विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 25 July 2022

संताजी घोरपडे आणि त्याच्या वंशजांचा अपरिचित इतिहास भाग १

 

संताजी घोरपडे आणि त्याच्या वंशजांचा अपरिचित इतिहास
पोस्तसांभार :आशिष माळी


भाग १
साधारण सांगली कोल्हापूर भागातली मोठासा भाग संताजी घोरपडे यांच्या कडे देशमुखी म्हणून होते. खालील पत्र १६९२ मधील छत्रपती राजाराम महाराजांचे आहे.हे पत्र संताजी घोरपडे ने यांनी १६८९ पासून १६९२मध्ये गाजवलेल्या पराक्रम च आहे. जेंव्हा छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृण हत्या झाली तेंव्हा मराठे संपले अशी संपूर्ण भारताची धारणा झालेली असताना संताजी ने एकहाती मुघल वार भीषण हल्ले केले. लक्षात घ्या यावेळी धनाजी त्यामानाने थोडे वयाने लहान होते. सांगली जिल्ह्यातील विटा मध्ये भालवणी नावाच्या गावात त्यांचा वाडा होता.त्यांच्या मानस पुत्र नारो महादेव जोशी या कडे इचलकरंजी ची जहागिरदार गेली तिथेच बाजीराव पहिल्या यांची बहीण अनुबई याना घोरपडे कुटुंबात दिली. (पुढे नारो महादेव जोशी यांनी आपले आडनाव घोरपडे केले ते संताजी साठी, तपण मूळ ते ब्राम्हणच) कापाशिकर घोरपडे सुद्धा त्यांचाच जहागिरदार च भाग.
सरसेनापती संताजीराव घोरपडे यांना दोन पत्नी होत्या. पहिल्या सोयराबाई दुसर्या द्वारकाबाई होय. सोयराबाई यांना राणोजी तर द्वारकाबाई यांना पिराजी हे पुत्र होय. तारिख दिलकुशा मध्ये भीमसेन सक्सेना लिहिते की, "संताजीच्या निधनानंतर पुढे ५ -६ वर्ष राणोजीने आपल्या वडिलांप्रमाणे मुघल सैन्याशी निकराची झुंज दिली. शिपाईगिरीत तो आपल्या वडिलांच्या पेक्षा दोन पावले पुढे होता. त्यावरुन १७०१ ते१७०२ हे वर्षे राणोजी घोरपडे यांनी गाजवून सोडलीे होती.

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...