शाहू राजे जवळजवळ अठरा वर्ष औरंगजेबाच्या छावणीत कैद होते.वयाच्या 7 व्या वर्षी रायगडावर कैद झालेला शंभू पुत्र 18 वर्ष मुघली सेनेच्या विळख्यात अडकून पडला होता.महाराणी येसुबाईंनी शाहू राजांना चांगल्या पद्धतिने शिक्षण दिल होत रणांगणातल्या गोष्टी सांगून शाहूंच्या मनात पराक्रमाची ज्योत पेटवून दिली होती.मराठे मुघल छावणीवर हल्ले करायचे तेव्हा शाहू राजांच्या मनगटातली रग उफाळून यायची त्यांनाही वाटायचं आपण समशेर घेऊन रणांगणात जावं आणि सुटका करून घ्यावी,ब्रम्हपुरीत औरंगजेबाची छावणी पडली होती आणि अचानक धनाजी जाधवांनी हल्ला चढवून औरंगजेब भयभीत केला होता तेव्हा मात्र शाहू राजांना एक आशा लागली होती की आपली मुक्तता होईल पण लाखाच्या फौजे पुढं कणभर मराठे टिकणार कसे.शाहू राजे कैदेत असताना कसे जगले असतील याची कल्पनाही करू शकत नाही.आपण स्वतः एक दिवस घराबाहेर नाही गेलो तर दिवसभर मानसिक तणाव सहन करावा लागतो.आजारी असेल आणि आठवडा भर घरात आराम केल्यावर जेव्हा एकदम बाहेर पडतो तेव्हा होणार जो आनंद असतो तो आनंद शाहूंच्या आयुष्यात न्हवता.अठरा वर्ष शत्रूच्या छावणीत राहणे सोपं नाही बरं फक्त राहायचं नाही तर कैद सोसायची.कितीतरी अपमान, किती तरी हाल,अपेष्ठा सहन कराव्या लागल्या. पण मराठे जेव्हा मुघलांची दाणादाण उडवायचे तेव्हा मात्र शाहूंच्या आणि येसूबाईंच्या मनाला एक आनंद व्हायचा.आपला त्याग,आपली कैद आणि आपण सोसलेले हाल वाया गेले नाहीत.राजाराम राजे या गोष्टीचा बदला घेत होते.शाहूंना सोडवण्याचे खूप प्रयत्न झाले पण त्यात यश आलं न्हवत.शाहूंनी लहानपणापासून मराठ्यांच्या पराक्रमाच्या आणि बेलाग छातीच्या सह्याद्रीच्या गोष्टी ऐकल्या होत्या तो सह्याद्री त्यांनी मुघलांच्या छावणीत असताना अनुभवला होता.
राजाराम राजांचा पकडण्यासाठी झुल्फिकार खान तिकडं जिंजीला वेढा देऊन बसला होता.इकडं महाराष्ट्रात औरंगजेब स्वतः नेतृत्व करत मराठ्यांचे गडकिल्ले जिंकत होते.एका पाठोपाठ एक अशे किल्ले तो जिंकत होता कधी तह व्हायचे कधी लढाई व्हायची.खरं तर मुघलांनी एकच किल्ला लढून जिंकला होता तो म्हणजे तोरणगड बाकी त्यांनी जिंकलेले किल्ले हे जिंकले नाहीत तर किल्लेदाराच्या हातात मोहरा देऊन विकत घेतले होते.मराठे एखादा किल्ला लढवायचे नंतर पैशे घेऊन त्यांच्या ताब्यात द्यायचे.मुघल किल्याची दागडुजी करायचे,रसद भरायचे किल्ला जिवंत करायचे आणि दोन तीन महिन्यांनी मराठे रात्री येऊन किल्ला जिंकून ग्यायचे.अस करत मरहट्टे त्यांना लुटत होते.सह्याद्री कसा बिकट आहे,कसा रांगडा आहे हे मुघली सेनेला माहीत न्हवत.उत्तरेच्या विस्तीर्ण पसरलेल्या माळरानावर मैलो- मैल पसरलेल्या सपाट प्रदेशात युद्ध खेळणारे मुघली सैन्य सह्याद्रीच्या डोंगर रांगा, अवघड घाट माथे यात फसत होते.उत्तरेत नदीची पात्रही लांब च्या लांब पण संथ वाहणाऱ्या आणि रुंद पण दक्षिणेत नद्या लहान,खोल आणि अतिवेगाने वाहणाऱ्या होत्या.मुघली घोडी सुध्दा पाण्यात शिरायला तयार नसायची.उत्तरेच्या माळरानावर कुठं तरी लहानशी टेकडी असायची बाकी सारा मैदानी प्रदेश.दक्षिण देशात मात्र मैला मैलावर लहान टेकड्या,खिंड आणि कवचित एखाद मैदानी पठार असायच.उत्तरेच्या मानानं सह्याद्रीतल्या नद्या,ओढे मुघलांना किरकोळ वाटायच्या.
ओरंगजेबाची छावणी पडली तर 4-5मैलाचा प्रदेश त्याच्या छावणीने व्यापून जायचा.लाखो सैन्य,घोडे,जनावरे,हत्ती आणि करोडो रुपयांची संपत्ती घेऊन तो सह्याद्रीत घुसला आणि आयता मराठ्यांच्या ताब्यात सापडला.औरंगजेब जिथं जाईल तिथं शाहू आणि येसूराणी यांना सोबत घेऊन जायचा,सोबत त्याचा जनाना पण असायचा.मराठी दौलतीचे किल्ले जिंकून ग्यायचं म्हणून तो किल्यावर वेढे देत होता.राजाराम राजें सिंहासनावर बसले होते खरे पण सिंहासन त्यांच्या नशिबात न्हवत.सारखी धावपळ त्यांच्या नशिबी होती.राजाराम राजेंनी लढाई स्वतःच्या बचावासाठी केल्या. मराठी सैन्य मात्र मुघलांना लुटण्याचा इराद्याने हल्ला करून गायब व्हायचे.सरंजाम पद्धत पुन्हा सुरू केली त्यामुळे मनगटात तलवारी आवळल्या गेल्या आणि अंगातील रक्त सळसळत मुघलांवर तुटून पडलं यातूनच मराठे अगदी नर्मदेपालिकडे गेले आणि संरजांम वसूल करू लागले.मराठी सैन्य मुघली प्रांतात हल्ले करून आपली पकड मजबूत करत होते,औरंगजेब मात्र इकडेच किल्ले जिंकायचा नादात होता. 26 वर्ष औरंगजेब मराठी मुलखात होता पण तो कधीच विजयी झाला नाही.विजयाचे सोहळे साजरं करण्याचं भाग्य त्याला मराठी भूमीत लाभलं नाही.मराठे,निसर्ग आणि मुघल यांनी या भूमीत असा रणतांडव मांडला होता की औरंगजेबाच्या पुढच्या कित्येक पिढ्याना त्याचा परिणाम भोगावा लागला.
मराठ्यांचा गनिमी कावा असा होता की ते अचानक हल्ला करायचे लढायचे कमी पण लुटायचे जास्त,त्यात मोगली सैन्य विनाकारण मारले जायचे.कधी कधी महिना महिना सह्याद्रीचा पाऊस थांबत नसायचा अशा वेळी मात्र सर्वांची दैना उडायची.शाहू राजांनी सुद्धा हे सह्याद्रीच रौद्र रूप अनुभवलं,सह्याद्री पहिला तो औरंगजेबाच्या छावणीत.बुलंद,बेलाग,मजबुत.कातळ ताशीव दगडांच्या पर्वत रांगेतला सह्याद्री उन्हाळ्यात शांत निपचित पडून असतो.कुठंतरी वावटळ उठून झाडाची वाळलेली पान आकाशात फेर धरायची.पावसाळ्यात मात्र सह्याद्री खवळून उठायचा.हाताच्या अंगठ्या एवढा एक एक थेंब असायचा.पावसाळ्यात नदी नाले ओसंडून वाहायचे.वाहणाऱ्या पाण्याबरोबर लालबुंद माती वाहून यायची.शाहू राजांच्या यातनाच्या पुढं सह्याद्रीच रौद्र रूप काहीच न्हवत पण मुघलांना ते सहन होत न्हवत.
एकदा औरंगजेबाच्या सैन्याचा मुक्काम मानदेशात पडला होता.माण नदीच्या छोट्या पात्रात त्याची भली मोठी सेना तळ ठोकून होती.माण देश म्हणजे दुष्काळी प्रदेश.या भागात औरंगजेबाची छावणी पडली होती.सगळे शांत झोपी गेले अचानक रात्री 2 वाजण्याच्या सुमारास आरडा ओरडा चालू झाला.सारी मुघल सेना अस्ताव्यस्त झाली होती.सारी गुलालबारी जागी झाली.त्या गुलालबारीत पूर्ण पाणी शिरलं होत.औरंगजेब खडबडून जागा झाला.त्या धामधुमीत त्याचा पायाला जबर दुखापत झाली.विव्हळत कसा बसा तो त्यातून बाहेर आला.चौकशी केल्यावर समजले की लांब कुठंतरी डोंगरावर ढगफुटी झाली होती,आणि त्या पावसाच्या पाण्याने माण नदीला पूर आला होता.या अचानक आलेल्या अस्मानी संकटात औरंगजेबाची कितीतरी लाखांच नुकसान झाल होत.हजारो जनावरे मेली होती.मनूची नावाचा इतिहासकार म्हणतो की "दुर्गंधी इतकी पसरली होती की शुद्ध हवा ग्यायला अडीच कोसावर जावं लागायचं."
इतकी बेकार अवस्था औरंगजेबाची झाली होती.
औरंगजेबाच्या कैदेत असताना शाहू राजे छावणीत सुरक्षित होते याच सगळं श्रेय जात ते महाराणी येसूबाई,राजाराम राजे आणि दक्षिण प्रांतात धुमाकूळ घालणाऱ्या मराठी सेनेच.शाहू राजे खरे घडवले ते त्या वीर मातेने.विचारांचा,संस्कारांचा,पराक्रमाचा वारसा शाहूंच्या रक्ताच्या थेंबा थेंबात जिवंत ठेवायचं काम केलं ते पहिल्या गुरू महाराणी येसूबाईंनी.काही प्रसंग अशे आले होते की औरंगजेबाने या माय लेकरांची ताटातूट केली होती.औरंगजेबाची छावणी ब्राह्मपुरीत जवळजवळ 5 वर्ष तळ ठोकून होती.त्याच्यानंतर येसूबाईंना नगरच्या किल्ल्यात ठेऊन शाहूंराजेंना बादशहाने सोबत ठेवलं होतं.
शाहू राजे म्हणजे औरंगजेबाची ढाल होती.ही ढाल सोडवण्यासाठी कितीतरी प्रयत्न झाले पण त्यात यश आलं न्हवत.अचानक मराठ्यांनी हल्ला केला आणि प्रसंग जीवाशी आला तर शाहूंच्या मानेवर तलवार धरून मुघल स्वतःची सुटका करून घेऊ शकत होते आणि म्हणूनच औरंगजेबान शाहूंना इतकी वर्षे जिवंत ठेवलं होतं.शाहू आणि येसूबाई कैदेत यायच्या आधी त्यांनी काही अटी मांडल्या होत्या त्याचा जामीन झुल्फिकार खान होता.तो झुल्फिकार खान जिंजी ला वेढा देऊन होता.अचानक एके दिवशी एका बाजूने संताजी आणि दुसरीकडून धनाजी नि हल्ला केला आणि हल्ला इतका जबर होता की मुघलांची प्रचंड हानी आणि प्रचंड लूट झाली होती.झुल्फिकार खानाला मारायचा आणि संभाजी राजांच्या हत्येचा बदला घ्यायचा आशा त्वेषाने संताजी राव तुटून पडले होते.अचानक राजांचा निरोप आला आणि झुल्फिकार खानाला जिवंत सोडावा लागला.खान तलवारीच्या वाराच्या टप्प्यात आला होता पण त्याच्या वकिलाने राजाराम राजांकडे तहाची बोलणी केली.राजाराम राजेंनी एक गोष्ट जाणली होती की मुघलांच्या दरबारात झुल्फिकार खान हा शाहू राजे आणि इतर कैद्यांना जामीन आहे त्यामुळे तो असेपर्यंत औरंगजेब त्यांच्या केसालाही धक्का लावणार नाही.म्हणून फक्त आणि फक्त शाहू राजांच्या संरक्षणासाठी झुल्फिकार खान जिवंत राहणे गरजेचा होता.राजाराम राजेंनी त्याच्याशी मैत्री चा हाथ समोर केला होता.नेमकी हीच गोष्ट कडक शिस्तबद्ध लढणाऱ्या संताजी रावांना खटकली.या आधी सुद्धा राजाराम राजेंनी वतनदारी,सरंजाम पद्धत चालु केली याला संताजी चा विरोध होता.त्यात आता हा विषय खूप शेवटाकडे गेला आणि संताजी रावांनी नाराज होऊन राजाराम राजेंशी वाद घालत स्वराज सोडून दिलं. स्वराज्याचा सेनापती रुसून निघून जाणे ही गोष्ट स्वराज्यासाठी घातक होती.राजाराम राजेंनी धनाजी जाधवांना सेनापती पदाची वस्त्र दिली आणि संताजी शत्रूंना जाऊन मिळाला तर आपल्याला जड जाईल म्हणून त्याला कैद करण्याचा हुकूम निघाला.खरतर संताजी स्वराज्याशी बेईमानी करणाऱ्यातले न्हवते पण तरि राजाराम राजेंनी विषाची परीक्षा नको म्हणून आदेश काढले.इतिहासात मात्र आम्हाला वेगळंच दाखवलं इतिहास आम्हाला सांगतो की धनाजी संताजी यांच्यात फूट पडली पण संताजी धनाजी यांच्यात कसलाच वाद न्हवता हा वाद होता स्वराज्याचे छञपती आणि संताजी. धनाजी राव फक्त हुकूम पाळायच काम करत होते.पुढं संताजी रावांचा मृत्यू झाला.हळूहळू शाहू राजे राजकारणाचा अभ्यास करत होते. औरंगजेबाच्या चाली ह्या खूप विचार करून केलेल्या असायच्या पण कुठंतरी त्याच्या फौजेत इमानदारी संपत आली होती.त्याच्या फौजेत आलेला सैनिक हा कित्येक वर्षे घरी गेला न्हवता परिणामी सैन्याची मानसिक स्थिती लढण्याची न्हवती पण स्वतः लंगडा औरंगजेब नेतृत्वाला उतरायचा आणि त्याला पाहून सैन्यात चेव चढायचा.
मुघल सैन्यात कित्येक मराठा सरदार आपल्या तलवारी गाजवत होतें, राजपूत होते,उमराव,वतनदार होते.ह्या लिकांना शाहू राजांनी आपल्या बाजूने वळवून संघटन बांधायचा प्रयत्न केला होता.मुघलांच्या कैदेत असल्याने उत्तरेत जशी प्रतिष्ठा असेल तर रहावं लागायचं.त्यांच्या प्रतिष्ठेनुसार रीतिरिवाज होते ते पाळायला लागायचे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा वारस, शूर पराक्रमी संभाजी राजांचा मुलगा म्हणून कित्येक मुघलांना सुद्धा शाहूनबद्धल प्रेम,आदर आणि स्नेह होता.शाहू राजांना वाटायचं कधी मुघलांकडून सुटका होईल आणि मातृभूमी च्या मातीचा मळवट कपाळी लावेल.पण नियतीच्या मनात वेगळच होत.
क्रमश:
संदर्भ :
१)मुकद्दर-
2)चिटणीसाची बखर
3)अखबर ते औरंगजेब

No comments:
Post a Comment