विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 27 April 2026

चाफाजी शिंदे

 स्वराज्य उभे राहिले ते चाफाजी शिंदे यांच्यासारख्या अनेक अपरिचित सरदारांच्या कष्टावर. इतिहास वाचताना अनेकदा मोठी नावे समोर येतात, पण त्यांच्यासोबतच अनेक निष्ठावान सरदार पडद्यामागे राहून लढत होते.






चाफाजी शिंदे हे अशाच पैकी एक पराक्रमी नाव. त्यांच्याकडे पाच हजार पायदळ सैन्याचे नेतृत्व होते, ज्याला पदात पंचहजारी असे म्हटले जात असे.

सन १७०४ च्या सुमारास लोहगड किल्ला जिंकण्याची मोठी मोहीम हाती घेण्यात आली होती. हा काळ मराठ्यांच्या संघर्षाचा होता. लोहगडसारखा बळकट किल्ला पुन्हा स्वराज्यात आणणे सोपे नव्हते. चाफाजी शिंदे यांनी या मोहिमेसाठी स्वतः मेहनत घेऊन मोठी फौज जमवली आणि जिद्दीने ही लढाई लढली. त्यांच्या या कष्टाचे आणि एकनिष्ठेचे फळ म्हणून त्यांना स्वराज्यातून सन्मान मिळाला.
पेशवे दप्तरातील पत्र
श्री
मशरूल अनाम चाफाजी सिंदे पदात पंच हजारी यासी बहिरी मोरेश्वर प्रधान आशीर्वाद सुहूर सन खमस मया व अलफ. तुम्ही या राज्यांत कस्ट मेहणत एकनिष्टपणे केली च हाठी लोहगडचे प्रसंगी जमावणसी श्रम केला, यावद्दल तुम्हास वक्षीस घोडा वा तुपटा पेदस्त किले लोहगड पौौ किमत रुशा ७५ पचाहतरीत नदर यास खडून दिली असे. यास कोन्ही कृथला करावयास प्रयोजन नाहीं.. छ २४ रमजान. लखनसीमा.
चाफाजी शिंदे यांनी स्वराज्यासाठी जे कष्ट घेतले आणि लोहगडच्या मोहिमेत सैन्य जमवण्यासाठी जी मेहनत केली, त्याबद्दल त्यांना ७५ रुपये किमतीचा एक घोडा आणि एक दुपटा बक्षीस म्हणून दिला. ही घटना छत्रपती शाहू महाराज गादीवर येण्यापूर्वीची आहे. चाफाजी शिंदे यांच्यासारख्या अपरिचित सरदारांनी आपल्या रक्ताचे पाणी करून किल्ले जिंकले आणि स्वराज्य टिकवले, हेच या पत्रातून दिसून येते.
संदर्भ: पेशवे दप्तर, पत्र क्रमांक ८७ (१२ डिसेंबर १७०४).

No comments:

Post a Comment

खिळचीपूर संस्थानाची सनद..!!

  खिळचीपूर संस्थानाची सनद..!! रतलाम आणि सैलानाप्रमाणेच माळवा प्रांतातील खिळचीपूर हे देखील एक महत्त्वाचे संस्थान होते. या संस्थानावरही शिंदे ...