विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 18 April 2021

शिवकालीन जळगाव जिल्हा विषयीचा इतिहास


 शिवकालीन जळगाव जिल्हा विषयीचा इतिहास

शिवाजी महाराजांच्या काळात या गावास जलग्राम असे संबोधित असत. इ.स. १६३७ मध्ये जलग्राम वासी रूद्र भटाचा मुलगा सोम दैवज्ञ याने लिहिलेल्या " पध्दतीभूषण" नामक संस्कृत ग्रंथात या नगरीचे वर्णन केले आहे. सन १८१८ मध्ये ते इंदोरच्या होळकरांकडून ब्रिटीशांच्या ताब्यात आले. सन १८६१-६५ मध्ये अमेरिकेत यादवी युद्धामुळे खानदेशात कापसाला मागणी वाढली आणि जळगाव कापसाची मोठी बाजारपेठ बनली. सन १८७४ मध्ये मुळजी जेठा आणि कंपनीने खानदेश स्पिनिंग आणि लिव्हिंग मिलची स्थापना केली.आणि जळगाव औद्योगिक शहर बनले. पण जळगावच्या सोने सराफ बाजाराचा इतिहास हा दैवज्ञ या शब्दाशी जोडलेला आहे.
अधिक संशोधनाची गरज आहे. हा फक्त सापडलेला पुरावा आहे. अजुन संदर्भासठी स.ना.भालेराव यांनी संपादित केलेले गिरणाई बघावे. वरील संदर्भ: खानदेश गॅझेटियर १९६५.
(दैवज्ञ ब्राह्मण हा बहुतांश पश्चिम किनारपट्टीवर राहणारा हिंदू ब्राह्मण समाज आहे. ही ब्राह्मण पोटजात गोवा, किनाऱ्यावरील कर्नाटक, तसेच किनाऱ्यावरील महाराष्ट्राची निवासी आहे. या क्षेत्रात यांना 'शेठ' म्हटले जाते, जे 'श्रेष्ठ' किंवा 'श्रेष्ठिन्' चा अपभ्रंश आहे. हे लोक मूळचे गोव्यातील असून इस्लामी व पोर्तुगीज आक्रमणांमूळे कर्नाटकात ,महाराष्ट्रात तसेच केरळात स्थायिक झाले.ते कोंकणी तसेच मराठी बोलतात, पौरोहित्य करणारे दैवज्ञ पुरोहित वगळता ईतर मत्स्याहारी असून जवाहिरे आणि सोन्याचा धंदा करतात. त्यांच्यात अत्रि,कौशिक,भारद्वाज,वत्स इ. गोत्रें असून ते प्रामुख्याने शांकरमतानुयायि आहेत तसेच थोडे लोक मध्वानुयायि आहेत.ते आपले पुर्वज शाकद्वीपि मग लोक आहेत असे मानतात. संदर्भ: विकिपीडिया)

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...