बलाढ्य मुघल बादशाहस धड़की भरवनारा मराठा सेनापती म्हणजे संताजी आणि धनाजी..!!
पोस्तसांभार :आशिष माळी
संताजी आणि धनाजी यांना पाहून मोगल सैनिक घाबरत असे आणि आपल्या घोड्याला टाच देऊन पळून जात असे अश्या अर्थाचे विधान आहे. आणि ते संपूर्ण सत्य आहे . मुघल इतिहासकार, परदेशी पत्रे आणि मराठी इतिहासकार यांनी त्याकाळी याविषयी खुप लिहलेले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचे क्रूर हत्ये नंतर (मार्च1689 ) लयाला जाणारे मराठ्यांचे राज्य मे 1690 पर्यंत राजगडापासून पन्हाळ्यापर्यंत पुन्हा जोर धरु लागले होते,आणि यासाठी संताजी-धनाजी या जोड़गोळीने आपले सर्वस्व उधळले होते.यांच्या विशेषतः संताजी घोरपडे च प्रसिद्ध लढाई यामध्ये किमान 10 मुघल सरदार मारले गेले किंवा पराभूत झाले.
1. सातारच्या लढाईत सर्जाखान
2. रायबाग हुक्केरीचा लढाईत जाननिस्सारखान,तहव्वुरखान
3. कांजीवरम च लढाईत अलीमर्दनी खान,
4.जिंजी च लढाईत झुल्फिकार खान
5.दोड्डेरी च लढाईत खानजादा खान आणि कासिम खान
6.बसवपटणं च लढाईत हमिनिदुईन खान, हिम्मत खान , सफशिखन खान, रुस्तम खान
7. खटाव सातारा जवळ ,लुत्फुल्लाखान
8. कोल्हापूर जवळ मुकर्रखान खान आणि इनायत खान
,यांसारख्या कितीतरी बलाढ्य सेनापतींचा पराभव करुन आपली घोडी संताजी आणि धनाजी चौफेर उधळत होता.[1]
खानदेशापासून जिंजीपर्यंतचे विस्तृत मैदानी युद्धक्षेत्र या दोघांच्या पराक्रमा ने गाजले होते आणि त्याचा दहशतीचा पुरेपूर वापर संताजी धनाजी यांनी केला नसता तर आश्चर्यच . धनाजी जाधव ने गुजरात पार करून भरूच वैगेरे इथे मुघल वर विजय मिळवला. नर्मदा क्षेत्रात आणि पुणे ते खानदेश मध्ये मुघाल वर अनेक हल्ले करून उत्तरेत दबाव निर्माण केला.
बुरहानपुरच्या मुघली सुभेदाराला बादशाहकडून बांगड्यांचा आहेर मिळाला,तो या दोघांनी गाजवलेल्या पराक्रमामुळे..मराठ्यांपेक्षा मुघलांचे सैन्य जास्त असूनही त्या सुभेदाराला पराभवाचे तोंड पहावे लागले होते..
जेव्हा राजाराम महाराज हे झुल्फिकार खानासोबत जिंजीच्या किल्ल्यावर मुरब्बी राजकारण करत होते,तेव्हा संताजी धनाजी साऱ्या दख्खन मध्ये आपली तलवार गाजवत हिंडत होता..!!
दोड्डेरी म्हणजे संताजीच्या लढाईचा परमोच्च कळस..छत्रपती शिवराय यांच्यानंतर त्याकाळात मराठ्यांच्या युद्धकलेमधे क्रांतिकारी बदल करण्याचा मान संताजी घोरपडे यांचाच..!!
No comments:
Post a Comment