अखेरचे
पेशवे शनिवारवाडा सोडून बिठूरला का व कसे स्थायिक झाले? तेथे त्यांनी कोणते कार्य केले?
खरे म्हणजे याची सुरुवात राघोजी पेशवे (दुसऱ्या बाजीराव यांचे वडील ) यांनी केली . सत्ताच्या मोहात त्यांनी नारायण पेशवे यांचा खून केला .मराठ्या मध्ये आणि पुण्यात राघोबा विषयी तीव्र संताप व्यक्त होऊ लागला . बारभाई राजकारण जसे वळण घेऊ लागले . तेंव्हा राघोबा पेशवे यांनी इंग्रजांकडे शरण गेला .पुढे १७७८ -७९ इंग्रजांचे पहिले युद्ध झाले . सर्व लढले इंग्रजांचा पराभव झाला .
दुसरा बाजीराव ने विठोजी हत्तीच्या पायी दिले आणि यशवंत राव होळकर (भारतातच नेपोलियन) याने पेशवे आणि शिंदे हल्ला केला . डिसेंबर १८०२ ला बाजीरावाने इंग्रजांशी वसईचा तह केला. या तहानुसार इंग्रज बाजीरावाला त्याचे पेशवेपद परत मिळवून देणार होते, पण त्याबदल्यात इंग्रजांना त्यांचे सैन्य मराठा साम्राज्यात ठेवण्याची तसेच त्यांचे राजकीय कारभार पुण्यातून करण्याची परवानगी हवी होती. १८०३ ला बाजीराव पेशवेपदावर आले खरे पण इथून प्रत्येक बाबतीत इंग्रज मराठी सत्तेत ढवळाढवळ करू लागले. होळकर आणि शिंदे यांना ब्रिटिशांची मराठ्यांच्या सत्तेत होणारी ढवळाढवळ मान्य नव्हती. यातूनच १८०३ ला दुसरे इंग्रज-मराठा युद्ध सुरू झाले. होळकर आणि शिंदे यांच्यातील गैरसमजुतींमुळे मराठे हे युद्ध हरले.
पळपुटा बाजीराव त्यावेळी बाजीरावास शिंद्यांचा आश्रय राहिला नाही आणि होळकरावर विश्वास ठेवता आला नाही. त्यामुळे त्याने मुंबईकर इंग्रजांची मदत मागवली. त्यानुसार आर्थर वेल्सली याने दक्षिणेत आणि जनरल लेक याने उत्तरेत अशी एकाच वेळी मोहीम सुरु केली.१८०३ साली भारताच्या इतिहासातले एक निर्णायक वर्ष सुरु झाले.बाजीरावाने शिंदे + भोसले याना इंग्रजांचा पराभव करण्यास भरपूर प्रयत्न केला . हो मराठा सैन्य एका बाजूस तर इंग्रज, निझाम आणि थोडे मराठा सरदार दुसऱ्या बाजूस असा निर्णायक लढा सुरु झाला. पण यात मराठ्यांचा पराभव झाला .
एक गोष्ट दिसते की दौलतीस (मग ती पेशवेपद, होळकर, शिंदे अशी कोणतीही असो) पुढचा वारस कोण होणार या प्रश्नावर सतत अंतर्गत कलह चालू राहिला - . त्याचा फायदा घेऊन इंग्रजांनी सर्वांचे लष्करी पराभव केले आणि हा देश ताब्यात घेतला
आपल्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात खुप शहाणपण येऊन त्यांनी त्रांबकजी ठेंगळें बरोबर मराठा साम्राज्य वाचावण्याच प्रयत्न केला असला तरी त्यांनी १७९६मध्ये पेशवा झाल्यावर ज्या चुका केला त्या मुळे मराठा साम्राज्याला वाट लागली. यशवंतराव होळकर यांच्याशी विनाकारण. वैर घेतले. विठोजी होळकर याना दौलतराव शिंदे यांचे ऐकून भर चौकात हत्तीच्या पायी दिले.
त्यामुळे पहिल्या बाजीराव पासून फडणवीस यांनी शिंदे होळकर यांच्या मध्ये समेट आणून साम्राज्य सांभाळले पण दुसरा बाजीराव यांनी त्याची वाट लावली.
पेशवाई संपवण्याचे निम्मित ठरले बडोद्याचे वकील गंगाधर पंत शास्त्री यांचं खून ....त्यांच्या खुनाचे निम्मित करून त्र्यंबकजी डेंगळे यांना बंगाल ला पाठवले आणखी संपवले ...त्र्यंबकजींचे निमित्त करून दुसऱ्या बाजीराव ला पुणे सोडायला लावली ...आणि शनिवार वाडा मराठ्यांच्या हातातून काढून घेतला ..त्यावेळी पुण्यात अनेक खून झाले ...खून झाल्या मध्ये सातारचे वकील /खरसेठजी मोदी/ खरसेठजी मोदी यांचे सहाय्यक बापू साने हे सर्व मराठ्यांना आणि पेशव्याने सहाय्यक कारक माणसे होती ……योगायोगाने ज्यांचे खून झाले ते सर्व मराठा साम्राज्याच्या भलाईसाठी झटणारे लोक होते ...पण शास्त्रींच्या खून्याचे निमित्त करून दुसरा बाजीराव ला परागंदा करणाऱ्या एल्फिन्स्टन आणि बाळाजीपंत नातू यांनी हे सर्व खून कोणी केले ते कधीच इतिहासाला सांगितले नाही .
सन १८१७, महिना नोव्हेंबर, बाजीराव पेशव्यांनी प्रथम इंग्रजांच्या पुण्यातील वसाहतींवर हल्ला चढवला. पुण्यातील खडकी येथे युद्धाला तोंड फुटले. काही दिवस हे युद्ध असेच चालू राहिल्यानंतर बाजीरावांनी 'पुण्यावर संकट येऊ नये' म्हणून पुण्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. जानेवारी १८१८ ला भीमा नदीकाठी मोठे युद्ध पेटले. युद्धात १७५ ब्रिटिश सैनिक मेले, अर्ध्याहून जास्त जखमी झाले. त्र्यंबकजी डेंगळेंनी, बापू गोखल्यांचा मुलगा गोविंदराव गोखलेचा खून केलेल्या लेफ्टनंट चिशमला ठार मारून बदला घेतला. पण ह्या युद्धात मराठ्यांचेसुद्धा मोठे नुकसान झाले. जवळपास ५०० मराठे मारले गेले. शिंदे-होळकर-भोसले यांच्या मदतीची वाट बघत पेशव्यांनी इंग्रजांबरोबर अनेक छोट्या-मोठ्या लढाया केल्या. पण त्यांच्याकडून योग्य ती मदत मिळाली नाही.
१० एप्रिल १८१८ ला इंग्रजांनी सिंहगड आणि पुरंदर हे किल्ले घेतले. ३ जून १८१८ ला बाजीरावांनी धुळकोट येथे शरणागती पत्करली.
इंग्रजांनी बाजीरावाची रवानगी कानपूरजवळ बिठूर केली. इंग्रजांनी रायगड किल्लादेखील ताब्यात घेतला. रायगडवर त्यांनी सगळी हिशेबाची आणि दरबारी कागदपत्रे जाळली व सगळ्या मुख्य इमारती जमीनदोस्त केल्या. इंग्रजांचा काळा कालखंड भारतावर सुरू झाला.
इतिहासकार प्रफुलचन्द्र गुप्ता म्हणतात की "ह्या युद्धाच्या फार काळ आधीपासूनच मराठी सत्तेची अवकळा सुरू झाली होती. यापूर्वी कधीही कोणत्याही पेशव्यावर अशी वेळ आली नव्हती. "
१८५७ स्वतंत्र युद्धात इंग्रजांनी पेशवे चा बिठूर चा वाडा उध्वस्त केला
२७०० सोन्याचांदीच्या अत्तरदाण्या, गूळ दाण्या १५०० सन्याचांदीच्या ताटे ४० पुंड वजनाचे ससोन्याचे तसराळे चांदीची अंबारी आणि तीस लाख रुपये खजिना इंग्जनी लुटला पुढे चर्च बांधण्यासाठी नानासाहेबाने वाडा चे संगमरवरी दगड सुद्धा वापरले .
त्याकाळी ज्ञानोदय वृत्तपत्र मध्ये १६ जानेवारी १८६० मध्ये बातमी पण आली.
"बिठूरतील माणसाहेबांचेच वाड्याचे संगरावरी धोंडे सरकारने जप्त केले आणि कानपुर मुक्कामी जे ख्रिस्ती भाजनालाय आहे त्याची फरसबंदी करण्याकरिता नेले "
1) सरदेसाई गो. स. रियासत उत्तर विभाग [Marathi Riyasat Uttar Vibhag 3 (1795-1848)]
2) पेशवाईच्या सावलीत - नारायण गोविंद चापेकर [192162_OU_Peshavaaiichyaa_Saavaliin't_Gran'tha_34.pdf](https://docs.google.com/.../0B0vwUrnl4.../edit...)...
3) Fall of Mughal empire by Jadunath Sarkar [Fall Of The Mughal Empire Vol-iv ](https://archive.org/details/in.ernet.dli.2015.231251)[: Sarkar Jadunath ](https://archive.org/details/in.ernet.dli.2015.231251)[: Free Download, Borrow, and Streaming ](https://archive.org/details/in.ernet.dli.2015.231251)[: Internet Archive](https://archive.org/details/in.ernet.dli.2015.231251)
4) Battle of Assaye – Wikipedia [Battle of Assaye - Wikipedia](https://en.wikipedia.org/wiki/Battle_of_Assaye)


No comments:
Post a Comment