विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 15 February 2023

१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजाची शिफारस ! - ११

 


१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजाची शिफारस ! - ११
संजय सोनावणे

गारद्यांच्या तोफांमुळे रोहिला सैन्याची भयंकर हानी होऊ लागली तेव्हा रोहिला सरदारांनी हळूहळू पुढे सरकण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सहेतुक असा होता. जर शत्रूच्या तोफा तुमच्या लष्कराची नासाडी करत असतील तर दोन प्रकारे तुम्हाला स्वतःच्या फौजेचा बचाव करता येतो. शत्रूच्या तोफांच्या पल्ल्याबाहेर जाऊन, म्हणजे मागे जाऊन उभे राहाणे किंवा तसेच पुढे चालत जाणे. पुढे निघून गेल्यास शत्रूच्या पल्लेदार तोफांचे गोळे आपोआप तुमच्या सैन्याच्या पिछाडीच्या मागे जाऊन पडतात. या दरम्यान काही प्रमाणात तुमच्या सैन्याचे नुकसान होऊ शकते. हे टाळण्यासाठी एकवटलेल्या सैन्याला विखरून उभे केले तर हि हानी काही प्रमाणात कमी होऊ शकते. १४ जानेवारी १७६१ रोजी अफगाण - रोहिल्यांनी याच पद्धतीचा वापर करून मराठ्यांचा तोफखाना एकप्रकारे निष्प्रभ केला.
रोहिल्यांची फौज जसजशी पुढे सरकू लागली तसतसे गारद्यांच्या तोफांचे गोळे, आरंभी त्या सैन्याच्या मध्यभागी व नंतर पिछाडीला पडू लागले. आपल्या तोफांचे गोळे फुकट जात आहेत हे लक्षात आल्यावर गारद्यांनी आपल्या पल्लेदार तोफा बंद केल्या. गारद्यांच्या पल्लेदार तोफांचा मारा निष्प्रभ करण्यासाठी रोहिला सैन्य जेव्हा पुढे सरकत होते तेव्हा, ते आपल्या गोलाला भिडण्यापूर्वीचं त्याचा संहार करावा या हेतूने मराठी सरदार गोलातून बाहेर पडले असावेत. हि शक्यता जर गृहीत धरली तर विंचूरकर, गायकवाड, पवार यांनी लष्कराचा गोल अजाणतेपणी किंवा गारद्यांच्या ईर्ष्येने अथवा गोलाची रचना समजून न घेता फोडला असा जो आरोप त्यांच्यावर केला जातो तो साफ चुकीचा ठरतो.

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...