विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 13 August 2024

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन सुनांनी केलेल्या त्याग आणि त्यांच्या आयुष्यात आलेला योग

 


छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन सुनांनी केलेल्या त्याग आणि त्यांच्या आयुष्यात आलेला योग🙏🏼🙏🏼
“ मला कोठे तरी कैदेतच रहावयाचे... तुम्हांजवळच राहू. ” तेव्हा छत्रपती शाहूने महाराणी ताराबाई साहेब ना सातारच्या किल्यातल्या राजवाड्यात ठेवले. महाराणी ताराबाई साहेब यांच्या मुलगा आधीच वारला होता ( १७२७) अन्‌ हिच्या नशिबी मात्र कोल्हापूर येथे कैद आली. पुढे वारणा तहात त्या सातारा येथे आल्यावर छत्रपती शाहू महाराजांच्या अजित शत्रूपणामुळे छत्रपती शाहूबद्दल मन पालटले अन्‌ हिच्याच नातवाला ( रामराजा ) त्याने वारस ठरविले. छत्रपतींच्या दोन्ही सुनांच्या अश्या दोन तर्हा झाले..मोगलांची कैद तीस वर्षे भोगली महाराणी येसूबाई साहेब यांनी! तर्तर् महाराणी ताराबाई तब्बळ सत्तेचाळीस वर्षे राज बिंदवासात होती. महाराणी ताराबाई साहेब लाही आपला नातू छत्रपती रामराजे यास मराठ्यांच्या गादीवर बसलेला बघण्याची योग आले..
महाराणी येसूबाईने स्वकीयांच्या साठी मोगलांच्या बंदिवासात होत्या शेवट गोड झाला आपला पुत्र छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या सानिध्यात व मराठ्यांचे स्वतंत्र साम्राज्य बघून त्यांचे निधन झालं.
इतिहासातून काय बोध घ्यायला पाहिजे आम्ही संयम ठेवा लगेच पराभव मान्य करू नका वेळ पडली तर शरण जा कारण येणारा काळ तुम्हाला पुन्हा संधी देतो तुमच्या त्यागाला तुमच्या बलिदानाला तुमच्या निष्ठेला येणार का हा न्याय देऊन जातो कारण महारणी येसूबाईंनी आयुष्यातील 30 वर्ष मुलांचे कैद मोगली आणि महाराणी ताराराणीने आयुष्यातील ते 40 वर्ष राज कैदी म्हणून राहिले पण महाराणी येसूबाईचा पुत्र शाहू महाराजांनी उभ्या हिंदुस्थानाची दौलत तिचा कारभार साताऱ्यातून हाकला तर त्याच शाहू महाराजांनी छत्रपती म्हणून महाराणी ताराराणी साहेबांचे नातू रामराजे या गादीवर बसवावी अशी व्यवस्था आपल्या निधनापूर्वी करून ठेवली बघा आयुष्याच्या सुरुवातीस कैदेतून आल्यावर ज्या ताराराणी विरुद्ध शाहू महाराज लढले त्या स्तरावर आणि ला कोल्हापुरातून काढून आपल्याजवळ ठेवून पुन्हा त्यांच्याच नातू सातारच्या गादीवर बसवणारा अजित शत्रू राजा जर कोण असेल तर तो छत्रपती थोरले शाहू महाराज उर्फ दुसरे शिवाजी राजे होय आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन्ही सुनांनी केलेल्या त्याग हे मराठ्यांच्या काही पिढ्यांना मार्गदर्शन करणार आहे
लेख व माहिती संकलित
संतोष झिपरे

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...