विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 27 April 2026

जाटांचा पराभव आणि ६५ लाखांची युद्धखंडणी

 




जाटांचा पराभव आणि ६५ लाखांची युद्धखंडणी

पानिपत युद्ध झाले मराठ्यांची एक पिढी जागीच कामी आली,समस्त हिंदुस्थानात ऐतिहासिक घडा मोडी झाली,मराठ्यांची सत्ता अस्ताला जाती की काय अशी परिस्थिती निर्माण झाली, उत्तरेतील मराठ्यांची ही स्थिती पाहून लहान मोठ्या हिंदू मुस्लिम सत्तांनी मुंडकी वर काढायला सुरुवात केली,
इकडे दक्षिणेत पुणे दरबारात सत्तेसाठी चढा ओढ सुरू होती,याच राजकारणाचा फटका महादजी शिंदे या नव्या दमाच्या सरदाराला बसला,राघोबाने शिंदेशाहीची वस्त्रे देण्यास विलंब केला,राघोबाला भविष्यात महादजी शिंदे डोईजड होतील म्हणून त्यांनी कुरघोड्या करण्यास सुरू केल्या,अखेर महादजींना शिंदेशाहीची वस्त्रे मिळाली,
१७६९ साली पानिपतचा पराभवाचा कलंक,उत्तरेरील मराठ्यांची शानशौकत व उत्तर हिंदुस्थानात सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी मोहीम आखली गेली, दक्षिणेतून रामचंद्र गणेश कानडे, विसाजीकृष्ण बिनवले आपल्या फौजीनिशी आले उत्तरेत शिंदे होळकर पवार यांच्या फौजा येऊन मिळाल्या,
उत्तरेत उभ्या ठाकलेल्या या मराठ्यांच्या फौजेचा पहिला सामना भरतपुरच्या जाटाशी झाला, भरतपुरचा राजा जवाहरसिंगच्या मृत्यू नंतर त्याच्या वारसामध्ये सत्ता संघर्ष सुरू झाला, रणजितसिंहाने लष्करी सह्ययतासाठी मराठ्यांच्याकडे धाव घेतली,संधी चालून आलेली पाहून मराठ्यांनी उचल खाऊन नवलसिंग जाटाचा निर्णयक पराभव केला,सलामीलाच उत्तर मोहिमेतील मराठ्यांनी यश प्राप्त केले यामुळे अनेकांचे धाबे दणानले,मराठ्यांच्या फौजेत वीरश्री संचारु लागली लढण्याची नवीचेतना मिळू लागले,पानिपतचा बदला घेईला मराठ्यांनी सुरू केला,बेईमानी केलेल्या प्रत्येकाचा समाचार घेण्यास मराठ्यांनी प्रारंभ केला,
लागलीच जाटांची आग्रा व मथुरा ही शहरे जिंकून घेतली पुढे मथुरा येथे महादजी शिंदे यांनी दारू गोळ्याच्या कारखान्याची निर्मिती केली,
जाटांच्या प्रदेशात मराठ्यांनी धुमाकूळ घालून नवलसिंगला घायकुतीला आणला शेवट जाट राजा नवलसिंग याने शरणागती पत्करली व सप्टेंबर १७७० मध्ये मराठ्यांशी तह केला. या तहाचे मुद्दे
१)२०लाखांची जहागीर स्वीकारून जाटांनी मराठ्यांचे मांडलिकत्व पत्करले
२)युद्धखंडणी म्हणून ६५ लाख रुपये देण्याचे मान्य केले
३)वार्षिक ११ लक्ष रुपये खंडणी देण्याचे कबूल केले,
भरतपुरच्या जाटांना मराठ्यांनी नमवताच उत्तरेत मराठ्यांची दहशत दरारा पुन्हा प्रस्थापित झाली,आज नाही तर उद्या या दख्खनी मराठ्यांना आपण नर्मदेपार पिटाळून लावू या भ्रमक समजुतीत खुशीची गाजरे खाणाऱ्या उत्तरेतील हिंदू मुस्लिम राज्यकर्त्यांची झोपच उडाली!
पानिपतची भळ भळती जखम पचवून मराठे हिंदुस्थानात पुन्हा सिद्ध झाल्याची जानवी स्वकीय सत्ता आणि परकीय बंगालच्या ब्रिटिश सत्तेलाही झाली!
#हर हर महादेव
#संदर्भ-महादजी शिंदे आणि नाना फडणवीस
#श्रीनाथ माधवराव शिंदे
#शिंदे घराण्याचा इतिहास
#दौलतराव शिंदे कार्य आणि कर्तृत्वकाळ

No comments:

Post a Comment

खिळचीपूर संस्थानाची सनद..!!

  खिळचीपूर संस्थानाची सनद..!! रतलाम आणि सैलानाप्रमाणेच माळवा प्रांतातील खिळचीपूर हे देखील एक महत्त्वाचे संस्थान होते. या संस्थानावरही शिंदे ...