पाडाव व वसाहत निर्मिती व ठराव
दुर्गा देवीचा दुष्काळ नंतर पाऊस पडला होता तेव्हा त्याच्या लक्षात आले की आपण आपन आपल्या बेचिराख प्रदेशातील लोकांना लुटूमार करून आपला उदरनिर्वाह करन्यासाठी सैन्य बळ शक्ती तयार केली ह्या भुपतराव बेरड ह्याने अनेक प्रशासकीय अधिकारी व गरीब लोकांना लुटून पुर्णपणे मोकळे केले.
तो खटाव भागात आपलं सैन्य बळ वापरून लोकांना लुटूमार करून राहीला .काही ठिकाणी रामोशी समाजातील लोक टोळ्या करून लोकांना लुटूमार करतं होते.
आसाच ऐक दुसरा पुंड मौजे भाडवनी कसबे मलवडी येथे सैन्य जमवुन लोकांना लुटूमार करून राहीला होता.
ह्या दोघांनी मिळून सर्व सामान्य जनतेला लुटून पुर्णपणे मोकळे केले होते.
सलग ३०साल दुर्गा देवीचा दुष्काळ पडला त्यामुळे लोक वस्ती नाहीशी झाली होती.पुढे पाऊस पडला.बेचिराग झालेल्या खटाव माण प्रांताला बेरड रामोशी पुंड लोक लोकांना लुटूमार करून राहीले.त्यामुळे त्या भागातील शेतकरी व सामान्य लोकांना खुपचं मनस्ताप झाला. होता.
त्यामुळे मनसबदार कामराज घाटगे यांना राजनैतिक मनस्ताप झाला होता.त्यामुळे बादशहास विनंती करून बादशही सरदार मल्लिक उल तिजार ह्याला आपल्या प्रजेच्या हितासाठी त्यांनी स्वाताचा कारकुन दादाजी नरसिंह व सैन्य दिले.महाराष्टातील बंडखोर लोकांचे बंड मोडून काढण्यासाठी कामराज घाटगे हे मनसबदार बादशहाच्या अधिक उपयोगी पडले होते अस पुरावे मिळतात.
कृष्णा नदीच्या काठाने कराड येथे आले.तेतुन खटाव माण प्रांतात घुसून बेरड रामोशी पुंड लोकांना दोन महिने युद्ध सुरू होते.काही किल्ले व गाव सर करून बेरड पुंड लोकांशी मैत्री केली व त्यांना जगण्यासाठी काही ठिकाणी गावं दिली.त्यात वाघीनगरा , चित्रदुरग,पाल गावी जागा देउन बेदरा स गेला .व कामराज घाटगे नी व त्यांच्या कारभारी मुतालिक दादाजी नरसिंह ह्यांच्यावर खटाव माण प्रांताची वसाहत स्थापन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.
कामराज घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली मुतालिक दादाजी नरसिंह ह्यांनी अनेक गावांची नावे ठेवली होती व वसाहत स्थापन करण्यात आलेल्या जून्या लोक लोकांना पुन्हा प्राधान्य दिले गेले गावांची कारभार करणारे पाटील व बारा बलुतेदार वतन दिली होती.
पहिल्या वर्षी जमीनीचा उसुल न घेता पुढे दर बिघ्यास ऐक तोबरा धान्य ठराव मंजूर मनसबदार कामराज घाटगे केला.त्या ठरावास "दादाजी नरसिंह तोब्रा"असे आजही प्रसिद्ध आहे.
मुस्लिम राजवटीत किती आल्प शेतसारा वसूली किती आल्प घेत हे सिद्ध होते.कामराज घाटगे यांनी दादाजी नरसिंह ह्याना ललगुण, मलवडी, खटाव गावाचे देशकुळकरन दिलें होतें.
सन १३६१पयत आत्ता ह्या प्रदेशातील लोकांचा वनवास संपवून गेला होता.भरपुर पाऊस पडला होता.धन धान्य ने लोक संपन्न झाले होते.आनेक गावाच्या गावं कामराज घाटगे व त्यांच्या मुतालिक यांनी वसवली ह़ोती.लोक वस्ती खुप वाढु लागली होती.
ह्या पुर्ण प्रदेशातील गावं कामराज घाटगे यांनी दादाजी नरसिंह ह्यांनी आपल्या दुरदुष्टीतुन साकारली होती.लोकांना वसाहत निर्मिती साठी वसुली न घेता पुढे दर बिघ्यास ऐक तोबरा धान्य ठराव मंजूर करण्यात आला होता.शिवाय पुढं बेरड रामोशी समाजाकडून लोकांना लुटूमार करून्या पासुन वाचवले.त्याही लोकांना जागा देउन त्यांच्या पोटा पाण्याचा कायम बंदोबस्त केला.आशा कामराज घाटगे व त्यांच्या मुतालिक दादाजी नरसिंह ह्यांना इतिहास कसा विसरू शकेल.
लेखन : नितीन घाडगे ( सरकार)
मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Subscribe to:
Post Comments (Atom)
राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी
राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी १७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...
-
25 सप्टेंबर 1750 रोजी नानासाहेब पेशवे व राजाराम महाराज द्वितीय यांच्यात सांगोला करार झाला सांगोला करार :- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थाप...
-
साळुंकीचे पाखरू अथवा साळुंकीचे पंख कुलचिन्ह अर्थात देवक : राजे साळुंखे चाळुक्य राजवंशाचे --------------------------- ---------------------...
-
मराठा सरदार राजे वाघ घराणे #काठापुर_वाडा__________ लेखन माहिती : Nitin Kemse मराठा साम्राज्य वाढवण्यासाठी होळकर शाहीने कंबर कसली होती.त्य...

No comments:
Post a Comment