चिक्कदेवराय आणि संभाजी महाराज
पोस्तसांभार ::आशिष माळी
म्हैसूर चे शासक चिक्कदेवराय वडियार (म्हैसूर चे 14 वे शासक) याना संभाजी महाराजांनी मारले नाही.
मराठा साम्राज्याच्या झालेल्या एका चुकीमुळे आज म्हैसूरचे राज्य दिमाखात उभे आहे. ती चूक केलेली शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाने म्हणजे व्यंकोजीने . त्याने चिक्कदेवरायला केवळ ३ लाखा साठी बंगलोर विकले होते . (त्या वेळचे )
चिक्कदेवराय हा डोद्दा देव राजाचा मुलगा. इसवीसन १६४५ साली त्याचा जन्म झाला आणि वयाच्या २८ व्यावर्षी म्हणजे इ.स. १६७३ साली तो गादीवर बसला. त्याने माद्देगिरी जिंकून आपल्या सीमा शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी (बंगलोर) च्या सीमेपर्यंत नेल्या .
पण कर्नाटक मध्ये आज पर्यंत हा चिक्क देवराया प्रसिद्ध आहे तोे त्याच्या विचित्र कर प्रणाली साठी. त्याने सैनिक सोडून सर्व लोकांवर जबरदस्त कर लावले. त्यामुळे म्हैसूर चा जंगम (लिंगायत् मध्ये शिव पुजारी) समाज खवळला."बसवण्णाने (बसवेश्वर) जमीन दिली, इंद्राने पाऊस दिला मग आम्ही या राजाला पैसे का देऊ ?" अशा घोषणा देत त्यांनी राजा विरुद्ध आंदोलन केले.
या वेळी चिक्कदेवरायाने १००० जंगम लोकांना जेवायला बोलावले. प्रत्येकाला भेटवस्तू दिली आणि एक अरुंद बोळक्यातून तो त्यांना बाहेर पाठवत होता. त्यावेळी त्याने बोळक्यात अंगरक्षक ठेवले होते. एकीकडून अंगरक्षकांनी या जंगम लोकांना चेंगरले आणि दुसरीकडून सैन्याने चेंगरले. अशा रीतीने त्याने १००० जंगमांची हत्या केली. त्यानंतर ते आंदोलन बंद झाले.
त्यांनी व्यंकोजीकडून बंगलोर प्रांत हा फक्त 3 लाख रुपयांना विकत घेतला. व्यंकोजीला आपली राजधानी तंजवारला हलवायची होती आणि आर्थिक दृष्ट्या तो कमजोर पण झाला होता. त्यावेळी कासीमखानने बंगलोरवर हल्ला केला. मोंघलांशी खास सख्य असलेल्या चिक्कदेवराय ला व्यंकोजीने बंगलोर विकले.
इ.स. १६८० ला औरंगझेब दख्खन मध्ये घुसला त्याने कर्नाटक चा खूप भाग काबीज केला विजपुरची आदिलशाहि संपवली . पण चिक्कदेवरायाने आधीपासूनच औरंगजेबाशी संधान साधले होते. औरंगजेबाशी संधान साधायला त्याने त्यावेळी कासीम खान या मोगलांच्या मुख्य सरदाराची मदत घेतली होती .
इ.स. १६८१ च्या उत्तरार्धात मोगलांचे दक्षिण भारतातील आक्रमण रोखण्यासाठी संभाजी राजांनी हरजीराजे महाडिक या मातब्बर मराठी सरदारास २०००० सेना घेऊन दक्षिणेकडे रवाना केले. दक्षिणेतील सरदार औरंगजेबा ला सामील होवू नये यासाठी संभाजी राजांनी मैसूर च्या चिक्कदेव राजाशी मैत्रीचा प्रयत्न केला होता.पण त्या चिक्कदेव ने मराठ्यांच्या काकडे काटकर सरदारांची कत्तल करून त्यांची मुंडकी श्रीरंगपट्टणम च्या वेशीवर टांगली होती.चिक्कदेवराय याने वरकरणी मराठ्यांशी मैत्री दाखवून आतून बादशाहाशी संधान साधले होतेे. दक्षिणेकडे ३२० किलोमीटर धडक मारून मदुराई ताब्यात घेतले. त्यामुळे तंजावर व पश्चिमेकडील त्रिचनापल्ली आणि पूर्वेकडील नेगापट्ट हि मराठी स्थानके धोक्यात आली. चिक्कदेवराय व मोगल यांची युती मोडून काढणे आवश्यक असल्यामुळे तीस हजाराचे घोडदळ बरोबर घेवून संभाजीराजे स्वतः सातारा, मिरज, धारवाड या मार्गाने चिकमंगरूळ कडे रवाना झाले. म्हैसूरवर हल्ला करण्याच्या दृष्टीने चिक्कदेवरायचा शत्रू मदुराईचा नायक याच्याशी लष्करी करार करून व तंजावरच्या एकोजी राजांच्या तुकड्या घेवून १६८३ च्या जानेवारीत संभाजी राजांनी म्हैसूर च्या पूर्वेस धर्मपुरी येथे आपली छावणी प्रस्थापित केली. ऑक्टोबर १६८३ मध्ये संभाजी राजांनी त्रिचनापल्ली कडे जाऊन मदुराईचा कब्जा घेतला. व तेथून पूर्वेकडे वळून मद्रासच्या दक्षिणेस असलेल्या मायावरम व पोर्टोनोब्से येथे मराठी अंमल बसविला. पण त्यात मराठ्यांचा पराभव झाला. त्यांच्याशी शस्त्रसंधी करून मध्य महाराष्ट्रात होणाऱ्या मोगली आक्रमणाला थोपविण्यासाठी राजे रायगडला परतले.
पुढे संभाजी महाराज यांची हत्या झाल्यावर, संताजी धनाजी यांनी कर्नाटकात धुमाकूळ घातला.त्यावेळी तटस्थ राहण्याची भूमिका घेतलीन पन अंतस्थ तो मुघलांना मदत करत होता.पण संताजी घोरपडे ने कासीम खान ला संपवले. तो पर्यंत चिक्कदेवराय ने सालेम आणि बारामहाल हे भाग स्वतःच्या राज्याला जोडून घेतले.मराठ्यांना मदत करणाऱ्या मदुराई च्या नायक ला हरवले.त्रिचनापल्ली ओण स्वतःच्या राज्याला जोडले.देवराय ने कासीम खान मरण पावल्यामुळे वकील पाठवला , तेंव्हा खुश होऊन औरंगझेब ने फिरंगी तलवार दिली अन त्याला जुग देवो राज हि पदवी दिली .
संदर्भ
.2औरंगजेब | Sambhaji Maharaj
३]How the Mughals sold Bengaluru for Rs 3 lakh 330 years ago

No comments:
Post a Comment