8 SEP 1857
*फाशीचा वड*
१८५७ चा उठाव झाला. उत्तरेकडे उठवाचा जोर जास्त होता पण सातारा भागात सुद्धा हालचाली होत होत्या. यात रांगो बापूजी मोठ्या जिद्दीने लढले. ५०० रुपयाचे बक्षीस ठेवण्यात आले. ते भूमिगत झाले. त्यांच्या सोबत त्यांचे १६ साथीदार ही भूमिगत झाले. परंतू रंगो बापूजी यांचा मुलगा सीताराम बोरगाव येथे कंपनीच्या हाती लागला. त्यानंतर बाकीचे ही सापडले (फितुरी हा रोग हो दुसरं काय?).
सातारा गेंडामाळ येथील फाशीचा वड या ठिकाणी सतरा जणांना ईस्ट इंडिया कंपनीच्या न्यायमंडळाने शिक्षा सुनावली. तो खटला म्हणजेच सातारा राजद्रोहाचा खटला असे इतिहासात नमुद आहे. इंग्रज सरकारच्या अन्यायाला बळी पडून 17 वीरांना देहदंडाची शिक्षा सुनावली.
इ. सन 8 सप्टेंबर 1857 दिवस –
*फाशी देण्यात आले* :-
नारायण (नाना) बापू पावसकर ,
केशव निलकंठ चित्रे ,
शिवराम मोरेश्र्वर (बहुश्रुत) कुलकर्णी ,
विठ्ठल कोंडी (तात्या) वाकनीस ,
सीताराम रंगो गुप्ते,
*गोळ्या घातल्या* :-
रामजी बापूजी उर्फ रामसिंग चव्हाण ,
बांब्या हणगू शिरतोडे ,
नाम्या नाईक चव्हाण ,
शिवाजी सोमाजी पाटोळे,
पर्वजी विठोबा साळुंखे,
पाटलू येसू घाटगे,
*तोफेच्या तोंडी दिले* :-
*मुनाजी उर्फ बापू (नारायण) बाबर उर्फ भांदिर्गे, किकली*,
सखाराम बळवंत शेट्ये (चव्हाण),
बाब्या नाथ्या गायकवाड,
येशा नाथ्या गायकवाड,
गणेश सखाराम कारखानीस,
नान उमाजी रामोशी (मुडके).
या शूरवीर वीरांना मानाचा मुजरा.
यातील 70 % शहीद वीर भोर तालुक्यातील त्यावर संशोधन करून या अपरिचित वीरांना लवकरच मांवनदना देऊन अपरिचत मावळ्यांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करू
धन्यवाद,
आपलेच,
संतोष विठ्ठल खोपडे
नाटंबी ता भोर
** ऐतिहासिक मावळ प्रांत **
No comments:
Post a Comment