विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 27 April 2026

दिल्लीची पातशाही पालथी घालणारे मराठे

 





दिल्लीची पातशाही पालथी घालणारे मराठे

​एक काळ असा होता की दिल्ली मराठ्यांचे राज्य संपवण्याचे स्वप्न पाहत होती, पण आता त्याच दिल्लीच्या तख्तावर कोण बसणार, हे मराठे ठरवत होते..
​१७५४ मध्ये मुघल बादशहाने मराठ्यांशी दगाफटका करण्याचा प्रयत्न केला. पण मराठ्यांनी मुघलांचा हा डाव उधळून लावला. मराठ्यांच्या भीतीने बादशहा आणि वजीर आपली संपत्ती आणि बेगमांना सोडून पळून गेले.
​मराठ्यांनी दिल्लीवर ताबा मिळवला आणि बादशहा अहमदशहा याला कैद केले. त्याच्या जागी त्यांनी आजुजिदीन नावाच्या शाहजाद्याला गादीवर बसवले. विशेष म्हणजे, मराठ्यांनीच त्याचे #आलमगीर असे नामकरण करून त्याला दिल्लीच्या तख्तावर बसवले. दिल्लीचा बादशहा कोण असावा आणि त्याचे नाव काय असावे, हे ठरवण्याइतकी मोठी ताकद मराठ्यांनी निर्माण केली होती.
​पेशवे दप्तरातील नोंद-
"अहमदशाह कैंद करून आजुजिदीन नामे शाहजादा होता त्यास तख्तावर बसविले. आलमगीर नाव ठेविले... साडेब्यायंशी लक्ष रुपये वजिरानी यांसी करार केले आहेत."
​दिल्लीच्या तख्तावर मराठ्यांनी बसवलेला आणि स्वतः नाव दिलेला बादशहा ही मराठा राज्याच्या वाढत्या वचकाची सर्वात मोठी साक्ष आहे.
​संदर्भ-
१. पेशवे दप्तर भाग २१, पत्र क्रमांक ६०, पृष्ठ क्रमांक ६९ (१७ जुलै १७५४).

No comments:

Post a Comment

खिळचीपूर संस्थानाची सनद..!!

  खिळचीपूर संस्थानाची सनद..!! रतलाम आणि सैलानाप्रमाणेच माळवा प्रांतातील खिळचीपूर हे देखील एक महत्त्वाचे संस्थान होते. या संस्थानावरही शिंदे ...