विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 25 September 2024

२४ सप्टेंबर १६९०... #ह्याला_म्हणत्यात_मराठी_बाणा

 


२४ सप्टेंबर १६९०... #ह्याला_म्हणत्यात_मराठी_बाणा 🚩

मावळ्यांच्या भीम पराक्रमामुळे ही गोष्ट साधता आली म्हणूनच १६८९ ते १६९१ पर्यंत जो मोगल मराठा संघर्ष चालू होता त्यात संपूर्ण मराठी रयतेस एक गोष्ट मनोमन उमजली की, मराठी राज्य आता बुडत नाही, औरंगजेब बादशाहाला-मोगलांना जाऊन मिळालेल्या मराठी सरदारांना देखील असेच काही उमगले असावे म्हणूनच नेमाजी शिंदे, माणकोजी पांढरे, नागोजी माने यांसारखे मराठे सरदार पुन्हा स्वराज्यात आले अखिल मराठी जनतेत आता एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला होता...

या सुमारास महाराष्ट्रात एक प्रकारे नवचैतन्याचे वारे वाहत होते याचे दर्शन घडविणारे एक महत्वाचे पत्र उपलब्ध आहे हे पत्र मावळ प्रांताचा सुभेदार... महादजी शामराज या मराठा अधिकाऱ्याने तर्फ मुठे खोऱ्याच्या हवालदारास लिहिले आहे २४ सप्टेंबर १६९० :

त्यात महादजी म्हणतात...,
“मोगलाची धामधूम आपल्या राज्यात आजी तीस वर्षे होत आहे यामुळे मुलुख वैराण जाला.. मुलखात मोगलाईचा अमल चालिला.. हली श्रीकृपेने आपल्या राज्याचा मामला थाटात चालला आहे....”

रायगड नोव्हेंबर १६८९ मध्ये मोगलांच्या हाती पडला तेव्हा आकाश कोसळल्यासारखी मराठ्यांची स्थिती झाली होती आणि अवघ्या वर्षभराने म्हणजे सप्टेंबर १६९० मध्ये मराठे मोठ्या आत्मविश्वासाने म्हणत होते की, ‘श्रीकृपेने राज्याचा मामला थाटात चालला आहे....’

इतिहासकार : डॉ.जयसिंगराव पवार..
(संदर्भ. सेनापती संताजी घोरपडे )
――――――――――――
📷 @gadwat_official 👌🏼♥️🔥
.
#marathaempire #chhatrapati
#raigad #chhatrapatishivajimaharaj
#rajdhaniraigad #gadkille #maharashtra
#रायगड #रायगडाची_श्रीमंती #photography

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...