विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 17 March 2022

हिंदनृपती #कथा_शंभुपुत्राची #शाहुपर्व #भाग_२

 

औरंगजेबान तहात ठरवल्याप्रमाने कैदी केलेल्या मराठी स्त्रियांना सुरक्षेची हमी दिली,शाहू राजांना स्वतंत्र राजा म्हणून मान्यता दिली,आता शाहू राजे कैदेत होते पण राजे होते कैदेतील 600 मराठा सेवक शाहूंच्या सेवेला हजर होती.शिवाय काही मराठी सरदार मंडळी शाहूंच्या सोबत देत सात हजारांची मनसब शाहूराजांना दिली.आता शाहू राजे मुघलांचे मांडलिक होते पण कैदेत होते.शाहूंच वय कमी असल्याने त्यांची जहागिरी सभाळण्याचं काम येसूबाई करायच्या 'येसूबाई-ए-वालिद-शाहू-सन-अहद' आशा शिक्का येसूबाईंना दिला.शाहूंना औरंगजेबाने आपल्या छावणीत कैद केले होते.सोबत झीनत म्हणजे औरंगजेब याची मुलगी असायची तिला हा छोटासा शाहू खूप आवडायचा.झीनत च लग्न झालं न्हवत त्यामुळे मूलबाळ नसल्यानं ती शाहूंना मुलासारखा जपत होती.शाहू अतिशय शांत होते पण जिज्ञासू होते. जोत्याजी केसरकर शाहूंना युद्ध शिक्षण देत होते तर येसूबाई जिजाऊंच्या रूपांन पुन्हा एकदा एक शिवाजी घडवीत होत्या.शाहू सुद्धा हळू हळू सगळ्या कसोटीत उतरत यशस्वी होत होते.औरंगजेबाच्या अगदीच जवळ असल्याने त्यांचं लक्ष प्रशासनावर जास्त होत,ती प्रशासनाची पद्धत ते आपल्या मनात साठवत होते.पण दुर्दैवाने ते कैदेत होते.
आलमगीर औरंगजेब म्हणजे अजब रसायन होतं कधी ते शाहूंसोबत प्रेमान वागायचा तर कधी शाहूंचा अपमान सुद्धा करायचा.त्याच्या मनात शाहूंच्या बद्धल कुठं तरी राग होता आणि कधीकधी तो प्रकट करून दाखवायचा.औरंगजेबाने राजारामराजेंना शोधण्यासाठी जंग जंग पछाडलं होत.पण सह्याद्रीत येऊन सह्याद्रीचे वाघ पकडणे सोपं न्हवत.राजाराम संपला की मराठी राज्य संपणार होत पण राजाराम राजे जिंजी ला पोहचले होते तिथून ते संताजी-धनाजी यांच्या मदतीने मुघलांना सळो की पळो करून सोडत होते.जिंजी सुद्धा जिंकायच्या प्रयत्नात औरंगजेब होता पण त्याला यश येत न्हवत तो त्याचा सरदारांवर राग व्यक्त करायचा आणि त्याचा तो वैतागलेला चेहरा पाहून शाहू आणि येसूबाई मात्र मनोमन खुश असायचे.
औरंगजेबाने त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच एवढी मोठी हार मानली होती.अदिलशाही,कुतुबशाही त्यानं सहज जिंकून घेतली होती पण मराठी दौलत त्याच्या हाती येत न्हवती.सह्याद्रीच्या कडे कपारीत त्याला तडफडत ठेवत मराठे मात्र चांगलाच धडा देत होते.कधी कधी औरंगजेबाचा राग इतका वाढायचा की तो शाहू राजांवर भडकायचा.शाहू मात्र शांत पणे सहन करायचे.शाहूंना मारावं असही औरंगजेबाला वाटायचं पण मराठ्यांचा वाढता प्रभाव पाहून जर शाहूंना दगाफटका केला तर मराठे आपली कबर इथंच बांधतील ही भीती त्याच्या मनात होती.संताजी घोरपडे नि तोडून नेलेले सोन्याचे कलश त्याची साक्ष देत होते.भविष्यात जर मराठे आपल्या पेक्षा वरचढ झाले तर हा शाहू सोडून त्यांच्यात यादवी माजवता येईल म्हणून त्यानी शाहूंना जिवंत आणि सुखरूप पण कडक नजरकैदेत ठेवलं होतं.
छोटासा शाहू आता मोठा होत होता,मराठ्यांच्या पराक्रमाच्या कथा त्याच्या कानावर यायच्या,मन आनंदित व्हायचं.येसूबाई आपल्या पुत्राला घडवण्यात कुठंही कमी पडत न्हवत्या,आपले पूर्वज आणि त्यांनी निर्माण केलेल हे स्वराज्य संवर्धित करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि ते वाढवलं पाहिजे.म्हणूच शस्त्रा सोबत शास्त्रा,विद्या, चातुर्य,निर्णय कशे घ्यायायचं,राज्यकारभार कसा करायचा,दरबारी लोकांशी कसं वागायचं सारं सारं येसु शाहूंना शिकवत होती.ज्योत्याजी आणि इतर मावळे शाहूंना अतिशय प्रेमान,सावधानतेने वेळ मिळेल तस गपचूप तलवार,भाला, पट्टा शिकवत होते,एक भविष्यातला महान राजा कृष्णासारखा कंसाच्या कैदेत वाढत होता.
औरंगजेबाची मुलगी झीनत नेहमी शाहुंची ढाल बनून उभी राहायची.तीच मुलासारखं प्रेम शाहुंवर होत.लग्न झालं नासल्याने मातृत्वाचा अखंड झरा ती शाहुंवर अर्पण करायची.येसूबाई आणि झीनत यांचेही संबंध चांगले होते,झीनत ला नेहमी येसूबाईंच्या नशिबावर कीव यायची त्यामुळे तीन त्यांनाही कधी अंतर पडू दिलं न्हवत.शाहूंच्या सोबत संभाजी राजांनी आणखी दोन मुलं कैदेत होती.जाधवांच्या दुर्गा सोबत जिजाऊंनी शंभूराजांचा विवाह लावून दिला होता,जेव्हा शंभूराजे दिलेरखानाकडे केले होते तेव्हा दुर्गा बाई सोबत होत्या,त्यांच्या पोटी मदनशिंग आणि मानशिंग नावाची दोन मुलं होती,ती सुद्धा शाहूंच्या सोबत कैदेत होती पण औरंजगेबांन त्यांना शाहूंपासून दूर ठेवले होते.शाहूंवर औरंगजेब जास्त लक्ष देऊन असायचा.
का कोण जाणे? पण शाहुंच्या नजरेत त्याला भविष्यातील मराठ्यांचा बादशहा दिसायचा.संभाजी सारखी महत्वकांक्षा त्याच्या डोळ्यात होती तर शिवाजी सारखं शांत पण नवीन शिकण्याची ओढ असलेली बुद्धिमत्ता शाहुंमध्ये होती.
औरंगजेब जिथं जाईल तिथं सावली सारखा शाहु सोबत घेऊन जायचा कारण त्याला भीती होती,कदाचित मराठ्यांनी जर हल्ला केला,जीव जाईल असा प्रसंग आला तर शाहूंचा वापर ढालीसरखा करून सुटका करून घेता येईल.
औरंगजेबाच्या 5 मैलाच्या मोठ्या छावणीत मद्यभागी त्याचा तंबू असायचा.तंबू कसला तो कापडी महालच होता.त्याला औरंगजेबाची 'गुलाबबारी' म्हणायचे.त्याचा घेरा भला मोठा,त्याला मुख्य तीन प्रवेशद्वार असायची.तीनही प्रवेशद्वारांना वापर वेगवेगळा होता.त्या गुलाबबारी बाहेर डोळ्यात सुरमा भरलेलं तळपत्या तलवारी हातात घेतलेले हशम कडक पहारा देऊन असायचे.औरंगजेबाच्या तंबूचा पहिला दरवाजा त्याच्या मार्जितल्या खास सल्लागार आणि श्रीमंत उमरावांसाठी होता. हीच मंडळी त्यातून ये जा करायचे.दुसऱ्या प्रेवेशद्वारातून फक्त सरदार,सैनिक,मनसबदार यांना प्रवेश होता त्यांच्या व्यतिरिक्त कोणी येऊ शकत न्हवत.तिसरा दरवाजा मात्र शाही जनाना आणि मेहमानासाठी होता.औरंगजेब थकला होता तरी पण जनाना सोबत घेऊनच फिरायचा.तिन्ही प्रवेशद्वाराच्या आतमध्ये एका मोठ्या खोलीत औरंगजेबाला बसण्यासाठी सोन्याची खास बनवलेली तख्त असायची.त्याच्या बाजूला बाकीच्यांना बसायला लाकडी मंचक,गाड्या,तक्के लोड असायचे.ह्या तंबूत वेगवेगळे अशे बरेच कक्ष होते त्यात बादशहाचा नमाज पढायचा कक्ष,जेवणाचा कक्ष,स्वतंत्र शयनकक्ष,जनानखण्यासोबतचे कक्ष वेगवेगळे होते,प्रत्येक कक्षाच्या मधी जाड कापडी भिंती असायच्या या सगळ्या कक्षाच्या मधोमध अती सुरक्षित आणि सहज कोणाला समजणार नाही असा एक कक्ष होता त्या कक्षात शाहू राजे नजर कैदेत ठेवले होतें, शाहू राजे सगळी गुलाबबारी फिरू शकत होते पण गुलाबबारी बाहेर जायला त्यांना बंधी होती,लढाईच्या प्रसंगी तर त्यांना कक्षाच्या बाहेर पडायला पण बंदी होती.शाहूंराजांचं बालपण अतिशय संवेदनशील अवस्थेत होत.औरंगजेबाच्या छावणीतील सैनिकांना सुद्धा शाहू राजांच्या नशिबावर कीव येत असेल.मुघलांकडून कैदी म्हणून जी वागणूक दिली जायची त्यापेक्षा तहीतीशी चांगली वागणूक शाहूंना होती पण कधी कधी औरंगजेब शाहूंना मारायची धमकी द्यायचा तेव्हा मात्र येसूबाईंच्या काळजाला पीळ पडायचा,तर कधी कधी शाहूंच धर्मांतर करायच्या धमक्या सुद्धा यायच्या.शाहू मात्र हे हसण्यावारी न्यायचे आणि आलेली संकट टाळायचा प्रयत्न करायचे.
छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी महाराज यांना घडवताना जिजाऊंनी जे काही शिवरायांना शिकवलं होत त्या सोबत ज्या काही गोष्टी अनुभवातून शिकता येतात ते सुद्धा येसूबाई शाहूंना शिकवत होत्या.
नेताजी पालकर,शिवा काशीद,तानाजी मालुसरे,नेताजी पालकर,शंभूशिंह जाधवराव,कोयाजी बांदल,फिरंगोजी नरसाळे,कविकलश आशा असंख्य मावळातील तेजस्वी,पराक्रमी,धाडसी वीरांच्या गोष्टी सांगून येसूबाई शाहूंच्या कोवळ्या मनात लढण्याच आणि स्वधर्मासाठी निष्ठा वाहण्याच बाळकडू पेरत होत्या.शाहू राजे सुद्धा आपल्या वडिलांच्या सारख शूर होऊन औरंगजेबच साम्राज्य संपवून दिल्लीच्याच शिंहासनावर बसण्याची स्वप्ने पाहू लागले होते.त्यासाठी त्यांनी औरंजेबाचा अभ्यास चालू केला.गेले अनेक वर्षे औरंगजेब दक्षिणेत आला,झुंजला.अनेक यातना त्याने सहन केल्या,पराक्रम,हार,पराभव आशा अनेक घटनांनी त्याच मन कणखर बनलं होत.तो इकडं होता पण तरी त्याच्या उत्तरेच्या राज्यात त्याच्या विरोधात कोणी बंड केलं न्हवत,कोणी त्याच्या राजगादीवर हक्क सांगत आक्रमणं केलं न्हवत.शेवटच्या श्वासापर्यंत सैन्य त्याला देव मानायचे आणि मरणाला मिठी मारायचे.औरंगजेबाची त्याच्या प्रशासनावर असलेली पकड,आपल्या सरदारांच्या वर असलेला वचक,भीती, दरारा आणि संबंध ह्या शिकण्यासारख्या गोष्टी छोटासा शाहू पाहत होता,शिकत होता.कधी तरी आपण या कैदेतून सुटू आणि उंच भरारी घेत आपलं शिंहासन साकार करू अशी भावना त्यांच्या मनात होती.
औरंगजेब शाहूंना मुद्दाम आपल्या सोबत खलबत करायला बसवायचा,शाहूंना तो सरदारांवर भडकलेला पाहून भीती वाटायची आणि शाहूंच्या मनात आलमगीर विषयी भीती बसली पाहिजे अस त्याला वाटायचं म्हणून तो त्यांना दरबारात पण घेऊन जायचा.
असाच एके दिवशी औरंगजेबाचा दरबार भरला होता.अनेक मातब्बर सरदार दरबारात हजर होते.शाहू राजे औरंगजेबाच्या जवळच बसले होते.दरबार चांगला रंगला होता आणि अचानक औरंगजेब उभा राहिला.त्याच्या पायातील मखमली जोडे बाजूला सरकले होते,अचानक उठल्याने त्याला जोडे सापडेना त्याची अवस्था पाहून शेजारी बसलेल्या शाहू राजांनी तात्काळ ते जोडे पुढे केले,म्हातारा औरंगजेब खुश झाला.त्यांनी त्याच्या जवळचा मखमली किमती रुमाल शाहू राजांना भेट दिला.औरंगजेब हुशार होता त्याच्या डोक्यात वेगळंच काहीतरी चालू होतं.त्याची नजर दरबारात फिरली.कपाळावर आठया पडल्या आणि मुत्सद्दी विचाराने औरंगजेब शाहूंना म्हणू लागला.
"शाहू आम्ही तुमच्या वडिलांना मारले,तुमच्यावर अन्याय करत तुम्हाला कैद केले.तरी पण तुम्ही आमची एवढी सेवा करत आहात.आम्ही तुमच्यावर खुश होऊन तुम्हाला कैदेतून मुक्त करतो,जा आणि तुम्ही तुमचा राज्य सांभाळा".
शाहूंनी एकदा औरंगजेबाकड पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरन त्याच्या मनाचा खेळ ओळखत हुशारीने शाहूंनी उत्तर दिलं.
"जहापना तुम्ही आम्हाला कैद करून आमची तर मदत केली आहे.आमचे चुलते तर आमच्या वडिलांना कैद करणार होते,त्यांनी आम्हालाही कैद करून मारलं असत,तुम्हीच आम्हाला इकडं आणून त्यांच्या तावडीतून आमची सुटका केली,शहजादया सारखी आमची काळजी घेतली तुम्हीच आमच्या चुलत्यांना पराभूत करून तुमच्या हाताने आम्हाला गादीवर बसवलं तर आम्ही राज्य सांभाळू".
हे ऐकताच औरंगजेब प्रचंड खुश झाला.त्याला खात्री पटली होती की शाहू आता आपल्या हुकमानुसार वागतील पण ही तर शाहूची चाल होती,काही करून औरंगजेब खुश केला तरच कैदेत आपण सुखात जगू शकतो हे शाहूंना चांगलंच समजलं होत.शाहू नेहमी त्याला खुश करायचे.
औरंगजेब भलताच खुश होता,शाहू आता वयाने थोर होत होते तास अलमगिराने त्याच्या जवळच्या मातब्बर मुस्लिम सरदारांच्या मुलिंची स्थळ शाहूंसाठी पाहिली होती आणि लग्नाविषयी येसूबाईंजवळ प्रस्ताव मांडला.

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...