विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 15 May 2021

मराठा साम्राज्य भाग ३

 



मराठा साम्राज्य
भाग ३
महाराष्ट्रातील विखुरलेला मराठा एकतेच्या सूत्रात गुंफावा आणि भूमिपुत्रांनी स्वराज्य निर्माण करावे या हेतूने शहाजीराजे जिजामाता यांनी शिवरायांचे आठ विवाह केले.
तसेच मोरे, घोरपडे यांसारखे जे स्वराज्याच्या आड येत होते, प्रसंगी त्यांचा काटा काढण्यासही शिवाजी महाराजांनी मागेपुढे पाहिले नाही.
मराठ्यांची परंपरा आणि इतिहास हा असा उज्वल आहे. यदुनाथ सरकार यांनी मराठ्यांची भारतीय इतिहासांतील कामगिरी समर्पक शब्दांत व्यक्त केली आहे.ते म्हणतात, आजच्या भारतात त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे मराठ्यांना एक अनन्यसाधारण असे स्थान प्राप्त झाले आहे.त्यांच्या अगदी नजीकच्या पूर्वजांनी अनेक समरांगणावर आपले देह अर्पण केले आहेत.त्यांनी सेनापतीपदे भूषविले, राजनैतिक क्षेत्रात भाग घेतला, मराठा साम्राज्याच्या समस्यांशी सामना केला आणि स्मृतीआड न झालेल्या नजीकच्या काळातील भारताच्या इतिहासाच्या घडणीस हातभार लावला.या सर्व गोष्टींच्या स्मृती म्हणजे या जमातीचा अमूल्य ठेवा.
परंतु केवळ मराठ्यांच्या योगदानावर स्वराज्य निर्माण झालं नव्हतं. शिवरायांनी मावळ, कोकण आणि देश या प्रदेशातील लोकांच्या समोर स्वराज्याचे, महाराष्ट्र धर्माचे ध्येय समोर ठेवून त्यांना संघटित केले. सर्वधर्मसमभावाचे तत्व आचरून सर्व धर्म- पंथांना, अठरा पगड जातींना आपल्या राज्यांत सामावून घेतले.
खऱ्या अर्थाने जाणता राजा असलेले शिवशाहीला राज्यातील सर्व लोकांच्या कल्याणाचा ध्यास होता आणि उत्तम शासन हे लोकहिताचे माध्यम होते. त्यांचे हे विचार व धोरणसूत्र त्यांच्या मुद्रेत आहेत.
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते
ही मुद्रा भद्राय म्हणजेच लोकांच्या कल्याणासाठी आहे.महाराजांनी जर फक्त हिंदू धर्मीय लोक अभिप्रेत असते तर त्यांनी धर्माय राजते असे म्हटले असते.

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...