीकडे गेला; परंतु पुढें लवकरच दक्षिणेंत निजाम आल्यावर त्यानें निजामाच्या पदरीं चाकरी धरली व शाहूचा पाडाव करण्याची खटपट चालविली. बिदर भालकी येथें बरीच मोठी जहागीर निजामानें जाधवास देऊन त्यास आपल्या पदरीं ठेविलें. १७१६ मध्यें सय्यदबंधु याचा दिवाण महकबसिंग व खंडेराव दाभाडे यांच्या दरम्यान अहमदनगराजवळ जी लढाई झाली तींत चंद्रसेन मोंगलांकडून लढत होता. बाळापुरच्या लढाईंतहि चंद्रसेन निजामाकडून लढला. स. १७२५ त तर चंद्रसेनानेंच निजामास शाहूविरुद्ध उठविलें होतें.
इ. स. १७२७-२८ मध्यें निजाम व बाजीराव यांच्यामध्यें जें युद्ध झालें, त्यांत चंद्रसेन निजाम काढून लढत होता. त्यानेंच संभाजीस शाहूकडे राज्याचा हिस्सा मागण्यास चिथविलें होतें. हा १७५१ सालीं मरण पावला.चंद्रसेनाचा मुलगा रामचंद्र जाधव.हाही काही दिवस निजाम कडे राहिला पेशवेचा प्रसिद्ध उदगीर लढाईंत हा निजामाकडेच होता. स. १७६१ मध्यें निजामअल्लीनें गोदावरीतीरीं असलेल्या कायगांव टोकें नांवाच्या गांवातील हिंदु देवळें उध्वस्त केल्यावरून, रामचंद्र जाधव मोंगलांनां सोडून मराठयांच्या पक्षास मिळाला.
इ. स. १७६२ पानिपत नंतर राघोबादादानें याला मराठ्यांकडे बोलावले. परंतु स गुजराथप्रांतहि आपल्या ताब्यांत देण्यांत येईल अशी जी यास आशा होती, ती सफळ न झाल्यानें हा लवकरच पुढें पुन्हां निजामकडे गेला. रामचंद्र हा स. १७६९ त निजामकडून मारला गेला. त्याचा पुत्र खाशेराव ह्यास भालकीची जहागीर मिळाली होती. तो टिप्पूबरोबरच्या एका लढाईंत ठार झाल्यावर (१७९१) त्याची जहागीर खालसा झाली.
Source:
१)शिवदे यांचे पुस्तक
.२)जाधवांची कैफियत;
३)डफ,
४)जदुनाथ सरकार चे काही भाग
No comments:
Post a Comment