!शिवपुत्र शंभूराजे!!










ज्याने वयाच्या अवघ्या बत्तिसाव्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर आपले मस्तक हिंदवी स्वराज्यासाठी दिले .....
पण हिंदवी स्वराज्यातील एकही महत्त्वाची किल्ला अथवा आपल्या आरमारातील एकही जहाज आयुष्यात गमावले नाही. विचारी आक्रमक, कवी, लेखक, राज्यकर्ता, पराक्रमी सेनानी,अशी छत्रपती संभाजी महाराजांचा विविध रूपे.............!!
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांनी, सागर खाडयांनी आणि दुर्लक्षिलेल्या दुर्मिळ कगदापत्रांनी सांगितली या महाराष्ट्राला शिवपुत्र संभाजीराजांनी चित्तथरारक वादळ सत्य वास्तव गाथा !!
जी संशयाच्या धडप्यात ३००शतक गुंडाळून ठेवली होती .....!!







छत्रपती संभाजीराजे--सिद्दी संघर्ष :-जंजिरकर सिद्दी हे कोकणात येऊन मराठी मुलखात लुटालूट करीत व पुरूष, स्त्री व लहान मुलांना कैदी करून अरब राष्ट्रांत गुलाम म्हणून विकत हे यांची उधोग होय..
जंजिराचा सिद्दी हा औरंगजेब बादशहाचा ताबेदार व मुंबईकर इंग्रजांच्या आश्रयाला जाऊन मराठ्यांशी व रायगडास शह देण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या कालखंडातील उधोग आरंभिले हिंदवी स्वराज्य, सुरत व मुंबईकर इंग्रज तसेच गोव्याच्या पोतुगीजांना शह देण्यासाठी मुघल बादशाह औरंगजेबाने सिद्दीस हाताशी धरले कारण मुघलची स्वतःचा आरमार नाहीत, औरंगजेबाने सिद्दीचा आरमार वाढवून त्याच्या करवी संभाजीराजावर चढाई करविली. १६८२मध्ये मुघलांचे संकट हिंदवी स्वराज्यावर आल्याने त्यांचा फायदा सिद्दीने घेतला. त्याने मराठे मुलूख व मराठ्यांचा ठाणी वर हल्ला केला. सिद्दीला धडा शिकविण्यासाठी खुद्द छत्रपती संभाजी महाराजांनी २०,०००हजार फौजेनिशी दंडराजपूरीला वेढा घातला, जंजिरा किल्ला हातात येत आहे असे दिसत असताना मुघलाविरूध्द प्रतिकार करण्यासाठी कुमक व सैन्य पाठवण्याची आवश्यकता लक्षात घेऊन छत्रपती संभाजी महाराजांनी वेढा उठविली 







गादीवर आल्यानंतर संभाजीराजांनी पोर्तुगीज शी सलोख्याचे प्रयत्न केला पण अंजदीव हे बेट पोर्तुगीजांनी शह देण्यासाठी उपयुक्त आहे असे वाटून संभाजीराजांनी याठिकाणी तटबंदी बांधण्याचायोजना सुरु केली पोर्तुगीजांनी ही गोष्ट न रूचल्याने व औरंगजेब बादशहा कुमकच्या सहकार्याने पोर्तुगीजांनी अंजदीव बेट हस्तगत केले व मराठे शी संघर्ष आरंभले तेव्हा पोर्तुगालचे एक जहाज सुरेतस जात असताना चौलजवळ मराठ्यांनी पकडले त्यावरील माल जप्त केला या संदर्भात पोर्तुगीजांनी संभाजीराजांपुढे तक्रार केली औरंगजेब शी हाताशी धरुन असलेल्या या परकीयानां छत्रपती संभाजी महाराजांनी कानपिचक्या दिल्या पण मुघलांच्या सल्लानुसार पोर्तुगीजांनी मराठ्याशी संघर्ष सुरू करून मराठा मुलखात रयतेसा त्रास देणे सुरू केली म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कडील आश्रयाला असलेल्या अरबांनी पोर्तुगीज व्यापारीचे नुकसान आरंभिले व १६८३मध्ये चौल बंदराला वेढा घातला यामुळे उभय पक्षांमध्ये संघर्षाला सुरूवात झाले
छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्व खालीमराठ्यांनी वसई, दमण व गोवा तसेच साष्टी बारदेशात एकाच वेळीस चढाई करून बरीच मुलुख हिंदवी स्वराज्यात आणले या सघर्षचा
आणखीन एक महत्वाची कारण म्हणजे औरंगजेब याचा मुलगा अकबर यास इराणला जाण्यासाठी पोर्तुगीजांनी सहाय्य करावे म्हणून छत्रपती संभाजी महाराज प्रयत्नशील होते परंतु औरंगजेब च्या। दबावामुळे पोर्तुगीजांनी अकबरसाठी मदत केला नाही छत्रपती संभाजी महाराजांचा आक्रमणे रणनिती व मराठ्यांचा शौर्यपुढे पोर्तुगीजांनी पराभवाचा सामना करावा लागले
शिवपुत्र शंभू ची ही पराक्रम सप्तकोटीश्वरच्या शंभुमहादेवास सप्तसिधुंची अभिषेक करुन शांत झाले 







मराठ्यांच्या विरोधात इग्रंजाना जंजिरा कर सिद्दी यास वेळोवेळी मदत केली यावेळेस मुंबईकर इंग्रजांनी विरोधात मुबंई परिसरात मराठ्यांनी हल्ला सुरु केली तेव्हा मुंबईकर इंग्रजांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या दहशत खाल्ले १६८२मध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी प्रल्हाद निराजी यास पाठविले व इंग्रजांनी सिद्दीस मदत करू नये म्हणुन समज दिले छत्रपती संभाजी महाराजांनी घेतलेल्या आक्रमक पवित्रा बघून सुरतकर इंग्रजांनी यावेळेस सिद्दीस सहकार्य करणार नाही असे मान्य केले १६८४ मध्य गव्हर्नर केजवीनने छत्रपती संभाजीराजे शी तह करण्याचे ठरविले उभयतामध्ये तह झाले १६८७मध्ये!! 



विषेशतः नोंद :-------
छत्रपती संभाजी महाराज यांची १)जन्म १४मे १६५७मध्ये पुरंदर किल्लावर राणीसाहेब सईबाईच्या पोटी जन्म झाला. २)दोन वर्षानंतर राणीसाहेब सईबाई वारल्या
३)संभाजीराजे आठ वर्षाचे असताना त्यांनी औरंगजेब बादशहा कडून पंचहजारी मनसब बहाल करण्यात आले
४) २१एप्रिल १६१८० छत्रपती राजाराम महाराजाचे मंचकरोहण
५)१६मे १६८०रायगडावर आगमन
६)२०जुलैला राज्यरोहण
७)१६जानेवारी १६८१रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची राज्याभिषेक
८)१जून १६८१ रोजी औरंगजेब पुत्र अकबराचे संभाजीराजेकडे आश्रय साठी आगमन
९)१३नोव्हेंबर १६८१रोजी छत्रपती संभाजी महाराज व औरंगजेब पुत्र अकबर भेट
१०)डिसेंबर १६८१जंजिरा वर स्वारी
११)१२जानेवारी १६८२ जंजिरा कर सिद्दीशी युध्द
१२)२४नोव्हेंबर १६८२मराठ्यांनी शी रणमस्तखान संघर्ष सुरू करून विजेतेपद
१३)१८१६८२मे महाराणी येसुबाई यास पुत्र नाव शिवाजी ठेवले
१४)१६८३मराठे, आदिलशाही व भागानगरकर कतुबशाही मैत्री शी सुरुवात
१५)१०जून १६८३छत्रपती संभाजी महाराज राजपुरास
१६)१नोव्हेंबरला छत्रपती संभाजी महाराज किल्ला फोंडयास आले
१७)फेब्रुवारी १६८७मध्ये औरंगजेब पुत्र अकबर इराण येथील हणाण कडे रवाना
१८)१फेब्रुवारीला १६८९छत्रपती संभाजी महाराज कैद
१९)९फेब्रुवारीला छत्रपती राजाराम महाराजांची मंचकारोहण महाराणी येसुबाई साहेब यांनी केला
२०)११मार्च छत्रपती संभाजी महाराजाची वढू बुद्रुक येथे बलिदान




राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य पुणे संस्थापक संतोष झिपरे ९०४९७६०८८८
No comments:
Post a Comment