विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 9 May 2024

● किल्ले सुवर्णदुर्ग आणि कान्होजी आंग्रे यांचा उदय :

 

रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेले हर्णे बंदर. ह्याच हर्णे गावाजवळ सागरी किल्ला “सुवर्णदुर्ग”.....🚩
सुवर्णदुर्ग किल्ल्याची निर्मिती बहामनी राजाने केल्याचे सांगितले जात दूरदृष्टी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या बंदराचे महत्त्व ओळखून आपले आरमार या ठिकाणी वसवले व किल्ल्यांचीही मजबुती केली सुवर्णदुर्ग किल्ला छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे..

● किल्ले सुवर्णदुर्ग आणि कान्होजी आंग्रे यांचा उदय :
छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत सुवर्णदुर्ग वर अचलोजी मोहिते नावाचे किल्लेदार होते. इसवी सन १६८८ मध्ये भर समुद्रातील सुवर्णदुर्ग किल्ल्यास सिद्दीने वेढा घातला. सुवर्णदुर्गाच्या तिन्ही बाजूने आरमार व जमिनीच्या बाजूने सैन्याची भलीमोठी फळी उभारून सिद्दीने सुवर्णदुर्गाची नाकेबंदी केली. सिद्दीने राजकारण करून सुवर्णदुर्गाच्या किल्लेदारालाच आपल्या बाजूने वळवून घेतले. किल्लेदार फितुर होऊन सुवर्णदुर्ग सिद्दीच्या ताब्यात देणार आहे ही गोष्ट किल्ल्यातील कान्होजी आंग्रे नावाच्या तरूणाला मान्य नव्हती. त्याने रातोरात सुवर्णदुर्गावरील आपल्या इतर सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन किल्लेदारालाच कैद करून गडाचा ताबा आपल्याकडे घेतला. यानंतर कान्होजींनी सरळ किल्ल्याबाहेर पडून सिद्दीवर हल्ला चढवला. दुर्दैवाने तो फसला आणि कान्होजी आंग्रे आपल्या निवडक सहकाऱ्यांसह सिद्दीच्या कैदेत सापडले. परंतु कान्होजींनी सिद्दीच्या कैदेतून शिताफीने आपली सुटका करून परत सुवर्णदुर्ग गाठला. गडावर येताच कान्होजी पुन्हा नव्या जोमाने किल्ला लढवत राहिले. मराठ्यांच्या या चिवट लढ्यामुळे अखेर सिद्दीला माघार घेऊन वेढा उठवावा लागला. कान्होजींच्या या पराक्रमाबद्दल छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना सुवर्णदुर्गाची किल्लेदारी दिली..
पुढे हेच कान्होजी आंग्रे मराठा आरमाराचे सरखेल बनले..
――――――――――――

No comments:

Post a Comment

#द ग्रेट मराठा #श्रीमंत महादजी बाबा शिंदे

  पानिपतच्या लढाईत पठाण घोडेस्वाराने केलेल्या तलवारीच्या तडाख्याने महादजींचा एक पाय कायमचा अधू झाला ; परंतु तशाही जायबंदी अवस्थेत महादजी सुख...