विनोद जाधव एक संग्राहक

Friday 7 August 2020

स्वराज्याचे पहिले सरसेनापती माणकोजीराव शिंदे दहातोंडे

 

स्वराज्याचे पहिले सरसेनापती
माणकोजीराव शिंदे दहातोंडे
▪माणकोजी दहातोंडे सुर्यवंशीय क्षत्रिय मराठा.
▪जन्म - (१५९२ - १५९५)
▪मुळगाव – चांदा तालुका – नेवासा जिल्हा – अहमदनगर
▪ सुरूवातीच्या काळात शहाजीराजेंबरोबर निजामशाहीत काम.
▪ मुगलांविरूद्धच्या अनेक लढाईत माणकोजींचा मोठा पराक्रम.
▪शहाजहान व आदिलशहा यांच्या बरोबर झालेल्या तहानंतर माणकोजी व शहाजीराजे विजापुरच्या सेवेत दाखल.
▪विजापुरातच शहाजीराजेंनी माणकोजींना स्वराज्याचा संकल्प सांगितला.
▪स्वराज्याचे पहिले सरसेनापती म्हणून शहाजीराजेंनी माणकोजींची नियुक्ती केली.
▪शिवाजीराजेंच्या मदतीसाठी माणकोजी पुण्यात दाखल.
▪माणकोजी दहातोंडे म्हणजे शहाजीराजेंचा खास जुना व इमानदार माणुस.
▪माणकोजी हे शिवाजी महारांजाचे फक्त सरसेनापतीच नाही तर मार्गदर्शक व गुरूपण होते.
▪माणकोजींच्या अनुभवामुळे व युद्धनितीमुळे स्वराज्याच्या सुरूवातीला शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या.
▪माणकोजी हे गनिमी कावा तज्ञ् म्हणून ओळखले जात.
▪स्वराज्याच्या विस्तारात माणकोजींचे खुप मोठे योगदान.
▪लोहगङ व विसापुरचे किल्ले माणकोजींनी स्वतः जिंकले.
▪पुरंदरचा किल्ला महाराजांनी पहिल्यांदा जिंकला तेव्हा माणकोजी महारांजासोबत होते.
▪१६५६ मध्ये जावळी जिंकली तेव्हा माणकोजी व रघुनाथ बळ्ळाल यांनी रणतोंङीच्या घाटात नाकेबंदी केली होती.
▪१६५७ हे माणकोजींच्या आयुष्यातील महत्त्वाचे वर्ष.
▪१४ मे १६५७ ला युवराज संभाजीराजेंचा जन्म. घरात नातवासमान युवराज जन्माला आल्यामुळे माणकोजींना आनंद.
▪बढती – मार्च १६५९ मध्ये माणकोजींना स्वराज्याचे प्रमुख सल्लागार व युद्धशास्र तज्ञ (Senior Adviser & Warfare Minister) म्हणून नियुक्त करण्यात आले.
▪जिजाबाई व शिवाजीराजेंनी दरबारात खुप मोठा सत्कार केला.
▪राजेंच्या सदरेवर माणकोजींना भारी वजन होते.
▪सईबाईंचे निधन झाले तेव्हा माणकोजींनी जातीने महाराजांचे सांत्वन केले.
▪अफजलखाना विरुद्धच्या लढाईच्या नियोजनामध्ये माणकोजींचा मोठा सहभाग होता.
▪पुन्हा एकदा रणतोंङीचा घाट बंद करण्याचे ठरविले म्हणजे खान व त्याची फौज परत जाता कामा नये.
▪खानाच्या भेटीआधीच्या बैठकीत माणकोजींचे खास मार्गदर्शन.
▪खानाच्या भेटीला जाण्याआधी महाराजांनी माणकोजींचे दर्शन घेतले.
▪खानाला मारुन आल्यानंतर दारातच उभ्या असलेल्या माणकोजींना राजांनी मिठी मारली.
▪खानाच्या वधानंतर शहाजीराजे व माणकोजींची पुण्यात भेट.
▪शहाजीराजेंच्या स्वागताला माणकोजी हजर. खुप दिवसांनी भेट झाल्यामुळे दोघांनाही आनंद.
▪शहाजीराजे , शिवाजीराजे, माणकोजी व जिजाबाई मध्ये स्वराज्याची खाजगीत चर्चा.
▪माणकोजींची तब्येत ढासळते.
▪जिजाबाई स्वतः भेटुन येतात व महाराजांना खबर देतात.
▪महाराज स्वतः शिवापुरला माणकोजींना भेटायला जातात.
▪शेवटच्या घटका मोजत असतांनाही माणकोजींना स्वराज्याचीच काळजी.
▪महाराजांना शायिस्तेखानाचा बंदोबस्त करायला सांगतात.
▪एवढी प्रकृती खालावली असुनही स्वराज्याची चिंता बघुन महाराज गहिवरतात.
▪माणकोजी माँसाहेबांना मुजरा सांगतात.
▪महाराज व माणकोजींची हिच शेवटची भेट.
▪जुलै ते अॉगष्ट दरम्यान १६६२ मध्ये शिवापुर येथे माणकोजींचे निधन.
▪माणकोजींच्या निधनाची बातमी राजांना कळते. लहानपणापासून बघितलेला एक जिव्हाळ्याचा माणूस गेल्याची राजांना खंत.
▪महाराजांनी मोठ्या मानाने माणकोजींचा अंत्यविधि केला.
▪माणकोजी हे दिलदार व मनमिळाऊ स्वभावाचे होते.
▪शहाजीराजे व शिवाजीराजे या दोघांसाठी काम करणारे एकमेव सरसेनापती.
▪शहाजीराजेंसाठी १५ वर्षे तर शिवाजीराजेंसाठी २० वर्षे सेवा.
▪सलग ३५ वर्षे स्वराज्याची सेवा.
▪१६४२ -१६५९ अशी सलग सतरा वर्षे सरसेनापती म्हणून सेवा कराणारे एकमेव सरसेनापती.
▪बाकीचे वर्षे प्रमुख सल्लागार (Senior Adviser) व युद्धशास्त्र तज्ञ (Warfare Minister) म्हणून काम.
▪दोन्ही राजांची मर्जी असल्यामुळे संपत्तीचा मोह व चिंता कधीही नाही.
▪माणकोजींना शेवटच्या श्वासापर्यंत फक्त स्वराज्याचाच ध्यास होता.
▪अधिक माहितीसाठी अवश्य पहा.
स्वराज्याच्या पहिल्या सरसेनापतीला मानाचा मुजरा
#संकलन- The Great Maratha श्रीमंत महादजी शिंदे सरकार

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...