विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 21 July 2021

मराठेशाहीतील अंजनवेलचा इतिहास



 मराठेशाहीतील अंजनवेलचा इतिहास

इ ति हा स - १५ व्या शतकापूर्वी अंजनवेल येथें किल्ला नव्हता, पण मोजे गुढे तर्फ वलंबे येथें पवार उपनामक कोणी मराठा पुरुष गढी बांधून या भागावर अंमल चालवित होता असें इ. स. १८२४ च्या सुमारास नकलल्या गेलेल्या अंजनवेलची माहिती देणार्या एका चोपड्यावरून दिसतें. इ. स. १५०२ च्या (शके १७२४) सुमारास विजापूरच्या मुस्तफाखान नामक सरदारानें सदरहू पवाराच्या गढ्या उध्वस्त करून दाभेम (दाभोळ) येथें सुभा स्थापन केला. दाभोळ जिल्हा विजापूरकराकडे सुमारें १४९ वर्षें होता व इ. स. १६५१ (शके १५७४) च्या सुमारास शिवरायांनी दाभोळ सुभा काबीज केला तेव्हां त्याबरोबरच अंजनवेल हा तालुका शिवरायांकडे आला. शिवरायान च्या ताब्यांत अंजनवेल गांव आला तेव्हां तेथें किल्ला अगोदरच बांधलेला होता. पण शिवरायांनी तो पुन्हां बांधून काढून त्याची मजबुती केली व त्या ठिकाणीं आपलीं एक गोदीहि स्थापन केली. शके १६२० (१६२२?) मध्यें म्हणजे इ. स. १६९८ च्या सुमारास अंबरनाथ हबशी यानें मराठ्यांपासून अंजनवेल किल्ला काबीज केला व तो पुढें ४६ वर्षें म्हणजे इ. स. १७४४ (शके १६६५) पर्यंत त्याच्याकडेसच होता. शके १६६६ मध्यें (माघ शु. ४ बुधवार रोजीं) तो तुळाजीं आंग्र्यानें शिद्दयापासून काबीज केला व पुढे ११ वर्षानंतर म्हणजे इ. स. १७५६ त (शके १६७७ पौष शु. १४ रोजीं) तो पेशव्यांनीं रामाजी महादेव बिवलकर यास पाठवून आंग्र्यांपासून जिंकून घेतला. यानंतर मात्र हा किल्ला ५३ वर्षें म्हणजे पेशवाईच्या अखेरपर्यंत पेशव्यांकडेच होता.

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...