विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 22 April 2023

बाल शिवाजी ते शाहू

 

Ch 2 -


बाल शिवाजी ते शाहू

येसूबाईंच्या मनाची अवस्था जर पहिली तर एका बाजूला आपला पती,मराठ्यांचा छत्रपती शंभुराजे ऐन तारुण्यात साथ सोडून गेला होता,दुसऱ्या बाजूला ज्यांच्या साठी जगायचं ते  बाल शिवाजी आणि आबासाहेबांनी मोठ्या कष्टाने फुलवलेलं स्वराज्याच 32 मणाच,रयतेच्या डोईवर सुखाच छत्र धरणारं स्वराज्याच तख्त सिंहासन औरंग्याच्या हाती लागणार होतं.खाशा खाशा गोकुळाला वेढा पडला होता सारे शोकसागरात होतेच त्यात औरंग नावाचा जहरी साप त्यांना गिळायला फणा काढुन सज्ज होता.येसूराणींवर प्रचंड दबाव होता.दुसरी कोणी स्त्री असती तर रायगडावरून उडी मारून जीव दिला असता,एका बाजूला रायगड आणि रायगडावरील माणस दुसऱ्या बाजूला स्वराज्याची तमाम रयत आता काय होतंय,कोण वाचवेल स्वराज्य या आशेत होती.येसूराणी म्हणजे साक्षात रायगडाच्या राजाची पराक्रमी सून होती,जिजाऊंच्या अनुभवांतून समृद्ध झालेल्या संस्कारांच्या विदयापिढात वाढलेली एक आदर्श माता,राज्यकारभारीण होती.ती स्वराज्याची "कुलमुखत्यार" होती. येसुराणी नियतीपुढं खचली होती,संभाजी नावाच्या रणात घोंगावणाऱ्या तलवारिची शस्त्र विना उरलेली मोकळी एकटीच पडलेली म्यान होत पण भीतीचा मागमूसही तिच्या चेहऱ्यावर न्हवता.ती लढत होती आपल्या नशीबाशी आणि सांगत होती नियतीला 'राजा नसला म्हणून काय झालं आपलं सिंहासन अजून सज्ज आहे'.
           मधीच कधीतरी झुल्फिकारखानाचे वकील यायचे 'किल्ला ताब्यात ध्या' म्हणून आर्जव करायचे मराठे हट्टी होते ते किल्ला द्यायला तयार न्हवते.आक्रमण,हल्ले प्रतिहल्ले चालू होते.दिवस काळजीत पुढं सरत होते.स्वराज्याची "कुलमुखत्यार" म्हणून आठ महिने  राज्यकारभार चालू होता.तसं तर राजाराम महाराज गादीवर छत्रपती म्हणून बसले होते पण राजकारणाची मुत्सद्दी धोरण आखण्यात ते अयशस्वी होते.आपल्या भावाला शंभुराजांना मनात ठेवून त्याच्या मुलाच्या नावानं बाळ शिवाजी च्या वतीने ते राज्यकारभार पहात होते पण सारी सूत्रे येसुरांणींच्या हातात होती.
         मराठे झुल्फिकारखान  खानाचा वेढा तोडायला यशस्वी होत न्हवते तेव्हा मात्र लढून उपयोग नाहीं आता युक्ती चा मार्ग निवडत येसूबाईंनी खलबतखान्यात बैठक बोलावली.पंत,प्रधान,सचिव,सेनापती सारे एकत्र जमले स्वराज्याच्या भविष्याची चर्चा रंगली होती.प्रत्येक जण आपापले विचार मांडत होते पण त्या विचारांच्या पेक्षा औरंगजेब बलशाली होता युक्त्या,लढाया करून उपयोग न्हवता आता एकच मार्ग शिल्लक होता.चारी बाजूंनी रायगड घट्ट आवळला जात होता,श्वास कोंडला जात होता.
 एक नजर येसूबाईंनी सर्वांवर फिरवली आणि दीर्घ श्वास घेत आपला निर्णय सांगितला. तसा इतक्या वेळ शांत राहोलेला सेनापती संताजी घोरपडे वाघा सारखा सज्ज झाला.त्याची छाती फुगली होती,हाताच्या मुठी आवळल्या गेल्या, "नाही,मुळीच शक्य नाही स्वराज्याच तख्त अस गनिमांच्या तावडीत सोडून जाण्यापरीस मेलेलो काय वाईट" संताजी रागात बोलत होता.
"नाही हे कदापी शक्य होणार नाही, स्वराज्य आणि बाळराजे मुघलांच्या तावडीत देऊन आम्ही पळ काढला तर काय तोंड दाखवू या रयतेला" धनाजी जाधव पण तडक उभे राहत बोलू लागले.
"त्यापरीस हितच कटुन मरु पण रायगड सोडणार नाही" जोत्याजी केसरकर काळजीच्या स्वरात म्हणला तसा त्याच्या डोळ्यात पाण्याचा ओसरता थेंब जमा झाला.
      सारे शांत होते,आता कोण काय बोलेल यावर राजाराम राजे काय बोलतील यावर सर्वांचं लक्ष होत पण येसूबाईं उभ्या राहिल्या.आपली पूर्ण शक्ती एकवटून त्या बोलत होत्या नव्हे आदेशच देत होत्या,
"या रयतेवर सुखाच छत्र व्हावं आऊसाहेबांनी पाहिलेलं हे स्वप्न,आबासाहेबांनी शिवभूपतींनी मोठ्या बलिदानाने उभं केलं,हे तख्त सिंहासन म्हणजे आपली प्रतिमा आणि त्या सिंहासनावर बसणारा राजा म्हणजे आपलं हृदय,आपलं सत्व,आपलं अस्तित्व पण हे अस्तित्व आज नाहीस होण्याच्या मार्गावर आहे आणि तुम्ही लढाईच्या गोष्टी करताय,आता लढण्यापेक्षा राजा वाचवणं गरजेचं आहे म्हणून चंदी ला आपल राज्य आहे सध्या राजाराम राजेंना तिकडं पाठवू,संताजी धनाजी आणि इतर पडली मुलूखगिरी करतील,आम्ही बालशिवाजी सोबत कैद होतो,पुढं तुम्ही तुमच्या कार्यकर्तृत्वावर स्वराज्य अबाधित ठेवत आम्हाला सोडवून आणलं यात शंका नाही"
      सारे शांत होते,कोणाचंही काही बोलायच धाडस होत न्हवत,
"पळून जाण्यापेक्षा दादामहाराजांसारखं आम्ही पण मुघलांवर तुटून पडू"
एवढ्या वेळ शांत बसलेले राजाराम राजे कडाडले.
"नाही,जसं ठरलंय तसच होईल"येसूबाईंनी आपला निर्णय ठाम पणे सांगितला.
        कोणालाच हा निर्णय मान्य न्हवता पण काही पर्याय नासल्याने शेवटी नाही होय करत राजाराम महाराज त्यांचा कुटुंब कबिला आणि सेनापती आणि कारभारी मंडळी एका रात्री गपचूप वाघ दरवाज्याने रायगड उतरून चंदी म्हणजे जिंजी च्या दिशेने निघाले.पुढं भविष्यात आपण येसूराणी सरकार आणि बाल शिवाजी ची सुटका करू असा मनात बेत धरत ओल्या डोळ्यांनी सर्वांनी रायगड सोडला.
        मराठ्यांचा इतिहास जितका पराक्रमाचा,साहसाचा,धैर्याचा होता तितकाच आपुलकीचा,संयमाचा,निर्णयक्षमतेचा आणि भावनेचा आहे.धर्म शास्त्रनुसार वडिलांच्या निधनानंतर मोठ्या मुलाचा अधिकार त्यांच्या मालमत्ता,कारभारावर असतो पण बाल शिवाजी लहान होता,त्यांना राजा बनवणे शक्य न्हवत म्हणून येसूबाईंनी राजाराम महाराजांचा राज्याभिषेक केला होता.राजराम राजे तरुण होते,निर्णय घ्यायची क्षमता त्यांच्यात होती शिवाय युद्ध शास्त्र सुद्धा त्यांना जमत होत.
       ऐकत झुल्फिकारखान वेढा अधिक आवळत होता एके दिवशी त्याचे काही स्वार आणि वकील रायगडावर आले,येसूबाईंनी  एक तह करत रायगड मोगलांच्या हाती द्यायचं मान्य केलं.झुल्फिकारखानाला आनंद झाला आयत स्वराज्य हातात आलं,मराठयांचा राजा आयता हातात येणार होता म्हणून त्यांनी तहतील अटी मान्य केल्या होत्या.येसूबाईंनी कुराण हातात घेऊन शपथ ग्यायला लावली होती की,जो पर्यंत येसूबाई मुघलांच्या कैदेत आहेत तो पर्यंत त्यांच्या चरित्राची,इज्जतीची आणि मान सन्मानाची जबाबदारी झुल्फिकार खान घेणार होता.शिवाय बाल शिवाजी राजांना राजा म्हणून मान्यता मुघल बादशहा देणार होता.एकदा का बाळशिवाजी मुघलांचे मनसबदार होऊन राजा म्हणून मान्यता मिळाली की त्यांच्या सुरक्षेची जास्त काळजी करायची गरज न्हवती.मुघलांनी मोठ्या आनंदात मागण्या मान्य केल्या.रायगडावर उपस्तीत असलेला छत्रपती संभाजी राजेंचा कुटुंब कबिला,महत्वाची काही सरदार मंडळी आणि बाळ शिवाजी च्या रक्षणासाठी जोत्याजी केसरकर अशी जवळ जवळ 600 माणसं कैद केली.झुल्फिकारखान मात्र रायगड हातात येऊनही उदास होता कारण त्याचा जिंकून सुद्धा पराभव झाला होता.कडक पहारा असून पण राजाराम राजे म्हणजे स्वराज्याचा छत्रपती त्याला रायगडावर सापडला न्हवता.मराठ्यांचा पराभव करत राज्य ताब्यात ग्यायच स्वप्न भंगल होत.तोंड पाडत झुल्फिकारखान औरंगजेबाच्या कारभारात बाळशिवाजी आणि येसूबाईंना घेऊन हजर झाला.
        औरंगजेबाचा दरबार भरला होता,एका उंच आसनावर दाढी कुरवाळत आणि हातातले माळेचे मणी मोजत तो दिल्लीचा महत्वकांक्षी बादशहा अबुल मुजजफ्फर मुहीउद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर म्हणजे औरंगजेब  शांत बसला होता.त्याच्या शेजारी एका मखमली पडद्याआड एक 50 ची स्त्री  त्याची मूलगी झीनत बसली होती.साधारण 80 च्या पुढं गेलेला वृद्ध झालेला तो आलमगीर आपल्या पांढऱ्या-सोनेरी दाढीवरून हात फिरवत सज्ज झाला.आपल्या मनसबदार,सरदारांचे कुर्निसात त्याने मंजूर केले काही पराक्रम गाजवणाऱ्यांना खिल्लती  वाटल्या जात होत्या.त्याच वेळी येसूबाई आणि बालशिवाजी यांना दरबारात हजर करण्यात आलं.येसूबाईंनी पाहताच औरंगजेब आपली बैठक ताठ करत सावध बसला.सौभाग्यवतीच्या कुंकवाने भरलेलं ते कपाळ आज पांढऱ पडलं होत.पांढरीच पण भरजरी साधी नेसलेल्या येसूबाई एखाध्या देवी सारख्या भासत होत्या,रायगड हातात आला पण मराठ्यांचा राजा सापडू दिला नाही याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता.येसूबाईंच्या चेहऱ्यावर किंचितही भय न्हवत.ते तेज पाहून औरंगजेबाने सुद्धा नजर झुकवली. समोर सात आठ वर्षाच कोवळं लेकरू आपली नजर खाली करत पायाच्या अंगठयांन जमिनीशी खेळत होत.अंगावर भरजरी वस्त्र,कमरेला छोटी तलवार,डोईवर रेशमी मोत्यांच्या तुर्याचा राजेशाही फेटा,गळ्यात मोठ्याच्या माळा त्याच्या छोट्याशा छातीभोवती गुंडालेल्या छोट्याशा रेशमी  शेल्यात एक भरजरी वस्त्र आणि सोन्या-मोत्यांनी सजवलेली कट्यार,कानात कर्णफुले,हातात सोन्याचं कडं आशा रूपातील तो बालशिवाजी तितकाच रुबादर आणि देखणा दिसत होता.
"नाम क्या है तुम्हारा?"
औरंगजेब त्या छोट्याशा मुलाकडे पाहत मोठ्या गुर्मीत धमकावत विचारता झाला.क्षणाचा ही विलंब न करता बालशिवाजी ची नजर वर गेली ती थेट औरंग्याच्या डोळ्यात,हाताच्या मुठी आवळत तो युवराज नजर रोखून त्या आलमगीर औरंगजेबकड पाहत होता,त्याला कसलीच भीती वाटत न्हवती.औरंगजेब थरारला,थोडासा सावरला.तीच नजर,तसाच साज आणि अशाच बुलंद छातीचा संभाजी याच खेळण्या बागडण्याच्या वयात दिल्ली च्या दरबारात असाच दिल्लीच्या मुघल तख्तावर बसलेल्या आलमगीर औरंगजेबाला डोळ्यात डोळे घालून रोखत उभा होता.तो प्रसंग औरंगजेब अजून विसरला न्हवता. शिवाजीनं माझी खैरात उधळून लावली होती,सारा दरबार भयभीत होता पण असाच याचा बाप संभाजी आपल्या समोर छाती फुगवत उभा होता.औरंगजेबाला विश्वास बसत न्हवता पण हा नियतीनं घडवलेला योगायोग होता.इतिहासान पुन्हा एकदा मराठ्यांच्या लेकराचं रुद्र रूप त्याला दाखवलं होत.
"सुना नहीं हमने क्या पुछा,नाम क्या है तुम्हारा?" 
औरंगजेब स्वतःला सावरत पुन्हा गरजला.
"शिवाजी संभाजीराजे भोसले" आपल्या शरीरातील सगळी ताकद एकवटत बाळ शिवाजीनं आपलं नाव सांगितलं.औरंगजेबाला नीट ऐकू गेलं न्हवत तो पुन्हा रोखून म्हणला."जरा ठिकसे नाम बताना,अब तो हमेशा मुझे आपको बुलाना पडेगा" हसत औरंगजेब म्हणाला.

"आप हमारा नाम कभी भुलेंगे नहीं, क्योकी मेरा नाम मेरे दादाजी के नाम से रखा है,शिवाजी संभाजीराजे भोसले" मोठ्या विजयी तोऱ्यात बाल शिवाजी ने आपला परिचय खड्या आवाजात करून दिला.शिवाजी नाव ऐकताच तख्तावर बसलेला औरंगजेब ताडकन उभा राहिला.सारा दरबार हादरला होता, छटपट मुजरे जडले,कुर्निसात पडले. आपलं तख्त सोडून तो आलमगीर खाली आला. अगदी बालशिवाजी च्या जवळ आला.शिवाजीनं आईचा हात घट्ट पकडला.एकदा येसूबांईंकडे पाहिलं आणि बाल शिवाजी कड पाहून तो विचार करु लागला.याचा आजा शिवाजी असाच आपल्या दरबारात खिल्लत उधळून लावला दरबाराचा अपमान केला होता,मुघलांच्या हातावर तुरी देत कैदेतून गायब झाला होता.अजून एक शिवाजी त्याचा समोर उभा होता उमर कमी होती पण रुतबा तसाच होता.औरंगजेब तडफडत होता पण काहीच करू शकत न्हवता.

    "शिवाजी नामसे हमे नफरत है,हम आपका नाम बदलेंगे" औरंगजेबाचा आवाज गंभीर होत होता.छोटासा बाळ शिवाजी सुखावला होता.आपल्या आईने सांगितलेल्या आजोबांच्या पराक्रमी कथा त्याला खऱ्या वाटू लागल्या होत्या.

"तुम्हारा दादा शिवाजीने हमारी पुरी सलतनत को परेशान किया था, सैतान जैसा शिवाजी हमे छलता रहा....लेकिन मै तुम्हे सच्च आदमी बनाउंगा" हसत हसत औरंगजेब बोलत होता.

येसूबाई आणि शिवाजी सोबत मराठी मावळ्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या,सर्वांचं लक्ष औरंगजेबकडं होत.

 बालशिवाजी च नाव त्यानं साव ठेवलं,साव म्हणजे शांत,सच्चा.पुढं साव च शाहू झालं आणि शंभूपुत्र शिवाजीचा शाहू झाला होता.

No comments:

Post a Comment

राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे

  राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे : सरदार मलोजी रणनवरे हे जिंती तालुका फलटण येथील पुरातन वतनदार....