इंग्रजांच्या मदतीला पोटाल्याचा डोंगर धावून आला.
इतिहास एका रात्रीत घडत नसतो. जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेले परिश्रपूर्वक काम आणि चतुराई मुळे मराठा साम्राज्य घडले , तसेच इंग्रजांनी मराठा साम्राज्याचे दुही आणि कमकुवत झालेला आरमाराचा फायदा घेतला. रायगड फितुरी शिवाय पडणे शक्य नाही असा समज त्यांनी दूर केला ते भूगोल च अभ्यास आणि नवीन तंत्रज्ञान वापरून.
रायगड अभेद्य आणि कणखर असला तरी इंग्रजांच्या मदतीला पोटाल्याचा डोंगर धावून आला. या डोंगरावर इंग्रजांनी खांद्यावरून तोफा चढविल्या आणि तिथून रायगड वर तोफ्यांचे गोळे डागली.
(रायगड वरून दिसतो तो हा पोटल्याचं डोंगर)
पेशवे च काळात रायगड चे महत्त्व कमी होत गेले . कारण भारतातल्या अनेक शाही आदिलशाह, कुतुबशाही आणि मुघल हे मराठ्यांच्य पराक्रम मुळे कमजोर होत गेले . त्यामुळे strategically रायगड चे महत्व कमी होणे हे नक्कीच झाले. सिद्दी ला सुद्धा अंकुश मध्ये ठेवलेले आणि इंग्रज ना नाना फडणवीस आणि माधवराव पेशवे सोडून बाकीच्या राज्यकर्ते नी दुर्लक्ष केले . राघोबा दादा नी बारभाई विरुद्ध मदत मागितली आणि इंग्रजांनी नाक खुपसत गेले. सुरुवातीला मराठ्या कडे नाना फडणवीस ,महादजी शिंदे तुकोजी होळकर सारखे मुत्सद्दी आणि रण झुंजार होते तो पर्यंत इंग्रजांची डाळ शिजली नाही. मात्र हे सर्व महान लोक 1795 ते 1800 मध्ये मरण पावले आणि मराठांच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली. दुसरा बाजीराव सारखा दुर्गुनी पेशवा आणि दौलतराव शिंदे सारखा अविचारी माणूस मुळे यशवंत राव होळकर ला दुखावले. तिथून मराठ्यांची वाताहत सुरू झाली.
दुसरा बाजीराव , बापू गोखले, त्रम्बकजी डेंगळे यांनी मिळून स्वराज्य वाचवण्यासाठी पेंधाऱ्याची मदत घेऊन प्रयत्न केले , पण तो पर्यंत खुप उशीर झालेले होता. होळकर शिंदे गायकवाड भोसले सारखे संस्थानिक आता इंग्रजांशी स्वतंत्र वाटाघाटी चालू केल्या.
१८१८ मध्ये इंग्रजांनी पूर्ण फास आवळत चालले होते. रायगड घेणे साठी त्यांनी कर्नल प्रॉयर ने वेढा घातला. त्यावेळी प्रतापगड आणि कांगोळ मधील मराठी सैनिक रायगड चा मदतीस धावले. त्या वेळी लेफ्टनंट क्रोसबी ने महाड चे सैनिक घेऊन या सैनिक ना अडवले. रायगड एकटाच झुंजत होता. दुसऱ्या बाजीराव ची शहाणी बायको वाराणसी बाई त्यावेळी किल्ल्यावर होती. इंग्रजांनी तिच्या जाण्यासाठी मार्ग मोकळा केलांपण वाराणसी बाई ने किल्ला सोडण्यास नकार दिला आणि लढाई सकाळी ठेवण्याचा मानस ठेवला.
इंग्रजांनी पोटल्याच्या डोंगराचा आधार घेतला. तिथे तोफा नेल्या आणि तिथून मारा चालू केला. ६ मे १८१८, एक ८इंचाचा तोफेचा गोळा सरळ वाराणसी बाई च वाड्यावर पडला आणि आग लागली. किल्लेदाराने आता वाराणसी बाई ल किल्ला सोडण्याचा विचार करायला सांगितला. वाराणसी बाई नी शरणागती ची कलमे ठरवू लागली.७ मे ते ९ मे पर्यंत किल्लेदार शेख बोलणी करत होता पण तो पर्यंत इंग्रजांनी तोफेचा मारा चालूच ठेवला. त्यामुळे मराठे दडपण खाली होते. या तोफा मारा मुळे रायगडचे सर्व इमारती नाश्ता झाल्या. फक्त एक धान्याचे कोठार आणि एक घर सोडले तर काहीच शिल्लक राहिले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सुद्धा इजा पोहोचली. १० मे १८१८ ल रायगड इंग्रजांच्या ताब्यात आला. कर्नल प्रॉयर ने स्वतः वाराणसी बाई ची भेट घेतली.कर्नल प्रॉयर त्यावेळी इंग्रजांना पत्र पाठवून किल्ला पुन्हा दुरुस्त करावा अशी मागणी केली .
कर्नल प्रॉयर ने वाराणसी बाई ना मनानें पुण्याला पाठवले. जाताना खाजगी मालमत्ता हत्ती उंट घेऊन दिले. त्यांना पुण्याच्या विश्रामबावाडा इथे राहायला सांगितले.
कर्नल प्रॉयर ने १२ मे १८१८ मध्ये ब्रिगेड ऑर्डर मध्ये नोंदणी करून ठेवली ती अशी लेफ्टनंट रेमन, जोफ आणि वूड यांनी मोलाची कामगिरी बजावली .हे तिघे मेजर बॉण्ड यांच्या हाताखाली तोफखाना च यांत्रिकी भागात प्रशिक्षण घेतले.




.jpg)
