("अनामवीरा", म्हणजे ज्या वीराच नाव घेतलं जात नाही.
अनेकांना प्रसिद्धी मिळते, गरज नसताना इतिहासात
जागा मिळते. आणि काही जन खूप थोर कार्य करतात पण
त्यांची दखलही घेतली जात नाही. असंच काहीस झाल
दडपला गेला...
मी जेव्हा हि कुसुमाग्रजांची कविता वाचतो तेव्हा तेव्हा शंभू
राजांचेच चित्र उभे राहते...)
अनामवीरा, जिथे जाहला तुझा जीवनांत
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात
धगधगता समराच्या ज्वाला या देशासाठी
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी
मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा
जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव
जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान
सफल जाहले तुझेच हे रे तुझे बलिदान
काळोखातूनी विजयाचा हे पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्यूंजय वीरा

No comments:
Post a Comment