विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 27 April 2026

मुघलांच्या २२ सुभ्यांचा अधिकार मराठ्यांकडे..

 


मुघलांच्या २२ सुभ्यांचा अधिकार मराठ्यांकडे..

​१७५३ मध्ये अहमदशहा अब्दाली फौज घेऊन चालून आला. त्याने आपला वकील दिल्लीला पाठवला आणि मुघल बादशहाकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागितली.
​त्यावर दिल्लीच्या दरबाराने अब्दालीच्या वकिलाला स्पष्ट उत्तर दिले. बादशहा आणि वजीराने त्याला सांगितले की, "आता दिल्लीचे रक्षण मराठे करणार आहेत. बादशहाने मराठ्यांना आग्रा आणि अजमेर हे सुभे दिले आहेत. तसेच, मुघलांच्या पूर्ण २२ सुभ्यांची चौथाई वसूल करायचा अधिकार फक्त मराठ्यांना दिला आहे. त्यामुळे आता सर्व अधिकार मराठ्यांकडे आहेत!"
​अब्दालीला रोखण्यासाठी दिल्लीचा बादशहा पूर्णपणे मराठ्यांवर अवलंबून होता. याची नोंद अंताजी माणकेश्वरांच्या पत्रात मिळते
"हजरत आबदालीची मोहीम महाठियानी कबूल केली. हजरतनी त्यास आजमेर आकबराबाद दोंन सुमें नामांकित दिल्हे व दरोबस्त बाविसा सुभियांची चौथ दिल्ही व पैका देऊन सर्व येख्तार मराठियांचा ठेविला."
​संपूर्ण २२ सुभ्यांचा अधिकार मराठ्यांच्या हातात होता, हे या पत्रावरून स्पष्ट होते.
​संदर्भ-
१. पेशवे दप्तर भाग २१, पत्र क्रमांक ५३, पृष्ठ क्रमांक ६६
(८ फेब्रुवारी १७५३).

No comments:

Post a Comment

मराठ्यांच्या गनिमी काव्याने हादरलेला मुघल बादशाह

  मराठ्यांच्या गनिमी काव्याने हादरलेला मुघल बादशाह इ.स. १६८१. मुघल सम्राट औरंगजेब स्वतः जवळपास पाच लाखांच्या प्रचंड सैन्यासह दख्खनमध्ये उतरल...