विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 21 July 2021

खंडोजी माणकर

 


खंडोजी माणकर—

हा खरवलीचा राहणारा असून फिरंग्यांशीं १७३७ ते ४० पर्यंत मराठ्यांच्या ज्या लढाया झाल्या त्यांत एक प्रमुख लढवय्या होता. मानाजी व संभाजी आंग्रे यांच्या भांडणांत पेशव्यांनी शंकराजी फडक्याबरोबर यास मानाजीच्या मदतीस पाठविलें होतें. साष्टीबेट काबीज करण्याच्या कामी खंडोजीनें बरीच मेहनत केली. पटवर्धन, जोशी व खंडोजी यांनीं रात्रीचे चोरून छापे घालून ठाण्याचा किल्ला काबीज गेला. (२७।३।३७). त्या वेळीं तेथील किल्लेदारी खंडोजीकडेच सोंपविण्यांत आली. पुढें वसईच्या मोहिमेच्या वेळीं खंडोजीनें वांदरे, वेसावें व धारावी वगैरे ठिकाणें हस्तगत केलीं (फेब्रु. १७३९). वसई पाडाव करतांना खंडोजीनें वेष पालटून गुराखी म्हणून किल्ल्यांत नौकरी धरून भेद काढला होता. याचे वंशज कुलाबा जिल्ह्यांत माणगांव तालुक्यांत खरवलीस रहातात, त्यांनां खरवली वगैरे गांवें इनाम आहेत. [पेशव्यांची बखर; म. रियासत, मध्यविभाग].

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...