विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 18 July 2026

सरसेनापती संताजीराव घोरपडे

 साधारण सांगली कोल्हापूर भागातली मोठासा भाग संताजी घोरपडे यांच्या कडे देशमुखी म्हणून होते. खालील पत्र १६९२ मधील छत्रपती राजाराम महाराजांचे आहे.हे पत्र संताजी घोरपडे ने यांनी १६८९ पासून १६९२मध्ये गाजवलेल्या पराक्रम च आहे. जेंव्हा छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृण हत्या झाली तेंव्हा मराठे संपले अशी संपूर्ण भारताची धारणा झालेली असताना संताजी ने एकहाती मुघल वार भीषण हल्ले केले. लक्षात घ्या यावेळी धनाजी त्यामानाने थोडे वयाने लहान होते. सांगली जिल्ह्यातील विटा मध्ये भालवणी नावाच्या गावात त्यांचा वाडा होता.त्यांच्या मानस पुत्र नारो महादेव जोशी या कडे इचलकरंजी ची जहागिरदार गेली तिथेच बाजीराव पहिल्या यांची बहीण अनुबई याना घोरपडे कुटुंबात दिली. (पुढे नारो महादेव जोशी यांनी आपले आडनाव घोरपडे केले ते संताजी साठी, तपण मूळ ते ब्राम्हणच) कापाशिकर घोरपडे सुद्धा त्यांचाच जहागिरदार च भाग.


सरसेनापती संताजीराव घोरपडे यांना दोन पत्नी होत्या. पहिल्या सोयराबाई दुसर्या द्वारकाबाई होय. सोयराबाई यांना राणोजी तर द्वारकाबाई यांना पिराजी हे पुत्र होय. तारिख दिलकुशा मध्ये भीमसेन सक्सेना लिहिते की, "संताजीच्या निधनानंतर पुढे ५ -६ वर्ष राणोजीने आपल्या वडिलांप्रमाणे मुघल सैन्याशी निकराची झुंज दिली. शिपाईगिरीत तो आपल्या वडिलांच्या पेक्षा दोन पावले पुढे होता. त्यावरुन १७०१ ते१७०२ हे वर्षे राणोजी घोरपडे यांनी गाजवून सोडलीे होती.
सन १७०२ मध्ये कनार्टकतील वाकीनखेड्याच्या लढाईत चंदनगढीला मराठ्यांच्या वेढा घातला असता बेडरविरूध्दच्या लढाईत राणोजींना बंदुकीच्या गोळी लागून वीर मरण प्राप्त झाले. राणोजींना पुत्र संतती नव्हंती. त्यांच्या मृत्यूनंतर आई सोयराबाई या आपल्या दिराकडे म्हणजे बहिर्जी घोरपडे हिंदूराव यांच्याकडे गजेंद्रगड येथे राहत होत्या.त्यांच्या नेमणुकीस बहिर्जी घोरपडे हिंदूराव यांनी मौज गंगावती प्रांत हुक्केरी व आणखी काही गावे लावून दिली होती. राणोजींच्या पत्नी संतूबाई होत. त्या राणोजींच्या निधनानंतर त्यांना कसबा कापशी सुभा आजरे हा गाव व इतर आणखी उत्पन्न नेमून दिले होते. त्या संताजीची द्वितीय पत्नी द्वारकाबाई जवळ राहत होत्या. राणोजीच्या अकाली निधनानंतर सेनापती घोरपडेच्या घराण्यावर आलेलेल्या संकटातून बाहेर काढले ते सरसेनापती संताजींच्या द्वितीय पत्नी द्वारकाबाई साहेब यांनी.अशा अवघड प्रसंगी त्यांना साथ दिलीे ती संताजींचे मानसपुत्र नारो महादेव घोरपडे (जोशी) यांनी होय. छत्रपती राजाराम महाराज यांच्या निधनानंतर राजपुत्र शिवाजी (दुसरे) यांना रणराणी, महाराणी ताराबाई साहेब यांनी गादीवर बसवून स्वतः महाराणी ताराबाई साहेब यांनी राज्यकारभार व सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली वर सेनापती पद अनुभवी व पराक्रमी धनाजीराव जाधवराव यांना दिले. ते योग्य सुध्दा होते. सेनापती राणोजींचा, सेनापती धाकटा भाऊ पिराजी यास द्या हि मागणी द्वारकाबाई साहेब यांनी केली पण पिराजी हा लहान होता म्हणून शक्य झाले नाही परंतु महाराणी ताराबाई साहेब यांनी इ. सन १७०३ मध्ये पिराजीच्या नावे वडिलोपार्जित सरंजामदार चालु ठेवण्यासाठी १३ नोव्हेंबर रोजी द्धारकाबाई साहेब घोरपडे यांनी करुन घेतला. पण त्यांना सेनापती पद दिलो नाही. याची रुखरुख द्वारकाबाई साहेब यांना लागून राहिली. पण या काळात औरंगजेब बादशहा इरेला पेटला होता व मराठ्यांच्या अंत्यत आणीबाणीच्या कालावधीत द्वारकाबाई साहेब यांनी सेनापती पदाचा विचार सोडून मानसपुत्र नारो महादेव जोशी यांच्याकडे सैन्य देऊन औरंगजेब विरोधात महाराणी ताराबाईसाहेब यांना साथ दिली. व सरंजामाचा कारभार आपल्या हातात घेऊन योग्य उत्पन्न मिळत ठेवले कारण सैन्यात पगार वगैरे वेळेवर देऊन औरंगजेब विरोधात जोरदार लढाईत पुढाकार घेतला. तसेच बहिर्जी घोरपडे याच्याशी समजूतशीर भूमिका घेतली. महाराणी ताराबाई साहेब यांना भेटून छत्रपती घराण्यावर निष्ठा कायम ठेवत असे आशिर्वाद घेतले. १७१० नंतर छत्रपतीच्या दोन गादी निर्माण झाल्या. सातारा व कोल्हापूर. महाराणी ताराबाई साहेब यांना पिराजी घोरपडे हे ११ - १२ वर्षेचा आहेत म्हणून सेनापती पदी बहिर्जी घोरपडे गजेदगडकर यांचा पुत्र शिदोजीराव घोरपडे यांच्या कडे दिले.
कापशीकर घराण्यातील सेनापती पद घोरपडेंच्या दुसऱ्या शाखेकडे गेल्यामुळे मोताश्री द्वारकाबाई साहेब या नाराज झाल्या. पण पुढे १५ जुन १७२१ मध्ये शाहू महाराजांनी पिराजी घोरपडे यांच्या नावाने सनद दिली . ती सनद दिली खालीलप्रमाणे
असून त्यात पिराजी सेनापती असा उल्लेख आहे पुढे १७२८ ला मौजे नागनूर कर्योत नूल येथील छत्रपतींना पाळेगराचा त्रासाचा बंदोबस्त करण्यासाठी गेलावर तेथील देशमुखशी लढाईत पिराजी मृत्यू झाले. त्यांच्या निधनानंतर मुलगा राणोजी (२)यांस सेनापतीपदी नियुक्त केले

No comments:

Post a Comment

बाजीराव पेशव्यांचे पालखेडचे युद्ध.

  इतिहासात अशी काही युद्धे आहेत ज्यांनी केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगातील लष्करी अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतले. त्यापैकी एक म्हणजे छत्रपत...