विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 15 January 2023

श्रीमंत सरदार महादजी शिंदे वाडा- कण्हेरखेड

श्रीमंत सरदार महादजी शिंदे वाडा- कण्हेरखेड
पोस्तसंभार ::पे पृथ्वीराज माने सरकार 










सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील कण्हेरखेड गावात श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांचा भव्य वाडा आहे आणि पानिपतच्या तिसऱ्या युद्धात वीरमरण पत्करलेल्या सोळा शिंदे वीरांच्या स्मरणार्थ उभारलेले सोळा खांबी स्मारक आहे. गावात सरदार दौलतराव शिंदेंच्या पत्नी बायजाबाई यांची समाधी म्हणजे छत्री आहे, कन्हेश्वराचे सुंदर मंदिर आहे. महादजींनी वाड्याचे बांधकाम सुरू केले पण पानिपतचे युद्ध सुरू झाले आणि ते अर्धवट राहिले. त्यांना वाडा असा बांधायचा होता की त्यावर फडकणारा भगवा थेट सातारच्या राजवाड्यातून दिसला पाहिजे. कण्हेरखेड रहिमतपूरजवळ आहे. सातारापासून साधारण ३० कि.मी अंतरावर आहे.
नेसरीच्या रणमैदानात सरनौबत प्रतापराव गुजरांसोबत , असामान्य शौर्य गाजवणारे सरदार विठोजी शिंदे यांचे सुपुत्र जनकोजी शिंदे. जनकोजींचे सुपुत्र राणोजी यांनी कण्हेरखेड येथे शिंदे घराण्याची स्थापना केली. पानिपतच्या युद्धात फक्त राणोजींचे पुत्र महादजी शिंदे जिवंत राहिले पुढे त्यांनी पुन्हा मराठा साम्राज्याला उभारी दिली व साम्राज्य वाढविले. त्यांनी ग्वाल्हेरला शिंदे घराण्याची स्थापना केली.
सरदार महादजी शिंदे यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासूनच रणांगणावर आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली होती. इ.स. १७४० च्या निजामाविरुद्धच्या लढाईत त्यांनी सरदार दत्ताजी शिंदे व त्रिंबक किन्नड यांना साथ दिली होती. इ.स.१७४२ मध्ये बेळूरच्या लढाईत महादजींनी भाग घेतला होता या लढाईत मराठ्यांनी निझामच्या सैन्याला परतावून लावले होते.
इ.स.१७४५ ते इ.स.१७६१ च्या दरम्यान जो मराठ्यांचा स्वराज्य विस्तारातील सुवर्णकाळ मानला जातो. त्या काळात महादजी शिंदे यांनी जवळपास ५० लढायांचे नेतृत्व/ सहभाग घेतला होता. महादजींच्या महत्त्वाच्या लढाया म्हणजे चंद्रावती गंज इ.स.१७४६, फतेहाबाद इ.स.१७४६. मल्हाराव होळकरांच्या साथीने सरदार महादजी शिंदे यांनी अनेक राजपूत संस्थाने मराठासाम्राज्याखाली आणली. रतनगढ, लालगढ, बिकानेर, लासवारी, लाखमगढ, कुंभेर, डीग ही राजपूत संस्थाने मराठा साम्राज्याला जोडली गेली. तसेच जोधपूर व जयपूर ह्या मोठ्या राजपूत राज्यांनी मराठा वर्चस्व मान्य करून टाकले. मथुरा हे मुघल सत्तेखाली होते ते मराठा अखत्यारीत आणून त्यांनी तेथील काही हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला. इ.स जानेवारी १७५८ मध्ये महादजी यांनी ग्वाल्हेर येथे शिंद्यांचे राज्य बनवले.
पानिपतच्या युद्धात शिंदेंचे बलिदान म्हणजे न विसरण्यासारखी घटना त्यातील १६ वीरांची नावे पुढीलप्रमाणे
०१.जय्यापाराव शिंदे ०२.दत्ताजी शिंदे ०३.तुकोजी शिंदे ०४.ज्योतिबा शिंदे ०५.जनकोजी शिंदे ०६.साबाजी शिंदे ०७.बयाजी शिंदे ०८.धारराव शिंदे ०९.येसाजी शिंदे १०.जीवाजी शिंदे ११.संभाजी शिंदे १२.हणमंतराव शिंदे १३.फिरंगोजी शिंदे १४.मानाजी शिंदे १५.रवलोजी शिंदे १६.आनंदराव शिंदे

 

No comments:

Post a Comment

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...