postsaambhar:Satish Kadam
छञपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर (1700 )ताराबाई आणि राजसबाई यांच्यामध्ये गादीसाठी संघर्ष सुरु झाल्याने ताराबाईंनी आपला नातू जन्मताच निधन पावल्याची हूल उठऊन त्याला आपली मुलगी दर्याबाई निंबाजीराव निंबाळकर, पानगाव ता. बार्शी जि. सोलापूर याठिकाणी ठेवले. याकामी त्यांना तुळजापुरचे नारोजी भुते कदम यांनी मोठी मदत केली. 1745 ते 1750 अशी पाच वर्षे नातू रामराजे गुप्तपणे पानगावात वावरले.
दर्याबाईंचे पती निंबाजीराव नाईक निंबाळकर हे महाराणी सईबाईंचे बंधू साबाजींचे वंशज असुन त्यांनी पानगावात 300x300 फुट अष्टकोणी आकारात बांधलेला हत्ती तलाव आजही सुस्थितीत असून दुष्काळातही त्यात मुबलक पाणी आहे.
पुढे छञपती शाहूंचे निधन झाल्यानंतर 1750 ते 1777 पर्यंत छञपती रामराजांनी कारभार केला.यांच्याच काळात 14 जानेवारी 1761ला पानिपतचे युद्ध झाले. काहीकाळ निंबाजीराव निंबाळकर हे स्वराज्याचे सेनापती झाले. पुढे पानगाव पानसेंकडे दिल्याने निंबाळकर घराणे हे वैरागला स्थिरावले. रामराजेंच्या कारभारात दर्याबाईंचा वारंवार उल्लेख येतो. पानगावची वेस आणि हत्ती तलाव पाहिल्यानंतर छञपतींचे वास्तव्य आठवते...dr.satish kadam
दर्याबाईंचे पती निंबाजीराव नाईक निंबाळकर हे महाराणी सईबाईंचे बंधू साबाजींचे वंशज असुन त्यांनी पानगावात 300x300 फुट अष्टकोणी आकारात बांधलेला हत्ती तलाव आजही सुस्थितीत असून दुष्काळातही त्यात मुबलक पाणी आहे.
पुढे छञपती शाहूंचे निधन झाल्यानंतर 1750 ते 1777 पर्यंत छञपती रामराजांनी कारभार केला.यांच्याच काळात 14 जानेवारी 1761ला पानिपतचे युद्ध झाले. काहीकाळ निंबाजीराव निंबाळकर हे स्वराज्याचे सेनापती झाले. पुढे पानगाव पानसेंकडे दिल्याने निंबाळकर घराणे हे वैरागला स्थिरावले. रामराजेंच्या कारभारात दर्याबाईंचा वारंवार उल्लेख येतो. पानगावची वेस आणि हत्ती तलाव पाहिल्यानंतर छञपतींचे वास्तव्य आठवते...dr.satish kadam
No comments:
Post a Comment