तंजावर मराठा दरबार स्थानिक पातळीवर अरमानई म्हणून ओळखले जाते आज भोंसले कुटुंबाचे अधिकृत निवासस्थान आहे ज्याने तंजावर येथे १६७४ ते १८५५ पर्यंत कब्जा केला होता...
तंजावर मराठा राजवाडा मूळ तंजावर नायक राज्यातील राज्यकर्त्यांनी बांधला होता तंजावर नायक राज्य पडल्यानंतर ते तंजावर मराठा यांचे अधिकृत निवासस्थान होते १७९९ मध्ये बहुतेक तंजावर मराठा राज्य ब्रिटीश साम्राज्याने वेढला तेव्हा तंजावर मराठ्यांनी राजवाड्यावर आणि आजूबाजूच्या किल्ल्यांवर ताबा मिळविला शेवटचा राजाशिवाजी दुसरे नंतरही भोसले घराण्याने राजवाडा धरला...
तांजोर ऊर्फ तंजावरचा काही भाग नायकांच्या ताब्यात होता तो १६७४ मध्ये व्यंकोजीराजे भोसले यांनी घेऊन तंजावरला भोसले घराण्याचे राज्य स्थापन केले अरकाट नवाब झुल्पिकार अली हा मूळ दुसरा खलिफा उमर बिन अल खताब यांचा वंशज असल्यामुळे मुस्लीम लोकांमध्ये नवाबाला महत्त्व होते.. १७०७ साली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल सत्ता उतरणीला लागली तत्कालीन अरकाट नवाब सादत अल्लाह १७१०-१७३२ याने अरकाटच्या स्वतंत्र राज्याची घोषणा केली... नवाब सादत आणि त्याच्या नंतरचा नवाब दोस्त अली यांनी अरकाट राज्यक्षेत्राचा विस्तार केला...
१७३६ साली त्यांनी मदुराचे राज्य घेऊन अरकाटमध्ये सामील केले पुढे १७४० साली मराठ्यांनी अरकाट राज्यातील दमालचेरी येथे नवाबावर आक्रमण केले दमालचेरीच्या खिडीत मराठे आणि अरकाटच्या फौजां मध्ये झालेल्या युद्धात नवाब दोस्त अली आणि त्याचा मुलगा हसन अली मारले जाऊन त्यांचा पराभव झाला दमालचेरीनंतर मराठ्यांनी अरकाटवर विनासायास कब्जा केला...
तमिळनाडुमध्ये महाराजांनी निर्माण केलेले राज्य व महाराष्ट्र या दोन राज्यांतील दुवा म्हणून पुढे मराठ्यांना उपयोग ही झाला पुढे व्यंकोजीराजे आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये झालेल्या तहात उत्तरेकडील काही किल्ले ही महाराजांनी व्यंकोजीराजेंना दिले...

No comments:
Post a Comment