विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 5 September 2026

अंबोजी इंगळे यांचा गोसाव्यांवर विजय...!!

 


अंबोजी इंगळे यांचा गोसाव्यांवर विजय...!!

डिसेंबर १७९१ मध्ये महादजी शिंदे यांचे सरदार अंबोजी इंगळे यांचा मुक्काम चित्तोडगडजवळ होता. त्याच वेळी चित्तोडचे सुमारे पाच ते सात हजार गोसावी एकत्र जमून त्यांनी मराठा फौजेवर अचानक चाल केली.
दोन्ही बाजूंमध्ये तुंबळ लढाई झाली. या लढाईत मराठ्यांनी गोसाव्यांचा पराभव केला. सुमारे पाचशे गोसावी जखमी व ठार झाले, तर उरलेले शिकस्त खाऊन पळून गेले.
"चितोडकर गोसावी पांच सात हजार जमा होऊन, अंबोजी इंगळे यांजवर चालोन आले. परस्परें लढाई जाली. पांचशें गोसावी जखमी व ठार जाले. तदनंतर शिकस्त खाऊन पळोन गेले. इंगळेमजकुराचे फौजेचा मुक्काम चितोडगडनजीक आहे."
राजपुतान्यात मराठ्यांच्या फौजेला सतत अशा लढायांना सामोरे जावे लागत होते, याची ही समकालीन नोंद आहे.
संदर्भ : दिल्ली येथील मराठ्यांचीं राजकारणें (भाग २), संपादक – दत्तात्रय बळवंत पारसनीस, लेखांक ७३ (डिसेंबर १७९१).

No comments:

Post a Comment

#पवार #घराण्याची #उपनावे...

  #पवार #घराण्याची #उपनावे ... प्रथम मुलूखगिरी करताना काही खिताब (पदवी) मिळाले त्या पुढे तेच खिताब आडनाव म्हणून रुजू झाले. १) महिपतराव २) ...