फर्जंद शहाजी राजे
भाग ४
महाराज साहेब फक्त प्रदेश जिंकत राहिले नाहीत तर त्यांनी दक्षिण भारतात आपले राजकीय संबंध इतके मजबूत करून घेतले की शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, संताजी धनाजी ,ताराबाई , या मराठ्यांच्या पुढच्या पिढीला ते पावलोपावली मदातीलच आले.
शहाजी महाराज यांचे काल आणि कर्तृत्व पाहताना एक गोष्ट मात्र नक्की दृष्टीआड करता येत नाही ती म्हणजे त्यांचे दोन कर्तृत्ववान पुत्र, एक संभाजी महाराज आणि दुसरे शिवाजी महाराज. दोघेही एकमेकांपेक्षा पराक्रमी आणि सरस. राजाधिराज संभाजीराजे म्हणजे महाराज साहेब शहाजीराजे यांची प्रतिकृती होय. . महाराज साहेब शहाजीराजे यांनी आपले दोन्ही पुत्र इतके कर्तृत्ववान आणि मुत्सद्दी घडवले की नियतीला ही त्याचा हेवा वाटावा. आणि कदाचित त्यामुळेच कि काय नियतीने महाराज साहेबा पासून संभाजी महाराजांना वेगळं केलं. कनकगिरीच्या एका लढाईत थोरले संभाजी महाराज धारातीर्थी पडले. एक पिता आपली स्वप्न आपल्या पुत्रामध्ये बघत असतो. महाराज साहेबांनीही आपली स्वप्न संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांमध्ये बघितली असतील यात शंका नाही. स्वतःचा पराक्रमी पुत्र गमावल्यावर त्या महान पुरुषाला काय यातना झाल्या असतील हे त्यांचे त्यांनाच माहीत.
त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच होदीगेरे या ठिकाणी शिकार करत असताना महाराज साहेबांच्या घोड्याचा पाय एका विवरात अडकला आणि महाराज साहेब घोड्याच्या रिकिबीत पाय अडकून फरफटले गेले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
शहाजीराजे यांच्या मृत्यूने स्वराज्याला फार मोठा धक्का बसला आणि स्वराज्या बरोबरच दक्षिण भारताचाही फार मोठा आधार नाहीसा झाला होता. नंतरच्या पुढच्या पिढीनी व्यंकोजी राजे, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, शाहू महाराज ही स्वराज्याची आधार श्रंखला महाराज साहेबांना कधीच विसरली नाही. कारण शहाजीराजे केवळ त्यांचे पूर्वज च नव्हते तर उभे राहिलेल्या स्वराज्यरुपी वटवृक्षाचे मुळाधार शहाजीराजे होते. छत्रपती शाहू महाराज म्हणजे शहाजीराजांचा पणतू ने आपल्या पणाजोबंचे स्वप्न पूर्ण केले.
होदिगेरे या छोट्याशा खेड्यात संधी रुपात घेणारा हा राष्ट्रपुरुष आमच्या हृदयात कायम मराठा साम्राज्याचे प्रतीक रुपाने जिवंत राहील.
शहाजी महाराज माहिती जेधे करीना
मराठ्यांची बखर ग्रँड duff.
No comments:
Post a Comment