जव्हारचे आदिवासी राज्य
सदाशिव टेटविलकर
ठाण्यावर शिलाहार राजांनी ४५० वर्षे राज्य केले, पण शिलाहारांचा राजवाडा वा त्याचे अवशेष कुठे पाहण्यात नाही, किंबहुना त्याआधी आणि त्यानंतर इथे अनेक राजवटी नांदल्या, त्यांचेही राजवाडे वा वाडे कुठे दिसत नाहीत. पण मध्ययुगात ठाणे जिल्ह्याच्या उत्तर पूर्वेला चहूबाजूने घनदाट जंगलाने वेढलेल्या उंच पठारावर एका आदिवासी राजाचे राज्य होते. हा पठारी भाग म्हणजे जव्हार होय. या जव्हारला जुना आणि नवा राजवाडा आहे. ठाणे जिल्ह्यातील राजघराण्यांपैकी हा एकुलता एक राजवाडा मोठ्या दिमाखात उभा आहे.
जव्हार हे शहर समुद्रसपाटीपासून दीड हजार फूट उंचीवर असून थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. चहूबाजूने तुटलेले कडे, दऱ्याखोरी, त्यात वाढलेले गच्च जंगल आणि दरीत कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे असा नयनरम्य सृष्टीसोहळा पाहण्यास विशेषतः वर्षा ऋतूत अनेक पर्यटक दूरवरून येथे येतात. जव्हार म्हणजे जुने संस्थानिकाचे राज्य 'महिकावतीची बखर' यामध्ये जी ग्रामनावे येतात त्यात जव्हारचा उल्लेख 'यवसाहार प्रेक्षादिगण' असा केला आहे. येथे कातकरी आणि डोंगर कोळी लोकांची मूळ वस्ती आहे. जव्हारला आदिवासी राज्य कसे स्थापन झाले, याबद्दल दोन मतप्रवाह आहेत.
जव्हार संस्थान इ. स. १३४३ मध्ये 'जयबा' नावाच्या मूळ पुरुषाने स्थापन केले. या मूळ पुरुषाचे पूर्वज राजस्थानमधून नाशिकजवळ पिंपेरा गावी स्थायिक झालेले. रजपुतांच्या चालीरीतीचे पालन करणारे क्षत्रिय कुटुंब होते, अशी माहिती संस्थानचे शेवटचे राजे यशवंतराव मार्तंडराव मुकणे यांनी सन १९७०मध्ये 'जयबा' नावाच्या इंग्रजी पुस्तकात दिली आहे. त्यात मूळ संस्थापकाने राज्य कसे स्थापन केले, याचे रसभरीत वर्णन करून इतिहास लिहिला आहे. जयबाने मोगलांच्या महाराष्ट्रात स्थिर होत असलेल्या सत्तेच्या जुलूमाविरुद्ध बंड करून इ. स. १३४३ मध्ये जव्हारचे स्वतंत्र राज्य स्थापले. याला ऐतिहासिक पुरावा वा सनद उपलब्ध नाही. शिवाय मोगल घराण्याची स्थापना दिल्लीत १५२६मध्ये झालेली आहे. ठाणे गॅझेटियरमध्ये खालील माहिती आहे.
जव्हार हे शहर समुद्रसपाटीपासून दीड हजार फूट उंचीवर असून थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. चहूबाजूने तुटलेले कडे, दऱ्याखोरी, त्यात वाढलेले गच्च जंगल आणि दरीत कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे असा नयनरम्य सृष्टीसोहळा पाहण्यास विशेषतः वर्षा ऋतूत अनेक पर्यटक दूरवरून येथे येतात. जव्हार म्हणजे जुने संस्थानिकाचे राज्य 'महिकावतीची बखर' यामध्ये जी ग्रामनावे येतात त्यात जव्हारचा उल्लेख 'यवसाहार प्रेक्षादिगण' असा केला आहे. येथे कातकरी आणि डोंगर कोळी लोकांची मूळ वस्ती आहे. जव्हारला आदिवासी राज्य कसे स्थापन झाले, याबद्दल दोन मतप्रवाह आहेत.
जव्हार संस्थान इ. स. १३४३ मध्ये 'जयबा' नावाच्या मूळ पुरुषाने स्थापन केले. या मूळ पुरुषाचे पूर्वज राजस्थानमधून नाशिकजवळ पिंपेरा गावी स्थायिक झालेले. रजपुतांच्या चालीरीतीचे पालन करणारे क्षत्रिय कुटुंब होते, अशी माहिती संस्थानचे शेवटचे राजे यशवंतराव मार्तंडराव मुकणे यांनी सन १९७०मध्ये 'जयबा' नावाच्या इंग्रजी पुस्तकात दिली आहे. त्यात मूळ संस्थापकाने राज्य कसे स्थापन केले, याचे रसभरीत वर्णन करून इतिहास लिहिला आहे. जयबाने मोगलांच्या महाराष्ट्रात स्थिर होत असलेल्या सत्तेच्या जुलूमाविरुद्ध बंड करून इ. स. १३४३ मध्ये जव्हारचे स्वतंत्र राज्य स्थापले. याला ऐतिहासिक पुरावा वा सनद उपलब्ध नाही. शिवाय मोगल घराण्याची स्थापना दिल्लीत १५२६मध्ये झालेली आहे. ठाणे गॅझेटियरमध्ये खालील माहिती आहे.
No comments:
Post a Comment