हिमालयाच्या रक्षनार्थ सह्याद्री धावला- श्रीमंत दत्ताजीराव शिंदे
समस्त उत्तर भरता मध्ये दत्ताजीराव यांनी मराठ्यांचा दब दबा निर्माण केला,शिव छत्रपतींचा भगवा चौफेर फड़कविला, हिन्दुस्थान म्हनल की फक्त मराठेच हाच जय घोष निघु लागला
हिन्दुस्थानच कराभार मराठे पाहत,परिकीय क्षत्रुंना मराठेच तोंड देत, आशा वेळी अब्दाली नावाच सावट या भारता वर घुमु लागले प्रचंड सेनाबळ कृर करमी अब्दाली निजीबाच्या अवताना मुळे या देशा वर चालून आला,ही बातमी मिळताच परिकीय सत्ते विरुद्ध मराठे उभे ठाकले..
शिंदयाची तुकडी यमुने काठी बुराडी घाटा वर तळ ठोकुन होती,थोड्याच अंतरावर अब्दालीचा तळ पडला होता,मराठ्यांची फौज तरण्या बांड आयन जवानीत आलेले,मुस मुसत्या रक्ताचा पराक्रमी ज्याच्या तलावरीवर शौर्याचे ५ शिक्के होते ऐसे रणधुरंदर दत्ताजी शिंदेच्या नेतृत्वा खाली दबा धरून होती..
अब्दाली सोबत कुतुब रोहिले पठान अशी बलाढ्य फौज बंदुका तोफ खाना सशक्त शस्त्र,त्यांच्या तोडीस मराठ्यांकड़ें फक्त होत्या सळ सळत्या नंग्या तलवारी,लाख भर अफगाना विरुद्ध मुठ भर मराठे उभे होते..
१० जानेवारी १७६० रोजी सूर्यदयाला यूमेनेच्या काठी अब्दालीचा सेना सागर दिल्ली कड़े सरसावत होता
जनाराव वाबले सैन्यास चेतवू लागले चला उठा रे या माय भुमीचे ऋण फेडायची वेळ आली.. बोला हर हर महादेव जय भवानी मराठ्यांच्या सैन्यात चिव चढु लागला..
अब्दाली येवून ठेपला ही खबर लगताच दत्ताजी शिंद्याच्या अंगातुन विज सळ सळु लागली हाताची मुठ्या आवळत दत्ताजीराव दात वट खावून तळपती तलवार हाती उचली,आपल्या सैन्य तुकडीचे तीन भाग करुण लालमनी वर स्वार झाले., आपल्या सैन्यास प्रोत्साहित करुंन क्षणात गलीचा वर तूटुन पडले
एकच कापा कापी सुरु झाली हर हर महादेवचा नारा घुमा लागला,मराठ्यांच्या पहिल्याच तडाख्यात अफगानी फळी कापून निघाली,तसा मराठ्यांना चिव येऊ लागला गनिमास यमुने पार मराठे रेटू लागले,स्वराज्याची प्रेरणा घेऊन मराठे जीवाची पराकाष्ठा करत दत्ताजीरावांच्या सामावेत लढत होते पण सशक्त शस्त्रा पुढे व लाख गनिमा पुढे मराठ्यांचे सैन बंदूकिने टिपले, दत्ताजी,जनाराव,तानाजीराव, जनकोजी बाबा अफगानी सैन्यावर तलवार घेऊन झेपवत होते
इतक्यातच दत्ताजीरावांना खबर आली जनकोजी बाबा पडले,दत्ताजींच्या डोळ्यात लव्हा झळकु लागला,लाल बूंद डोळे झाले,जनकोजी बाबाच्या जान्याच्या बातमीने ते गनिमाच्या सैन्यावर तटून पडले तलवारीच्या घावत रक्ताच्या चीळकांडया उडवू लागल्या,वाटेत येणाऱ्या अफगानावर तूटुन पडले,समशेरीच्या दनक्या सरशी अफगानी माकडांची मुंडकी उडवू लागले,सपासप बरगडीत तलावरी घुसवु लागले..
इतक्यात अचानक जंम्बूर्याच्या गोळा धड़धडत येऊन दत्ताजींना छेदुन गेला,दत्ताजी जमीनीवर कोसळले, नजीब अन कुतुबशहाला हे दृश्य पहताच आकाश ठेंगने झाले, दोन्ही सैतानासारखे दत्ताजींकड़े धावले
दत्ताजी तळमळत असलेले पाहुन कुतुबाने दत्ताजींच्या मानेवर तलवार ठेवून म्हनला...!!
"बोलो पटेल.....और लढोगे?"
हे आयकताच दत्ताजीरावांनी आपली सर्व शक्ति एकवटुन वाघा सारखी डरकाळी फोड़ली...
"क्यों नही? बचेंगे तो और भी लढ़ेंगे
ही वाघाची डरकाळी कानावर पड़ताच,नजीबाने दत्ताजी वीराची मान धडा वेगळी केली, दत्ताजींच मुंडके भाल्याला लावून सैन्यात थैय मान घालु लागला....
दत्ताजींचा देह हळुहळु रक्ताने पूर्ण पने माखाला व माय भूमिस आपल्या रक्ताने अभिषेक घातला
पोटला अन्न नाही जनावरांना दाणागोटा नाही..लढायला शस्त्र नाही.तोफखान्याला दारूगोळा नाही.तरीही मराठे लढले प्राणपणे लढले तळहातावर शिर घेऊन लढले..अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गनिमाच्या नरडीचा घोट घेण्यासाठी पानिपतच्या समरभुमीवर उतरलेल्या दत्ताजी शिंदे आणि मराठा सैन्याच्या अजोड पराक्रमाला आणि देशभक्तीला आजही जगाच्या इतिहासात तोड नाही.
त्यारात्री अफगानांनी एकच कापा कापी केली, घावेल त्या मराठ्याची कत्तल केली, मराठ्यांच्या सैन्यानी ही पहिलीच पहिलेली क्रूर दिवस रात्र
उरलेल्या सातीदारांनी अंधाराचा फायदा घेत दत्ताजीरावांचा देह उचलून आणला सोबतालच्या लाकडाच सरन रचले माणेच्या नलीके मधून डोळ्यातील असाव पाडत दत्ताजींना पानी पाजत होते,त्यातच बाटव्यातुन सुपारी आन पान काढून नलीके मध्ये ठवेले व अग्नि दिला...
कृष्णे काठी बगड़नारा राणोजीरावांचा पुत्र शिंदे दौलतीचा कोहिनूर हीरा आज यमुनेच्या काठा वर बिना शिराचा धड़ा धड़ा जळत होता
शिव छत्रपतींनी उभरलेल्या स्वराज्य रक्षणार्थ आपल्या प्राणाची आहुति देण्यारा या वीरास त्रिवार मानाचा मुजरा
देश रक्षण्या हिमालयाच्या मदतीला
सह्याद्री धवला
राणोजीरावांचा पुत्र
बिना धडाचा लढला
No comments:
Post a Comment