विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 29 May 2019

मराठेशाहीतील घोरपडे घराणी भाग 28

मराठेशाहीतील घोरपडे घराणी भाग 28

घो र प डे का प शी क र - सं ता जी घो र प डे. -  ------------------------------4

ताराबाईंचा व घोरपडयांचा जर बिघाड असता तर छत्रपतींकडून असा सरंजाम पिराजीस कधींच मिळाला नसतां हें उघड आहे. या राजपत्रावरून नारो महादेव यांच्या कर्तृत्वाचें अनुमानहि होतें.

सन १६९८ ते १७०५ पर्यंत बेदर, गुलबुर्गे व विजापूर याप्रांतीं घोरपडयांची धामधूम व लुटालूट एकसारखी सुरू होती औरंगझेबाच्यानें घोरपडयांचा बंदोबस्त झाला नाहीं. यावेळीं नारो महादेव यांची तेजस्विता उत्तम रीतीनें प्रकट झालीं. सन १७०७ ता घोरपडयांनीं स्वराज्यांतच कांहीं स्वारी शिकारीं केल्यावरून ताराबाईंचा क्षोभ होऊन त्याचें पारिपत्य करण्याकरितां त्यांनीं त्यांवर धनाजी जाधव यास पाठविलें; तेव्हां घोरपडयानींहि झुलपिकारखान यास मदतीस बोलाविलें. संताजीरावांची व खानाची मैत्री फार दिवसांची होती, सबब त्यानें कुमकेस जाऊन जाधवरावास हुसकून लाविलें. त्यानंतर बहिरजी व त्याचे पुत्र शिदोजी हे संताजीच्या मुलांमाणसांस घेऊन गजेंद्रगडाकडे गेले व तिकडे मोंगलाच्या आश्रयानें त्यांनीं आपली जहागीर वाढविली.
घोरपडयांनीं स्वराज्यातल्या मुलखावर स्वारी केल्याचें वर लिहिलें आहे. त्यांत नारो महादेव यांचें अंग नव्हतें. मोंगलांचें अंकित ह्मणवून घेऊन कर्नाटकांत रहावें ही गोष्ट नारोपंतास मुळींच पडली नाहीं. छत्रपतींच्या पदरीं राहून आपल्या धन्यानें मिळेल त्या भाकरीवर निर्वाह करावा हा त्याचा निर्धार पूर्वीपासून पक्का होतां. यामुळें आतां घोरपडयांची वांटणी होतऊन त्यांच्या कर्तृत्वास भिन्न भिन्न दिशा लागल्या. बहिरजी व शिदोजी हे गजेंद्रगडास राहून मोंगलाईंचें सरदार ह्मणून आपणांस ह्मणवून घेऊं लागले व तिकडे त्यांनीं गुत्ती व गजेंद्रगड वगैरे मुलुख मोंगलांकडून सरंजाम मिळविला; त्यावरून त्यांस गर्जेद्रगडकर हें नांव पडलें. संताजीचीं मुलेमाणसें त्यांजवळ
होतीं परंतु नारोपंतांनीं त्यांशीं तंटा करून ती सर्व मंडळी आपल्या ताब्यांत घेऊन ते कापशीस येऊन राहिले. इतउत्तर पिलाजीराव व त्यांचे वंशज हे मात्र कापशीकर या नांवानेंच प्रसि‍द्धि पावले व त्यांनी छत्रपतींचा आश्रय कधीं सोडिला नाहीं.
नारो महादेव यांनीं हिंमत धरून आपले अल्पवयी धनी पिराजीराव यांच्या नांवें त्यांचीं वडलोपार्जित वतनें छत्रपतींकडून करार करून घेतलीं व आपले अल्पवयी पुत्र व्यंकट
रांव यांची पांचशें स्वारांच्या सरदारींवर नेमणूक करून घेतली ! त्यावेळीं छत्रपतींच्या दरबारांत नारो महादेव यांचें फार वजन होते.
कापशीकर घोरपडयांचा एकंदर सरंजाम सत्तावीस लक्षांचा होता. त्याचा तिसरा हिस्सा (म्हणजे नऊ लक्षांचा) संताजीरावांस मिळालेला होता. परंतु त्यांचे पुत्र पिराजीराव यांच्या ताब्यांत सुमारें पांच लक्ष रूपये उत्पन्नाचा मुलूखच राहिला. इतका मुलुख तरी नारोपंतांच्या मर्दुमकरमुळेंच राहिला. कापशीकर आपल्या पक्षास चिकटून राहिल्यानें राज्याला उपयोग होत आहे हें ताराबाईच्या प्रत्ययास आल्यामुळें त्यांनीं मिरज व पन्हाळा येथील देशमुखी व सरदेशमुखी वतन पुन: पिराजीराव यांजकडे कायम केलें. या वतनाचा सर्व कारभार नारोपंतांनीं पिराजीरावांकडून आपल्या नांवें करून घेतला.

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...