विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 27 August 2024

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

 


चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले🚩🚩
चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व प्रतिष्ठीत दक्षिण ,द्रविड भारतातील आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ साम्राज्य होते . चोल साम्राज्याचा राज्यविस्तार दक्षिणेकडे श्रीलंका , मालदीव ,जावा ,सुमात्रा ,इंडोनेशिया इथपर्यंत झाला होता .पराक्रमी सागरी मोहिमा कडून हिंद महासागर भारताच्या दक्षिण दिशेकडील द्वीप , बेट ,भूभाग ,राज्ये ,देश चोळ राजांनी पादाक्रांत केला होता . इसवी सन च्या १३ व्या शतकापर्यंतचा काळ चोळ साम्राज्याचा परमोत्कार्षाचा काळ होता .
चोला साम्राज्य सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील सरलस्कर शहाजीराजे यांनी जिंकून ताबा मिळवला व एक मरहट्टा प्राचीन चोळ साम्राज्याच्या रक्तावर बसला ही गोष्ट काही सामान्य नाही इतिहासाचे मांडणी करताना परिघाच्या बाहेर जाऊन करावे लागते आणि भोसल्यांचा इतिहास मांडताना सुसंगत विचारबुद्धीने मांडावे लागते तेव्हा वेरूळच्या गोष्टींनी केलेले पराक्रम इतिहासात नजरेस येत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदरचे मराठी शाही
दख्खन मरहट्टा वेरूळकर भोसले घराणे
लेख व माहिती संकलित
संतोष झिपरे

Friday 23 August 2024

महाराणी येसूबाई यांच्या सुटकेस इतका जास्त वेळ का लागला?

 


महाराणी येसूबाई यांच्या सुटकेस इतका जास्त वेळ का लागला?
मध्यकालीन मराठेशाहीच्या म्हणजेच उत्तर शिवकाळापश्चात. सर्वात जास्त छळ , कोणत्या घराण्याचा वा कुटुंबाचा झाला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र ,पुत्रवधू ,पौत्र , शिवकन्या ह्यांचा. मराठेशाहीतील इतिहासातले महाराणी येसूबाई हे निर्विवाद झाकोळले गेलेले एक श्रेष्ठ तेवढेच त्यागमुर्ती असे कणखर मातृतुल्य व्यक्तिमत्त्व आणि महापर्व. .,ज्याची इतिहासाला नोंद घेणे संयुक्तिक वाटले नसेल . कारण अनेक बहारदार अन् पराक्रमी पैलू त्या काळात होते जे एका पेक्षा एक .
मातोश्री जिजाऊ आऊसाहेब ,महाराणी येसूबाई , भद्रकाली ताराराणी , त्यानंतरच्या काळात अहिल्याबाई या चार स्त्रिया म्हणजे अलम मराठेशाहीचे मुत्सद्दी मातृवैभव असून सुवर्ण अध्याय आहेत. त्यात संशयास जागा नसावी . कारण कार्यच एवढे उत्तुंग आहे जिथे महोमहत्तम सेनापती अन् रजवाडे त्यांच्यापुढे फिके आहेत , असा तो असिम अद्वितीय त्याग महाराणि येसुबाई नी केला. १६८९ ते १७१९ म्हणजे तब्बल २९ वर्ष त्या मोगल कैदेत होत्या
३ नोव्हेंबर १६८९ ला झुल्फिकार खानाने , मराठि फितुरांमुळे स्वराज्याची राजधानी रायगड हा अजिंक्य किल्ला काबिज केला . तत्पूर्वी वेढ्यातून सुखरूप पणे बाहेर पडण्यास , राजाराम , ताराराणी व कुटुंब कबिला दक्षिणेकडे कूच करित होता . हे सर्व महाराणी येसूबाई च्या रणनीती ने साध्य झाले होते .आणि त्या स्वतः , पुत्र शिवाजी (द्वितिय) उर्फ शाहु , सकवारबाई या रायगडावर रक्षणासाठी मागे राहिल्या आणि वेढ्यात पुर्णपणे अडकणार, जीवानीशी जाणार हे माहिती असुनसुद्धा रायगडावरच थांबल्या. झुल्फिकारखान ,मुघल सैन्याने रायगड काबिज केला , येसुबाईस कैद करण्यास मुघल सैन्य गेले असता . उर्वरित मुठभर मराठि सैन्याकडून येसुराणीस उपद्रव होऊ नये याबद्दल झुल्फिकार खानास कळविले. कुराणावर ,हात ठेऊन शपथ घेऊन झुल्फिकार खानाने ते मान्य केले अशा रितीने येसुबाई ,पुत्र शिवाजी , सकवारबाई ,मदनसिंह , प्रतापराव गुजर चे दोन पुत्र , लवाजमा ,दासदासी हे कैद झाले. छत्रपतींचे भव्य ३२ मण सुवर्ण सिंहासनाचे तुकडे करून वाहून नेले .रायगडाचा विध्वंस केला .जाळपोळ केली. दफ्तरखान्यासकट अनेक वास्तू बेचिराख केल्या.
१७०७ मध्ये आलमगीर औरंगजेब अहमदनगर जवळ मरण पावला .तेव्हा औरंगपुत्र मुअज्जम ने शाहुस सुटका करविली. ह्या मागे मोगल नीच राजनीती होती ज्या २५ ते ३० वर्षाच्या पराक्रमी ताराराणी ने औरंगजेबास लढा देऊनही हि शूर मराठ्यांची अजिंक्य ताराराणी सोबत वारसाहक्क साठी शाहुचे पाचारण करणे मराठ्यात गादिसाठी दुफळी माजून पर्यायाने मोगलांचा दक्षिणेत निर्वेध आणि निर्धोक पणे सत्तावावर राहावा. आणि शाहूने मोगलांचा सुभेदार म्हणून दक्षिणेत शिरकाव करावा. परंतु काही जाचक अटिवर, त्यात पहिली अट होती .महाराणी येसूबाई ह्या मोगल कैदेत ओलिस असतील ,सोबतच लवाजमासुदधा .एकटे शाहु महाराज कैदेतून सुटून महाराष्ट्रात आले होते आणि येसुबाई मुघल कैदेत अडकून पडल्या होत्या.
जेष्ठपुत्र शहजादा मुअज्जम ने स्वतास बहादूरशहा हि पदवी लावून दिल्लीत मोगल सल्तनीचा बादशहा म्हणून १७०७ ते १७१३ मृत्यूपर्यंत होता . ह्या काळात शाहूराजे ची स्वताची अस्तित्वाची लढाई सुरू होती ताराराणी सोबतच गृहकलह सुरू झाला होता. सुरवातीला ते शंभुपुत्र शाहू आहेत हे मानायला सुद्धा कोणी तयार नव्हते .परसोजी भोसले ने एका ताटात शाहुं सोबत जेवण केले आणि मराठा मंडळांची खात्री पटली हेच खरे शंभुपुत्र शाहू आहे .
१७०८ मध्ये सातारा हि राजधानी बनवून शाहुराजे नी स्वतःस राज्याभिषेक करुन घेतला .छत्रपती झाले. अष्ट प्रधान मंडळ नेमले , जाधव जेधे आंग्रे दाभाडे गायकवाड पवार चव्हाण , भोसले हि मराठा मंडळी मातब्बर सरदार शाहु छत्रपतीं चे एकनिष्ठ शिलेदार होते ,तसेच श्रीवर्धन चे भट , बाळाजी विश्वनाथ यास प्रधानपद म्हणजे पेशवा हा हुदद दिला . मग शाहु राजेंनी राज्यविस्तार आरंभला , सुरवातीला , ताराराणी चा पाडाव करण्यात शक्ति खर्ची गेली . वसंतगड , पन्हाळा हे महत्वाचे गड खाशे शाहूराजे नी जिंकून घेतले .
शाहु महाराजांचे १७०८—०९ पासुनच मातोश्री येसुराणिस सोडविण्याचे मनसुबे होते परंतु त्या वेळेस मोघल प्रबळ सत्ता होती आणि शाहुराजेंकडे अर्थातच कमी लष्करी संख्याबळ . कारण तोपर्यंत शाहुंचा जम बसायला ५ वर्षं निघून गेली होती. आणि उघड मैदानात मोगलांशी युद्ध करणे हि प्रशस्त नव्हतं त्यामुळे सबुरिने अन् गोडिगुलाबिनेच हे कार्य करावे लागणार होते.
१७१३ ती संधी आली.दिल्लीचा मोघल बादशहा बहादूर शहा वृद्धापकाळाने मरण पावला.दिल्लीत ,मोघलाईत बेदिली माजली .नवीन बादशहा फरुखसियार झाला .त्याचे वझिर सय्यद बंधूंशी वितुष्ट होते .बादशहा ला सय्यद बंधूंची भीती वाटे . मराठ्यांना आयतिच संधी चालून आली दिल्लीत हस्तक्षेप करण्याची ,ह्या कामी बाळाजी विश्वनाथ भट ची शिष्टाई , मुत्सद्देगिरि ,वकीली कामात आली. परंतु १७१३ ते १७१९ हा ६ वर्षांचा काळ. बहुधा शाहुराजे राज्यविस्तारात गुरफटले असतील
दख्खनेतील मोगल सुभेदार सय्यद हुसेन कडून १७१३ मध्ये शाहुराजेंशी तह केला त्याप्रमाणे मोघलांच्या दक्षिणेतील सुभ्यावर चौथाई सरदेशमुखी चे हक्क स्वतःहुन वसुल करावे.तसेच मोगल बादशहा च्या प्रदेशाचा बंदोबस्त जय्यत ठेवावा , मराठ्यांनी बादशहास १० लाख खंडणी द्यावी, १५ हजार मराठा फौज बादशहाचे मदतीस ठेवावि त्याबदल्यात . राजेंच्या मातुश्री, कुटुंब आप्तेष्ट ची बादशहाच्या कैदेतून मुक्तता करावी. असे तहात ठरले परंतु बादशाह ने तह मान्य केला नाही. बादशहा फरुखसियार च्या अविश्वसनीय धोरणामुळे हे मनसुबे फसले.तरिहि सय्यद बंधूने मराठ्यांशी संधान बांधले होते. सय्यद बंधूला बादशहा फरुखसियारचा काटा कायमचा काढायचा होता. परिणामी सय्यद बंधूंना मराठ्यांचे सहाय्य ह्याकामी अपेक्षित होते.
मधल्या काळात हा बेत तडीस जाऊ शकला नाही. कारण मोघलांना उघड्या मैदानावर लढा देणे आत्मघात करण्यासारखे होते .तरिहि मराठे संधी शोधत होते.
परिणामी १७१९ ला मराठी फौज १५ हजार आणि सातारा हून बाळाजी विश्वनाथ, राणोजी शिंदे,खंडो बल्लाळ, सेनापती खंडेराव दाभाडे, संताजी भोसले हे मातब्बर सरदार दिल्लीवर चालून गैले , बादशहा फरुखसियार यास कैदेत टाकले.तिथे त्यांची हत्या करण्यात आली .सय्यद बंधू ह्या बादशहाच्या वझिराने रफी उद दरजत याला नवनिर्वाचित नामधारी बादशहा घोषित केले व त्याचेकडून सनदा विधीवतपणे मराठ्यांना शिक्कामोर्तब करुन दिल्या. ह्यामुळे दक्षिणेतील मुघलांच्या सहा सुभ्यातून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे हक्क छत्रपती शाहू राजांना मिळाले व सनदशीर हक्क प्राप्त झाला. तसेच मोगलांच्या कैदेतील मातोश्री येसूबाई, शाहू राजांचे सावत्र बंधू मदनसिंग यांची सुटका झाली. आणि ते मजल तर मजल सातारा महाराष्ट्र येऊन पोहोचले.
४ जुलै १७१९ या दिवशी त्या बंदिवासातून मुक्त होऊन सातारा , स्वगृही परत आल्यात .मराठा मंडळात त्यांच्या अभुतपुर्व त्यागामुळे , धैर्यशील वृत्तीमुळे मानाचे स्थान आहे. शंभुछत्रपतीनी त्यांना श्री सखी राज्ञी जयति हा खिताब देऊन गौरविले होते. अशा जाज्वल्य त्यागमुर्ती अन् मातृदेवतेला त्रिवार मानाचा मुजरा .
आस्ते कदम
आस्ते कदम
आस्ते कदम

Tuesday 13 August 2024

🚩🚩कर्यात कासेगाव येथील कारभारी बाबाजीराजे भोसले 🚩🚩

 



🚩🚩कर्यात कासेगाव येथील कारभारी बाबाजीराजे भोसले 🚩🚩
मित्रांनो दोन महिन्यापूर्वी कसबा कासेगाव येथील ताटे देशमुख यांच्या घराण्याकडे छत्रपतीच्या खाजगीकडील तलवार आल्याच्या एक पत्र मी टाकलं होतं ते आपल्या सर्वांना मिळाला असेलच त्यास ताटे देशमुख यांची देशमुख असलेलं कसबा कासेगाव याबद्दल नवीन संशोधनातून कागदपत्र पुढे आले आहेत जे येथील कारभार वेरूळच्या बाबाजीराजे भोसले यांच्याकडे होता हे स्पष्ट होतं
मालोजीराजे भोसले ने दाखविलेल्या कर्तबगारीचा उल्लेख बृहदीश्वरशिलालेखकर्त्याने केला आहे. त्यात आवश्याच्या लढाईचा उल्लेख करून, मालोजीराजे ह्यापूर्वी बहुत युद्धात जय पावले होते, असे तो शिलालेखकार लिहितो. याचा अर्थ असा की, शक १४९९ पासून शक १५१० पर्यंतच्या काळातील अकरा बारा वर्षांच्या अवधीत मालोजीराजे भोसलेने निजामशाहाच्या वतीने अनेक मोहिमात पराक्रम करून आवश्याच्या युद्धप्रसंगी तर त्याने निजामशाहाचे प्राण वाचविले. आवश्याच्या लढाईनंतर मालोजीची साख इतकी वाढली की, पुढे शक १५१४ त इभ्राई आदिलशहाला सोडून नगरास आलेल्या दिलावरखानाच्या सल्ल्यावरून बु-हाण निजामशहाने जेव्हा मंगळवेढ्यापर्यंत आदिलशाही मुलुख जाळून पोळून उद्ध्वस्त केला तेव्हा त्याही मोहिमेत मालोजीने मोठा पराक्रम केला. ह्या पराक्रमाचा उल्लेख बृहदीश्वरशिलालेखकर्त्याने केला आहे. नंतर शक १५१५ त इभ्राइम आदिलशहाच्या इस्माएल नामक भावाने कोल्हापूर, बेळगाव प्रांती बंड करून बु-हाण निजामशाहाची मदत मागितली. त्या मदतीच्या सैन्यात सामील होऊन मालोजी भोसल्याने कोल्हापूर प्रांती आदिलशाही फौजेला बहुत त्रास दिला. यावेळी त्या काही गावे वतन इनाम मिळाले होते. पण त्या अगोदर पेरूच्या राजे भोसले पाटलांकडे असलेले मोकासा व पाटील की हे वतन की गावी आणि त्यांची नावे सदर फोटो क्रमांक दोन मध्ये दिले आहे ते पहा पण मालोजीराजांनी या काळात जिंतीची पाटील की काकडेकडून विकत घेतली त्याच्या पत्र पाठीमागे मी टाकलेले आहे ते ग्रुप वर पाठवा.
आता संदर्भ फोटो क्रमांक एक कडे येऊ तत्कालीन काळात भोसले घराणे कडे इंदापूरची देशमुख व पुणे सुपे ची जागरी होती हे इतिहास सर्वज्ञात आहे पण सदर पत्र क्रमांक एक मुद्दे दिलेल्या कार्यात कासेगाव हे गाव पंढरपूर शेजारील कसब्याचे गाव असून तत्कालीन काळात तेथील कारभार बाबाजी भोसले राजे भोसले यांच्या वतीने चालत असल्याचा उल्लेख आदिलशहाने मसवडच्या माने देशमुख यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे आणि त्याची तारीख ही दिली आहे ती आपण प्रत्यक्षात पहा यावरून तत्कालीन काळातील कारभार हा भोसले घराण्याकडे होता हेही स्पष्ट होते तसेच 2010 साठी वसंतराव शिंदे यांचे एक पुस्तक माझ्या वाचण्यात आलं होतं की पंढरपूर परिसरातील गावांशी वेरूळच्या भोसले पाटलांचा काय संबंध आहे पण संदर्भ साधना नसल्यामुळे याबाबत काही बोलणे योग्य नव्हतं सदर पत्र आदेशाने सांगितल्याप्रमाणे चे प्रमाणे मान देशाच्या मानदेशमुखांना पत्र लिहिण्याचे कारण की तत्कालीन काळात सांगोला पंढरपूर कसबा कासेगाव ही हा परिसर हा माण देशात मोडत होता आणि याच परिसरात शिखर शिंगणापूर हे बाबाजी राजे भोसले यांचे कुलदैवत होतं असल्यामुळे येथील मुतालिक अथवा सरदेशमुखी अथवा देशमुख ही बाबाजी भोसलेंकडे असावी काय याबाबत संशोधन झालं पाहिजे हे अन लोक कालगणनेनुसार 1634 मधला आहे 1634 पर्यंत या परिसरातील कारभार हा बाबाजी भोसले यांच्या अर्थात भोसले घराण्याकडून चालत होता हे स्पष्ट होते तसेच सादर कर्यात कासेगाव हे दौलखवासखान हबशी जो आदिलशाही वजीर होते त्यास देण्यात आले. सादर इनाम खवासखान यास मिळाले यावरून पुर्वीपासून भोसले कडे हे इनाम व कारभार होते काय या संशोधनासाठी वाव आहे पुढील काळात आणखीन संशोधन झाले पाहिजे असे वाटते....
आपले
संतोष झिपरे
9049760888

🌙 सरलष्कर शहाजीराजे भोसले यांच्या तिसऱ्या पत्नी नरसाबाई भोसले🌙🌙

 



🌙 सरलष्कर शहाजीराजे भोसले यांच्या तिसऱ्या पत्नी नरसाबाई भोसले🌙🌙
सादर दानपत्र दिल्यानंतर नरसाबाई यांच्या नावावरून एका गावाला नरसांबपूर असे नाव पडले. नरसापूर हे नेमके कोणते याचा उल्लेख नसलातरी राणी नरसाबाई या मुळच्या कर्नाटकातील असून 1637 साली ज्यावेळी शहाजीराजे आदिलशाहीत दाखल झाले. तेव्हा त्यांनी नरसाबाईसोबत लग्न केले असावे. उपरोक्त पत्र हे १६८८ सालचे असून नरसाबाई या पुढे बरेच दिवस हयात होत्या. यातील नरसापूर म्हणजे कर्नाटकातील बेंगलोर जिल्ह्यातील नरसापुरा म्हणून ठिकाण आहे ठिकाणी या भागात कोणतं मराठा घराणे नांदले आहे काय याचा शोध भविष्यात घ्यावा लागेल किंवा आजही हे मंडळी तिथे आहेत का याचा शोध भविष्यात घ्यावा लागेल कारण बेंगलोर शहर हे शहाजीराजे महाराज साहेबांचं जहागिरीचे गाव असून याच परिसरातील एखाद्या वतनदार घराण्यातल्या या राणीसाहेब असाव्यात असा एक अंदाज आहे पण तत्कालीन कालखंडात कोणतं मराठा घराणे या ठिकाणी होऊन गेलं याबद्दल मराठ्यांच्या इतिहासातील कागदपत्र अजिबात बोलत नाहीत हे दुर्दैव! !
सरलस्कर शहाजीराजे भोसले व राणीसाहेब नसराबाई यांचा विवाह कधी झाला याबद्दल काही उल्लेख नाही तसेच औरंगजेबाच्या आगमनानंतर संभाजीराजे आल्यानंतर या परिसरात येऊन गेल्याचे बेंगलोर व आदी परिसरात लष्करी तर असल्याचेही उल्लेख आढळतो तसेच तसेच सादर पत्रातून संताजी राजे यांचा उल्लेख सापडतो संताजी राजे हे शहाजी महाराजांचे पुत्र होते आणि नसराबाई या त्यांच्या विवाहित तिसऱ्या पत्नी होत्या याबद्दल उल्लेख वरील पत्रात स्पष्ट दिला आहे यामुळे 91 कलमी बखरीत दिलेल्या नसराबाई या सरलष्कर शहाजीराजे भोसले महाराजांच्या रक्षा पत्नी होत्या याबद्दल मुद्दा या ठिकाणी खोडून निघतो तसेच छत्रपती शाहू महाराजांच्या सोबत कैदेत असलेले रायभानजी काका भोसले यांचा उल्लेख पुढे सातारा दरबारात आल्यानंतर रायभानेकाका भोसले हाच सापडतो कारण छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या पत्रातून त्यांचा उल्लेख रायभान काका असाच येतो त्याअर्थे रायभान राजे भोसले हे कोण होते हे सांगण्याची मुळीच गरज नाही फक्त ते शहाजीराजांच्या कोणत्या पत्नीपासून जन्माला आले किंवा वंश होता याबद्दल माहिती उपलब्ध होत नाही कारण छत्रपती शाहू महाराजांचा येसूबाई यांच्या सह चाळीस मंडळी कैदीत होती जुल्फिकर खान याच्या कैदेत सापडलेल्या तंजावर येथील राजघराण्यातील मंडळींपैकी रायभानराजे काका भोसले हे एक होते औरंगजेबाने रायभानराजे काका भोसले यांची नियुक्ती छत्रपती शाहू महाराज यांच्या कारभारी म्हणून केली होती याबद्दल मोगल दरबारच्या कागदपत्रे नोंद आहे व त्यानंतर त्या घराण्यातील वंशाचे काय झालं याबद्दल ही काही लिहिलं आणि बोललं जात नाही किंवा आज त्यांचा वंश कुठे आहे याबद्दलही काही सांगितलं जात नाही तसेच जिंती येथील थोरले संभाजीराजे शहाजीराजे भोसले यांच्या सुनबाई व उमाजी राजे भोसले यांच्या पत्नी मकाऊ राणी सरकार पाटलीण या कनार्टकातून येऊन येऊन मासाहेब जिजाऊ साहेबांच्या याच्या वतनने जिंती गावात स्थायिक झाल्या पण आज घडीला त्या घराण्या कडेही कागदपत्रे किंवा कोणतीही माहिती उपलब्ध नसल्यामुळे या राणीसाहेब कोण व रायभान काका भोसले, नरसाबाई राणी सरकार याबद्दल कागद बोलत नाहीत तसेच तंजावर येथील छत्रपती घराण्यातील वंशजांनी याबद्दल पुढाकार घेऊन मराठ्यांच्या तंजावर छत्रपती दप्तरात उपलब्ध असलेल्या कागदपत्रातून भविष्यात खरी इतिहास बाहेर पडले वरील उल्लेख केलेला बहुतेक चारही गाव हे त्याचा मराठ्यांचा इतिहासात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हिंदवी स्वराज्याची संबंध आहे व या भागात मराठ्यांची लष्करी हालचाली तसेच छत्रपती घराण्यातील संबंधित घराण्याचं वास्तव्य झालेला आहे पण नरसा बाई या कर्नाटकातील होतय याबद्दल दुमत नाही फक्त या कोणत्या घराण्यातील होत्या व त्यांचे मूळ गाव कोणतं याबद्दल संशोधनास वाव आहे जर याबद्दल काही उल्लेख माहिती असल्यास आवश्यक कळवावा सादर दानपत्र
🔥🔥 " राजेश्री शहाशहाजीराजे भोसले यांची स्त्री राजेश्री
संतोजी राजियाची माता राजेश्री नसराबाई 🔥🔥
हे उल्लेख संताजी राजे हे शहाजी महाराजांचे व नरसुबाई या शहाजी महाराजांच्या पत्नी होत्या हे सांगण्यास पुरस आहे
🙏🏼🙏🏼
राजश्री नरसाबाईंनी हे दानपत्र अरवी गावात रहाणारे बाळंभट रामेश्वर प्रभाकर भट उपाध्ये. यांना दिले आहे.
तोरपाडी या गावाचे नाव बदलून ते नरसांबापूर असे केले आहे.
तोरपाडी ( नवीन नाव नरसांबापूर ) हे गाव तर्फे तायणूर गावाच्या पूर्वेस, इकोणा गावाच्या पश्चिमेस , मांबट गावाच्या दक्षिणेस व पुदपट गावाच्या उत्तरेस आहे.
या गावाचा परगणा बेंटवाल व प्रांत त्रिणमल आहे. असा सर्व उल्लेख पत्रात आहे, थर २२जानेवारी १६८८या तारीखाचे सादर दानपत्र दिले आहे तसेच नरसाबाई यांनी आरवी येथील भट उपाध्ये यांनी दानपत्र दिले या अर्थाने त्याच्या महाराष्ट्र तील जडणघडणीशी संबंध आले आहे व सरलष्कर शहाजीराजे भोसले महाराज च्या सोबत जो मराठा सरदार बंगलोर येथे गेले त्यापैकी एखाद्या घराण्यातील असावीत ❓
सदर पत्राच्या शेवटी संस्कृत श्लोक असून पत्राच्या वरील बाजूस फारशी शिक्का आहे
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक संतोष झिपरे ९०४९७६०८८८
🙏🏼🙏🏼बेंगलोर म्हैसूर आणि कोल्हार भागातील कोणी इतिहास प्रेमी मराठा बांधव असतील तर संपर्क करावा कारण भविष्यात या ठिकाणी भेट देऊन इतिहासाची नव्याने माहिती व संशोधन करण्यास आम्हा सहकार्य होईल सोबत खाली नंबर देत आहोत

छत्रपती भोसले घराण्यातील तीन पिढ्यांचा संगम जिथे झाला ते #शकुंतलेश्वर मंदिर

 

#









छत्रपती
भोसले घराण्यातील तीन पिढ्यांचा संगम जिथे झाला ते #शकुंतलेश्वर मंदिर🔥🔥
#शाहू महाराज व #संभाजी महाराज या उभयतांसही पोटीं पुत्रसंतान नाहीं याजमुळें चिंता करीत होते. त्यास ताराबाईस पुत्र #शिवाजीराजे व राजसबाईस #संभाजीराजे हे दोघे पुत्र राजारामसाहेबाचे. त्यास, शिवाजीराजे यांस एक पुत्र रामराजे व कन्या दर्याबाई, दोवें जहालीं. त्यास संभाजी राजे यांची स्त्री जिजाबाई यांचे भयास्तव ताराबाईंनी लांबविला. तो कोणास न समजे अशा रीतीनें जागा जागा देशांतर करून काल हरणें होता. तो बारा चवदा वर्षांचा होऊन #तुळजापुराजवळ पानगांवीं येऊन नारोजी भुत्याकडे होता. त्यास शाहूहाराजांस वेथा होऊन चारसा महिने वेथिस्त होते. त्या दिवसांत नारोजी भुत्या यास रांडपोर नव्हतें. शंभर रुपये कुणगा होता. आपलें म्हातारपण यास्तव त्या मुलांस अंतस्ते सांगितलें. तेव्हां त्या मुलानें आपलें अंतरंग सांगितलें कीं मी शिवाजी राजे यांचा पुत्र. तेव्हां त्या मुलाची हेटाळणी करूं लागला. त्यास शिवाजीराजे यांस दर्याबाई कन्या, पुत्र हा रामराजा, दोघें जाहलीं होतीं. त्यास पुकार होतां होता दर्याबाई निंबाळकरांचे घरी दिली होती तिजला बारशीस खबर गेली. तिनें माणसे पाठवून घरी नेऊन चौकशी करून ठेविलें. तें वर्तमान शाहूमहाराजांस व ताराबाईस कळलें. तेव्हां बातमीस नेहमी खंडेराव #न्यायाधीश पाठविले. व नानासाहेबींही बातमीस कारकून पाठविले. त्याजवर शाहूमहाराजांनी शके १६७१ शुक्ल नामसंवत्सरी मार्गशीर्ष वद्य तृतीयेस कैलासवास केला. तेव्हां फौज पाठवून बारशीपानगावाहून राजारामास आणून, नानासाहेब आदिकरून सर्व सरकारकून व सरदार सामोरे जाऊन आणून, सुमुहूर्ते राज्याभिषेक करून, राज्यावर बसवून नजरा व मुजरे केले.
________________
छत्रपती थोरले शाहू १५डिसेबर१७४९रोजी मृत्यू झाले. दुसरेच दिवशीं महाराणी ताराबाई साहेब यांनी पाच हजार फौज देऊन लवाजमा सह बापूजी
खंडेराव चिटणीस, महादोबा पुरंदरे बाबूजी नाईक बारामतीकर, , चिंतो विनायक, लिंगोजी अनंत, इद्रोंजी कदम सापकर असे प्रमुख गृहस्थ छत्रपती रामराजास रामराजास आणण्यासाठीं पानगांवास कृष्णाबाई ऊर्फ दर्याबाई साहेब निंबाळकर यांच्या घरी रवाना केले. बरोबर फौज, कारखाने, शागीर्दपेशा, वस्त्रे, जवाहीर, हत्ती-घोडे असा मुबलक सरंजाम दिला. पानगांवास यापूर्वी सर्व व्यवस्था भगवंतराव अमात्य व दर्याबाई निंबाळकर पाहत होती. आपल्या हातची खूण म्हणून ताराबाईनें स्वतःची अंगठी रामराजास पाठविली. तुळजापुरचे गोंधळीं रामराजाची वरदास्त ठेवीत, त्यांस पांच हजार रुपये इनाम देऊन ही मंडळी छत्रपती रामराजा व दर्याबाई यांस घेऊन परत निघाली. ता. २६ डिसेंबरला त्यांचा
दत्तविधान झालें नाहीं.
मुक्काम कृष्णाकांठीं वडूथजवळ झाला. पेशवे सामोरे जाऊन भेटले,🚩🚩 आईसाहेब ताराबाई साहेब खालीं वडूथ शहरांत तेरा दिवस होती, त्यांची छत्रपती रामराजाशीं पहिली भेट कृष्णाउत्तरतीरी शकुंतेश्वराचे मंदिरांत विधिपूर्वक झाली.🚩🚩 नंतर नगर प्रवेशाचा मुहूर्त मिळेपर्यंत आरळें नजीक मुक्काम केला. लोक सामोरे जाऊन भेटले. सरदार वगैरेंच्या भेटी होऊन म्हसवें येथे आले. मध्यंतरी २० डिसेंबरला सदाशिवरावभाऊ साताऱ्यास आला, त्यानें वडुथावर महाराजांची भेट घेतली. तेराव्याचे मोठें जेवण उरकल्यावर गुरुवार पौष शु० ८ ता० ४ जानेवारी स. १७५० च्या मुहूर्तानें सकाळीं रामराजानें नगर-प्रवेश केला आणि त्याच दिवशीं राज्यारोहण समारंभ झाला.
रामराजाचे दत्तविधान म्हणून झालेच नाहीं. दत्तक देणारा व घेणारा कोणी नव्हते. तर 'मध्यग्रह दत्तक विधीनें नवीन राजा स्वीकारण्याची व्यवस्था धर्मशास्त्रांत सांगितली आहे, तीही रामराजासंबंधानें घडली नाहीं...
_____________
ते तेथें जाऊन रामराजास घेऊन छ २६ मोहरम रोजी (२६ डिसेंबर १७४९) वडूथाजवळ कृष्णेचे ठिकाणी आले. इतक्यात महाराज वारल्याची बातमी पुण्यास गेल्यावर भाऊसाहेबही छ २० मोहरम रोजी (२० डिसेंबर १७४९) पुण्याहून निघाले. महाराज वारल्याची खबर लागतांच वडुथावर राहिले होते, त्यांची भेंट तिसरे प्रहरी दिवसास झाली, व पुढें छ ६ सफर रोजीं (४ जानेवारी १७५०) साता-यास येण्यास मुहूर्त होता त्या दिवशीं मुहूर्तानें शहरांत दाखल झाले. तेव्हां श्रीमंतांनी ८८९ रुपयांचा पोषाख महाराजांस केला. त्याच दिवशी ह्मणजे पौष शु॥ ८ (४ जानेवारी १७५०) सहा घटिका दिवसास राज्याभिषेक झाला..
-----------------
26 डिसेंबर 1749 रोजी छत्रपती रामराजे हे सातारा मार्गावर असताना वडूज येथे आले यावेळी छत्रपती थोरले शाहू महाराज निधन झाल्याचं वार्ता त्यास कळाले तसेच त्यांच्यासोबत वरील लेखात उल्लेख असल्याप्रमाणे लवाजमा आहे म्हणजेच छत्रपती राजाराम महाराज यांचे सातारा गादीच्या युवराज पदाचा मान यावेळी त्यांना मिळाला होता किंवा जाहीर झाला होता यामुळे आपल्या ला दत्तक घेणारे #छत्रपती_थोरले_शाहू_महाराज यांचे निधन झाल्यामुळे त्यांना वडूथ सोडता आले नाही कारण तत्कालीन काळात राजघराण्यातील अथवा मातब्बर घराण्यातील मंडळीत जर घरातील करता किंवा वडील वाढल्यास त्या सुतुकातून उठून त्या घराण्यातल्या कर्त्या माणसाने घेऊन पुन्हा दिनचर्या सुरू केली पाहिजे ही प्रथा होती तसेच छत्रपती रामराजे हे तत्कालीन काळात #मराठा साम्राज्याचे होणारे छत्रपती होते यामुळे आपसूक त्यांना तेरा दिवस सुचक पाळणा हे अगत्य होतं यावेळी यावेळी महारणी तारा राणी सरकार सोडून सातारकर छत्रपतींच्या घराण्यात कुणीही करता पुरुष अथवा स्त्री उरली नव्हती कारण छत्रपती शाहू महाराजांच्या तीन पत्न्या या त्यांच्या हयातीतच वारल्या तर सकवार बाई साहेब या सती गेल्या तर रघोजीराजे भोसले नागपूरकर हे नागपूर परिसरात असल्याने त्यांचाही वापर या ठिकाणी दिसून येत नव्हता तर फत्तेसिंह बाबा यांनी या दत्तक विधानातून पूर्वीपासूनच अंग काढून घेतल्याने आणि ते सकवार बाई साहेब व सगुनाबाई साहेबांच्या विचाराने राहणारे असल्याने छत्रपती शाहू महाराजांवर निष्ठा ठेवून त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही यामुळे युवराज फत्तेसिंह भोसले यांची भूमिका ही अलगद बाजूला गेली याउलट महानताराणी साहेब या रामराजे यांच्या आधी असल्याने तसेच मराठ्यांच्या या भावी छत्रपती चे सुतुक काढून पुन्हा साताऱ्यात घेऊन येण्यासाठी त्यांना वडूज येथे येणे अगत्य होतं छत्रपती घराण्यातील दुहिमुळे पंतप्रतिनिधी व पेशवे यांनीही बघायची भूमिका घेतली होती आणि सर्वच अधिकार हे महारणी तारांसाहेब यांच्या कडे एकवटल्यामुळे तसेच घराण्यातील कर्त्या स्त्री असल्यामुळे त्यांनी आपल्या नातवाच्या भेटीसाठी प्रस्थान केले व छत्रपती रामराजे व महारणी यांची भेट कृष्ण काठी असलेल्या शकुंतलेश्वर मंदिरात श्री शंभू महादेवाच्या देवळात झाली व भोसले यांच्या तीन पिढ्यांच्या संगम या ठिकाणी झाला असेच म्हणावे लागेल यावेळी छत्रपती थोरले शाहू महाराजांचा तेरावे वडूज येथे करण्यात आलं आले व राजाराम महाराजांचे सुतुक निघाल्यानंतर त्यांनी सातारा कडे प्रस्थान केले असे उपलब्ध संदर्भातील कागदपत्रातून दिसून येते तसेच वडूच्या या वडूथच्या या शकुंतेश्वराच्या मंदिरात साताऱ्याचा गादीचा वारस कोण आहे हे प्रत्यक्ष दयाबाई साहेब सोडून व भगवंतराव अमात्य सोडून कोणाशी माहिती नव्हते आणि या राजाला बघण्यासाठीच प्रत्यक्ष पंचक्रोशी ही आई असावी असा कयास बांधण्यास जागा आहे कारण जवळजवळ मराठ्यांची 40 हजाराची फौज या ठिकाणी आपल्या धन्याच्या स्वागतासाठी व धन्याला बघण्यासाठी आली होती ही तत्कालीन विविध सरदारांच्या उपस्थितीनुसार दिसून येते यावेळी नागपूरकर हे बंगालमध्ये लढाईवर अडकल्यामुळे त्यांची उपस्थिती या ठिकाणी नव्हती बाकी मराठा दौलतीतले सर्वच मान्यवर सरंजमदार सरदार व वतनदार वडू तेथे आपल्या धन्यास बघण्यासाठी व धन्याला मुजरा झाडण्यासाठी उपस्थित होते हे विशेष त्यामुळे वडूज येथील शकुंतलेश्वर मंदिर हे जसं जेजुरी येथील छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शहाजीराजे सरलस्कर व राजमाता जिजाऊ यांच्या भेटीसाठी तीर्थक्षेत्र म्हणून निवडले होते तोच प्रकार महानतारणी यांनी शकुंतुलेश्वर मंदिराची महत्व इतिहासात नमूद झाला आहे पण सदर इतिहास किंवा या शकुंतश्रीच्या मंदिरातील भेटीबद्दल मराठ्यांच्या इतिहासातील कागदपत्र आजवर कोणीही मांडणी केलेली नाही हे विशेष भविष्यात याबद्दल आणखीन विस्तृतपणे लिहिणारे पिढी पुढे येईल याबद्दल खात्री आहे यामुळे वडूज येथील शकुंतलेश्वर मंदिराचे महत्त्व इतिहासात अनन्य साधारण आहे
तळटीप:- सदर लेखात सुरुवातीला आलेले हे राजाराम महाराजांच्या आगमनाच्या वेळचे तत्कालीन उपलब्ध संदर्भात लेखन जसेच्या तसे शब्दांकित केले आहे. याबद्दल गैरसमज नसावा संदर्भ साधने मधील उल्लेख तीन लेखात आहे त तसेच दिले आहे
सदर लेख व माहिती संकलन संतोष झिपरे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य

सरदार दरेकर घराणे

 


सरदार दरेकर घराणे⚔️
⚔️⚔️
तळटीप:-सदर सदर लेख लिहिण्यासाठी घेतलेलं परिश्रम लक्षात घेता तसेच यातील नोंदीसाठी कोणत्याही तरेकर मंडळींना संपर्क साठी अडचण येणार नाही म्हणून यातील नंबरासह पोस्ट शेअर करावी एवढीच विनंती....
मराठ्यांच्या इतिहासात हिंदवी स्वराज्य ते मराठा साम्राज्य याची सेवा करताना जे अनेक घराणे उदयाला आले त्यापैकी एक घराण म्हणजे दरेकर घराणं होय. खालील लेखात अस्सलपत्रातील नोंदी संदर्भसह दिले असून त्याचे सविस्तर वृत्तांकन केलं आहे यात पुणे, सातारा व कोकणातील दरेकर घराण्यातील नोंदी असलेल्या सरदारांचा उल्लेख आला आहे खरतर १८मे २०२४ रोजी छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या जयंती निमित्त हा लेख टाकण्याचा मानस होता पण वेळेअभावी पूर्ण झालं नसल्यामुळे आज टाकत आहोत
🌞श्री🌙
छत्रपती शाहू
चरणी तत्पर दरेकर घराणे निरंतर
सदर लेखक पत्रात उल्लेख आलेल्या सरदारांची नावे क्रमवार पद्धतीने व नात्यावर आधारित दिले असून याची नोंद घ्यावी. मराठ्याच्या इतिहासातील अशा कर्तबगार आणि वीर घराण्याच्या इतिहास मांडण्याचा हा प्रयत्न छोटासा असुन यातील काही दुरस्ती असतील तर संदर्भ सह संपर्क करावे
काही लोक म्हणतात जल स्वतःच्या दोन पिढ्यांचा इतिहास माहिती नसतो त्याने इतिहास सांगूच नये पण ज्यांना स्वतःच्या आडनावच खात्री नाही त्यांना इतिहास बद्दल बोले नये
दरेकर सरदार यास वेगवेगळ्या कालखंडात छत्रपती सातारा महाराज कडून दिलेल्या मोकासा व महाल मोकासा यादी⛳⛳
मौजे सेडवली
मौ. क्षत्रपाल
भोगाव
मौजे कोढवी
तरवली
भोगावी
मौजे पैठण
कोतवाल खुर्द
पालचल
भोगावी चिकणे
मौजे पलवे
मौजे वाहाली
ताईघाट
सोनदरी
भोसरे
सिवरे
वर्दी
बाकी
घावरी
मौजे चिखली
मौजे देवसर
मौजे धावली
देवली
मौजे दरे
पांगारी
करवली (फरवली)
मौजे वेळूत
सहजपूर
गाडोली
निलंगे
सुलतानपुरे
पानगाव बारा बिवीचे
कुभारडे
चिंचोली
मानगाव
सेरी खुर्द
हरदापूर
उचाट
आरव
वाखवटी
कांदट
बामणोली
कलंबगाऊ
जाऊली
सरदार दरेकर यास वेगवेगळ्या कालखंडात छत्रपती सातारा महाराज यांच्याकडुन मोकासा देण्यात आलेले गावांची यादी
तळटीपा :-यातील काही गावे आज अस्तित्वात नाहीत
अथवा सापडते नाही त
🚩🚩 सुलबाजी दरेकर पाटील अबंळेकर🚩🚩
कसबा पुणे व पर्वती गावातील शिवेचे तंटा पुढे आले त्यात कसबा पुणे येथे गोतसभात मजालस करण्यात आले त्यात सुलबाजी दरेकर पाटील अबंळेकर म्हणून उल्लेख आढळतो...
आषाढ वद्य १० दशमी गुरुवारीं पर्वती व पुणें याच्या शिवेस वाट आहे. पुण्याहून कात्रजेस जावयाची असे. तिची कटकट पडिली. ती मनास आणून टाकली. हजीर मजालसः--
कित्ता पा। कित्ता पा।
१ केसे। सखदेव कमावीसदार, २ अंबळेकर पाटील
का। पुणें. १ सुलबाजी दरेकर
३ देशमूख १ हिरोजी जगथाप
१ जगोबा ----------
_______________
🚩🚩 सुभानाजी दरेकर🚩🚩 हे आंबिळेकर दरेकर घराण्यातील छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या काळात सेनापती धनाजीराव जाधव यांच्या लष्करी दिमंतात होते सदर पत्र१७०९मधील असुन यावेळी छत्रपती थोरले शाहू महाराजांनी सातारा येथे राजधानी सह मराठे साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केले होते . हे सरदार सरंजामदार आंबिळेकर सयाजीराव दरेकर यांचे वडील होय.
७ /१८
श्री. शके १६३० चैत्र वद्य ८.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३४ सर्वधारीनाम संवत्सरे चैत्र बहुल अष्टमी भृगुवासर क्षत्रियकुलावतंस श्रीराजाशाहुछत्रपति स्वामी यांणी राजमान्य राजश्री मोरो प्रल्हाद यासि आज्ञा केली ऐसी जे :-
तुह्मांकडे सरदेशमुखीच्या मामलियास फडणीस पाहिजे. त्यासी, रुद्राजी केशव हुजूर उमेदवार होते. लिहिणार, कामाचे मर्दाने देखोन त्यासि फडणीसीचा कार्यभाग सांगितला असे. याचे हातें फडनीसीची सेवा घेत जाणें. यासी वतन सालीना, देखीलं चोकर, होन पा। ६०० साहासे रास करार केले असेत. इ॥ पैवस्तगीपासून वजावाटाव दंडकप्रमाणें वजा करून उरलें वतन शिरस्ताप्रमाणें पावणें. वतनाचे मोइनप्रमाणें चाकर हाजिर करून लेहवितील, त्या दिवसापासून चाकराचा हक पावीत जाणें. यासी जमान त्रिंबककाकाजी. जमेनिवीस, सुभानाजी दरेकर, दि॥ राजजी सेनापति, हुजूर घेतला असे. बहुत काय लिहिणें ?
मर्यादेयं
राजते
_______________
🚩🚩 सरदार सयाजीराव दरेकर🚩🚩
छत्रपती छत्रपती थोरले शाहू महाराजांनी कृपाळू होऊन सयाजीराव दरेकर आंबेडकर यांना सरांजमी दिल्याचा उल्लेख या पत्रात आला आहे मराठ्यांच्या इतिहासात स्वामी हा शब्द छत्रपतींसाठी वापरला जातो
५१५ /६
श्री.
राजश्री अंबाजी व्यंबक यासी आज्ञा केली ऐसीजेः--
राजश्री सयाजी दरेकर याजवरी स्वामी कृपाळू होऊन त्याचा सरंजाम त्यास करून दिल्हा असे. * तुह्मांस कळावयाकारन लिहिल अस.
________________
🚩🚩 छत्रपती ताराबाई राणी सरकार यांच्या चरणीशी खंडेराव दरेकर यांच्या विनंती🚩🚩
एखाद्या घराण्यातील कुलाचार हा किती उच्च कोटीचा असतो हे त्या घराण्याचा कुलाचार व धर्मविधी कार्य करणारे पुरोहित गुरव, जगंम यांच्या राजसत्ता व धर्मसत्ता तील अधिकारवरून ठरतो खालील दोन्ही पत्रात असलेले दीक्षित घराणं याबद्दल अगोदर आपण सविस्तर माहिती घेऊ कारण छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या निधनानंतर छत्रपती रामराजे गादीवर आल्यावर छत्रपती रामराजे व पेशवे यांच्यात दुरवा निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा सदर पत्रातून छत्रपती ताराराणी सरकार बाळाजी पंडित प्रधान यांनी आठवणे दिसतात यावेळी वेदोसंपन्न राजश्री सदाशिव दीक्षित यांनी श्रमसहस करून छत्रपती व पेशव्यांमधला गैरसमज व दुरावा दूर करून एक ओपन केल्याचं उल्लेख मातोश्री आईसाहेब ताराराणी सरकार यांनी या पत्रात उल्लेख केला आहे आणि सदर दीक्षित बद्दल काही रक्कम व त्याची कुटुंब चालवले पाहिजे म्हणून हुकूम पेशव्यांना दिला आहे पहिला पत्रातून महाराणी ताराराणी सरकार पत्रातील उल्लेखातील सदाशिव दीक्षित यांचा उल्लेख खालील दुसरा पत्राची आला आहे आणि दोन्हीही पत्र हे 1759 सालातील आहेत यावेळी सयाजीराव पुत्र खंडेराव दरेकर यांनी आईसाहेब छत्रपती ताराराणी सरकार यांना आपले वडील सयाजीराव दरेकर यांच्या निधनानंतर थोरल्या शाहू महाराजांनी सदर सदाशिव दीक्षित यांचे वडील बाबदेवभट दीक्षित यांना बहुदा समाधीच्या पूजा आर्ची साठी आहीरवाडा येथे 85 बिघा जमीन इनाम दिली होती छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या निधनानंतर छत्रपती रामराजे महाराजांच्या काळात सदर परंपरा खंडित झाली असावी यामुळे सदर इनाम नूतनीकरण करून द्यावी अशी विनंती पत्र खंडेराव दरेकरांनी मातोश्री छत्रपती ताराराणी सरकार यांच्या चरणी शी केले आहे सदाशिव बट दीक्षित यांचा उल्लेख मातोश्री ताराराणी सरकार यांनी वेदोसंपन्न असे केला आहे यावरून या दीक्षित घराण्याची महत्त्व नमूद करणं गरजेचं वाटलं कारण सयाजीराव दरेकर यांचे स्मृती त छत्रपती थोरले शाहू महाराजांनी इनाम दिले आहे वंशपरंपरागत दरेकर घराण्यातील कुलाचार या दीक्षित घराण्याकडे असावे तसेच पानगाव येथील सरलष्कर दर्याबाई निबांळकर घराण्यातील कुलाचार सांगणार दीक्षित घराणे पानगाव च्या पांढरीत आज पण आहे
लेखांक ११३/११
श्री.
१६८० वैशाख वद्य १.
श्रीमंतमहाराज मातुश्री आईसाहेब यांणी राज्यमान्य राजश्री बाळाजी पंडित प्रधान यांसी आज्ञा केली ऐसीजे- चिरंजीव शाहूबाबा यांसी कैलासवास जालियानंतर, साहेबांत व तुम्हांत कितेकांनी नानाप्रकारे विकल्प घालून राज्यांत बखेडे केले. येविशी वेदशास्त्रसंपन्न राजश्री सदाशिव दीक्षित ठकार यांणी श्रमसाहस करून, साहेबांचे व तुमचे एक लक्ष करून, बंदोबस्त केला. त्यावरून, साहेब यांजवर कृपाळू होऊन हे कुटुंबछळ, स्नानसंध्यादि षट्कर्मे आचरोन आहेत, यांचे प्रपंचाचा खर्च भारी यास्तव यांचे चालविलिया श्रेयस्कर, व हे पंधरा सहस्त्र रुपयांचे द्यावे, ऐसे साहेबी चित्तांत आणून तुम्हांस हे आज्ञापत्र सादर केले असे. तर वेदमूर्तीस पंधरा हजारांचे इनाम गांव स्वदेशी लाऊन देऊन यांस व यांचे पौत्रादि वंशपरंपरेने चालवणे. जाणिजे. छ १५ माहे रमजान, सु।। समान खमसैन मया व अलफ. बहुधान्यनाम संवत्सरे. बहुत लिहिणे तरी सुज्ञ असा.
श्री लेखन शुध.
लेखांक ११४विनंति/११
श्री. नक्कल
१६८० पौष शुध्द ७. तीर्थस्वरूप राजश्री आबा वडिलांचे शेवेसी-
येथून हस्ताक्षर ताराबाईचे.
अपत्ये खंडेराव दरेकर दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असिले पाहिजे. विशेष. तीर्थरूप सयाजीबाबा कैलासवासी झाले ते समई अहीरवाडी येथील जमीन बिघे ८५ मळा-सुधां वेद।स्त्रसंपन्न कैलासवासी बाबदेवभट दीक्षित ठकार यांसी इनाम दरोबस्त करून दिली आहे. तेणेपो करार करून मौजेमजकुरीची जमीन पानथळासुधां वेदशास्त्रसंपन्न राजश्री सदाशिव दीक्षित ठकार यांचे स्वाधीन करून तेथील अनभवून सालदरसाल स्नानसंध्या करून राहतील. पूर्वीपासून वडिलावडील यांचे आपल् चालत आले आहे. पहिली जमीन पानथळा बिघे ८२ व किता जमीन कोरडवाहा बिघे ८३ येकून बिघे पांच पेशजी दिली. ते यांसी अगत्यरूप दिल्हे पाहिजे. यांचे वंशपरंपरंने चालवावे. शके १६८० सोळासे आइसी, बहुधान्यनाम संवत्सरे, पौष शु।। ७ सुक्रवार. हे विनंति.
_______________
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक संतोष झिपरे9049760888
________________
🚩🚩तानाजीराव दरेकर हवालदार कि महिपतगड🚩🚩
सदर पत्र हे नानासाहेब पेशवे यांनी १७५०मध्य दिवाणातून लिहिले आहे कारण खेड तालुक्यात आबंडस गाव भार्गवराम स्वामींनी इनाम असुन तो महिपतगड हवालदार तानाजीराव दरेकर यांनी सरकारी वसुली किल्लाच्या खर्चासाठी केले असे दिसते व सदर गाव कडून महसुल परत करण्यासाठी आज्ञापत्र दिले आहे हे तानाजीराव दरेकर हे कोकणातील दरेकर घराण्यातील असावेत असे एक नोंदी वरून दिसते.........
४२/६ श्री ३ नोव्हेंबर १७५०
भार्गवरावस्वामी.
राजश्री तानाजीराव दरेकर हवालदार व कारकून के॥ महिपतगड गोसावी यासी.
आज्ञापत्र
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने॥ सदाशिव चिमणाजी आशीर्वाद व नमस्कार. सुहुर सन इहदे खमसेन मयाव अलफ मौजें आंबडस ते॥ खेड हा गांव श्री यांकडे इनाम आहे. ऐसें असतां तुह्मी तेथील वसूल सालगुदस्ता व सालमजकुरीं कांही घेतला आहे, ह्मणून विदित जालें. तरी पेशजीपासून इनाम चालत आहे. तेथील उसूल घ्यावयास प्रयोजन नाहीं. या उपरी तेथील जो वसूल घेतला असेल तो फिराऊन देणें. फिरोन त्या गांवचे वांटेस नच जाणें. जाणिजे. छ १४ जिल्हेज. आज्ञाप्रण.
श्री.
राजा शाहू नरपति
हर्ष निधान
बाळाजी बाजीराव प्रधान.
_________________
🚩🚩मानसिंग दरेकर🚩🚩
हे छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या सरदार सयाजीराव दरेकर यांचे व सरलष्कर खंडेराव दरेकर यांचे भाऊ आहेत सदर पत्र हे कामवीसदार मल्हार तुकडे यांनी बाजीराव पेशवे यांनी लिहिलेले आहे
२६३
तीर्थरूपा राजश्री राऊ आणि ला राजश्री आपा स्वामीचे सेवेसी
अपत्ये मल्हार तुकदेव कृतानेक सांां नमस्कार विनंती उपरी. स्वामीच्या आसीर्वादेकरून ताा छ २० जमादिलीवलपरियंत कुषल असो विशेष. राजश्री मानसिंग दरेकर सयाजी दरेकर याचे पुत्र याचे चाकरीविसी स्वामीस विनंती केली. स्वामीनी आज्ञा केली कीं पुणियास गेलियावर आज्ञा करून. त्यावरून स्वामीचे सेबेसी पाठविले आहेत. माारनिले आपलें सविस्तर वर्तमान विदित कारतील. स्वामीनी याजवरी कृपा करून यास चाकरीस ठेविले पाहिजे. माारनिळेचे वडील यानी पुरातन स्वामीची सेवा केली आहे. स्वामीवेगले याचे कोण्ही उर्जित कोण्ही करणार नाहीं. याचा मामला बहुत आफ्तर जाला आहे. स्वामीनी यास आगत्य चाकरीस ठेऊन सेवा घेतली पाहिजे. राजश्री रामाजीपंत कारकून पाठविले आहेत यास आज्ञा केली म्हणिन स्वामीचे सेवेसी येतील. विदित जाले पाहिजे. सेवेसी श्रुत होये विज्ञापना.
_______________
संतोष झिपरे 9049760888
________________
🚩🚩 दरेकर घराण्यातील दिव्या 🚩🚩
आबिंले येथील दरेकर घराण्यातील भावकीतील वादविवादात सरदार पिलाजीराव दरेकर यांचे काळात जेजुरी येथील खंडोबाच्या मंदिरात गोत बसला भोवरी येथील पाटील यांनी सदर दिव्या निवड करण्यासाठी भोवरीतील गोत उपस्थित होते यावेळी सासवड येथील जगताप देशमुख सासवड देशपांडे यांवेळी गोतसभात बसवला होता या यावेळी दिव्य करण्या च्याप्रसंगी दोन्ही दरेकर मंडळीने माघार घेतली असल्याचे दिसून येतो यावेळी कढईतील दिव्य करण्यात येणार होता ज्यात उकळतं तेल अथवा पाणी टाकून वस्तू काढल्या जात होते आणि यात जो खरा ठरेल त्याची बाजू शक्ती घेतली जात असेल यावेळी भाऊबंदकीतील वाघ दिव्यावाटे ने सोडवता आपसात केल्यामुळे केल्यामुळे दरेकर घराण्यातील एकोप्यास वाढ झाल्याचे दिसते इतिहासात अशी जर मी उदाहरण खूप कमी आहे की दिव्य करताना दिव्याला उपस्थित असलेले दोन्ही मंडळी एकदिलाने पाठीमागे जातील किंवा माघारी फिरते यामुळे या दिव्यास इतिहासात अन्याय सारंग महत्त्व आहे
शुद्ध १२ मंदवारी अबळेकर दरेकर याचें दिव्य पिलाजी दरेकराच्या भांडणाबाबत घ्यावयास राजश्री नारोपंतनाना व देशमुख देशपांडे गेले. रविवारीं दिव्याचें साहित्य करून जेजूरीस श्रीच्या कासवावरीं होमास आरंभ केला. पुढें होमादिक कर्म जाल्यावरी कढई ठेवावी तों भोंवरगांवचे गोत व देशमुख देशपांडे भानगडीस पडोन, दिव्याचा मजकूर राहून दोघांची समजाविषी केली.
______________
🚩🚩सरदार दादजी दरेकर🚩🚩
सरदार दादजी दरेकर हे हिंदुस्थानाच्या रक्षणासाठी पानिपतच्या रणभूमीवर धारातीर्थी पडली मुळात या ठिकाणी दरेकर घराणे सयाजीराव दरेकरांपासून सरंजा जामी असल्यामुळे दरेकर घराण्यातला जमाव पाणीपथावर मोठ्या संख्येने होतात पण सदर दरेकर घराण्याची सरदार म्हणून दादजी दरेकर यांचा उल्लेख एकच सापडतो याची नोंद घ्यावी
________________
🚩🚩 पिलाजीराव दरेकर🚩🚩
सदर पत्रातील हकीकत असे की सयाजीराव दरेकर यास भोसरी येथील मोकासा असून त्यांचे कुटुंब या ठिकाणी स्थायिक झालेलं होतं यावेळी भाऊ भाऊबंदकीतील वादाचा पडसाद दरेकर मंडळींच्या लष्करी कार्याची दिसून येतो असं खालील नोंदीवरून दिसते कारण सयाजीराव हे भोसरी येथे असल्याने खालील पत्रात राजश्री याचा अर्थ छत्रपती असा अर्थ असावा सयाजीराव दरेकर यांचे पुत्र अर्थात मानसिंगराव दरेकर होय. त्यांनी दोन दोनशे रुपये घेऊन गुजरी पाठवलं यावेळी यावेळी पिलाजीराव दरेकर पळून पेशव्यांकडे आले
यावेळी या पत्रात उल्लेख आलेले गर्डीकर हे छत्रपती सातारकर महाराज यांच्या खाजगी कडील गरडी या गावचे साळुंखे घराण आहे यावेळी छत्रपतींच्या कडून बाळाजी बहिर्जी साळुंखे या ठिकाणी आल्याची नोंद यात आहे तर यातील शंभर रुपये स्वामींचे असल्याने ती त्यांनी पेशव्याकडून घेतले
पिलाजी दरेकर याजवर सयाजी दरेकर याच्या पुत्रानीं राजश्रीपासून दोनशें रुपये मसाला करवून हुजरे पाठविले. पिलाजी पळोन पेशवियापाशीं आला. यांचा निरोप घेऊन गांवांतून बाहेर गेला. मुले माणसें काढिलीं. हुजुरियांनी बायकोपाशीं मसाला सदरहूप्रों। घेतला असे. गराडकरांसही मसाला राजश्री स्वामीचा शंभर रु॥ होता त्याणीं मसाला देऊन पेशवियांकडे आले. पेशवियांनी पेशजी मनसुबी केली आहे ते कागदपत्र देऊन सटवोजी संभाजी जगदाळे हुजुर पाठविले. तेथें बाळोजी बहिरजी आहेत. पेशवियांनीं निमे रु॥ कदमी घेतली आहे. हुजूर काय मजकूर होईल तो पाहावा१८
________________
🚩🚩सरलष्कर हणमंत राव दरेकर🚩🚩
सदर पत्र हे १८०७ मधील असुन या पत्रातील सरलष्कर खंडेराव दरेकर पुत्र सरलष्कर हणमंतराव दरेकर यांच्या बद्दल माहिती मिळते. यातील त्यांनी तत्कालीन लोणार परगणा तील म्हणजे आजच्या बुलढाणा जिल्ह्यातील खारकुंडा येथील लष्करी खर्चासाठी मोकासा व तिजाई देण्यात आले आहे. नारायण राव पेशव्यांच्या काळात त्यांनी सरलष्कर पद देण्यात आले. आजही त्या भागात दरेकर मडंळी आजघडीला आहेत असे समजते कारण पाठीमागे बुलढाणा जिल्ह्यातील दरेकर आमच्या संपर्कात आले होते पण सदर पत्रातून तेथील कामवीसदार यास मोकासा व तिजाई देऊ नये म्हणून उल्लेख आहे कारण सरलष्कर दरेकर घराण्यात भोसरी कर सयाजीराव दरेकर यांच्या लष्करी सरंजाम बद्दल उल्लेख असलेल्या पत्र या ठिकाणी या लेखात देत आहे त तसेच खंडेराव दरेकर यांनी सरलष्कर पदी नियुक्ती नंतर वडील सयाजीराव दरेकर यांनी असलेले सरंजाम भोसरी कर मानसिंह दरेकर यांनी होते असे समजते. सगळे माहिती येथे देणे शक्य नाही
पत्रांक ४०५/१०
श्री. १७१८ ज्येष्ठ-कार्तिक
मा। अनाम देशमुख व देशपांडे पो। लोणार यांसी:--
चिमणाजी माधवराव प्रधान. सु।। सबा तीसैन मया व अलफ, परगणें मजकूर येथील निमे मोकासा व तिजाई खारकुंडा श्रीहणमंतराव दरेकर सरलष्कर याजकडे फौजेचे बेगमीस सरंजाम पेशजीपासून आहे त्याप्रमाणें करार असे. तरी, सालमजकुरापासून रा। नारायणराव विश्वनाथ दिवाण व फडणीस नि।। सरलष्कर यांजकडील कमावसदारांसी रुजू होऊन परगणें मजकूरचा निमे मोकासा व तिजाई खारकुंडाचा अंमल सुदामत प्रों सुरळीत देणें. सरलष्कर यांजकडे न देणें
_______________
🚩🚩सरलष्कर बळवंतराव दरेकर🚩🚩 छत्रपती घराण्यातील तसेच भारतातील विविध मराठा सरांना आमदार घराण्यातील नातेसंबंध विषय आलेल्या नोंदीत सदर बळवंतराव यांचा उल्लेख सरलष्कर बळवंतराव दरेकर असा येतो हे नोंद पाठीमागच आमच्या सोशल मीडियावर मी टाकले आहे
आपले
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक
संतोष झिपरे
९०४९७६०८८८

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...