विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 20 November 2025

२९ ऑक्टोबर १६६४ बार्सीलूरच्या छापा

 २९ ऑक्टोबर १६६४ बार्सीलूरच्या छापा

२९ ऑक्टोबर १६६४ बार्सीलूरच्या छाप्याचा विचार करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, आदिलशाहा व मोगल यांचे परस्पर संबंध या कसे होते, पूर्वीच्या परिस्थितीचे वर्णन डचांच्या तत्कालीन नोंदीत मिळते :
"ही लढाई म्हणजे मोगल व त्याचा वकील यांच्या समजुती करिता आदिलशाहा एक देखावा करित आहे, इतकेच. औरंगजेब आदिलशाहाला सारखा लिहीत आहे की, शिवाजी महाराजांविरुद्ध सेना उठवून त्याचे बंड मोड. जर तसे केले तर तीस लाखाची वार्षिक खंडणी माफ केली जाईल. न केले तर मात्र आदिलशाहीवरच स्वारी करण्यात येईल. परंतु ज्या गोष्टी ऐकण्यात येत आहेत त्यावरून असे दिसते की, या लढ्यात विशेष गांभीर्य नाही. कुडाळच्या वेढयात अजीजखान दूर सुरक्षित जागी राहिला होता व देसाईला तेव्हढा आघाडीवर पाठविला होता. लखम सावंताने हल्ले चढविले. त्यांतील काही थोडे यशस्वी झाले. आदिलशाही सैन्याने फारशी हालचाल केली नाही. पट्टागडीही लोकांनी कुचराई वगैरे केली, परंतु त्यांचे शासन केले नाही. शिवाजी महाराजांनी आदिलशाहाला तीस हजार पगोडे, हत्ती व २० उत्तम घोडे नजर केले. त्याचे आदिलशाहाला मोगलाविरुद्ध लढा देण्या बद्दल बोलणे चालले असून आदिलशाहाने तसे केले तर तो वार्षिक तीस हजार खंडणी देऊ करित आहे. त्या दोघांचा गुप्त करारही झाल्याचे बोलतात. आदिलशाहा शिवाजी महाराजांविरुद्ध लढण्याऐवजी मोगलांविरुद्धच लढेल असा लोकांचा कयास आहे...
मोगलाने जरी मैत्रीचा कितीही मैत्रीचा भाव दाखविला असला तरी त्याच्यापासून आदिलशाहीला धोका आहे ही समजूत आदिलशाही सरदारात पूर्णपणे जागृत होती. निजामशाहीचा मोड होताच याच कारणास्तव शहाजी महाराजांनी आदिलशाहाने जवळ केला होता. शहाजीमहाराजांचा मृत्यू पावल्याने मावळ घाटमाथ्यावरील लोक जर आपल्या बाजूस राहिले नाहीत व त्यांस मोगलाकडे जाऊ दिले, तर त्यांच्याच साह्याने आदिलशाहीची इतिश्री मोगल अगदी स्वल्प काळात करील, अशी भीती वाटत होती. शिवाय पठाणी सरदारांना शिवाजी महाराजांच्या सैन्यास डोंगर-जंगलांच्या व खाड्या-दलदलीच्या भागात तोड देण्याचे सामर्थ्य नव्हते. त्यांना मराठा बारगीरांवर नेहमीच अवलंबून राहावे लागे. त्याच प्रमाणे शिवाजी महाराजांना एका शत्रूशी लढा द्यावयाचा, तर सभोवतालच्या इतर शत्रूशी काही तरी कारण शोधून त्या अनुसंधानाने संगनमत करून आपली पिछाडी सुरक्षित राखण्याचा प्रयत्न करणे जरुरीचे भासत होते...
अशी जुट करीताना शिवाजी महाराज मात्र सामदामा दिभेदांना धरून सर्व उपाय योजित असे. आदिलशाहतील पठाणाच्या वर्चस्वाबद्दल मत्सर बाळगणाऱ्या रुस्तुम जमासारख्या सरदारांशी गुप्त मैत्री ठेवून आदिलशाहीतील मुलुखगिरीत ते एकमेकांचा बोज राखला जाईल, असा डाव समरंगणावर खेळत. याच कारणाने पठाणी सरदारांना या कोकण भागांत लढे देण्याची ताकद राहत नसे. हा जो राजकारणी खेळ चालू होता, त्यावरून साहजिकच डचांसारख्या त्रयस्थांना या लढ्यातील हेतूबद्दल संशय वाटत असे...
मोगलांच्या दटावणीस्तव आदिलशाहाने बेदनूरच्या स्वारीतून मोकळीक घेऊन शिवाजीराजेंच्या मुलखावर स्वारीचे चक्र जोरात सुरू केले होते. थोडाफार मुलूखही १६६४ च्या पावसाळ्यापूर्वी पादाक्रांत केला होता. साहजिकच मोगली राजकारणातून अवसर मिळताच शिवाजी महाराजांनी आदिलशाही परचक्राला तोड देण्याची पावसाळ्यात बरीच तयारी केली. आदिलशाही सरदारांनी कोकणात जरा अधिक जोर धरला होता. त्यांना राजापूर परत घ्यावयाचे होते. याचवेळी आदिलशाही पठाणाचे प्राबल्य मोडण्याकरिता शिवाजी महाराजांचे प्रयत्न चालू झाले. तसेच युरोपीय शत्रू परकीय पोर्तुगीज यांचाही बंदोबस्त करणे आवश्यक भासू लागले होते. समुद्रकिनाऱ्यावर आपली आरमारी सत्ता वाढवून परकीय सत्तांचा जो मुख्य आधार व्यापार त्यातही आपली शक्ती पणाला लावण्याकडे शिवाजी महाराजांचे लक्ष प्रथम कोकणात उतरल्या पासूनच लागले होते. याचे शब्दचित्र, संक्षिप्त का होईना, पण डचांच्या सप्टेंबर १६६४ मधील एका नोंदीत पाहावयास मिळते...
"In the meantime, Siwasi(Shivajiraje) took advantage of the fact that the Mogul's army had retired (June 1664) and announced that he had united with him (Mogul) for 22 lacks pagodas to be paid in 10 years. His forces consisted of 50,000 footmen and 10,000 horsemen whom he has kept together in the rainy season and moreover he has got 40 good frigates, which are all lying in the river of Currepattanam (Kharepatan) and Ragiapour (Rajapur) and another 50 frigates were on the stocks. It is duly confirmed that he is after something big, it appears from many circumstances that he will choose battle and that this will take place on the seaside not far from Wingurla (Vengurla). On an island opposite the village Harni (Harana) he is building a very strong castle and he still occupies the fortress Prapatghary (Pratapgadhi) where by he manages to warn his troops continuously of any alaram and from where he makes his profit as soon as opportunity arises. And although the King of Visiapour has got a considerable army in Caudel (Kudal) he is not strong enough to make Siwasi (Shivajiraje) evacuate that district...
यावरून १६६४ चा पावसाळा संपेपर्यत शिवाजी महाराजांची तयारी कशी झाली होती, हे समजून येते. परंतु या आरमारी तयारीचा रोख पोर्तुगीजांवर असावा, असा जरी डच व इंग्रज संशय घेत होते; तरी या आरमाराचा पहिला आघात कोठे व कसा होणार याची यत्किंचितही कल्पना या युरोपियन दयावर्दी लोकांना शिवाजी महाराजांनी येऊ दिली नव्हती, यात शंका नाही...
पावसाळा संपताच दिवाळीनंतर शिवाजी महाराजांनी आपले सैन्य आदिलशाही सरदारांवर स्वारी चढवून गेलेला मुलूख परत जिंकण्याच्या इराद्याने बाहेर काढले. शकवलीतील माहिती प्रमाणे १६६४ च्या ऑक्टोबरात आदिलशाहा व शिवाजी महाराज यांच्यात बिघाड झाल्यावरून महाराज सेनेसहवर्तमान गेले आणि बाजी घोरपडे यांस ठार मारीले. नंतर खवास खानाशी युद्ध करून त्याला अडचणीत पकडून पळावयास लाविले. तो घाटावर गेला. नंतर नोव्हेंबरात खुदावंतपूर वसूल केले ; परंतु कारवारकरांना २९ ऑक्टोबर १६६४ जी बातमी मिळाली, त्यात वेंगुर्ले बेचिराख केल्याचे व आदिलशाहाने शिवाजी महाराजांवर पाठविलेले सैन्य पराजित होऊन पळून गेल्याचे वृत्त होते. नंतर ५ डिसेंबरच्या गोव्याच्या पत्रात शिवाजी महाराजांचा मुक्काम फोंड्यापर्यत आल्याचे आणि शिवाजी महाराजांजवळ ८०० स्वार व १००० पायदळ असल्याचे लिहिले आहे..
@rambdeshmukh

No comments:

Post a Comment

#द ग्रेट मराठा #श्रीमंत महादजी बाबा शिंदे

  पानिपतच्या लढाईत पठाण घोडेस्वाराने केलेल्या तलवारीच्या तडाख्याने महादजींचा एक पाय कायमचा अधू झाला ; परंतु तशाही जायबंदी अवस्थेत महादजी सुख...