विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 26 July 2022

सरदार कृष्णाजी गायकवाड

 


सरदार कृष्णाजी गायकवाड
शिवरायांची पत्नी राणीसाहेब सकवारबाई यांचे बंधू सरदार कृष्णाजी बंकी गायकवाड , कवी पारामंद यांच्या परमानंद काव्यात शिवाजी महाराजांचे अंगरक्षक म्हणून जी नावे आहेत त्यामध्ये कृष्णाजी बांकी गायकवाड हे अग्रभागी होते
अफजल खान चालून आला त्यावेळी माणकोजी दहातोंडे , सुभानजी इंगळे ,जिवाजी देवकाते पिलाजी बेलदरे व संताजी बोबडे हे सरदार भेटायला गेले सोबत कृष्णाजी गायकवाड होते , शिवाजी राजांनी विचारले कि बेत कसा आखावा तेव्हा कृष्णाजी गायकवाड बोलले "आतून बारीक चिलखती झगा घाला बाहेरून मुसेजरी वापरा डाव्या हातात बिचवा आणि उजवीकडे छुपी वाग नखे पंजात लपवा कारण खान कापटी आहे दगाबाज आहे …….'' आणि झाले तसेच झाले खानाने कपाट केले महाराजांवर वार केला महाराजांनी खानच्या पोटात बिचवा फेकला वाघ नखांनी खानाचा कोथळा बाहेर काढला . महाराज जिंकले पण त्याच्या मागे गनिमी कावा होता तो सरदार कृष्णाजी बांकी गायकवाड यांचा हे इतिहास विसरला ……।
पण शिवराय विसरले नव्हते
म्हणून
अफजल खानच्या वधाच्या नंतर शिवाजी राजांच्या राजदरबारात अज्ञान दासाकडून पोवाडा सादर झाला त्यामधल्या ओळी
राजा विचारी भल्या लोकांला । "कैसें जावें भेटायाला" ॥
बंककर कृष्णाजी बोलला । "शिवबा सील करा अंगाला" ॥
भगवंताची सील ज्याला----। आंतून, (तो) बारिक झगा ल्याला ॥
मुसेजरीच्या सुरवारा । सरजा (जें) बंद सोडुन दिला ॥
डावे हातीं बिचवा त्याला (ल्याला) । वाघनख सरज्याच्या पंजाला ।
पटा जिव म्हाल्याप दिला । सरजा बंद सोडुन चालिला ॥२४॥

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...